Click Live News Short news on Mobile 2019.....: Tajya news Feeds

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......
Showing posts with label Tajya news Feeds. Show all posts
Showing posts with label Tajya news Feeds. Show all posts

Tuesday, April 13, 2021

डॉ. बाबासाहेबांनी आजवर केलेली 'ही' मंदिर सत्याग्रहे! काळाराम मंदिर प्रवेश भारतीय इतिहासातील मोठा लढा

नाशिक : काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपणाला माहीतच आहे.
माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरिता बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. "देव्हाऱ्यात जनावरांना जायला परवानगी आहे परंतु दलितांना का नाही. आम्हीही माणसेच आहोत." हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक मंदिर सत्याग्रह केलेली आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ.

काळाराम मंदिर सत्याग्रह

काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. हा लढा २ मार्च १९३० ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. बाबासाहेबांचे जवळचे सहकारी असलेले नाशिकचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी हा सत्याग्रह सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. हा मंदिर प्रवेश लढा भारतीय इतिहासातील मोठा लढा समजला जातो.

समानतेचा अधिकारासाठी संघर्ष

 काळाराम मंदिर सत्याग्रह हा देव दर्शनासाठीचा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी मंदिर प्रवेशाचा तो संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मूर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू बाबासाहेबांच्या चळवळीमागे होता.

 

पर्वती मंदिर सत्याग्रह

हा पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेशासाठी इ.स. १९२९ मध्ये केला गेलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह होता. पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' हे अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा अमरावती नंतरचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील आंबेडकरांच्या वतीने एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम.एम.जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.

 

अंबादेवी मंदिर सत्याग्रह

अमरावती येथील प्राचीन 'अंबादेवी मंदिरात' प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला होता. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.

 

हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठी सत्याग्रह
हिंदू धर्मातील ईश्वरांची पूजा करण्यासाठी बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.

 

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन झालेली भारतातील काही मंदिर प्रवेश सत्याग्रहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काळाराम मंदिर सत्याग्रह

इ.स. १९३१ - ३५

एम.एम. जोशी यांचा पर्वती मंदिर सत्याग्रह

इ.स. १९२९

डॉ. पंजाबराव देशमुख यांचा अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रह

इ.स. १९२८

साने गुरुजी यांचा पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सत्याग्रह

इ.स. १९४७

भंगीकाम करणाऱ्या २०० दलित महिलांचा काशी विश्वनाथ मंदिरात (पहिल्यांदाच) प्रवेश आणि पूजा 

२० जून २०११

अस्पृश्य महिलांचा राजस्थानच्या नाथद्वारा मंदिरात प्रवेश

इ.स. १९८८

अस्पृश्य महिलांचा ओरिसामधील जगन्नाथ मंदिरात प्रवेश

२००६

गढवालमधल्या जौनसर बावर तालुक्यातील परशुराम राम मंदिरात महिलांना व अस्पृश्यांना प्रवेश; (४०० वर्षे असा प्रवेश नव्हता)

१६ जानेवारी २०१६

Tajya news Feeds https://ift.tt/3dgwkLP

डॉ. बाबासाहेबांनी आजवर केलेली 'ही' मंदिर सत्याग्रहे! काळाराम मंदिर प्रवेश भारतीय इतिहासातील मोठा लढा नाशिक : काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपणाला माहीतच आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरिता बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. "देव्हाऱ्यात जनावरांना जायला परवानगी आहे परंतु दलितांना का नाही. आम्हीही माणसेच आहोत." हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक मंदिर सत्याग्रह केलेली आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ. काळाराम मंदिर सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. हा लढा २ मार्च १९३० ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. बाबासाहेबांचे जवळचे सहकारी असलेले नाशिकचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी हा सत्याग्रह सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. हा मंदिर प्रवेश लढा भारतीय इतिहासातील मोठा लढा समजला जातो. समानतेचा अधिकारासाठी संघर्ष  काळाराम मंदिर सत्याग्रह हा देव दर्शनासाठीचा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी मंदिर प्रवेशाचा तो संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मूर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू बाबासाहेबांच्या चळवळीमागे होता.   पर्वती मंदिर सत्याग्रह हा पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेशासाठी इ.स. १९२९ मध्ये केला गेलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह होता. पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' हे अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा अमरावती नंतरचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील आंबेडकरांच्या वतीने एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम.एम.जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.   अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावती येथील प्राचीन 'अंबादेवी मंदिरात' प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला होता. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.   हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठी सत्याग्रह हिंदू धर्मातील ईश्वरांची पूजा करण्यासाठी बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.    हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन झालेली भारतातील काही मंदिर प्रवेश सत्याग्रहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काळाराम मंदिर सत्याग्रह इ.स. १९३१ - ३५ एम.एम. जोशी यांचा पर्वती मंदिर सत्याग्रह इ.स. १९२९ डॉ. पंजाबराव देशमुख यांचा अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रह इ.स. १९२८ साने गुरुजी यांचा पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सत्याग्रह इ.स. १९४७ भंगीकाम करणाऱ्या २०० दलित महिलांचा काशी विश्वनाथ मंदिरात (पहिल्यांदाच) प्रवेश आणि पूजा  २० जून २०११ अस्पृश्य महिलांचा राजस्थानच्या नाथद्वारा मंदिरात प्रवेश इ.स. १९८८ अस्पृश्य महिलांचा ओरिसामधील जगन्नाथ मंदिरात प्रवेश २००६ गढवालमधल्या जौनसर बावर तालुक्यातील परशुराम राम मंदिरात महिलांना व अस्पृश्यांना प्रवेश; (४०० वर्षे असा प्रवेश नव्हता) १६ जानेवारी २०१६ Tajya news Feeds https://ift.tt/3dgwkLP

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3mKiuoc
Read More
तरुणाईचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन; "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' 

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यंदा तरुणाईकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यातून जमणारी मदत आजही चळवळ नेटाने पुढे नेणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून 26 जून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत हा अनोखा उपक्रम होणार आहे. दरम्यान, राज्यभरातील शाहिरांनी यंदा "आम्ही आंबेडकरवादी' हे अभिमानगीत साकारले असून, ते यूट्यूब चॅनेलवर आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाले आहे. 

"माझ्या दहा भाषणांची ताकद शाहिराच्या एका गाण्यात आहे,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत. मात्र, कोरोनाच्या काळात चळवळीतील हीच शाहीर आणि कलाकार मंडळी जगण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या वर्षीपासून एकही कार्यक्रम झाला नाही आणि आता आंबेडकर जयंतीच्या अगोदरच कोरोनाचा पुन्हा कहर झाला असल्याने यंदाही कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या या शाहीर व कलाकारांना धान्याबरोबरच जीवनावश्‍यक साहित्यासाठी समाजातील दातृत्वाला साद घातली आहे.

धान्य, कडधान्य, साखर, खाद्यतेल, शैक्षणिक साहित्य व आर्थिक स्वरूपात ही मदत बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात स्वीकारली जाणार आहे. ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशन आणि अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे कबीर नाईकनवरे, हरीश कांबळे, धीरज कठारे, रविराज सदाजय, हर्षवर्धन कांबळे, नितीन कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

असाही विचारांचा जागर 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीला माहिती व्हावेत, या उद्देशाने "आम्ही आंबेडकरवादी' या गाण्याची निर्मिती झाली आहे. सांगलीच्या शाहीर दीपक गोठणेकर यांनी हे गीत लिहिले असून शिरीष पवार, प्रवीण डोणे (मुंबई), कबीर नाईकनवरे, स्नेहलता सातपुते (कोल्हापूर), चरण जाधव (औरंगाबाद) या शाहिरांनी ते गायिले आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेत विजयकुमार नागदिवे असून दुष्यंत इनामदार यांचे नृत्य दिग्दर्शन आहे. नीलेश जाधव यांचे छायाचित्रण तर अभिजीत सुतार यांचे ध्वनी संकलन व आकाश मोरे यांनी व्हिडिओ संकलन केले आहे.

 
 संपादन- अर्चना बनगे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

तरुणाईचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन; "एक मूठ धान्य कलाकारांसाठी'  कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यंदा तरुणाईकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यातून जमणारी मदत आजही चळवळ नेटाने पुढे नेणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून 26 जून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत हा अनोखा उपक्रम होणार आहे. दरम्यान, राज्यभरातील शाहिरांनी यंदा "आम्ही आंबेडकरवादी' हे अभिमानगीत साकारले असून, ते यूट्यूब चॅनेलवर आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाले आहे.  "माझ्या दहा भाषणांची ताकद शाहिराच्या एका गाण्यात आहे,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत. मात्र, कोरोनाच्या काळात चळवळीतील हीच शाहीर आणि कलाकार मंडळी जगण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या वर्षीपासून एकही कार्यक्रम झाला नाही आणि आता आंबेडकर जयंतीच्या अगोदरच कोरोनाचा पुन्हा कहर झाला असल्याने यंदाही कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या या शाहीर व कलाकारांना धान्याबरोबरच जीवनावश्‍यक साहित्यासाठी समाजातील दातृत्वाला साद घातली आहे. धान्य, कडधान्य, साखर, खाद्यतेल, शैक्षणिक साहित्य व आर्थिक स्वरूपात ही मदत बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात स्वीकारली जाणार आहे. ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशन आणि अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे कबीर नाईकनवरे, हरीश कांबळे, धीरज कठारे, रविराज सदाजय, हर्षवर्धन कांबळे, नितीन कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.  असाही विचारांचा जागर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीला माहिती व्हावेत, या उद्देशाने "आम्ही आंबेडकरवादी' या गाण्याची निर्मिती झाली आहे. सांगलीच्या शाहीर दीपक गोठणेकर यांनी हे गीत लिहिले असून शिरीष पवार, प्रवीण डोणे (मुंबई), कबीर नाईकनवरे, स्नेहलता सातपुते (कोल्हापूर), चरण जाधव (औरंगाबाद) या शाहिरांनी ते गायिले आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेत विजयकुमार नागदिवे असून दुष्यंत इनामदार यांचे नृत्य दिग्दर्शन आहे. नीलेश जाधव यांचे छायाचित्रण तर अभिजीत सुतार यांचे ध्वनी संकलन व आकाश मोरे यांनी व्हिडिओ संकलन केले आहे.    संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/32dYOje
Read More
'आई ऽऽऽ'च्या हंबरड्यानं गहिवरले ग्रामस्थ, जगात येण्यापूर्वीच हरवलं बापाचं छत्र

टेकाडी (जि. नागपूर) : पारशिवनी तालुक्यातील टेकाडी गावात कोरोनाने थैमान घातले असून गावात एकाच दिवशी तिघांचा बळी गेल्याने गाव हादरून सुटले आहे. एकाच दिवशी मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवल्याने 'आई ऽऽऽ....या हंबरड्याने ग्रामस्थ गहिवरले, तर ३१ वर्षीय युवकाच्या जाण्याने पाच महिन्याच्या गर्भवती पत्नीपुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारं गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी अनुभवले आहे. 

हेही वाचा - मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू

शासनाने अनेक निर्बध लावून कोरोनाची परिस्थितीत प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे संकेत देत स्वतःची काळजी स्वतः घेण्याचे आवाहन केले आहे. अशात आठ दहा दिवस अंगावर रोग काढून रुग्णालय गाठणे आता नागरिकांच्या अंगलट येताना दिसून येत आहे. गावात दिवसागणिक मृत्यूचे तांडव सुरूच आहे. अशात काही दिवस मृतांच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. मंगळवारचा दिवस गावासाठी वाईट बातमी घेऊन उगवला. रात्रीला रुग्णालयात भरती केलेली आई सकाळी परतलीच नसल्याने गावात दिवस निघताच 'आईऽऽऽ...असा हंबरडा ग्रामस्थांच्या कानी पडला आणि गावात सकाळच्या चुली पेटल्याच नाही. जवाहरलाल रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन अपघातात मृत कल्पना अनिल कडू (वय४०), किरण राधेश्याम बोराडे (वय४५) या दोघीही गेल्या काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होत्या. किरण बोराडे यांची कोविड चाचणी बाधित आली होती. ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कल्पना कडू यांची देखील गेल्या आठ दिवसापासून प्रकृती खालावलेली होती.

हेही वाचा - स्वीट मार्टमधून मिठाईऐवजी चक्क तंबाखूजन्य पदार्थांची...

ऑक्सिजन पातळी कमी असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांना जे. एन.रुग्णालयात सोमवारीच दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणी मंगळवारी घेण्यात येणार होती. परंतु, त्या आधीच पर्याप्त ऑक्सिजन मिळाले नसल्याने दोघीही दगावल्याचे वृत्त गावात धडकले. या दोघांच्या मृत्यूची बातमी नंतर लगेच गावातील हरहुन्नरी ३१ वर्षीय युवक सुहास रामकृष्ण मोहूर्ले हा काही दिवसाआधी कोरोना बाधित आला होता. नागपूर स्थित खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारला त्याच्या मृत्यूच्या बातमीने गावात स्मशान शांतताच निर्माण झाली. सुहास याचे वडील देखील नागपूर स्थित खासगी रुग्णालयात कोरोनाशी दोन दोन हात करीत आहेत, तर घरी सुहासची ५ महिन्याची गर्भवती पत्नी पती जाण्याची कुठलीच चाहूल न लागता त्याच्या सुदृढ आयुष्याची प्रार्थना करत बाळासोबत आयुष्यचे स्वप्न रंगवत होती. नातेवाईकांनी हिमतीने तिला घाटावर नेऊन दुःखद बातमी दिली. त्यानंतर तिच्या पुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारे गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी पाहिलं आहे. बऱ्याच घरी चुलीही पेटल्याच नाहीत. 

हेही वाचा - नागपुरात ऑक्सिजन प्लांट स्थापनेला राज्य सरकारची मंजुरी...

रुग्ण दाखल झाले तेव्हाच त्यांची प्रकृती गंभीर होती. नागपूरला उपचारासाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी प्राथमिकता जवाहरला नेहरू रुग्णालयाला दिली होती. पूर्ण रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल अगोदरच कमी होते. प्रत्येकाला व्हेंटिलेटरची गरज होती. नागपूर शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर व बेडस वारंवार संपर्क करून देखील उपलब्ध होत नव्हते. त्याची ताकीद देखील नातेवाइकांना आधीच देण्यात आली होती. 
-डॉ.गजानन धुर्वे, कोविड केंद्राचे निरीक्षक 
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

'आई ऽऽऽ'च्या हंबरड्यानं गहिवरले ग्रामस्थ, जगात येण्यापूर्वीच हरवलं बापाचं छत्र टेकाडी (जि. नागपूर) : पारशिवनी तालुक्यातील टेकाडी गावात कोरोनाने थैमान घातले असून गावात एकाच दिवशी तिघांचा बळी गेल्याने गाव हादरून सुटले आहे. एकाच दिवशी मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवल्याने 'आई ऽऽऽ....या हंबरड्याने ग्रामस्थ गहिवरले, तर ३१ वर्षीय युवकाच्या जाण्याने पाच महिन्याच्या गर्भवती पत्नीपुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारं गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी अनुभवले आहे.  हेही वाचा - मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू शासनाने अनेक निर्बध लावून कोरोनाची परिस्थितीत प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे संकेत देत स्वतःची काळजी स्वतः घेण्याचे आवाहन केले आहे. अशात आठ दहा दिवस अंगावर रोग काढून रुग्णालय गाठणे आता नागरिकांच्या अंगलट येताना दिसून येत आहे. गावात दिवसागणिक मृत्यूचे तांडव सुरूच आहे. अशात काही दिवस मृतांच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. मंगळवारचा दिवस गावासाठी वाईट बातमी घेऊन उगवला. रात्रीला रुग्णालयात भरती केलेली आई सकाळी परतलीच नसल्याने गावात दिवस निघताच 'आईऽऽऽ...असा हंबरडा ग्रामस्थांच्या कानी पडला आणि गावात सकाळच्या चुली पेटल्याच नाही. जवाहरलाल रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन अपघातात मृत कल्पना अनिल कडू (वय४०), किरण राधेश्याम बोराडे (वय४५) या दोघीही गेल्या काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होत्या. किरण बोराडे यांची कोविड चाचणी बाधित आली होती. ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कल्पना कडू यांची देखील गेल्या आठ दिवसापासून प्रकृती खालावलेली होती. हेही वाचा - स्वीट मार्टमधून मिठाईऐवजी चक्क तंबाखूजन्य पदार्थांची... ऑक्सिजन पातळी कमी असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांना जे. एन.रुग्णालयात सोमवारीच दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणी मंगळवारी घेण्यात येणार होती. परंतु, त्या आधीच पर्याप्त ऑक्सिजन मिळाले नसल्याने दोघीही दगावल्याचे वृत्त गावात धडकले. या दोघांच्या मृत्यूची बातमी नंतर लगेच गावातील हरहुन्नरी ३१ वर्षीय युवक सुहास रामकृष्ण मोहूर्ले हा काही दिवसाआधी कोरोना बाधित आला होता. नागपूर स्थित खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारला त्याच्या मृत्यूच्या बातमीने गावात स्मशान शांतताच निर्माण झाली. सुहास याचे वडील देखील नागपूर स्थित खासगी रुग्णालयात कोरोनाशी दोन दोन हात करीत आहेत, तर घरी सुहासची ५ महिन्याची गर्भवती पत्नी पती जाण्याची कुठलीच चाहूल न लागता त्याच्या सुदृढ आयुष्याची प्रार्थना करत बाळासोबत आयुष्यचे स्वप्न रंगवत होती. नातेवाईकांनी हिमतीने तिला घाटावर नेऊन दुःखद बातमी दिली. त्यानंतर तिच्या पुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारे गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी पाहिलं आहे. बऱ्याच घरी चुलीही पेटल्याच नाहीत.  हेही वाचा - नागपुरात ऑक्सिजन प्लांट स्थापनेला राज्य सरकारची मंजुरी... रुग्ण दाखल झाले तेव्हाच त्यांची प्रकृती गंभीर होती. नागपूरला उपचारासाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी प्राथमिकता जवाहरला नेहरू रुग्णालयाला दिली होती. पूर्ण रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल अगोदरच कमी होते. प्रत्येकाला व्हेंटिलेटरची गरज होती. नागपूर शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर व बेडस वारंवार संपर्क करून देखील उपलब्ध होत नव्हते. त्याची ताकीद देखील नातेवाइकांना आधीच देण्यात आली होती.  -डॉ.गजानन धुर्वे, कोविड केंद्राचे निरीक्षक    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3di6S8Z
Read More
चार वर्षे भांडणात, एक वर्ष विकासात! विरोधी पक्षाची तलवार म्यान

मुरगूड (कोल्हापूर)  : शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद भूषवणारे राजेखान जमादार विरुद्ध मंडलिक गटाचे, पर्यायाने शिवसेनेचे नगरसेवक - नगरसेविका यांच्यातील कधी होणारे शीतयुद्ध तर कधी झालेली हमरीतुमरी यामुळे पालिकेतील सत्ताधारी मंडळींची पंचवार्षिक कारकीर्द चार वर्षे भांडणात आणि एक वर्ष विकासात, अशीच राहिली आहे. तर अल्प संख्याबळामुळे विरोधी पक्षाने बघ्याची भूमिका घेतली आहे. 

फ्लॅशबॅक 
मंडलिक गटाने गेल्या निवडणुकीपूर्वी माहितीच्या अधिकाराचे भांडवल हाताशी धरुन सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गटाला सळो की पळो करुन सोडले होते. भ्रष्टाचाराचे आरोप करत पाटील गटातील अंतर्गत फुटीचा फायदा उठवला आणि संजय घाटगे गटाच्या साथीने पाटील-मुश्रीफ गटाचा पराभव केला. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील, टोकाच्या संघर्षातील पालिकेवर (कै.) विश्वनाथराव पाटील यांच्या पाटील गटाने सर्वाधिक काळ तर त्या पाठोपाठ खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाने सत्ता गाजवली आहे. 

सध्याचे चित्र 
सध्या "गोकुळ'चे रणांगण तापले आहे. मुरगूडमधून सत्ताधारी पॅनेलमधून संचालक रणजितसिंह पाटील तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीतून खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक व बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील इच्छुक आहेत. पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. पण राज्यातील आघाडीची सत्ता व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार मंडलिक यांच्यातील सलोख्याचे संबंध, मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असणारे व नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले प्रवीणसिंह पाटील यांची समझोता एक्‍स्प्रेस लक्षात घेता पालिकेत विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का? असा प्रश्न पडतो.

राज्यातील सत्तासूत्रे पाहता खासदार मंडलिक, मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून सहा महिन्यात विविध विकासकामांना निधी आणण्यात नगराध्यक्ष जमादार यांनी यश मिळविले आहे. सुधारित नळ-पाणी योजना, बाजारपेठेतील फूटपाथ, गटर्स, हायमास्क दिवे, हुतात्मा तुकाराम चौक सुशोभीकरण अशा जवळपास 15 कोटींच्या विविध विकासकामांची धांदल सुरू आहे. नळ-पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदाई केली आहे. शहरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. मेच्या अखेरीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे धोरण आहे. 

घडलंय बिघडलंय - 
पालिका निवडणुकीत नेहमी होणारा मंडलिक विरुद्ध पाटील गटाचा सामना लक्षवेधी ठरत होता; पण आता पाटील गटाच्या फुटीमुळे तशा निवडणुका होणे कठीण आहे. पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणत्याही गटाला घाटगे गटाची साथ घेतल्याशिवाय यश मिळालेले नाही. मंडलिक गटाने सत्ता मिळवली खरी; पण या यशाचा निवडून देणाऱ्या जनतेला चार वर्षे फारसा उपयोग झालेला दिसत नाही. अपवाद वगळता सत्ताधारी नगरसेवक - नगरसेविका आहेत. यांना त्यांच्या सत्तेचा फारसा उपयोग झाला नाही. सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष जमादार व नगरसेवकातील चार वर्षे सुरु असलेला संघर्ष बऱ्यापैकी थोपवण्यात नेत्यांना यश आले आहे. 

पुढे काय? 
निवडणूक तोंडावर असताना विरोधी गटाकडून जे रान उठवले जाते, त्याचा लवलेशही आज पाहावयास मिळत नाही. 
"गोकुळ'चे संचालक पाटील यांनी वर्षभरापासून मुरगुडात तळ ठोकला आहे. तर भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी वारंवार कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत निवडणुकीच्या जोडण्या सुरू ठेवल्या आहेत. प्रवीणसिंह पाटील यांना ताकद देत मंत्री मुश्रीफ पुढील रणनीती आखताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधारी मंडलिक गटाच्या विरोधात नेमकी कशी आघाडी होणार? की मंडलिक, मुश्रीफ व प्रवीणसिंह पाटील एकत्रित राहणार, हे लवकरच कळेल. 

पक्षीय बलाबल - 
शिवसेना - 17 
राष्ट्रवादी - 3 

घडलंय-बिघडलंय 
* वेदगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायम 
* शहर स्वच्छता शासनाच्या बक्षिसापुरतीच 
* औद्योगिकीकरणाकडे सर्व नेत्यांचा कानाडोळा 
* शहरातील तरुणांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा 
* बागबगीचा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्कचे काय? 
* शासकीय कार्यालयांची कमतरता 

संपादन- अर्चना बनगे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चार वर्षे भांडणात, एक वर्ष विकासात! विरोधी पक्षाची तलवार म्यान मुरगूड (कोल्हापूर)  : शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद भूषवणारे राजेखान जमादार विरुद्ध मंडलिक गटाचे, पर्यायाने शिवसेनेचे नगरसेवक - नगरसेविका यांच्यातील कधी होणारे शीतयुद्ध तर कधी झालेली हमरीतुमरी यामुळे पालिकेतील सत्ताधारी मंडळींची पंचवार्षिक कारकीर्द चार वर्षे भांडणात आणि एक वर्ष विकासात, अशीच राहिली आहे. तर अल्प संख्याबळामुळे विरोधी पक्षाने बघ्याची भूमिका घेतली आहे.  फ्लॅशबॅक  मंडलिक गटाने गेल्या निवडणुकीपूर्वी माहितीच्या अधिकाराचे भांडवल हाताशी धरुन सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गटाला सळो की पळो करुन सोडले होते. भ्रष्टाचाराचे आरोप करत पाटील गटातील अंतर्गत फुटीचा फायदा उठवला आणि संजय घाटगे गटाच्या साथीने पाटील-मुश्रीफ गटाचा पराभव केला. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील, टोकाच्या संघर्षातील पालिकेवर (कै.) विश्वनाथराव पाटील यांच्या पाटील गटाने सर्वाधिक काळ तर त्या पाठोपाठ खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाने सत्ता गाजवली आहे.  सध्याचे चित्र  सध्या "गोकुळ'चे रणांगण तापले आहे. मुरगूडमधून सत्ताधारी पॅनेलमधून संचालक रणजितसिंह पाटील तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीतून खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक व बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील इच्छुक आहेत. पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. पण राज्यातील आघाडीची सत्ता व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार मंडलिक यांच्यातील सलोख्याचे संबंध, मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असणारे व नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले प्रवीणसिंह पाटील यांची समझोता एक्‍स्प्रेस लक्षात घेता पालिकेत विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का? असा प्रश्न पडतो. राज्यातील सत्तासूत्रे पाहता खासदार मंडलिक, मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून सहा महिन्यात विविध विकासकामांना निधी आणण्यात नगराध्यक्ष जमादार यांनी यश मिळविले आहे. सुधारित नळ-पाणी योजना, बाजारपेठेतील फूटपाथ, गटर्स, हायमास्क दिवे, हुतात्मा तुकाराम चौक सुशोभीकरण अशा जवळपास 15 कोटींच्या विविध विकासकामांची धांदल सुरू आहे. नळ-पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदाई केली आहे. शहरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. मेच्या अखेरीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे धोरण आहे.  घडलंय बिघडलंय -  पालिका निवडणुकीत नेहमी होणारा मंडलिक विरुद्ध पाटील गटाचा सामना लक्षवेधी ठरत होता; पण आता पाटील गटाच्या फुटीमुळे तशा निवडणुका होणे कठीण आहे. पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणत्याही गटाला घाटगे गटाची साथ घेतल्याशिवाय यश मिळालेले नाही. मंडलिक गटाने सत्ता मिळवली खरी; पण या यशाचा निवडून देणाऱ्या जनतेला चार वर्षे फारसा उपयोग झालेला दिसत नाही. अपवाद वगळता सत्ताधारी नगरसेवक - नगरसेविका आहेत. यांना त्यांच्या सत्तेचा फारसा उपयोग झाला नाही. सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष जमादार व नगरसेवकातील चार वर्षे सुरु असलेला संघर्ष बऱ्यापैकी थोपवण्यात नेत्यांना यश आले आहे.  पुढे काय?  निवडणूक तोंडावर असताना विरोधी गटाकडून जे रान उठवले जाते, त्याचा लवलेशही आज पाहावयास मिळत नाही.  "गोकुळ'चे संचालक पाटील यांनी वर्षभरापासून मुरगुडात तळ ठोकला आहे. तर भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी वारंवार कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत निवडणुकीच्या जोडण्या सुरू ठेवल्या आहेत. प्रवीणसिंह पाटील यांना ताकद देत मंत्री मुश्रीफ पुढील रणनीती आखताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधारी मंडलिक गटाच्या विरोधात नेमकी कशी आघाडी होणार? की मंडलिक, मुश्रीफ व प्रवीणसिंह पाटील एकत्रित राहणार, हे लवकरच कळेल.  पक्षीय बलाबल -  शिवसेना - 17  राष्ट्रवादी - 3  घडलंय-बिघडलंय  * वेदगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायम  * शहर स्वच्छता शासनाच्या बक्षिसापुरतीच  * औद्योगिकीकरणाकडे सर्व नेत्यांचा कानाडोळा  * शहरातील तरुणांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा  * बागबगीचा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्कचे काय?  * शासकीय कार्यालयांची कमतरता  संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QkCUIq
Read More
भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याला चिरडले; मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

ओझर (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री साडेअकराला सहाय्यक उपनिरीक्षक गोंदकर मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्यावेळी हा दुर्दैवी घटना घडली. 

मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

सोमवारी रात्री  ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) मोटारसायकलवरून घरी परतत होते. आडगाव शिवारातील शेरे पंजाब ढाब्याजवळ रस्ता मोकळा असताना भरधाव मर्सिडीजने गोंदकर यांना धडक दिली. कारने मोटारसायकलला फरफटत नेल्याने गोंदकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर फरारी झालेल्या बबलू कुरेशीने कार बदलण्याचाही प्रयत्न केल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

बबलू कुरेशीला अटक

आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी बबलू कुरेशीला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बबलू कुरेशीविरुद्ध जनावरांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत तीन, भद्रकाली पोलिसांत दोन, मुंबई नाका पोलिसांत व कळवा (ठाणे) पोलिसांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची आहे याचा आडगाव पोलिस शोध घेत आहेत.  

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची?

भरधाव मर्सिडीज कारने चिरडल्याने ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) यांचा मृत्यू झाला. कारचालक सद्दाम कयूम ऊर्फ बबलू कुरेशी (वय ३२, रा. कुरेशीनगर, वडाळा नाका) यास आडगाव पोलिसांनी अटक केली. त्यास दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याला चिरडले; मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना ओझर (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री साडेअकराला सहाय्यक उपनिरीक्षक गोंदकर मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्यावेळी हा दुर्दैवी घटना घडली.  मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना सोमवारी रात्री  ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) मोटारसायकलवरून घरी परतत होते. आडगाव शिवारातील शेरे पंजाब ढाब्याजवळ रस्ता मोकळा असताना भरधाव मर्सिडीजने गोंदकर यांना धडक दिली. कारने मोटारसायकलला फरफटत नेल्याने गोंदकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर फरारी झालेल्या बबलू कुरेशीने कार बदलण्याचाही प्रयत्न केल्याची चर्चा आहे.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू   बबलू कुरेशीला अटक आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी बबलू कुरेशीला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बबलू कुरेशीविरुद्ध जनावरांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत तीन, भद्रकाली पोलिसांत दोन, मुंबई नाका पोलिसांत व कळवा (ठाणे) पोलिसांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची आहे याचा आडगाव पोलिस शोध घेत आहेत.   हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची? भरधाव मर्सिडीज कारने चिरडल्याने ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) यांचा मृत्यू झाला. कारचालक सद्दाम कयूम ऊर्फ बबलू कुरेशी (वय ३२, रा. कुरेशीनगर, वडाळा नाका) यास आडगाव पोलिसांनी अटक केली. त्यास दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sdB1KF
Read More
काल गावात एकही गुढी उभारली नाही; ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच भाक्षी गावात स्मशान शांतता

सटाणा (जि.नाशिक) : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात...नवचैतन्याचा दिवस...पण त्याच दिवशी गावात अचानक एक काळजाचा ठोका चुकविणारी बातमी येऊन ठेपली. आणि मग गावात भयाण स्मशानशांतता पसरली. 

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी स्मशानशांतता

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १३) एकही गुढी उभारली नाही. सैन्यदलात देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले तालुक्याचे भूमिपुत्र व जवान स्वप्नील अमोलक रौंदळ (वय २५) हे भाक्षी (ता. बागलाण) येथील रहिवासी असून यांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे वीरमरण आले. त्यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच सटाणा शहर व बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

पार्थिव अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय नाही

बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी सांगितले, की चार वर्षांपासून सैन्यदलात असलेले बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र जवान स्वप्नील रौंदळ यांचे सध्या जम्मू-काश्मीर येथील सैन्यदलाच्या उधमपूर सेक्टर येथे ट्रेनिंग सुरू होते. ट्रेनिंगदरम्यान ते ज्या रूममध्ये वास्तव्यास होते, त्या रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत जवान स्वप्नील रौंदळ यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजले आहे. जवान स्वप्नील रौंदळ यांचे पार्थिव भाक्षी येथे अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे तहसीलदार इंगळे-पाटील यांनी सांगितले. गृहरक्षक दलाचे जवान अमोलक रौंदळ यांचे ते पुत्र होत. 

मंगळवारी एकही गुढी उभारली नाही.
शहीद जवान स्वप्नील रौंदळ यांचे प्राथमिक शिक्षण भाक्षी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण सटाणा येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. २०१६ मध्ये खडतर प्रशिक्षणानंतर स्वप्नील देशसेवेसाठी सैन्यदलात भरती झाले होते. पहिले पोस्टिंग राजस्थानमध्ये झाल्यानंतर नुकतीच दुसरे पोस्टिंग जम्मू-काश्मीरच्या सीबीएस सेक्टर येथे झाले होते. स्वप्नील अविवाहित असून, त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त शहर व तालुक्यात येऊन धडकताच शोककळा पसरली. जवान रौंदळ यांच्या निधनानंतर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तालुक्याने भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात मंगळवारी एकही गुढी उभारली नाही. 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

काल गावात एकही गुढी उभारली नाही; ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच भाक्षी गावात स्मशान शांतता सटाणा (जि.नाशिक) : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात...नवचैतन्याचा दिवस...पण त्याच दिवशी गावात अचानक एक काळजाचा ठोका चुकविणारी बातमी येऊन ठेपली. आणि मग गावात भयाण स्मशानशांतता पसरली.  ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी स्मशानशांतता ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १३) एकही गुढी उभारली नाही. सैन्यदलात देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले तालुक्याचे भूमिपुत्र व जवान स्वप्नील अमोलक रौंदळ (वय २५) हे भाक्षी (ता. बागलाण) येथील रहिवासी असून यांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे वीरमरण आले. त्यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच सटाणा शहर व बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पार्थिव अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय नाही बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी सांगितले, की चार वर्षांपासून सैन्यदलात असलेले बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र जवान स्वप्नील रौंदळ यांचे सध्या जम्मू-काश्मीर येथील सैन्यदलाच्या उधमपूर सेक्टर येथे ट्रेनिंग सुरू होते. ट्रेनिंगदरम्यान ते ज्या रूममध्ये वास्तव्यास होते, त्या रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत जवान स्वप्नील रौंदळ यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजले आहे. जवान स्वप्नील रौंदळ यांचे पार्थिव भाक्षी येथे अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे तहसीलदार इंगळे-पाटील यांनी सांगितले. गृहरक्षक दलाचे जवान अमोलक रौंदळ यांचे ते पुत्र होत.  मंगळवारी एकही गुढी उभारली नाही. शहीद जवान स्वप्नील रौंदळ यांचे प्राथमिक शिक्षण भाक्षी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण सटाणा येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. २०१६ मध्ये खडतर प्रशिक्षणानंतर स्वप्नील देशसेवेसाठी सैन्यदलात भरती झाले होते. पहिले पोस्टिंग राजस्थानमध्ये झाल्यानंतर नुकतीच दुसरे पोस्टिंग जम्मू-काश्मीरच्या सीबीएस सेक्टर येथे झाले होते. स्वप्नील अविवाहित असून, त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त शहर व तालुक्यात येऊन धडकताच शोककळा पसरली. जवान रौंदळ यांच्या निधनानंतर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तालुक्याने भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात मंगळवारी एकही गुढी उभारली नाही.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3thJoGx
Read More
गुढ्यातील हाणामारीप्रकरणी दोघांना अटक; गावठी पिस्तूल जप्त

ढेबेवाडी (जि. सातारा) : ढेबेवाडी- कऱ्हाड रस्त्यावरील गुढे गावाजवळ नुकत्याच झालेल्या जोरदार हाणामारीप्रकरणी येथील पोलिसांनी साेमवारी रात्री उशिरा दोन युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पाटण न्यायालयाने मंगळवारी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भांडणाऱ्या युवकांवर झडप टाकून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व लोखंडी पाइप ताब्यात घेतलेल्या सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून आज दिवसभर कौतुक सुरू होते.
 
साेमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावरील गुढे बस थांब्याजवळ ही घटना घडली होती. दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच तेथून मोटारीने ढेबेवाडीकडे निघालेले येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी नवनाथ कुंभार, संदेश लादे यांनी भांडणात घुसून दोन्ही युवकांवर झडप घालत गावठी पिस्तूल व लोखंडी पाइपसह त्यांना ताब्यात घेतले. सचिन जनार्दन सुतार (रा. मानेगाव, ता. पाटण) व रोहित सुनील माने (रा. गुढे, ता. पाटण) अशी संबंधित युवकांची नावे आहेत. रात्री उशिरा दोघांवर विविध कलमांन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पाटण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
 
गाडी आडवी मारल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तुंबळ हाणामारी सुरू असतानाच भांडणात घुसून पिस्तूल ताब्यात घेतल्याने दिवसभर सहायक पोलिस निरीक्षक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून कौतुक सुरू होते. सहायक फौजदार आर. एल. अंकुशी तपास करत आहेत. 

पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत

शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल

गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक; गावागावांत शुकशुकाट

विशेष मुलांसाठी इनरव्हीलतर्फे 18 बूट; पालकांत समाधान

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

गुढ्यातील हाणामारीप्रकरणी दोघांना अटक; गावठी पिस्तूल जप्त ढेबेवाडी (जि. सातारा) : ढेबेवाडी- कऱ्हाड रस्त्यावरील गुढे गावाजवळ नुकत्याच झालेल्या जोरदार हाणामारीप्रकरणी येथील पोलिसांनी साेमवारी रात्री उशिरा दोन युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पाटण न्यायालयाने मंगळवारी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भांडणाऱ्या युवकांवर झडप टाकून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व लोखंडी पाइप ताब्यात घेतलेल्या सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून आज दिवसभर कौतुक सुरू होते.   साेमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावरील गुढे बस थांब्याजवळ ही घटना घडली होती. दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच तेथून मोटारीने ढेबेवाडीकडे निघालेले येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी नवनाथ कुंभार, संदेश लादे यांनी भांडणात घुसून दोन्ही युवकांवर झडप घालत गावठी पिस्तूल व लोखंडी पाइपसह त्यांना ताब्यात घेतले. सचिन जनार्दन सुतार (रा. मानेगाव, ता. पाटण) व रोहित सुनील माने (रा. गुढे, ता. पाटण) अशी संबंधित युवकांची नावे आहेत. रात्री उशिरा दोघांवर विविध कलमांन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पाटण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.   गाडी आडवी मारल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तुंबळ हाणामारी सुरू असतानाच भांडणात घुसून पिस्तूल ताब्यात घेतल्याने दिवसभर सहायक पोलिस निरीक्षक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून कौतुक सुरू होते. सहायक फौजदार आर. एल. अंकुशी तपास करत आहेत.  पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक; गावागावांत शुकशुकाट विशेष मुलांसाठी इनरव्हीलतर्फे 18 बूट; पालकांत समाधान Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3mOJ4wn
Read More
बाजारात १५०० कोटींची उलाढाल ठप्प, ऑनलाइन खरेदीला पसंती

नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचे मनसूबे यंदा पुन्हा धुळीस मिळाले. त्यामुळे सराफासह सर्वच बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने १५०० कोटंची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुढीपाडव्याला सोने, चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. सराफा बाजार बंद राहणार असल्याने सोने खरेदीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यंदा काही व्यापाऱ्यांनी ऑनलाइन विक्रीचा पर्याय निवडला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीही टाळेबंदी होती. त्यामुळे सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सोने विक्री प्रभावीत झाली होती. यंदा सोन्याचे दर ४७ हजारापर्यंत आले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकानी ऑनलाईन दागीने खरेदी केली. ज्या व्यापाऱ्यांनी ऑनलाईचा पर्याय निवडला नाही त्यांना मात्र, गुढीपाडव्याच्या उलाढालीला फटका बसला आहे. दागिने प्रत्यक्ष हाताळून अथवा पाहूनच खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो. मात्र, परिस्थितीत लक्षात घेता सोने ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहक वळू लागले आहेत. मागील वर्षीही अशीच स्थिती होती. तेव्हाही ऑनलाईन दागिने विक्री करण्यावर भर दिला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने नाणे, नथ, दागिने, बिस्कीटाची खरेदी ऑनलाइन केली. 

हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना...

गुढीपाडव्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. नागपुरात सोन्याची लहानमोठी जवळपास १५०० पेक्षा जास्त दुकाने आणि शोरूम आहेत. या दिवशी सोने-चांदी मार्केटमध्ये १००० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. पण संपूर्ण खरेदी-विक्री बंद राहिल्याने कुठलाही व्यवहार झाला नाही. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने खरेदी-विक्रीच बंद होती. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी यंदा ऑनलाइनला पंसती दिल्याने थोडा दिलासा मिळाला. आता दागिन्यांचे बुकिंग केले असले तरी त्यांना टाळेबंदी मागे घेतल्यानंतरच वस्तू नेता येणार आहे. ग्राहकांना ८० ते ९० टक्के रक्कम खात्यात जमा करण्याची सोय केली होती. 
- राजेश रोकडे, रोकडे ज्वेलर्स 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

बाजारात १५०० कोटींची उलाढाल ठप्प, ऑनलाइन खरेदीला पसंती नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचे मनसूबे यंदा पुन्हा धुळीस मिळाले. त्यामुळे सराफासह सर्वच बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने १५०० कोटंची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुढीपाडव्याला सोने, चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. सराफा बाजार बंद राहणार असल्याने सोने खरेदीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यंदा काही व्यापाऱ्यांनी ऑनलाइन विक्रीचा पर्याय निवडला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.  हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार... कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीही टाळेबंदी होती. त्यामुळे सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सोने विक्री प्रभावीत झाली होती. यंदा सोन्याचे दर ४७ हजारापर्यंत आले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकानी ऑनलाईन दागीने खरेदी केली. ज्या व्यापाऱ्यांनी ऑनलाईचा पर्याय निवडला नाही त्यांना मात्र, गुढीपाडव्याच्या उलाढालीला फटका बसला आहे. दागिने प्रत्यक्ष हाताळून अथवा पाहूनच खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो. मात्र, परिस्थितीत लक्षात घेता सोने ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहक वळू लागले आहेत. मागील वर्षीही अशीच स्थिती होती. तेव्हाही ऑनलाईन दागिने विक्री करण्यावर भर दिला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने नाणे, नथ, दागिने, बिस्कीटाची खरेदी ऑनलाइन केली.  हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना... गुढीपाडव्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. नागपुरात सोन्याची लहानमोठी जवळपास १५०० पेक्षा जास्त दुकाने आणि शोरूम आहेत. या दिवशी सोने-चांदी मार्केटमध्ये १००० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. पण संपूर्ण खरेदी-विक्री बंद राहिल्याने कुठलाही व्यवहार झाला नाही. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने खरेदी-विक्रीच बंद होती.  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी यंदा ऑनलाइनला पंसती दिल्याने थोडा दिलासा मिळाला. आता दागिन्यांचे बुकिंग केले असले तरी त्यांना टाळेबंदी मागे घेतल्यानंतरच वस्तू नेता येणार आहे. ग्राहकांना ८० ते ९० टक्के रक्कम खात्यात जमा करण्याची सोय केली होती.  - राजेश रोकडे, रोकडे ज्वेलर्स  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3v1Fx0T
Read More
मानसिक छळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट लिहून पोलिसांना पाठविले स्पीड पोस्टाने  

औरंगाबाद : शेतजमिनीची वाटणी होऊन वडिलांच्या बाजूने कमी जमिन आली तर भाऊबंदकीला जास्त जमिन गेली, यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घे म्हणत मानसिक छळ केल्याने सावंगीच्या शेतकऱ्याने २३ मार्च रोजी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सांडू विश्‍वनाथ जगदाळे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ती पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू

मृत सांडू यांच्या पत्नी शुभांगी जगदाळे यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सांडू, त्यांचे भाऊ बापूराव आणि खुशालराव विश्‍वनाथ जगदाळे (दोघेही माजी सैनिक) हे तीन भाऊ कुटूंबासह शेजारी राहत होते. दरम्यान मृत सांडू यांचे चुलत भाऊ यांच्यात जमिनीच्या वाटण्या झाल्या. यात सांडू यांच्या वडिलांच्या बाजूने कमी जमिन आल्याने सांडू यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणावरुन संशयित बाबुराव काशिनाथ जगदाळे, दिलीप गंगाधर जगदाळे, संतोष बाबुराव जगदाळे, संदीप ऊर्फ गणेश बाबुराव जगदाळे, पोपट दिलीप जगदाळे, दत्तात्रय ऊर्फ नकुल दिलिप जगदाळे या सहाजणांनी सांडू यांचा दावा मागे घे म्हणत छळ केला.

Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू  

छळाला कंटाळून सांडू यांनी २३ मार्चरोजी सारोळ्यातील जंगलात झाडाला गळफास घेत स्वतःला संपविले. आत्महत्येपूर्वी सांडू यांनी सुसाईड नोट लिहून संबंधित वरील सहा जणांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असून यास जबाबदार सहा जणविरोधात पोलिस कारवाई व्हावी, असे नमूद केले होते, तसेच ही सुसाईड नोट पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट ही केला होती. आत्महत्येदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोटचा काढून ठेवलेला फोटोही आढळला. या प्रकरणी वरील सहा जणांविरोधात फुलंब्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात. 

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

मानसिक छळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट लिहून पोलिसांना पाठविले स्पीड पोस्टाने   औरंगाबाद : शेतजमिनीची वाटणी होऊन वडिलांच्या बाजूने कमी जमिन आली तर भाऊबंदकीला जास्त जमिन गेली, यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घे म्हणत मानसिक छळ केल्याने सावंगीच्या शेतकऱ्याने २३ मार्च रोजी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सांडू विश्‍वनाथ जगदाळे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ती पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू मृत सांडू यांच्या पत्नी शुभांगी जगदाळे यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सांडू, त्यांचे भाऊ बापूराव आणि खुशालराव विश्‍वनाथ जगदाळे (दोघेही माजी सैनिक) हे तीन भाऊ कुटूंबासह शेजारी राहत होते. दरम्यान मृत सांडू यांचे चुलत भाऊ यांच्यात जमिनीच्या वाटण्या झाल्या. यात सांडू यांच्या वडिलांच्या बाजूने कमी जमिन आल्याने सांडू यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणावरुन संशयित बाबुराव काशिनाथ जगदाळे, दिलीप गंगाधर जगदाळे, संतोष बाबुराव जगदाळे, संदीप ऊर्फ गणेश बाबुराव जगदाळे, पोपट दिलीप जगदाळे, दत्तात्रय ऊर्फ नकुल दिलिप जगदाळे या सहाजणांनी सांडू यांचा दावा मागे घे म्हणत छळ केला. Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   छळाला कंटाळून सांडू यांनी २३ मार्चरोजी सारोळ्यातील जंगलात झाडाला गळफास घेत स्वतःला संपविले. आत्महत्येपूर्वी सांडू यांनी सुसाईड नोट लिहून संबंधित वरील सहा जणांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असून यास जबाबदार सहा जणविरोधात पोलिस कारवाई व्हावी, असे नमूद केले होते, तसेच ही सुसाईड नोट पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट ही केला होती. आत्महत्येदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोटचा काढून ठेवलेला फोटोही आढळला. या प्रकरणी वरील सहा जणांविरोधात फुलंब्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात.    संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3seOlyr
Read More
नाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध; मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा 

नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन परिणामकारक ठरत असल्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यासाठी मायलन कंपनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. बुधवारी (ता. १४) नाशिकरांसाठी सात हजार रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध होणार आहे. बंगलोरहून एका विशेष विमानाने हा इंजेक्शनचा साठा मुंबईमार्गे नाशिकला येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. 

नाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध
रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असून, मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठासाठा अल्प असल्याने जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिव्हिरचा तुटवडा भासू लागला आहे. या मुळे कोरोनाबाधितांच्या अडचणीसह रेमडेसिव्हिरचा काळाबाजार होत असल्याच्या घटना गेल्या आठवड्यात उघडकीस आल्या आहेत. सर्वसामान्य रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होणे अश्यक्य होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकृत पुरवठाधारकांना रेमडेसिव्हिर उत्पादक कंपनीकडून इंजेक्शन आयात होत नसल्यामुळे एजन्सीधारकही हतबल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी काही इंजेक्शन पुरवठाधारकांच्या शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेत मायलन कंपनीकडून पुरेसा इंजेक्शन साठा उपलब्ध व्हावा, यासाठी साकडे घातले होते. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा 
दरम्यान, मायलन कंपनीने दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा जिल्हावासीयांसाठी उपलब्ध करून द्यावा, यासाठी गेल्या चार दिवसांत खासदार गोडसे यांनी मायलन कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. सोमवारी देखील खासदार गोडसे यांनी कंपनीचे नरेश हसीजा यांच्याशी संपर्क साधत तातडीने नाशिक जिल्हावासीयांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची गळ घातली होती. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

खासदार गोडसे यांचे प्रयत्न
मायलन कंपनी प्रशासनाने मंगळवारी (ता. १३) पाच हजार रेमडेसिव्हिर साठा पाठवित असल्याची माहिती खासदार गोडसे यांना दिली. नाशिक शहरासह जिल्ह्याची वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता पाच हजार इंजेक्शनच्या साठ्यावर खासदार गोडसे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अजून अधिकचा इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. बुधवारी सकाळी हा सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा बंगलोर येथून एका विशेष विमानाने मुंबईत येणार असून, त्यानंतर बायरोड हा साठा नाशिक शहरातील अधिकृत वितरकांपर्यंत पोचणार आहे. यात गेट वेल- दोन हजार, लाइफलाइन फार्मा- दीड हजार, दि विजय- दीड हजार, पी.एस. फार्मा- एक हजार असा रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा शहरातील अधिकृत एजन्सींना होणार आहे.  

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

नाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध; मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा  नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन परिणामकारक ठरत असल्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यासाठी मायलन कंपनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. बुधवारी (ता. १४) नाशिकरांसाठी सात हजार रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध होणार आहे. बंगलोरहून एका विशेष विमानाने हा इंजेक्शनचा साठा मुंबईमार्गे नाशिकला येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.  नाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असून, मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठासाठा अल्प असल्याने जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिव्हिरचा तुटवडा भासू लागला आहे. या मुळे कोरोनाबाधितांच्या अडचणीसह रेमडेसिव्हिरचा काळाबाजार होत असल्याच्या घटना गेल्या आठवड्यात उघडकीस आल्या आहेत. सर्वसामान्य रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होणे अश्यक्य होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकृत पुरवठाधारकांना रेमडेसिव्हिर उत्पादक कंपनीकडून इंजेक्शन आयात होत नसल्यामुळे एजन्सीधारकही हतबल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी काही इंजेक्शन पुरवठाधारकांच्या शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेत मायलन कंपनीकडून पुरेसा इंजेक्शन साठा उपलब्ध व्हावा, यासाठी साकडे घातले होते.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू   मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा  दरम्यान, मायलन कंपनीने दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा जिल्हावासीयांसाठी उपलब्ध करून द्यावा, यासाठी गेल्या चार दिवसांत खासदार गोडसे यांनी मायलन कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. सोमवारी देखील खासदार गोडसे यांनी कंपनीचे नरेश हसीजा यांच्याशी संपर्क साधत तातडीने नाशिक जिल्हावासीयांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची गळ घातली होती.  हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात खासदार गोडसे यांचे प्रयत्न मायलन कंपनी प्रशासनाने मंगळवारी (ता. १३) पाच हजार रेमडेसिव्हिर साठा पाठवित असल्याची माहिती खासदार गोडसे यांना दिली. नाशिक शहरासह जिल्ह्याची वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता पाच हजार इंजेक्शनच्या साठ्यावर खासदार गोडसे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अजून अधिकचा इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. बुधवारी सकाळी हा सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा बंगलोर येथून एका विशेष विमानाने मुंबईत येणार असून, त्यानंतर बायरोड हा साठा नाशिक शहरातील अधिकृत वितरकांपर्यंत पोचणार आहे. यात गेट वेल- दोन हजार, लाइफलाइन फार्मा- दीड हजार, दि विजय- दीड हजार, पी.एस. फार्मा- एक हजार असा रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा शहरातील अधिकृत एजन्सींना होणार आहे.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2OOEGB6
Read More
नाशिकमध्ये गोरगरिबांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडचे महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर! 

सिडको (जि.नाशिक) : महापालिकेच्या सहकार्याने व खासगी डॉक्टरांच्या मदतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडसह महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर बनणार आहे. वाचा सविस्तर...

खासगी डॉक्टर, मनपाच्या सहकार्याने उभारणी 
नाशिकमधील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह व बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी विद्यामंदिरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त, सुसज्ज कोरोना सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. सध्या नाशिक शहराचा विचार करता सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा समावेश होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये सिडकोतील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय सेवेअभावी पूर्णतः मेटाकुटीस आले आहेत. या सर्वांचा सारासार विचार करून बडगुजर यांनी सिडकोवासीयांसाठी सावतानगर येथील सावरकर सभागृह व रायगड चौकातील बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधिनी या महापालिकेच्या शाळेत कोविड सेंटर उभारण्याची मागणी महापालिका आयुक्तांना केली होती. त्यास परवानगी मिळाली असून, पुढील दोन दिवसांत या ठिकाणी सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.हा मान शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या वाट्याला आला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन

सावरकर सभागृहामध्ये ऑक्सिजनचे एकूण ६० बेड व इतर १०० बेड असे एकूण एक हजार १६० बेडची व्यवस्था केली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा फौजफाटा नेमला आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टाफ व स्वयंसेवक असणार आहेत. परिसरातील खासगी डॉक्टरांनी भरतीची तयारी दर्शविली आहे. यात डॉ. किरण बिरारी, डॉ. तुषार शिंदे, डॉ. भूषण कुलकर्णी, डॉ. छाया गाढवे, डॉ. त्रिवेंद्र शिंदे, तसेच एकूण पाच नर्स त्यांनी सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे खासगी डॉक्टरांच्या मदतीने निःशुल्क ऑक्सिजन बेडचे रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू आहे. याकरिता परिसरातील स्वयंसेवक, नर्स, डॉक्टर व नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. हातावर पोट भरणाऱ्या सिडकोतील कामगार वसाहतीतील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना याचा फार मोठा लाभ होणार आहे. याचे समाधान आहे. -सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

नाशिकमध्ये गोरगरिबांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडचे महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर!  सिडको (जि.नाशिक) : महापालिकेच्या सहकार्याने व खासगी डॉक्टरांच्या मदतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडसह महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर बनणार आहे. वाचा सविस्तर... खासगी डॉक्टर, मनपाच्या सहकार्याने उभारणी  नाशिकमधील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह व बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी विद्यामंदिरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त, सुसज्ज कोरोना सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. सध्या नाशिक शहराचा विचार करता सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा समावेश होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये सिडकोतील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय सेवेअभावी पूर्णतः मेटाकुटीस आले आहेत. या सर्वांचा सारासार विचार करून बडगुजर यांनी सिडकोवासीयांसाठी सावतानगर येथील सावरकर सभागृह व रायगड चौकातील बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधिनी या महापालिकेच्या शाळेत कोविड सेंटर उभारण्याची मागणी महापालिका आयुक्तांना केली होती. त्यास परवानगी मिळाली असून, पुढील दोन दिवसांत या ठिकाणी सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.हा मान शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या वाट्याला आला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू   सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन सावरकर सभागृहामध्ये ऑक्सिजनचे एकूण ६० बेड व इतर १०० बेड असे एकूण एक हजार १६० बेडची व्यवस्था केली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा फौजफाटा नेमला आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टाफ व स्वयंसेवक असणार आहेत. परिसरातील खासगी डॉक्टरांनी भरतीची तयारी दर्शविली आहे. यात डॉ. किरण बिरारी, डॉ. तुषार शिंदे, डॉ. भूषण कुलकर्णी, डॉ. छाया गाढवे, डॉ. त्रिवेंद्र शिंदे, तसेच एकूण पाच नर्स त्यांनी सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.  हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे खासगी डॉक्टरांच्या मदतीने निःशुल्क ऑक्सिजन बेडचे रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू आहे. याकरिता परिसरातील स्वयंसेवक, नर्स, डॉक्टर व नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. हातावर पोट भरणाऱ्या सिडकोतील कामगार वसाहतीतील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना याचा फार मोठा लाभ होणार आहे. याचे समाधान आहे. -सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3shEIPq
Read More
लातूर महापालिकेचे आयुक्त उतरले रस्त्यावर, दुकाने उघडणाऱ्यांवर केली कारवाई 

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील काही दुकानदार दुकाने उघडे करून विक्री करीत आहेत. मंगळवारी (ता. १३) आयुक्त अमन मित्तल रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठेत भेट देऊन अनेकांवर कारवाई केली; तसेच सराफ लाइनमधील दोन दुकानेही सील केली आहेत.  शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातून मिनी लॉकडाउन सुरू आहे.

Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू  

जीवनावश्यक वस्तू विक्रीलाच परवानगी आहे. असे असताना काही दुकानदार दुकान अर्धवट उघडून मालाची विक्री करीत आहेत. हे लक्षात आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल हे मंगळवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी गंजगोलाई येथे पाहणी केली. या परिसरात अनेक गाडे उभे असले त्यांच्या निदर्शनास आले. ते गाडे त्यांनी हटवले. सोन्या चांदीचे दुकाने चालू असताना आढळून आली. त्यांच्यावर कार्यवाही करून दोन दुकाने सील करण्यात आली. दोन दुकानदारांकडून ४० हजार रुपये दंड भरून घेण्यात आला. यावेळी झोन डीचे झोनल प्रमुख बंडू किसवे, सी झोनचे समाधान सूर्यवंशी, अतिक्रमण विभाग शेख आमजद शेख, हिरा कांबळे, नीलेश शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते. 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

लातूर महापालिकेचे आयुक्त उतरले रस्त्यावर, दुकाने उघडणाऱ्यांवर केली कारवाई  लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील काही दुकानदार दुकाने उघडे करून विक्री करीत आहेत. मंगळवारी (ता. १३) आयुक्त अमन मित्तल रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठेत भेट देऊन अनेकांवर कारवाई केली; तसेच सराफ लाइनमधील दोन दुकानेही सील केली आहेत.  शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातून मिनी लॉकडाउन सुरू आहे. Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   जीवनावश्यक वस्तू विक्रीलाच परवानगी आहे. असे असताना काही दुकानदार दुकान अर्धवट उघडून मालाची विक्री करीत आहेत. हे लक्षात आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल हे मंगळवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी गंजगोलाई येथे पाहणी केली. या परिसरात अनेक गाडे उभे असले त्यांच्या निदर्शनास आले. ते गाडे त्यांनी हटवले. सोन्या चांदीचे दुकाने चालू असताना आढळून आली. त्यांच्यावर कार्यवाही करून दोन दुकाने सील करण्यात आली. दोन दुकानदारांकडून ४० हजार रुपये दंड भरून घेण्यात आला. यावेळी झोन डीचे झोनल प्रमुख बंडू किसवे, सी झोनचे समाधान सूर्यवंशी, अतिक्रमण विभाग शेख आमजद शेख, हिरा कांबळे, नीलेश शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3gckXGG
Read More
वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या जावळी तालुक्यातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

कुडाळ (जि. सातारा) : वेण्णा नदी पात्रात बुडाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. निखिल नामदेव केसकर (वय 15, रा. केसकरवाडी, ता. जावळी) असे मृताचे नाव आहे. आपल्या 7 ते 8 मित्रांसह तो वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेला होता. 

पाण्याचा छोटा डोह पाहून पोहण्याचा प्रयत्न करताना पोहता येत नसल्याने गाळात रुतत गेल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. 15 मिनिटांनी गावातील ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून मेढ्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचा अधिक तपास पाेलिस करीत आहेत.
 

धक्कादायक! रयतच्या धुंदीबाबा विद्यालयातील तब्बल 11 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; जावळीत एकच खळबळ  

आता रामराज्य! इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या जावळी तालुक्यातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू कुडाळ (जि. सातारा) : वेण्णा नदी पात्रात बुडाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. निखिल नामदेव केसकर (वय 15, रा. केसकरवाडी, ता. जावळी) असे मृताचे नाव आहे. आपल्या 7 ते 8 मित्रांसह तो वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेला होता.  पाण्याचा छोटा डोह पाहून पोहण्याचा प्रयत्न करताना पोहता येत नसल्याने गाळात रुतत गेल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. 15 मिनिटांनी गावातील ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून मेढ्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचा अधिक तपास पाेलिस करीत आहेत.   धक्कादायक! रयतच्या धुंदीबाबा विद्यालयातील तब्बल 11 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; जावळीत एकच खळबळ   आता रामराज्य! इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/32c23Yn
Read More
आठवड्यात दुसऱ्यांदा 'मेडिकल'मधील कोव्हॅक्सिन लस संपल्या, नागरिकांना मनःस्ताप

नागपूर : नागपूर जिल्ह्यात मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. मात्र, तीन दिवसांपूर्वी केवळ १५०० लशी देण्यात आल्या. यामुळे पुन्हा एकदा मेडिकलमधील 'कोव्हॅक्सिन'चा साठा संपला. 

नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी कोविशिल्डच्या २ लाख १६ हजार डोस आले. यातील १ लाख ३२ हजार कोविशिल्डच्या लस नागपूर जिल्ह्यासाठी होत्या. वितरणाचे अधिकार आरोग्य विभागाला असल्याची माहिती असून नागपूर जिल्ह्याला केवळ ४८ हजार कोविशिल्डच्या लस उपलब्ध करून देण्यात आल्या. तर ९ एप्रिल रोजी नागपूर विभागासाठी कोव्हॅक्सीन लसीचे ५५ हजार ३६० डोस आले होते. यातील नागपूर जिल्ह्यासाठी ११ हजार ३६० डोस उपलब्ध करुन देण्यात आले होते. ११ हजार ३६० पैकी केवळ १५०० कोव्हॅक्सिनचे डोस मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे लस वितरणात पक्षपाती धोरण राबवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा मेडिकलमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आहे. 

हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार...

पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यासह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी मागील तीन महिन्यात आतापर्यंत १४ लाख ६० हजार ४०० कोविशिल्ड तर २ लाख १ हजार ५२० कोव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या. 

मेडिकलला द्या पाच हजार लस -
नागपूरच्या मेडिकलमधील केंद्रासाठी एकाचवेळी कमीत कमी ५ हजार लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी विविध संस्थांतर्फे करण्यात आली आहे. वारंवार मेडिकलमध्ये येणाऱ्या गरिबांना लस तुटवड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. लस महोत्सव साजरा करण्यापेक्षा लशींचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्यात यावा अशी मागणी दक्षिण नागपूर विकास आघाडीचे संयोजक अनिकेत कुत्तरमारे यांनी केली आहे. 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आठवड्यात दुसऱ्यांदा 'मेडिकल'मधील कोव्हॅक्सिन लस संपल्या, नागरिकांना मनःस्ताप नागपूर : नागपूर जिल्ह्यात मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. मात्र, तीन दिवसांपूर्वी केवळ १५०० लशी देण्यात आल्या. यामुळे पुन्हा एकदा मेडिकलमधील 'कोव्हॅक्सिन'चा साठा संपला.  नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी कोविशिल्डच्या २ लाख १६ हजार डोस आले. यातील १ लाख ३२ हजार कोविशिल्डच्या लस नागपूर जिल्ह्यासाठी होत्या. वितरणाचे अधिकार आरोग्य विभागाला असल्याची माहिती असून नागपूर जिल्ह्याला केवळ ४८ हजार कोविशिल्डच्या लस उपलब्ध करून देण्यात आल्या. तर ९ एप्रिल रोजी नागपूर विभागासाठी कोव्हॅक्सीन लसीचे ५५ हजार ३६० डोस आले होते. यातील नागपूर जिल्ह्यासाठी ११ हजार ३६० डोस उपलब्ध करुन देण्यात आले होते. ११ हजार ३६० पैकी केवळ १५०० कोव्हॅक्सिनचे डोस मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे लस वितरणात पक्षपाती धोरण राबवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा मेडिकलमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आहे.  हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार... पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यासह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी मागील तीन महिन्यात आतापर्यंत १४ लाख ६० हजार ४०० कोविशिल्ड तर २ लाख १ हजार ५२० कोव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या.  मेडिकलला द्या पाच हजार लस - नागपूरच्या मेडिकलमधील केंद्रासाठी एकाचवेळी कमीत कमी ५ हजार लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी विविध संस्थांतर्फे करण्यात आली आहे. वारंवार मेडिकलमध्ये येणाऱ्या गरिबांना लस तुटवड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. लस महोत्सव साजरा करण्यापेक्षा लशींचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्यात यावा अशी मागणी दक्षिण नागपूर विकास आघाडीचे संयोजक अनिकेत कुत्तरमारे यांनी केली आहे.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sbQQS1
Read More
त्वचेच्या अनेक समस्यां दूर करण्यासाठी कैमोमाइल टी चा कसा करावा वापर जाणून घ्या   

कोल्हापूर :कॅमोमाइल चहामध्ये रोगांशी लढण्यासाठी बरेच गुणधर्म असतात. वाढत्या सौंदर्याबरोबरच, तणाव आणि निद्रानाश यासारख्या बर्‍याच समस्या दूर करण्यात ते उपयुक्त ठरू शकतात.तुमची इच्छा असेल तर  सौंदर्य नियमामध्ये कॅमोमाइल चहाचा समावेश करून आपण उतारवयातही त्वचा निरोगी बनवू शकता. खरं तर, उतारवयात, त्वचेच्या मृत त्वचेवरील सुरकुत्या आणि फिकट डोळ्यांसारख्या अनेक समस्या आहेत ज्या त्वचेचे सौंदर्य खराब करतात.अशावेळी कॅमोमाइल चहापासून मुक्त होण्यासाठी योग्य पर्याय आहे.त्वचेची चमक कायम राखण्यासाठी या हर्बल टीचा वेगळ्या प्रकारे वापर करता येतो.

सुरकुत्यांवर उपचार
वयाच्या 30 व्या वर्षी सुरकुत्या आणि बारीक रेषा यासारख्या समस्या उद्भवू लागतात. हे टाळण्यासाठी आपण आपल्या त्वचेची अधिक काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.त्याच वेळी, रासायनिक  वस्तू वापरण्याऐवजी नैसर्गिक घटक वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कॅमोमाइल टीमध्ये पॉलीफेनॉल आणि फायटोकेमिकल्सचे गुणधर्म आहेत जे पेशी तयार करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करतात जे अकाली वृद्धत्व रोखते आणि तणावग्रस्त त्वचेला शांत करते.

फेस पॅक कसा बनवायचा
यासाठी कोरोमाईल चहामध्ये कोरफड आणि मध मिसळा.
पेस्ट थोडी जाड ठेवा आणि नंतर ती आपल्या त्वचेवर, मान आणि इतर भागांवर फेस मास्क म्हणून वापरा.
आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावा. मध आणि कोरफड आपली त्वचा निरोगी आणि मॉइश्चराइझ ठेवण्यात मदत करेल.

पफी आईज पासून मुक्तता
सतत डिहाइड्रेशन किंवा झोपेच्या अभावामुळे डोळे सुजतात, ज्याला आपण डोळे म्हणतो. जरी बहुतेक मुली मेकअपद्वारे लपवतात,परंतु या व्यतिरिक्त बर्‍याच घरगुती पद्धती आहेत. डोळ्यांमुळे डार्क सर्कलची समस्या बर्‍याच वेळा सुरू होते, जे दिलायला खूपच वाईट आहे.डोळ्यांची उबळ काढण्यासाठी आपण कॅमोमाइल चहा वापरू शकता. त्यामध्ये  अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म केवळ डार्क सर्कलच प्रकाश देणार नाहीत तर डोळ्यांची उबळपणा देखील कमी करतील.

कसे वापरायचे
ब्लॅक टी आणि कॅमोमाइल चहाचा काढ़ा तयार करा. आता हे मिश्रण एका आइस क्यूब ट्रेमध्ये ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा.
जेव्हा ते चांगले गोठते तेव्हा मऊ कपड्यात आइस क्यूब लपेटून घ्या आणि ते बाहेरून आपल्या डोळ्यांना पाच ते 10 मिनिटांसाठी टॅप करा.ब्लॅक टीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्यास मदत होते, तर कॅमोमाइल चहा त्वचेवरील  होणाऱ्या इरिटेशन शांत होतो.

डेड स्किन करा बाय बाय 
स्क्रबिंग आपल्या त्वचेच्या दिनचर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा स्क्रब करायला पाहिजे. रासायनिक  उत्पादन वापरण्याऐवजी आपण कॅमोमाइल टी DIY स्क्रब वापरुन पाहू शकता. हे आपली त्वचा थंड ठेवते, जेणेकरून आपण ताजे आणि चमकदार दिसाल.

असा तयार करा स्क्रब 
स्क्रब तयार करण्यासाठी प्रथम ओटचे पीठ घ्या आणि त्यात मध, कोमामल चहा मिसळा.
आता ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा आणि गोलाकार हालचालीमध्ये मसाज करा. आठवड्यातून फक्त तीन वेळा स्क्रब केल्यावर तुम्हाला फरक दिसून येईल.
ओटचे जाडे भरडे पीठ मध्ये एक अँटी-ऑक्सिडेंट असते जे त्वचेचे नुकसान कमी करण्यास मदत करते. त्याच वेळी, मधात अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेवर असलेले अतिरिक्त मुरुमे आणि जास्त तेल काढून टाकण्यास मदत करतात.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

त्वचेच्या अनेक समस्यां दूर करण्यासाठी कैमोमाइल टी चा कसा करावा वापर जाणून घ्या    कोल्हापूर :कॅमोमाइल चहामध्ये रोगांशी लढण्यासाठी बरेच गुणधर्म असतात. वाढत्या सौंदर्याबरोबरच, तणाव आणि निद्रानाश यासारख्या बर्‍याच समस्या दूर करण्यात ते उपयुक्त ठरू शकतात.तुमची इच्छा असेल तर  सौंदर्य नियमामध्ये कॅमोमाइल चहाचा समावेश करून आपण उतारवयातही त्वचा निरोगी बनवू शकता. खरं तर, उतारवयात, त्वचेच्या मृत त्वचेवरील सुरकुत्या आणि फिकट डोळ्यांसारख्या अनेक समस्या आहेत ज्या त्वचेचे सौंदर्य खराब करतात.अशावेळी कॅमोमाइल चहापासून मुक्त होण्यासाठी योग्य पर्याय आहे.त्वचेची चमक कायम राखण्यासाठी या हर्बल टीचा वेगळ्या प्रकारे वापर करता येतो. सुरकुत्यांवर उपचार वयाच्या 30 व्या वर्षी सुरकुत्या आणि बारीक रेषा यासारख्या समस्या उद्भवू लागतात. हे टाळण्यासाठी आपण आपल्या त्वचेची अधिक काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.त्याच वेळी, रासायनिक  वस्तू वापरण्याऐवजी नैसर्गिक घटक वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कॅमोमाइल टीमध्ये पॉलीफेनॉल आणि फायटोकेमिकल्सचे गुणधर्म आहेत जे पेशी तयार करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करतात जे अकाली वृद्धत्व रोखते आणि तणावग्रस्त त्वचेला शांत करते. फेस पॅक कसा बनवायचा यासाठी कोरोमाईल चहामध्ये कोरफड आणि मध मिसळा. पेस्ट थोडी जाड ठेवा आणि नंतर ती आपल्या त्वचेवर, मान आणि इतर भागांवर फेस मास्क म्हणून वापरा. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावा. मध आणि कोरफड आपली त्वचा निरोगी आणि मॉइश्चराइझ ठेवण्यात मदत करेल. पफी आईज पासून मुक्तता सतत डिहाइड्रेशन किंवा झोपेच्या अभावामुळे डोळे सुजतात, ज्याला आपण डोळे म्हणतो. जरी बहुतेक मुली मेकअपद्वारे लपवतात,परंतु या व्यतिरिक्त बर्‍याच घरगुती पद्धती आहेत. डोळ्यांमुळे डार्क सर्कलची समस्या बर्‍याच वेळा सुरू होते, जे दिलायला खूपच वाईट आहे.डोळ्यांची उबळ काढण्यासाठी आपण कॅमोमाइल चहा वापरू शकता. त्यामध्ये  अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म केवळ डार्क सर्कलच प्रकाश देणार नाहीत तर डोळ्यांची उबळपणा देखील कमी करतील. कसे वापरायचे ब्लॅक टी आणि कॅमोमाइल चहाचा काढ़ा तयार करा. आता हे मिश्रण एका आइस क्यूब ट्रेमध्ये ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा ते चांगले गोठते तेव्हा मऊ कपड्यात आइस क्यूब लपेटून घ्या आणि ते बाहेरून आपल्या डोळ्यांना पाच ते 10 मिनिटांसाठी टॅप करा.ब्लॅक टीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्यास मदत होते, तर कॅमोमाइल चहा त्वचेवरील  होणाऱ्या इरिटेशन शांत होतो. डेड स्किन करा बाय बाय  स्क्रबिंग आपल्या त्वचेच्या दिनचर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा स्क्रब करायला पाहिजे. रासायनिक  उत्पादन वापरण्याऐवजी आपण कॅमोमाइल टी DIY स्क्रब वापरुन पाहू शकता. हे आपली त्वचा थंड ठेवते, जेणेकरून आपण ताजे आणि चमकदार दिसाल. असा तयार करा स्क्रब  स्क्रब तयार करण्यासाठी प्रथम ओटचे पीठ घ्या आणि त्यात मध, कोमामल चहा मिसळा. आता ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा आणि गोलाकार हालचालीमध्ये मसाज करा. आठवड्यातून फक्त तीन वेळा स्क्रब केल्यावर तुम्हाला फरक दिसून येईल. ओटचे जाडे भरडे पीठ मध्ये एक अँटी-ऑक्सिडेंट असते जे त्वचेचे नुकसान कमी करण्यास मदत करते. त्याच वेळी, मधात अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेवर असलेले अतिरिक्त मुरुमे आणि जास्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dfNiKn
Read More
''आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!" भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा अनोखा प्रयोग; पाहा VIDEO

गणूर (जि.नाशिक) : 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. कसे ते पाहा....

भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा जगातील पहिला प्रयोग

कायमचं आपल्या कलेतून समाजप्रबोधनात जमेल त्या योगदानाचं देणं देणारे चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजरीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढत त्यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.

 चित्ररेखाटन, फलकलेखन, रांगोळी ह्या अंगी असलेल्या कलेतून समाजप्रबोधनाचं काम करणारे कलाशिक्षक म्हणून राज्यभरात देव हिरे यांची ओळख आहे. चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथे कलाशिक्षक म्हणून काम करताना प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने कला सादरीकरनातून वेगळा संदेश देण्याची त्यांची पद्धत सर्वाना भावणारी असते. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

चांदवडच्या देव हिरेंच महामानवाला अनोखं अभिवादन!

१४ एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देव हिरे यांनी सादर केलेल्या रांगोळीचं वेगळपण अनेकांना आश्चर्यचकित करणारं आहे. माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबासाहेबांच्या कार्यातून झालं असल्याने, 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच ह्या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

संयम व सातत्यातून रांगोळी

आठ इंच व्यास असलेल्या बाजरीच्या भाकरीवर सहा इंच आकारात पाच तासांचा संयम व सातत्यातून त्यांनी ही रांगोळी साकारली आहे, त्यांच्या या वेगळ्या प्रयोगात जयश्री देविदास हिरे.यांची देखील त्यांना मोलाची साथ लाभलीय.

खरं तर आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र! हे लोकप्रिय गीत ऐकूनच मला ही कल्पना सुचली. या अगोदर भाकरीवर पोर्टेट रांगोळी साकारण्यात आली आहे का याबाबतचा इंटरनेटवर कसून शोध घेऊन हा प्रयोग या अगोदर कुणी केला असल्याचं दिसलं नाही, राज्यभरातील नव्हे तर राज्याबाहेरील देखील अनेक कलाशिक्षकाशी याबाबत संवाद साधला सर्वांकडून हा पहिलाच प्रयोग ठरेल अशीच उत्तरं मिळालीत. मी लगेचच बाजरीची भाकर तयार करून रांगोळी काढायला सुरुवात केली अन पाच तासांच्या प्रयत्नांतून ती साकारली देखील गेली. अनेक मित्रांचा, कलाशिक्षकांचा आग्रह आहे की या प्रयोगाची नोंद होईल त्यामुळे तशा अर्थाने येत्या महिन्यात नोंदणी करणार आहोत.-देव हिरे
कलाशिक्षक चांदवड

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

''आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!" भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा अनोखा प्रयोग; पाहा VIDEO गणूर (जि.नाशिक) : 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. कसे ते पाहा.... भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा जगातील पहिला प्रयोग कायमचं आपल्या कलेतून समाजप्रबोधनात जमेल त्या योगदानाचं देणं देणारे चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजरीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढत त्यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.  चित्ररेखाटन, फलकलेखन, रांगोळी ह्या अंगी असलेल्या कलेतून समाजप्रबोधनाचं काम करणारे कलाशिक्षक म्हणून राज्यभरात देव हिरे यांची ओळख आहे. चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथे कलाशिक्षक म्हणून काम करताना प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने कला सादरीकरनातून वेगळा संदेश देण्याची त्यांची पद्धत सर्वाना भावणारी असते.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू   चांदवडच्या देव हिरेंच महामानवाला अनोखं अभिवादन! १४ एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देव हिरे यांनी सादर केलेल्या रांगोळीचं वेगळपण अनेकांना आश्चर्यचकित करणारं आहे. माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबासाहेबांच्या कार्यातून झालं असल्याने, 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच ह्या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत.  हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात संयम व सातत्यातून रांगोळी आठ इंच व्यास असलेल्या बाजरीच्या भाकरीवर सहा इंच आकारात पाच तासांचा संयम व सातत्यातून त्यांनी ही रांगोळी साकारली आहे, त्यांच्या या वेगळ्या प्रयोगात जयश्री देविदास हिरे.यांची देखील त्यांना मोलाची साथ लाभलीय. खरं तर आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र! हे लोकप्रिय गीत ऐकूनच मला ही कल्पना सुचली. या अगोदर भाकरीवर पोर्टेट रांगोळी साकारण्यात आली आहे का याबाबतचा इंटरनेटवर कसून शोध घेऊन हा प्रयोग या अगोदर कुणी केला असल्याचं दिसलं नाही, राज्यभरातील नव्हे तर राज्याबाहेरील देखील अनेक कलाशिक्षकाशी याबाबत संवाद साधला सर्वांकडून हा पहिलाच प्रयोग ठरेल अशीच उत्तरं मिळालीत. मी लगेचच बाजरीची भाकर तयार करून रांगोळी काढायला सुरुवात केली अन पाच तासांच्या प्रयत्नांतून ती साकारली देखील गेली. अनेक मित्रांचा, कलाशिक्षकांचा आग्रह आहे की या प्रयोगाची नोंद होईल त्यामुळे तशा अर्थाने येत्या महिन्यात नोंदणी करणार आहोत.-देव हिरे कलाशिक्षक चांदवड Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uP4XOZ
Read More
Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू  

औरंगाबाद ः मराठवाड्यात मंगळवारी (ता. १३) दिवसभरात आठ हजार १९८ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी ः लातूर १९१६, नांदेड १६६४, औरंगाबाद १३५२, बीड १०२८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी ५३२, हिंगोली २५२. उपचारादरम्यान आणखी ९३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नांदेडमध्ये २७, औरंगाबाद २१, परभणी १५, हिंगोली-बीडमध्ये प्रत्येकी आठ, जालना- उस्मानाबादेतील प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे. 

ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू

औरंगाबादेत १३५२ बाधित 
औरंगाबादेत दिवसभरात एक हजार ३५२ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या एक लाख एक हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या एक हजार ४३८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८४ हजार १६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार २५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला. यात गंगापूर येथील पुरुष (वय ६७), सिल्लोड येथील पुरुष (६४), जाधववाडीतील पुरुष (३५), पैठणमधील पुरुष (६४), इतावा (ता. औरंगाबाद) येथील महिला (५८), भावसिंगपुऱ्यातील पुरुष (५६), रामनगरातील पुरुष (७५), दौलताबादेतील महिला (७०), वैजापुरातील महिला (८५), सिल्लोडमधील महिला (६५), नागेश्‍वरवाडी येथील पुरुष (८०), पडेगावातील पुरुष (४५), सातारा परिसरातील पुरुष (४३), घाटी रुग्णालय परिसरातील महिलेचा (५२) समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चौघांचा मृत्यू झाला. त्यात फर्दापूर, सोयगाव येथील पुरुष (६५), हर्सूल सावंगी येथील पुरुष (६७), शिवनेरी कॉलनीतील महिला (५०), पुरुष, देवळाई रोड भागातील पुरुषाचा (६८) समावेश आहे. खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. यात नायगव्हाण (फुलंब्री) येथील महिला (५०), पुरुष, इटखेडा, पैठण रोड येथील पुरुष (६८), बीड बायपास भागातील पुरुषाचा (३९) समावेश आहे. 

कोरोना मीटर (औरंगाबाद) 
आतापर्यंतचे बाधित १०१५३६ 
बरे झालेले रुग्ण ८४१६१ 
उपचार घेणारे रुग्ण १५३५० 
आतापर्यंत मृत्यू २०२५ 

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   औरंगाबाद ः मराठवाड्यात मंगळवारी (ता. १३) दिवसभरात आठ हजार १९८ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी ः लातूर १९१६, नांदेड १६६४, औरंगाबाद १३५२, बीड १०२८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी ५३२, हिंगोली २५२. उपचारादरम्यान आणखी ९३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नांदेडमध्ये २७, औरंगाबाद २१, परभणी १५, हिंगोली-बीडमध्ये प्रत्येकी आठ, जालना- उस्मानाबादेतील प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे.  ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू औरंगाबादेत १३५२ बाधित  औरंगाबादेत दिवसभरात एक हजार ३५२ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या एक लाख एक हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या एक हजार ४३८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८४ हजार १६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार २५ जणांचा मृत्यू झाला आहे.  घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला. यात गंगापूर येथील पुरुष (वय ६७), सिल्लोड येथील पुरुष (६४), जाधववाडीतील पुरुष (३५), पैठणमधील पुरुष (६४), इतावा (ता. औरंगाबाद) येथील महिला (५८), भावसिंगपुऱ्यातील पुरुष (५६), रामनगरातील पुरुष (७५), दौलताबादेतील महिला (७०), वैजापुरातील महिला (८५), सिल्लोडमधील महिला (६५), नागेश्‍वरवाडी येथील पुरुष (८०), पडेगावातील पुरुष (४५), सातारा परिसरातील पुरुष (४३), घाटी रुग्णालय परिसरातील महिलेचा (५२) समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चौघांचा मृत्यू झाला. त्यात फर्दापूर, सोयगाव येथील पुरुष (६५), हर्सूल सावंगी येथील पुरुष (६७), शिवनेरी कॉलनीतील महिला (५०), पुरुष, देवळाई रोड भागातील पुरुषाचा (६८) समावेश आहे. खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. यात नायगव्हाण (फुलंब्री) येथील महिला (५०), पुरुष, इटखेडा, पैठण रोड येथील पुरुष (६८), बीड बायपास भागातील पुरुषाचा (३९) समावेश आहे.  कोरोना मीटर (औरंगाबाद)  आतापर्यंतचे बाधित १०१५३६  बरे झालेले रुग्ण ८४१६१  उपचार घेणारे रुग्ण १५३५०  आतापर्यंत मृत्यू २०२५    संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dXjHok
Read More
सौंदर्याशी संबंधित 9 समस्यापासून दूर करतो बेकिंग सोडा: कसे वापरावे घ्या जाणून

कोल्हापूर : आपल्याला बर्‍याच भारतीय स्वयंपाकघरात बेकिंग सोडा मिळेल. स्वयंपाकघरात हा एक महत्वाचा घटक मानला जातो, जो कोणताही पदार्थ पटकन शिजवतो, बेकिंग सुलभ करतो आणि खाद्य चवदार बनवितो. परंतु आपणास माहित आहे की बेकिंगशिवाय बेकिंग सोडा देखील स्वत: ला सुंदर बनविण्यासाठी अनेक प्रकारे वापरला जाऊ शकतो. आम्हाला 9 सौंदर्यासारख्या बेकिंग सोडाच्या आश्चर्यकारक वापराबद्दल जाणून घ्या.

डियोड्रेंट
केमिकल युक्त डियोड्रेंट खरेदी करण्याऐवजी आपण ते स्वतः घरी बनवू शकता. नैसर्गिक वस्तूंनी घरीच बनवलेले  डियोड्रेंटमुळे. दिवसभर आपल्याला ताजे आणि निरोगी ठेवते.

वापरण्याची पद्धत

बेकिंग सोडा - 1/4
अरारोट पावडर - 1/4
नारळ तेल 1/2 कप
आवश्यक तेल - काही थेंब
या सर्व गोष्टी एकत्र मिसळा आणि वापरा

नखांची काळजी
बेकिंग सोडा वापरून नेल स्क्रब बनवून  रफ़ क्यूटिकल आणि पांढऱ्या नखांपासून मुक्त व्हा.

वापरण्याची पद्धत
एका भांड्यात 1 चमचा लिंबाचा रस किंवा सफरचंदाचा रस व्हिनेगर घाला. स्वच्छ टूथब्रश घ्या, एका वाडग्यात बुडवा आणि फक्त काही मिनिटांसाठी नखांमध्ये घासून घ्या आणि नंतर पुसून टाका. नंतर आपल्या नखांना ओलावा देण्यासाठी तेल कमी प्रमाणात मालिश करा.

पांढरे दांत

जर तुम्हाला दात स्वच्छ करायचे असतील तर बेकिंग सोडाच्या वापराने दात नैसर्गिकरीत्या पांढरे होऊ शकतात.

वापरण्याची पद्धत
यासाठी, आपल्याला अॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने दात पांढरे करण्यासाठी पट्ट्या तयार करण्याची आवश्यकता आहे. अ‍ॅल्युमिनियम फॉइलवर थोडासा टूथपेस्ट लावा आणि त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. आपल्या दातांवर अॅल्युमिनियम फॉइल फोल्ड करा. 5 मिनिटांसाठी असे सोडा, नंतर ते काढून टाका आणि स्वच्छ धुवा.

सनबर्न उपचार
जर तुमची त्वचा सनबर्न झाली असेल तर सनबर्न टाळण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकता.

वापरण्याची पद्धत
यासाठी, आपण 4 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि ते एका मोठ्या  बाउलमध्ये पाण्यात विरघळवा. नंतर कापसाला पाण्यात बुडवून तो भाजलेल्या भागावर लावा आणि हल्का-हल्का लावा. आपल्याला ज्वलनशीलतेपासून त्वरित आराम मिळेल आणि त्वचेचा टोन देखील हळूहळू सावरण्यास सुरवात होईल

अंडर आर्म्‍स के लिए स्क्रब

अंडर आर्म्‍स की डेड स्किन  काढून टाकण्यासाठी आणि त्वचेला चमकदार बनविण्यासाठी स्क्रब करा. यासाठी आपण घरीच स्क्रब बनवू शकता

वापरण्याची पद्धत
1 चमचा जोजोबा तेल 1 चमचे बेकिंग सोडामध्ये घाला आणि आपल्या हाताखाली हळू हळू स्क्रब करा. गुळगुळीत आणि पांढर्‍या अंडरआर्म्ससाठी ते स्वच्छ आणि मॉइश्चराइझ करा.

आंघोळीच्या पाण्यात मिसळा
जर तुम्हाला त्वचेची खाज सुटली असेल तर आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा वापरा.
वापरण्याची पद्धत
कोमट पाण्याच्या टबमध्ये १/२ कप बेकिंग सोडा मिसळा आणि या पाण्यात 15ते 20  मिनिटे बसा. काही दिवसातच तुमची समस्या सुटेल.

माउथवॉश

जर आपल्याला दुर्गंधी येत असेल तर आपण त्यातून मुक्त होण्यासाठी बेकिंग सोडाच्या सहाय्याने एक नैसर्गिक माउथवॉश देखील बनवू शकता.

वापरण्याची पद्धत
माऊथवॉश बनविण्यासाठी, एक कप पाण्यात 1/4 कप बेकिंग सोडा घाला आणि त्यामध्ये 20 थेंब फूड ग्रेड पेपरमिंट आवश्यक तेल घाला. ते व्यवस्थित हलवा आणि काही मिनिटांसाठी ते आपल्या तोंडात रोल करा आणि ते थुंकून घ्या.

स्कैल्प स्क्रब

केसांच्या निरोगी वाढीसाठी, टाळूचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. यामुळे टाळू घाण, तेल आणि इतर अशुद्धतेपासून साफ ​​करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरता. बेकिंग सोडा टाळूला एक्सफोलीएट करते आणि कोणतेही उत्पादन तयार करण्यासाठी केसांच्या फोलिकल्स काढून टाकते.

वापरण्याची पद्धत
2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचे गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट -10-१० मिनिटे त्वचेवर चोळा आणि कोरडे ठेवा. नंतर ही पेस्ट कोमट पाण्याने धुवा. गुलाबाच्या पाण्याची आणि बेकिंग सोडाची पेस्ट आठवड्यातून २  वेळा लावा. आपल्याला काही दिवसांत फरक जाणवेल.

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सौंदर्याशी संबंधित 9 समस्यापासून दूर करतो बेकिंग सोडा: कसे वापरावे घ्या जाणून कोल्हापूर : आपल्याला बर्‍याच भारतीय स्वयंपाकघरात बेकिंग सोडा मिळेल. स्वयंपाकघरात हा एक महत्वाचा घटक मानला जातो, जो कोणताही पदार्थ पटकन शिजवतो, बेकिंग सुलभ करतो आणि खाद्य चवदार बनवितो. परंतु आपणास माहित आहे की बेकिंगशिवाय बेकिंग सोडा देखील स्वत: ला सुंदर बनविण्यासाठी अनेक प्रकारे वापरला जाऊ शकतो. आम्हाला 9 सौंदर्यासारख्या बेकिंग सोडाच्या आश्चर्यकारक वापराबद्दल जाणून घ्या. डियोड्रेंट केमिकल युक्त डियोड्रेंट खरेदी करण्याऐवजी आपण ते स्वतः घरी बनवू शकता. नैसर्गिक वस्तूंनी घरीच बनवलेले  डियोड्रेंटमुळे. दिवसभर आपल्याला ताजे आणि निरोगी ठेवते. वापरण्याची पद्धत बेकिंग सोडा - 1/4 अरारोट पावडर - 1/4 नारळ तेल 1/2 कप आवश्यक तेल - काही थेंब या सर्व गोष्टी एकत्र मिसळा आणि वापरा नखांची काळजी बेकिंग सोडा वापरून नेल स्क्रब बनवून  रफ़ क्यूटिकल आणि पांढऱ्या नखांपासून मुक्त व्हा. वापरण्याची पद्धत एका भांड्यात 1 चमचा लिंबाचा रस किंवा सफरचंदाचा रस व्हिनेगर घाला. स्वच्छ टूथब्रश घ्या, एका वाडग्यात बुडवा आणि फक्त काही मिनिटांसाठी नखांमध्ये घासून घ्या आणि नंतर पुसून टाका. नंतर आपल्या नखांना ओलावा देण्यासाठी तेल कमी प्रमाणात मालिश करा. पांढरे दांत जर तुम्हाला दात स्वच्छ करायचे असतील तर बेकिंग सोडाच्या वापराने दात नैसर्गिकरीत्या पांढरे होऊ शकतात. वापरण्याची पद्धत यासाठी, आपल्याला अॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने दात पांढरे करण्यासाठी पट्ट्या तयार करण्याची आवश्यकता आहे. अ‍ॅल्युमिनियम फॉइलवर थोडासा टूथपेस्ट लावा आणि त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. आपल्या दातांवर अॅल्युमिनियम फॉइल फोल्ड करा. 5 मिनिटांसाठी असे सोडा, नंतर ते काढून टाका आणि स्वच्छ धुवा. सनबर्न उपचार जर तुमची त्वचा सनबर्न झाली असेल तर सनबर्न टाळण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकता. वापरण्याची पद्धत यासाठी, आपण 4 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि ते एका मोठ्या  बाउलमध्ये पाण्यात विरघळवा. नंतर कापसाला पाण्यात बुडवून तो भाजलेल्या भागावर लावा आणि हल्का-हल्का लावा. आपल्याला ज्वलनशीलतेपासून त्वरित आराम मिळेल आणि त्वचेचा टोन देखील हळूहळू सावरण्यास सुरवात होईल अंडर आर्म्‍स के लिए स्क्रब अंडर आर्म्‍स की डेड स्किन  काढून टाकण्यासाठी आणि त्वचेला चमकदार बनविण्यासाठी स्क्रब करा. यासाठी आपण घरीच स्क्रब बनवू शकता वापरण्याची पद्धत 1 चमचा जोजोबा तेल 1 चमचे बेकिंग सोडामध्ये घाला आणि आपल्या हाताखाली हळू हळू स्क्रब करा. गुळगुळीत आणि पांढर्‍या अंडरआर्म्ससाठी ते स्वच्छ आणि मॉइश्चराइझ करा. आंघोळीच्या पाण्यात मिसळा जर तुम्हाला त्वचेची खाज सुटली असेल तर आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा वापरा. वापरण्याची पद्धत कोमट पाण्याच्या टबमध्ये १/२ कप बेकिंग सोडा मिसळा आणि या पाण्यात 15ते 20  मिनिटे बसा. काही दिवसातच तुमची समस्या सुटेल. माउथवॉश जर आपल्याला दुर्गंधी येत असेल तर आपण त्यातून मुक्त होण्यासाठी बेकिंग सोडाच्या सहाय्याने एक नैसर्गिक माउथवॉश देखील बनवू शकता. वापरण्याची पद्धत माऊथवॉश बनविण्यासाठी, एक कप पाण्यात 1/4 कप बेकिंग सोडा घाला आणि त्यामध्ये 20 थेंब फूड ग्रेड पेपरमिंट आवश्यक तेल घाला. ते व्यवस्थित हलवा आणि काही मिनिटांसाठी ते आपल्या तोंडात रोल करा आणि ते थुंकून घ्या. स्कैल्प स्क्रब केसांच्या निरोगी वाढीसाठी, टाळूचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. यामुळे टाळू घाण, तेल आणि इतर अशुद्धतेपासून साफ ​​करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरता. बेकिंग सोडा टाळूला एक्सफोलीएट करते आणि कोणतेही उत्पादन तयार करण्यासाठी केसांच्या फोलिकल्स काढून टाकते. वापरण्याची पद्धत 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचे गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट -10-१० मिनिटे त्वचेवर चोळा आणि कोरडे ठेवा. नंतर ही पेस्ट कोमट पाण्याने धुवा. गुलाबाच्या पाण्याची आणि बेकिंग सोडाची पेस्ट आठवड्यातून २  वेळा लावा. आपल्याला काही दिवसांत फरक जाणवेल.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/32eIwX7
Read More
योगा लाइफस्टाइल - कणा ताठ करणारी योगासने

वाचकांनो, जरा ताठ मानेने उभे राहा. होय. तुम्हाला कायमच कोणाला तरी खूष करण्यासाठी मान झुकवावी लागते. असे कायमच मान तुकवणे तुमच्या आत्मसन्मानासाठी किती योग्य आहे...

भुजंगासन
कोब्रा स्वतःला वाचवण्यासाठी त्याचा फणा वर काढतो. तुम्हीही स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी असे ताठ उभे राहिले पाहिजे. त्यासाठी तुमचे पोट सपाट करा, स्नानू बलवान करा आणि पाठीचा कणा ताकदवान बनवा. तुमच्या सर्व अवयवांना संपूर्ण समाधान लाभेल आणि सर्व प्रकारच्या थकव्यापासून तुमची मुक्तता होईल. जा, झेप घ्या, मान आणखी वर घ्या आणि आयुष्य तुम्हाला जमिनीवर लोळवू पाहील तेव्हा अधिक त्वेषाने उभे राहा...

हे वाचा - कोरोनाशी लढायचंय? खरी इम्युनिटी कोठून मिळते?

आसनाचे फायदे

    पाठीचा कणा ताकदवान बनतो. 

    छाती आणि फुफ्फुसे ताणली जातात. खांदे व पोटावर ताण येतो. 

    पार्श्वभागाच्या स्नायूंमध्ये ताकद येते. 

    पोटामधील सर्व अवयव उत्तेजित होतात.

    ताण आणि थकवा दूर होण्यास मदत होते. 

    हृदय आणि फुफ्फुसे खुली होतात.

    सायटिकाचा आजार बरा होतो. 

    अस्थमा बरा होतो.
 

हलासन
तुम्ही पाठीवर झोपलेले असताना जग तुम्हाला अधिक सुटसुटीत वाटते आणि तुम्ही जग खाली डोके वर पाय करून करून पाहता तेव्हा ते अधिक शांत भासते. हे पाठीचा कणा वाकविण्यासाठीचे सर्वात चांगले आसन आहे. हे आसन तुम्ही काही मिनिटांसाठी केल्यास तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव अगदी मसाज केल्याप्रमाणे ताजेतवाने होतात. यातून तुमच्या अवयवांना मसाज मिळतो, एवढेच नव्हे तर तुमचे चयापचय सुधारते, बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो, प्लिहा, मुत्राशय, स्वादुपिंड, आतडे यांचे कार्य सुधारते. तुमच्या हार्मोन्समध्ये समतोल साधला जाऊन तुम्हाला दिवसभर आरामदायी वाटते. तुम्ही जगाला या नव्या नजरेतून पाहण्यास सज्ज आहात का?

हे वाचा - तुमचंही कोलेस्ट्रॉल वाढलंय का? मग आहारात करा या पदार्थांचा समावेश आणि मिळवा आराम

आसनाचे फायदे

 रक्तदाब कमी होतो.

 स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होते. 

 मेंदू शांत होतो. 

 पोटातील सर्व अवयव व थायरॉईड ग्लॅंड उत्तेजित होतात. 

 खांदे व पाठीचा कणा ताणला जातो. 

 महिलांमध्ये मेनोपॉजच्या समस्येतील वेदना कमी होतात. 

 ताण आणि नैराश्य कमी होते. 

 पाठदुखी, डोकेदुखी, वंध्यत्व, निद्रानाश, सायनस या आजारांपासून आराम मिळतो.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

योगा लाइफस्टाइल - कणा ताठ करणारी योगासने वाचकांनो, जरा ताठ मानेने उभे राहा. होय. तुम्हाला कायमच कोणाला तरी खूष करण्यासाठी मान झुकवावी लागते. असे कायमच मान तुकवणे तुमच्या आत्मसन्मानासाठी किती योग्य आहे... भुजंगासन कोब्रा स्वतःला वाचवण्यासाठी त्याचा फणा वर काढतो. तुम्हीही स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी असे ताठ उभे राहिले पाहिजे. त्यासाठी तुमचे पोट सपाट करा, स्नानू बलवान करा आणि पाठीचा कणा ताकदवान बनवा. तुमच्या सर्व अवयवांना संपूर्ण समाधान लाभेल आणि सर्व प्रकारच्या थकव्यापासून तुमची मुक्तता होईल. जा, झेप घ्या, मान आणखी वर घ्या आणि आयुष्य तुम्हाला जमिनीवर लोळवू पाहील तेव्हा अधिक त्वेषाने उभे राहा... हे वाचा - कोरोनाशी लढायचंय? खरी इम्युनिटी कोठून मिळते? आसनाचे फायदे     पाठीचा कणा ताकदवान बनतो.      छाती आणि फुफ्फुसे ताणली जातात. खांदे व पोटावर ताण येतो.      पार्श्वभागाच्या स्नायूंमध्ये ताकद येते.      पोटामधील सर्व अवयव उत्तेजित होतात.     ताण आणि थकवा दूर होण्यास मदत होते.      हृदय आणि फुफ्फुसे खुली होतात.     सायटिकाचा आजार बरा होतो.      अस्थमा बरा होतो.   हलासन तुम्ही पाठीवर झोपलेले असताना जग तुम्हाला अधिक सुटसुटीत वाटते आणि तुम्ही जग खाली डोके वर पाय करून करून पाहता तेव्हा ते अधिक शांत भासते. हे पाठीचा कणा वाकविण्यासाठीचे सर्वात चांगले आसन आहे. हे आसन तुम्ही काही मिनिटांसाठी केल्यास तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव अगदी मसाज केल्याप्रमाणे ताजेतवाने होतात. यातून तुमच्या अवयवांना मसाज मिळतो, एवढेच नव्हे तर तुमचे चयापचय सुधारते, बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो, प्लिहा, मुत्राशय, स्वादुपिंड, आतडे यांचे कार्य सुधारते. तुमच्या हार्मोन्समध्ये समतोल साधला जाऊन तुम्हाला दिवसभर आरामदायी वाटते. तुम्ही जगाला या नव्या नजरेतून पाहण्यास सज्ज आहात का? हे वाचा - तुमचंही कोलेस्ट्रॉल वाढलंय का? मग आहारात करा या पदार्थांचा समावेश आणि मिळवा आराम आसनाचे फायदे  रक्तदाब कमी होतो.  स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होते.   मेंदू शांत होतो.   पोटातील सर्व अवयव व थायरॉईड ग्लॅंड उत्तेजित होतात.   खांदे व पाठीचा कणा ताणला जातो.   महिलांमध्ये मेनोपॉजच्या समस्येतील वेदना कमी होतात.   ताण आणि नैराश्य कमी होते.   पाठदुखी, डोकेदुखी, वंध्यत्व, निद्रानाश, सायनस या आजारांपासून आराम मिळतो.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dgmpWB
Read More
कोरोना संशयिताची आत्महत्या; कार्वे नाका परिसरातील कुटुंबास धक्का

कार्वे नाका (जि. सातारा) : छत्तीसगड येथील परप्रांतीय बांधकाम कामगाराने कोरोनाच्या भीतीने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. गोविंद परशाराम साहू (वय 45, रा. कार्वे नाका, मूळ रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कार्वे नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्‍स इमारतीशेजारील झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. गोविंद हे कोरोना संशयित होते, असा वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, गोविंद साहू हा अनेक वर्षांपासून कऱ्हाडमध्ये बांधकामावर कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी गोविंद हे मूळ गावी गेले होते. आठ दिवसांपूर्वी ते गावाहून कऱ्हाडला परत आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना ताप व अंग दुखू लागले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना कोविड टेस्ट करून घेण्यास सांगितले होते. तोपर्यंत साहू यांची मुलगी, मुलगा व पत्नीलाही त्रास सुरू झाला. त्या प्रकाराने साहू घाबरले होते. 

साेमवारी रात्रीपर्यंत ते घरीच होते. सकाळी ते घराबाहेर गेले. बराच वेळ न आल्याने शोधाशोध केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. साहू यांनी कोरोनाला घाबरून आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. साहू हे कोरोना संशयित असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे, असे तपास अधिकारी हवालदार खान यांनी सांगितले. 

पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत

बनपुरीतील नाईकबाच्या डोंगरावर सन्नाटा; यात्रा रद्द केल्याने परिसरात शुकशुकाट

कऱ्हाड, पाटणला पावसाने झोडपले; बहरात आलेल्या आंब्यासह कलिंगड, टरबुजला फटका

पाटण तालुक्यात भररस्त्यात फिल्मी स्टाईल हाणामारी; भांडणात घुसून पिस्तुलधारी युवकाला पोलिसांकडून अटक

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना संशयिताची आत्महत्या; कार्वे नाका परिसरातील कुटुंबास धक्का कार्वे नाका (जि. सातारा) : छत्तीसगड येथील परप्रांतीय बांधकाम कामगाराने कोरोनाच्या भीतीने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. गोविंद परशाराम साहू (वय 45, रा. कार्वे नाका, मूळ रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कार्वे नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्‍स इमारतीशेजारील झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. गोविंद हे कोरोना संशयित होते, असा वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे.   पोलिसांनी सांगितले की, गोविंद साहू हा अनेक वर्षांपासून कऱ्हाडमध्ये बांधकामावर कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी गोविंद हे मूळ गावी गेले होते. आठ दिवसांपूर्वी ते गावाहून कऱ्हाडला परत आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना ताप व अंग दुखू लागले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना कोविड टेस्ट करून घेण्यास सांगितले होते. तोपर्यंत साहू यांची मुलगी, मुलगा व पत्नीलाही त्रास सुरू झाला. त्या प्रकाराने साहू घाबरले होते.  साेमवारी रात्रीपर्यंत ते घरीच होते. सकाळी ते घराबाहेर गेले. बराच वेळ न आल्याने शोधाशोध केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. साहू यांनी कोरोनाला घाबरून आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. साहू हे कोरोना संशयित असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे, असे तपास अधिकारी हवालदार खान यांनी सांगितले.  पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत बनपुरीतील नाईकबाच्या डोंगरावर सन्नाटा; यात्रा रद्द केल्याने परिसरात शुकशुकाट कऱ्हाड, पाटणला पावसाने झोडपले; बहरात आलेल्या आंब्यासह कलिंगड, टरबुजला फटका पाटण तालुक्यात भररस्त्यात फिल्मी स्टाईल हाणामारी; भांडणात घुसून पिस्तुलधारी युवकाला पोलिसांकडून अटक Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3a9r9LR
Read More