Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 29, 2020

‘ॲम्नेस्टी’ने भारतातील काम थांबवले

नवी दिल्ली - ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेने भारतातील कामकाज बंद करीत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. भारत सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला संस्थेची बँक खाती बंद केल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे भाग पडले आहे, असे स्पष्टीकरण देताना भारत सरकार संस्थेच्या हात धुऊन मागे लागले असल्याचा आरोपही केला.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ॲम्नेस्टी’वरील कारवाईबाबत बोलताना सरकारने म्हटले आहे की, मानही अधिकाराच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या जागतिक संस्थेला विदेशातून ज्या देणग्या, निधी मिळत होता तो बेकायदा आहे. कारण यासाठी परकीय निधी विनियमन कायद्यानुसार (एफसीआरए) संस्थेची नोंदणी झालेली नाही.

लोकप्रिय मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशात महिलांचे अस्तित्व धोक्यात!

‍‘ॲम्नेस्टी’चे स्पष्टीकरण
संस्थेने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारने ॲम्नेस्टी इंटरनॅशनलची बँक खाती पूर्णपणे गोठविली आहेत. याची माहिती संस्थेला १० सप्टेंबरला मिळाली. यामुळे संस्थेचे कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढणे संस्थेला भाग पडले आहे. त्याचप्रमाणे भारतात सुरू असलेले उपक्रम व संशोधन कार्यही बंद करावे लागले आहे.

आणखी एका युवतीला मारले: राहुल गांधी

निराधार आणि हेतुपुरस्सर आरोपांच्या आधारे भारत सरकार मानवाधिकार संस्थांच्या मागे लागले असून ही नवी कारवाई त्याचे पुढील पाऊल आहे, ‘ॲम्नेस्टी’ने भारतीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व कायद्यांचे पालन केले असल्याचा दावाही केला आहे.

Video: खेळाडूच्या दोरीवरील आगळ्या वेगळ्या उड्या पाहाच

भारतातील ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक अविनाश कुमार म्हणाले, ‘भारतातील ‘ॲम्नेस्टी’वर गेल्या दोन वर्षांत सरकारकडून सातत्याने होत असलेली कारवाई आणि आता बँक खाती गोठविण्याचे पाऊल हे काही अचानकपणे झालेले नाही. सरकारमध्ये पारदर्शकतेची निःसंदिग्ध मागणी, दिल्लीतील दंगल आणि जम्मू-काश्‍मीरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनात दिल्ली पोलिस व सरकारची जबाबदारी निश्‍चित करणे, अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची चळवळ अशा गोष्टींमुळे सक्तवसुली संचालनालयासह अनेक सरकारी यंत्रणांकडून''ॲम्नेस्टी’ची छळवणूक सुरू आहे.’’

आरोप व चौकशी

परकीय देणग्या मिळविण्यात नियमांचे पालन झाले नसल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी

संस्थेने थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) पैसे मागविल्याचा गृह मंत्रालयाचा आरोप. स्वयंसेवी संस्थांना अशी परवानगी नाही.

‘ईडी’ने २०१७ मध्ये  खाती गोठविली होती. ‘ॲम्नेस्टी’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यांना दिलासा मिळाला.

गेल्या वर्षी ‘सीबीआय’नेही ‘ॲम्नेस्टी’विरोधात खटला दाखल केला. 

ब्रिटनमधील ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने मंत्रालयाच्या मंजुरीविना ‘एफडीआय’च्या रूपात भारतातील ‘ॲम्नेस्टी’ला दहा कोटी रुपयांचे वितरण असा आरोप केला होता.

याशिवाय ब्रिटनमधील संस्थांकडून ‘ॲम्नेस्टी’ (भारत) ला २६ कोटी रुपये मंत्रालयाच्या परवानगीविना दिले. भारतातील स्वयंसेवी संस्थांच्या कामासाठी ही रक्कम खर्च करण्यात आली. मात्र असे करणे ‘एफसीआरए’ कायद्याचे उल्लंघन आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘ॲम्नेस्टी’ने भारतातील काम थांबवले नवी दिल्ली - ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेने भारतातील कामकाज बंद करीत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. भारत सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला संस्थेची बँक खाती बंद केल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे भाग पडले आहे, असे स्पष्टीकरण देताना भारत सरकार संस्थेच्या हात धुऊन मागे लागले असल्याचा आरोपही केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ॲम्नेस्टी’वरील कारवाईबाबत बोलताना सरकारने म्हटले आहे की, मानही अधिकाराच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या जागतिक संस्थेला विदेशातून ज्या देणग्या, निधी मिळत होता तो बेकायदा आहे. कारण यासाठी परकीय निधी विनियमन कायद्यानुसार (एफसीआरए) संस्थेची नोंदणी झालेली नाही. लोकप्रिय मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशात महिलांचे अस्तित्व धोक्यात! ‍‘ॲम्नेस्टी’चे स्पष्टीकरण संस्थेने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारने ॲम्नेस्टी इंटरनॅशनलची बँक खाती पूर्णपणे गोठविली आहेत. याची माहिती संस्थेला १० सप्टेंबरला मिळाली. यामुळे संस्थेचे कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढणे संस्थेला भाग पडले आहे. त्याचप्रमाणे भारतात सुरू असलेले उपक्रम व संशोधन कार्यही बंद करावे लागले आहे. आणखी एका युवतीला मारले: राहुल गांधी निराधार आणि हेतुपुरस्सर आरोपांच्या आधारे भारत सरकार मानवाधिकार संस्थांच्या मागे लागले असून ही नवी कारवाई त्याचे पुढील पाऊल आहे, ‘ॲम्नेस्टी’ने भारतीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व कायद्यांचे पालन केले असल्याचा दावाही केला आहे. Video: खेळाडूच्या दोरीवरील आगळ्या वेगळ्या उड्या पाहाच भारतातील ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक अविनाश कुमार म्हणाले, ‘भारतातील ‘ॲम्नेस्टी’वर गेल्या दोन वर्षांत सरकारकडून सातत्याने होत असलेली कारवाई आणि आता बँक खाती गोठविण्याचे पाऊल हे काही अचानकपणे झालेले नाही. सरकारमध्ये पारदर्शकतेची निःसंदिग्ध मागणी, दिल्लीतील दंगल आणि जम्मू-काश्‍मीरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनात दिल्ली पोलिस व सरकारची जबाबदारी निश्‍चित करणे, अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची चळवळ अशा गोष्टींमुळे सक्तवसुली संचालनालयासह अनेक सरकारी यंत्रणांकडून''ॲम्नेस्टी’ची छळवणूक सुरू आहे.’’ आरोप व चौकशी परकीय देणग्या मिळविण्यात नियमांचे पालन झाले नसल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी संस्थेने थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) पैसे मागविल्याचा गृह मंत्रालयाचा आरोप. स्वयंसेवी संस्थांना अशी परवानगी नाही. ‘ईडी’ने २०१७ मध्ये  खाती गोठविली होती. ‘ॲम्नेस्टी’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यांना दिलासा मिळाला. गेल्या वर्षी ‘सीबीआय’नेही ‘ॲम्नेस्टी’विरोधात खटला दाखल केला.  ब्रिटनमधील ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने मंत्रालयाच्या मंजुरीविना ‘एफडीआय’च्या रूपात भारतातील ‘ॲम्नेस्टी’ला दहा कोटी रुपयांचे वितरण असा आरोप केला होता. याशिवाय ब्रिटनमधील संस्थांकडून ‘ॲम्नेस्टी’ (भारत) ला २६ कोटी रुपये मंत्रालयाच्या परवानगीविना दिले. भारतातील स्वयंसेवी संस्थांच्या कामासाठी ही रक्कम खर्च करण्यात आली. मात्र असे करणे ‘एफसीआरए’ कायद्याचे उल्लंघन आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HIc8W1
Read More
विद्यापीठ परीक्षेसाठी एजन्सी निवडीचा निर्णय एक दोन दिवसात होणार

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी एजन्सीची निवड कधी होते याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असताना आजच्या (मंगळवार) खरेदी समितीच्या (पर्चेस कमिटी) बैठकीमध्ये यावर निर्णय होऊ शकला नाही, आलेल्या प्रस्तावांवर तांत्रीक चर्चा करण्यात आली. पुढील एक दोन दिवसात याबाबत निर्णय होणार असला तरी परीक्षेच्या प्रक्रियेस आणखी विलंब होणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 89 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. "एमसीक्‍यू' पद्धतीने ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी एजन्सीची नेमणूक आवश्‍यक असल्याने पुणे विद्यापीठाने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये वर्षाला किमान 30 कोटी रुपयांची उलाढाल असावी, एका वर्षात किमान 3 लाख तर एका सत्रात 20 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा अनुभव असावा अशा अटी टाकल्या होत्या.

सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये 'ती' गेल्या सहा महिन्यांपासून लावतेय जिवाची बाजी

28 सप्टेंबर रोजी निविदेची मुदत संपल्यानंतर यामध्ये चार संस्थांनी सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले, पण काही तांत्रीक कारणांमुळे ही या निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या. त्यावर आजच्या (मंगळवारी) पर्चेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पण यामध्ये कोणत्या एजन्सीला काम द्यायचे यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. या कंपन्या मुंबईतील असल्याने त्यांना सादरीकरणासाठी आणखी काही वेळ द्यावा लागणार आहे अशी चर्चा बैठकीत झाली. त्यामुळे एजन्सी निवडीबाबत बुधवारी किंवा गुरुवारी बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेची पुढची कार्यवाही करण्यासही आणखी दोन दिवसांची विलंब होणार आहे.

35 व्या वर्षी केला गुन्हा आणि 55 व्या वर्षी सापडला

पुणे विद्यापीठाने 1 ऑक्‍टोबर पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता, पण परीक्षेची तयारी पूर्ण न झाल्याने आता 12 ऑक्‍टोबर पासूनच नियमित व बॅकलॉगच्या विषयांचे पेपर होणार आहेत.

'पर्चेस कमिटीच्या बैठकीत ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आलेल्या निवीदेबाबत तांत्रीक चर्चा झाली, यामध्ये आणखी व्यवस्थित चर्चा होणे गरजेचे आहे. पुढील बैठक येत्या दोन दिवसांमध्ये होऊन यावर निर्णय होईल.''
- राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन समिती

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यापीठ परीक्षेसाठी एजन्सी निवडीचा निर्णय एक दोन दिवसात होणार पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी एजन्सीची निवड कधी होते याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असताना आजच्या (मंगळवार) खरेदी समितीच्या (पर्चेस कमिटी) बैठकीमध्ये यावर निर्णय होऊ शकला नाही, आलेल्या प्रस्तावांवर तांत्रीक चर्चा करण्यात आली. पुढील एक दोन दिवसात याबाबत निर्णय होणार असला तरी परीक्षेच्या प्रक्रियेस आणखी विलंब होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 89 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. "एमसीक्‍यू' पद्धतीने ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी एजन्सीची नेमणूक आवश्‍यक असल्याने पुणे विद्यापीठाने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये वर्षाला किमान 30 कोटी रुपयांची उलाढाल असावी, एका वर्षात किमान 3 लाख तर एका सत्रात 20 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा अनुभव असावा अशा अटी टाकल्या होत्या. सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये 'ती' गेल्या सहा महिन्यांपासून लावतेय जिवाची बाजी 28 सप्टेंबर रोजी निविदेची मुदत संपल्यानंतर यामध्ये चार संस्थांनी सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले, पण काही तांत्रीक कारणांमुळे ही या निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या. त्यावर आजच्या (मंगळवारी) पर्चेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पण यामध्ये कोणत्या एजन्सीला काम द्यायचे यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. या कंपन्या मुंबईतील असल्याने त्यांना सादरीकरणासाठी आणखी काही वेळ द्यावा लागणार आहे अशी चर्चा बैठकीत झाली. त्यामुळे एजन्सी निवडीबाबत बुधवारी किंवा गुरुवारी बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेची पुढची कार्यवाही करण्यासही आणखी दोन दिवसांची विलंब होणार आहे. 35 व्या वर्षी केला गुन्हा आणि 55 व्या वर्षी सापडला पुणे विद्यापीठाने 1 ऑक्‍टोबर पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता, पण परीक्षेची तयारी पूर्ण न झाल्याने आता 12 ऑक्‍टोबर पासूनच नियमित व बॅकलॉगच्या विषयांचे पेपर होणार आहेत. 'पर्चेस कमिटीच्या बैठकीत ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आलेल्या निवीदेबाबत तांत्रीक चर्चा झाली, यामध्ये आणखी व्यवस्थित चर्चा होणे गरजेचे आहे. पुढील बैठक येत्या दोन दिवसांमध्ये होऊन यावर निर्णय होईल.'' - राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन समिती Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kWBttB
Read More

Monday, September 28, 2020

मुंबईच्या तटांवर पसरतेय रोगराई, कांदळवनांवर "हायब्लिया प्युएरा" रोगाचे थैमान

मुंबई, ता.28 : ठाणे जिल्हा खाडी पट्ट्यातील खांदळवनांवर हायब्लिया प्युरा नावाच्या रोगाने थैमाम घातले आहे. यामुळे कांदळनवातील झाडांची पाने नष्ट झाली असून सुकली आहेत. ठाण्यासह नवी मुंबईतील खाडी किना-यावरून जातांना या किड्यांच्या आक्रमणाने खराब झालेली कांदळवन दृष्टीस पडत असून पर्यावरण प्रमींना चिंता व्यक्त केली आहे.

"टिग डिफॉलेएटर" म्हणजेच पतंगाच्या अळीने ठाणे, नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावरील कांदळवनांवर हे आक्रमण केले आहे. या अळीने कांदळवनांतील झाडांची सर्व पाने खाऊन टाकली आहेत. यामुळे सर्व पाने सुकून गेली असून खुरटी झुडपे तेव्हडी अस्तित्वात आहे. या अळ्या केवळ कांदळवनांवरच आक्रमण करत असल्याने खाडीमधील इतर वनस्पतींना काहीही बाधा झालेली नाही.

पतंगाच्या अळीचा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा प्रजननाचा काळ असतो. या दरम्यान पतंगाच्या अळ्या केवळ कांदळवनांवरच आसरा घेऊन अंडी घालतात. त्यामुळे तिन महिने या अळ्या कांदळवनांची पाने खाऊन आपले पोषण करत असतात. साधारणता डिसेंबर नंतर या अळ्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.

महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती

हिवाळ्याच्या ऋतुत या अळ्यांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. दरवर्षी या अळ्या खाडीतील केवळ कांदळवनांवर येत असतात. या अळ्या जरी कांदळवनांची पाने खात असल्या तरी यामुळे झाडांना कोणताही धोका पोहोचत नसल्याचे मँग्रोव्ह फाउंडेशनचे प्रमुख सुरेश वरक यांनी सांगितले. अळ्या निघून गेल्यानंतर झाडे पुन्हा पुर्वीप्रमाणेच टवटवीत होत असल्याचे ही वरक म्हणाले. अळ्यांपासून झाडांच्या संरक्षणासाठी आम्ही काही औषधांची फवारणी करून प्रयोग केला आहे. मात्र त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे ही वरक यांनी सांगितले. 

ठाणे, नवी मुंबईसह शिवडी, माहीममधील खाडीत कांदळवनांचा मोठा पट्टा आहे. मात्र या अळ्यांनी केवळ ठाणे तसेच नवी मुंबईतील ऐरोली पट्ट्यामधील कांदळवनांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे शिवडी,माहीम खाडीत या अळ्यांचा प्रादुर्भाव अद्याप झाला नसल्याचे दिसते.

महत्त्वाची बातमी : राज्यात लवकरच रेस्टॉरंट सुरु होण्याची चिन्ह, मार्गदर्शक तत्व अंतिम झाल्यावर निर्णय

टीग डीफॉलिएटर, हायब्लिया प्यूएरा हा दक्षिण-पूर्व आशियातील पतंग आहे. पीटर क्रेमर यांनी पहिल्यांदा त्याचे वर्णन केले होते. ही प्रजाती नुकतीच मध्य अमेरिका आणि आफ्रिकेतही आढळली आहेत.हा पतंग कांदळवन, सुरवंट, सागवान व इतर झाडांवर पोसतो. हा जगभरातील सागवानांच्या कीटकांपैकी एक मानला जातो.

mangrove jungle around mumbai and thane are facing threat of hyblia puera

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईच्या तटांवर पसरतेय रोगराई, कांदळवनांवर "हायब्लिया प्युएरा" रोगाचे थैमान मुंबई, ता.28 : ठाणे जिल्हा खाडी पट्ट्यातील खांदळवनांवर हायब्लिया प्युरा नावाच्या रोगाने थैमाम घातले आहे. यामुळे कांदळनवातील झाडांची पाने नष्ट झाली असून सुकली आहेत. ठाण्यासह नवी मुंबईतील खाडी किना-यावरून जातांना या किड्यांच्या आक्रमणाने खराब झालेली कांदळवन दृष्टीस पडत असून पर्यावरण प्रमींना चिंता व्यक्त केली आहे. "टिग डिफॉलेएटर" म्हणजेच पतंगाच्या अळीने ठाणे, नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावरील कांदळवनांवर हे आक्रमण केले आहे. या अळीने कांदळवनांतील झाडांची सर्व पाने खाऊन टाकली आहेत. यामुळे सर्व पाने सुकून गेली असून खुरटी झुडपे तेव्हडी अस्तित्वात आहे. या अळ्या केवळ कांदळवनांवरच आक्रमण करत असल्याने खाडीमधील इतर वनस्पतींना काहीही बाधा झालेली नाही. पतंगाच्या अळीचा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा प्रजननाचा काळ असतो. या दरम्यान पतंगाच्या अळ्या केवळ कांदळवनांवरच आसरा घेऊन अंडी घालतात. त्यामुळे तिन महिने या अळ्या कांदळवनांची पाने खाऊन आपले पोषण करत असतात. साधारणता डिसेंबर नंतर या अळ्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती हिवाळ्याच्या ऋतुत या अळ्यांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. दरवर्षी या अळ्या खाडीतील केवळ कांदळवनांवर येत असतात. या अळ्या जरी कांदळवनांची पाने खात असल्या तरी यामुळे झाडांना कोणताही धोका पोहोचत नसल्याचे मँग्रोव्ह फाउंडेशनचे प्रमुख सुरेश वरक यांनी सांगितले. अळ्या निघून गेल्यानंतर झाडे पुन्हा पुर्वीप्रमाणेच टवटवीत होत असल्याचे ही वरक म्हणाले. अळ्यांपासून झाडांच्या संरक्षणासाठी आम्ही काही औषधांची फवारणी करून प्रयोग केला आहे. मात्र त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे ही वरक यांनी सांगितले.  ठाणे, नवी मुंबईसह शिवडी, माहीममधील खाडीत कांदळवनांचा मोठा पट्टा आहे. मात्र या अळ्यांनी केवळ ठाणे तसेच नवी मुंबईतील ऐरोली पट्ट्यामधील कांदळवनांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे शिवडी,माहीम खाडीत या अळ्यांचा प्रादुर्भाव अद्याप झाला नसल्याचे दिसते. महत्त्वाची बातमी : राज्यात लवकरच रेस्टॉरंट सुरु होण्याची चिन्ह, मार्गदर्शक तत्व अंतिम झाल्यावर निर्णय टीग डीफॉलिएटर, हायब्लिया प्यूएरा हा दक्षिण-पूर्व आशियातील पतंग आहे. पीटर क्रेमर यांनी पहिल्यांदा त्याचे वर्णन केले होते. ही प्रजाती नुकतीच मध्य अमेरिका आणि आफ्रिकेतही आढळली आहेत.हा पतंग कांदळवन, सुरवंट, सागवान व इतर झाडांवर पोसतो. हा जगभरातील सागवानांच्या कीटकांपैकी एक मानला जातो. mangrove jungle around mumbai and thane are facing threat of hyblia puera News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30bKRld
Read More
"मल्टिस्पेशालिटी' अडले जागेच्या गोंधळात 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत; मात्र जिल्ह्यासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 
जागेच्या गोंधळामुळे अडकले आहे. यातून मार्ग काढण्याची मागणी जोर धरत आहे. 

सावंतवाडीचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाच्या काळात कोट्यवधीचा निधी जिल्हासाठी आणला. त्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वीस कोटी रुपये त्यांनी मंजूर करुन आणले आहेत. हे हॉस्पिटल सावंतवाडीत होण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेत या हॉस्पिटलसाठी भुमीपूजनही त्यांच्या हस्ते झाले; मात्र ही जागा न्यायप्रविष्ट असल्याने हॉस्पिटलसाठी एक विटही याठिकाणी रचली गेली नाही. 

अलिकडेच या हॉस्पिटलचा मुद्दा चांगलाच गाजला तो शहरातील मंजुर हॉस्पिटल शहराबाहेर इतरत्र हलविण्यावरुन. खासदार विनायक राऊत यांनी येथील एका कार्यक्रमात यासंदर्भात विधान केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार राऊत यांनी वेत्ये येथे या हॉस्पिटलसाठी पर्यायी जागेची पाहणीही केली. यावरून टीका झाली. या प्रकल्पासाठी विनामोबदला जागा आवश्‍यक असल्याचा मुद्दा पुढे आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीतील जागेबाबत तोडगा काढायचाही प्रयत्न केला.

खुद्द केसरकर यांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे सावंतवाडीतच होणार आहे, उगाच आपापसात वाद नको. जागेचा तिढा सोडविणार, असे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देत भूमीपूजन झालेल्या जागेचा मोबदला देऊन ही जागा भूसंपादन होण्याच्या दृष्टीने रितसर प्रस्ताव शासन दप्तरी पाठवा, अशी मागणी केली होती; मात्र त्यानंतर हा विषयच मागे पडला. 

आज कोरोनाचा जिल्हातील शिरकाव लक्षात घेता आणि जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा तोकडी पडत आहे. जिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो रुग्ण दाखल होत आहेत; मात्र कोणावरच योग्य व अपेक्षित उपचार होत नाहीत. जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय मंजूर आहे; मात्र इतर जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्यातील या महाविद्यालच्या उभारणीसाठी काहीच हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे सक्षम आरोग्य यंत्रणा होण्यासाठी वीस कोटी रुपये मंजूर असलेले व सावंतवाडी शहरात भूमीपुजन झालेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तरी उभे राहावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे. 

"मल्टिस्पेशालिटी' हे सावंतवाडीतच होणार आहे. कोरोना काळात या विषयाला काहीसा ब्रेक लागला आहे. यासाठी प्राप्त निधी अद्यापही कुठेच वळविलेला नाही. लवकरच आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच हॉस्पिटल उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. 
- संजय पडते, जिल्हाप्रमुख, शिवसेना 

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नियोजित जागेतच होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जागेचा प्रश्‍न सुटल्यानंतर हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी येत्या काही दिवसांत जिल्ह्यात येऊन या विषयावर चर्चा करणार आहे. 
- उदय सामंत, पालकमंत्री 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"मल्टिस्पेशालिटी' अडले जागेच्या गोंधळात  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत; मात्र जिल्ह्यासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल  जागेच्या गोंधळामुळे अडकले आहे. यातून मार्ग काढण्याची मागणी जोर धरत आहे.  सावंतवाडीचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाच्या काळात कोट्यवधीचा निधी जिल्हासाठी आणला. त्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वीस कोटी रुपये त्यांनी मंजूर करुन आणले आहेत. हे हॉस्पिटल सावंतवाडीत होण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेत या हॉस्पिटलसाठी भुमीपूजनही त्यांच्या हस्ते झाले; मात्र ही जागा न्यायप्रविष्ट असल्याने हॉस्पिटलसाठी एक विटही याठिकाणी रचली गेली नाही.  अलिकडेच या हॉस्पिटलचा मुद्दा चांगलाच गाजला तो शहरातील मंजुर हॉस्पिटल शहराबाहेर इतरत्र हलविण्यावरुन. खासदार विनायक राऊत यांनी येथील एका कार्यक्रमात यासंदर्भात विधान केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार राऊत यांनी वेत्ये येथे या हॉस्पिटलसाठी पर्यायी जागेची पाहणीही केली. यावरून टीका झाली. या प्रकल्पासाठी विनामोबदला जागा आवश्‍यक असल्याचा मुद्दा पुढे आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीतील जागेबाबत तोडगा काढायचाही प्रयत्न केला. खुद्द केसरकर यांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे सावंतवाडीतच होणार आहे, उगाच आपापसात वाद नको. जागेचा तिढा सोडविणार, असे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देत भूमीपूजन झालेल्या जागेचा मोबदला देऊन ही जागा भूसंपादन होण्याच्या दृष्टीने रितसर प्रस्ताव शासन दप्तरी पाठवा, अशी मागणी केली होती; मात्र त्यानंतर हा विषयच मागे पडला.  आज कोरोनाचा जिल्हातील शिरकाव लक्षात घेता आणि जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा तोकडी पडत आहे. जिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो रुग्ण दाखल होत आहेत; मात्र कोणावरच योग्य व अपेक्षित उपचार होत नाहीत. जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय मंजूर आहे; मात्र इतर जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्यातील या महाविद्यालच्या उभारणीसाठी काहीच हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे सक्षम आरोग्य यंत्रणा होण्यासाठी वीस कोटी रुपये मंजूर असलेले व सावंतवाडी शहरात भूमीपुजन झालेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तरी उभे राहावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.  "मल्टिस्पेशालिटी' हे सावंतवाडीतच होणार आहे. कोरोना काळात या विषयाला काहीसा ब्रेक लागला आहे. यासाठी प्राप्त निधी अद्यापही कुठेच वळविलेला नाही. लवकरच आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच हॉस्पिटल उभारणीसाठी प्रयत्न केले जातील.  - संजय पडते, जिल्हाप्रमुख, शिवसेना  मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नियोजित जागेतच होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जागेचा प्रश्‍न सुटल्यानंतर हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी येत्या काही दिवसांत जिल्ह्यात येऊन या विषयावर चर्चा करणार आहे.  - उदय सामंत, पालकमंत्री  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/349uzdE
Read More
मराठा समाजाकडून कुडाळ तहसीलदार धारेवर 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज तालुक्‍यातील मराठा समाज बांधवांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. तालुक्‍यातील स्थानिक प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा समाजाने तहसीलदारांना धारेवर धरले. एकूणच जिल्हा प्रशासनाने आंदोलनाकडे कानाडोळा केला म्हणून तालुका व जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

जिल्ह्यात 65 टक्के मराठा समाज आहे. आज आंदोलनाबाबत निवेदन स्वीकारताना कसलीही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली नाही. जिल्ह्यातील खासदार, आमदार मराठा समाजाचे असताना जिल्हा प्रशासनाने मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले, अशी संतप्त प्रतिक्रीया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

सकल मराठा समाजाच्यावतीने 23 हजार 107 लोकांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले. तहसीलदार अमोल पाठक यांनी हे निवेदन स्वीकारले. जिल्हा प्रशासनाने मराठा आंदोलनाकडे गांभीर्याने पहावे नाहीतर मराठा समाज गांभीर्याने बघेल. त्यावेळी "पळता भुई थोडी' होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्यवक सुहास सावंत यांनी दिला. न्याय मागण्यांसाठी लवकरच जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक होईल, असेही ते म्हमाले. यावेळी अमरसेन सावंत, प्रभाकर सावंत, सचिन काळप, राजू राऊळ, बंड्या सावंत, संग्राम सावंत, विजय सावंत, अभि गावडे, शैलेश घोगळे, ज्ञानेश्‍वर आळवे आदी उपस्थित होते. 

काय झाला वाद? 
ऍड. सावंत यांनी तहसीलदार पाठक यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, ""हा मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. प्रशासन 65 टक्के इतक्‍या संख्येने असलेल्या या समाजाचा विचार करत नसेल तर चुकीचे आहे. यापुर्वी प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळाले. पुर्वीच्या पालकमंत्र्यांनीही मदत केली. ते आंदोलनाआधी संवाद साधायचे. यावेळी दुर्दैवाने प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. तुम्ही अधिकारी असला तरी जनसेवक आहात. तुमची वाट बघावी लागते, हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री-समाजातील दुवा आहात; मात्र तुमच्या कार्यपद्धतीचा निषेध. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मराठा समाजाकडून कुडाळ तहसीलदार धारेवर  कुडाळ (सिंधुदुर्ग) - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज तालुक्‍यातील मराठा समाज बांधवांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. तालुक्‍यातील स्थानिक प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा समाजाने तहसीलदारांना धारेवर धरले. एकूणच जिल्हा प्रशासनाने आंदोलनाकडे कानाडोळा केला म्हणून तालुका व जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला.  जिल्ह्यात 65 टक्के मराठा समाज आहे. आज आंदोलनाबाबत निवेदन स्वीकारताना कसलीही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली नाही. जिल्ह्यातील खासदार, आमदार मराठा समाजाचे असताना जिल्हा प्रशासनाने मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले, अशी संतप्त प्रतिक्रीया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. सकल मराठा समाजाच्यावतीने 23 हजार 107 लोकांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले. तहसीलदार अमोल पाठक यांनी हे निवेदन स्वीकारले. जिल्हा प्रशासनाने मराठा आंदोलनाकडे गांभीर्याने पहावे नाहीतर मराठा समाज गांभीर्याने बघेल. त्यावेळी "पळता भुई थोडी' होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्यवक सुहास सावंत यांनी दिला. न्याय मागण्यांसाठी लवकरच जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक होईल, असेही ते म्हमाले. यावेळी अमरसेन सावंत, प्रभाकर सावंत, सचिन काळप, राजू राऊळ, बंड्या सावंत, संग्राम सावंत, विजय सावंत, अभि गावडे, शैलेश घोगळे, ज्ञानेश्‍वर आळवे आदी उपस्थित होते.  काय झाला वाद?  ऍड. सावंत यांनी तहसीलदार पाठक यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, ""हा मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. प्रशासन 65 टक्के इतक्‍या संख्येने असलेल्या या समाजाचा विचार करत नसेल तर चुकीचे आहे. यापुर्वी प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळाले. पुर्वीच्या पालकमंत्र्यांनीही मदत केली. ते आंदोलनाआधी संवाद साधायचे. यावेळी दुर्दैवाने प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. तुम्ही अधिकारी असला तरी जनसेवक आहात. तुमची वाट बघावी लागते, हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री-समाजातील दुवा आहात; मात्र तुमच्या कार्यपद्धतीचा निषेध.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HzH1f3
Read More
पावसाची विश्रांती, भात कापणीला वेग

आचरा (सिंधुदुर्ग) - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे. कापलेले भात वाळवायचे कुठे? त्यामुळे ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे, ते तातडीने भात झोडणीचे काम उरकून घेत आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असताना दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे. 

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिंता आहे. येथील परिसरात खाडी लगतची, मळे शेतीत पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने भातशेती कुजू लागली आहे. बहुतांशी भागात भाताला कोंब आले आहेत. सध्या सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळात कापणी केलेले भात वाळवायचे कुठे? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना आहे. अशातच शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली आहे. ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे ते शेतकरी तातडीने भात झोडणी करुन मिळेल ते भात गोळा करत आहेत. 

वन्य प्राण्यांचाही उपद्रव 
अती कोसळणाऱ्या पावसाने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. माकड, डुकरांसह इतर वन्य प्राण्यांकडूनही भुईमूग शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणासोबत वन्य प्राण्यांचाही त्रास वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पावसाची विश्रांती, भात कापणीला वेग आचरा (सिंधुदुर्ग) - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे. कापलेले भात वाळवायचे कुठे? त्यामुळे ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे, ते तातडीने भात झोडणीचे काम उरकून घेत आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असताना दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे.  सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिंता आहे. येथील परिसरात खाडी लगतची, मळे शेतीत पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने भातशेती कुजू लागली आहे. बहुतांशी भागात भाताला कोंब आले आहेत. सध्या सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळात कापणी केलेले भात वाळवायचे कुठे? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना आहे. अशातच शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली आहे. ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे ते शेतकरी तातडीने भात झोडणी करुन मिळेल ते भात गोळा करत आहेत.  वन्य प्राण्यांचाही उपद्रव  अती कोसळणाऱ्या पावसाने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. माकड, डुकरांसह इतर वन्य प्राण्यांकडूनही भुईमूग शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणासोबत वन्य प्राण्यांचाही त्रास वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kTEtH8
Read More
नवी मुंबईत बोगस पत्रकाराकडून खंडणीसाठी गोळीबार
खाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती !

नागपूर : शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या तिपटीने वाढली असली नागपूरकरांत मात्र कुठलीही भीती नसल्याचे चित्र आहे. सायंकाळ होताच अनेक खवय्ये विविध रेस्टॉरंटसमोर सामाजिक अंतर न पाळता गर्दी करीत आहे. त्यामुळे पार्सलच्या नावावर उघडण्यात आलेली रेस्टॉरंट कोरोना संक्रमणाचे मोठे अड्डे ठरण्याची शक्यता वाढली आहे. 

कोरोनामुळे ‘मिशन बिगिन अगेन'अंतर्गत रेस्टॉरंटला ग्राहकांना केवळ पार्सल देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, काही मालकांनी हॉटेल समोरच चारचाकी वाहने लावण्याची परवानगी दिली आहे. हॉटेलमधून खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर वाहनाच्या आजूबाजूने उभे राहून खवय्ये ताव मारताना दिसून येत आहे.

सेंट्रल बाजार रोडवरील दररोज रात्री खवय्यांची जत्रा दिसून येत आहे. ऑर्डर घेतल्यानंतर ते पदार्थ तयार होईपर्यंत नागरिक येथेच थांबतात. अनेक जण येथेच ताव मारतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असून सामाजिक अंतराचा लवलेशही दिसून येत नाही. एवढेच नव्हे तर अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसून येत नाही.

महापालिकेचे आयुष हॉस्पिटल बंगल्यात

एकीकडे महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी नागरिकांना मास्क लावणे, घरातून बाहेर न पडणे, गर्दी न करण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु, प्रशासनाचे आवाहन कुणी गांभीर्याने घेत नसल्याचेच चित्र आहे. जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असला तरी खवय्यांच्या बेफिकिरीने सर्व खर्च व्यर्थ जात असल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले.

रस्त्यांवर ‘ट्राफिक जाम'
रामदासपेठेतील एका रेस्टॉरंटपुढे सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने सेंट्रल बाजार रोडवर अनेकदा वाहतूक कोंडी होते. अनेकदा महापालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलिस याच रस्त्याने जाताना दिसतात. परंतु, कारवाईसाठी महापालिका किंवा वाहतूक पोलिसही पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथे हॉस्पिटल्स असल्याने ॲम्बुलन्सचीही रहदारी असते. वाहतूक कोंडीमुळे उपचारासाठी वेळेत न पोहोचल्याने रुग्णाला काही झाले तर जबाबदार कोण? असा प्रश्नही यानिमित्त विचारला जात आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

खाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती ! नागपूर : शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या तिपटीने वाढली असली नागपूरकरांत मात्र कुठलीही भीती नसल्याचे चित्र आहे. सायंकाळ होताच अनेक खवय्ये विविध रेस्टॉरंटसमोर सामाजिक अंतर न पाळता गर्दी करीत आहे. त्यामुळे पार्सलच्या नावावर उघडण्यात आलेली रेस्टॉरंट कोरोना संक्रमणाचे मोठे अड्डे ठरण्याची शक्यता वाढली आहे.  कोरोनामुळे ‘मिशन बिगिन अगेन'अंतर्गत रेस्टॉरंटला ग्राहकांना केवळ पार्सल देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, काही मालकांनी हॉटेल समोरच चारचाकी वाहने लावण्याची परवानगी दिली आहे. हॉटेलमधून खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर वाहनाच्या आजूबाजूने उभे राहून खवय्ये ताव मारताना दिसून येत आहे. सेंट्रल बाजार रोडवरील दररोज रात्री खवय्यांची जत्रा दिसून येत आहे. ऑर्डर घेतल्यानंतर ते पदार्थ तयार होईपर्यंत नागरिक येथेच थांबतात. अनेक जण येथेच ताव मारतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असून सामाजिक अंतराचा लवलेशही दिसून येत नाही. एवढेच नव्हे तर अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसून येत नाही. महापालिकेचे आयुष हॉस्पिटल बंगल्यात एकीकडे महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी नागरिकांना मास्क लावणे, घरातून बाहेर न पडणे, गर्दी न करण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु, प्रशासनाचे आवाहन कुणी गांभीर्याने घेत नसल्याचेच चित्र आहे. जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असला तरी खवय्यांच्या बेफिकिरीने सर्व खर्च व्यर्थ जात असल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले. रस्त्यांवर ‘ट्राफिक जाम' रामदासपेठेतील एका रेस्टॉरंटपुढे सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने सेंट्रल बाजार रोडवर अनेकदा वाहतूक कोंडी होते. अनेकदा महापालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलिस याच रस्त्याने जाताना दिसतात. परंतु, कारवाईसाठी महापालिका किंवा वाहतूक पोलिसही पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथे हॉस्पिटल्स असल्याने ॲम्बुलन्सचीही रहदारी असते. वाहतूक कोंडीमुळे उपचारासाठी वेळेत न पोहोचल्याने रुग्णाला काही झाले तर जबाबदार कोण? असा प्रश्नही यानिमित्त विचारला जात आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3icvIGq
Read More
स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवायचे आहे, तर जाणून घ्या महत्वाच्या बाबी 

नागपूर :  व्वा यार, त्याची तर बातच न्यारी. काय बोलतो तो आणि वागणं एवढं साधं आहे ना, एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल असे उद्गार आपण बरेचदा ऐकतो. त्यावेळी आपल्याबद्दलही कुणी असे बोलावे, असे वाटते. परंतु ते मिळविणे सोपे नसते. त्यासाठी कमालीचा संयम, दुसऱ्यांप्रती चांगली भावना आणि शत्रूंवरही प्रेम करण्याची तयारी असावी लागते.     

लोकांना "इम्प्रेस" करायचं आहे? लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचे आहे? मग काही गुण तुमच्यात असलेच पाहिजे. बरेचदा असे होते की, तुम्ही एखाद्याला भेटता आणि ती व्यक्ती तुमच्या अगदी कायम स्मरणात राहते. तुमच्या असे लक्षात येईल की, अशी बरीच माणसे आहेत. अशा लोकांबद्दल सगळे सतत चांगलं बोलत असतात आणि त्यांच्या सहवासात राहण्यासाठी प्रयत्नशील असतात.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

मग आपल्यालाही असे वाटत राहते की, आपल्या बाबतीत असे होत असेल का, आपण कोणाच्या लक्षात राहत असू का? हो असेल तर ती आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, आणि नसेल तर तुम्ही ती कला नक्कीच आत्मसाद करून घ्या. स्वतःमध्ये काही चांगले बदल करून काही जुन्या सवयी सोडून काही नवीन सवयी लावून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारू शकता. जेणेकरून लोकांना तुमचा सहवास हवाहवासा वाटेल. तुम्ही नेहमी त्यांच्या आठवणीत राहाल आणि तुमच्याबद्दल त्यांच्याकडून चांगलाच विचार केला जाईल. 

मदत करा, पण परतफेडीची अपेक्षा करू नका

तुम्ही लोकांना मदत करा, पण लोकांकडून कुठलीही अपेक्षा करू नका.  स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्या हसण्यावारी न्यायची तयारी ठेवा. आपल्याला असं वाटलं की आपण जर परफेक्ट असू तर लोकांच्या लक्षात राहू. परंतु आपली चूक मान्य करणे आपल्याला कमीपणा वाटतो आणि आपण ते लपवायला जातो. यामुळे होतं काय की आपण एकतर आपल्या चुका मान्य करत नाही. दुसऱ्याने ती दाखवली तर आपण नाकारतो. 

स्वतः बोलण्यापेक्षा इतरांना संधी द्या

जर आपण स्वतःहून आपल्या चुका कबूल केल्या, आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती मान्य केली तर त्यात आपल्याच मनाचा मोठेपणा दिसतो. लोकांना इम्प्रेस करायच्या नादात आपण त्यांच्याशी बोलताना बऱ्याचदा आपली स्टेप लावतो. आपण काय काय केलं, कसं केलं आपल्याला आत्तापर्यंत आयुष्यात काय मिळालं, काय नाही मिळालं आयुष्यात तिथवर पोहोचायला आपण कितीक खाचखळगे पार केले, हे सांगत बसण्याच्या नादात आपण समोरच्याला बोलायला वावच देत नाही, यापेक्षा जर आपल्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन आपण समोरच्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल विचारलं तर त्यांना ते आवडेल.

स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा, पण आपले मत इतरांवर थोपू नका

आपण  मांडलेल्या मुद्यावर कुणी काही सुचवले तर लगेच आपण आपले मत बदलतो. परंतु असे होता कामा नये. आपले निर्णय एवढे ताकदीचे असावे की ते एखाद्याने ते बदलण्याचा प्रयत्न केला तर आपणास आपला मुद्दा पटवून देता आला पाहिजे. परंतु हे करताना आपले विचार दुसऱ्यांवर थोपवू नका. त्याचे म्हणणे ऐकून घेऊन जे बरोबर असेल ते त्या व्यक्तीला पटेल, रुचेल अशा पद्धतीने समजावून सांगा. 

राग, चिडचिड नुकसानदायीच

‘राग किंवा चिडचिड’ यामुळे सर्वाधिक नुकसान स्वतःचेच होते. समोरचा कितीही चुकला, आपल्याला कितीही कमी-जास्त बोलला तरी त्यावर आपली जी प्रतिक्रिया असते तीच आपल्या स्वभावाची ओळख असते. एकदा तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही.  कितीही राग आला तरी शांत राहणंच हिताचं असतं. राग आल्यावर स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे. एखाद्याचा राग आला तर त्या क्षणी त्याच्याजवळ न जाता शांतपणे विचार करून मग त्या व्यक्तीशी बोलावे.

सविस्तर वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन
 

छंद जपा आणि त्याबद्दल बोलाही

तुम्ही जर मनापासून एखादी गोष्ट करत असाल तर समोरच्याला तुमचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आवडीनिवडीबद्दल समोरच्याला सांगून, त्याची त्याबद्दलची मतं जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्हाला गाण्याचा छंद असेल तर तुमच्या या छंदाबद्दल तुम्ही अगदी भरभरून बोलत असाल तर समोरच्याला ती गोष्ट नक्की लक्षात राहील. यासोबतच सर्वांशी आदराने वागणे गरजेचे आहे.

संकलन / संपादन  : अतुल मांगे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवायचे आहे, तर जाणून घ्या महत्वाच्या बाबी  नागपूर :  व्वा यार, त्याची तर बातच न्यारी. काय बोलतो तो आणि वागणं एवढं साधं आहे ना, एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल असे उद्गार आपण बरेचदा ऐकतो. त्यावेळी आपल्याबद्दलही कुणी असे बोलावे, असे वाटते. परंतु ते मिळविणे सोपे नसते. त्यासाठी कमालीचा संयम, दुसऱ्यांप्रती चांगली भावना आणि शत्रूंवरही प्रेम करण्याची तयारी असावी लागते.      लोकांना "इम्प्रेस" करायचं आहे? लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचे आहे? मग काही गुण तुमच्यात असलेच पाहिजे. बरेचदा असे होते की, तुम्ही एखाद्याला भेटता आणि ती व्यक्ती तुमच्या अगदी कायम स्मरणात राहते. तुमच्या असे लक्षात येईल की, अशी बरीच माणसे आहेत. अशा लोकांबद्दल सगळे सतत चांगलं बोलत असतात आणि त्यांच्या सहवासात राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला   मग आपल्यालाही असे वाटत राहते की, आपल्या बाबतीत असे होत असेल का, आपण कोणाच्या लक्षात राहत असू का? हो असेल तर ती आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, आणि नसेल तर तुम्ही ती कला नक्कीच आत्मसाद करून घ्या. स्वतःमध्ये काही चांगले बदल करून काही जुन्या सवयी सोडून काही नवीन सवयी लावून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारू शकता. जेणेकरून लोकांना तुमचा सहवास हवाहवासा वाटेल. तुम्ही नेहमी त्यांच्या आठवणीत राहाल आणि तुमच्याबद्दल त्यांच्याकडून चांगलाच विचार केला जाईल.  मदत करा, पण परतफेडीची अपेक्षा करू नका तुम्ही लोकांना मदत करा, पण लोकांकडून कुठलीही अपेक्षा करू नका.  स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्या हसण्यावारी न्यायची तयारी ठेवा. आपल्याला असं वाटलं की आपण जर परफेक्ट असू तर लोकांच्या लक्षात राहू. परंतु आपली चूक मान्य करणे आपल्याला कमीपणा वाटतो आणि आपण ते लपवायला जातो. यामुळे होतं काय की आपण एकतर आपल्या चुका मान्य करत नाही. दुसऱ्याने ती दाखवली तर आपण नाकारतो.  स्वतः बोलण्यापेक्षा इतरांना संधी द्या जर आपण स्वतःहून आपल्या चुका कबूल केल्या, आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती मान्य केली तर त्यात आपल्याच मनाचा मोठेपणा दिसतो. लोकांना इम्प्रेस करायच्या नादात आपण त्यांच्याशी बोलताना बऱ्याचदा आपली स्टेप लावतो. आपण काय काय केलं, कसं केलं आपल्याला आत्तापर्यंत आयुष्यात काय मिळालं, काय नाही मिळालं आयुष्यात तिथवर पोहोचायला आपण कितीक खाचखळगे पार केले, हे सांगत बसण्याच्या नादात आपण समोरच्याला बोलायला वावच देत नाही, यापेक्षा जर आपल्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन आपण समोरच्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल विचारलं तर त्यांना ते आवडेल. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा, पण आपले मत इतरांवर थोपू नका आपण  मांडलेल्या मुद्यावर कुणी काही सुचवले तर लगेच आपण आपले मत बदलतो. परंतु असे होता कामा नये. आपले निर्णय एवढे ताकदीचे असावे की ते एखाद्याने ते बदलण्याचा प्रयत्न केला तर आपणास आपला मुद्दा पटवून देता आला पाहिजे. परंतु हे करताना आपले विचार दुसऱ्यांवर थोपवू नका. त्याचे म्हणणे ऐकून घेऊन जे बरोबर असेल ते त्या व्यक्तीला पटेल, रुचेल अशा पद्धतीने समजावून सांगा.  राग, चिडचिड नुकसानदायीच ‘राग किंवा चिडचिड’ यामुळे सर्वाधिक नुकसान स्वतःचेच होते. समोरचा कितीही चुकला, आपल्याला कितीही कमी-जास्त बोलला तरी त्यावर आपली जी प्रतिक्रिया असते तीच आपल्या स्वभावाची ओळख असते. एकदा तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही.  कितीही राग आला तरी शांत राहणंच हिताचं असतं. राग आल्यावर स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे. एखाद्याचा राग आला तर त्या क्षणी त्याच्याजवळ न जाता शांतपणे विचार करून मग त्या व्यक्तीशी बोलावे. सविस्तर वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन   छंद जपा आणि त्याबद्दल बोलाही तुम्ही जर मनापासून एखादी गोष्ट करत असाल तर समोरच्याला तुमचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आवडीनिवडीबद्दल समोरच्याला सांगून, त्याची त्याबद्दलची मतं जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्हाला गाण्याचा छंद असेल तर तुमच्या या छंदाबद्दल तुम्ही अगदी भरभरून बोलत असाल तर समोरच्याला ती गोष्ट नक्की लक्षात राहील. यासोबतच सर्वांशी आदराने वागणे गरजेचे आहे. संकलन / संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33bFx3e
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 सप्टेंबर

पंचांग -
मंगळवार - अधिक अश्‍विन शु.13, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, प्रदोष, चंद्रोदय सायं. 5.09, चंद्रास्त प.4.14, भारतीय सौर 7, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९० ः पंचांगकर्ते ल. गो. ऊर्फ नानाशास्त्री दाते यांचा जन्म. जुने पंचांग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाते पंचांगाचे संस्थापक. त्यांनी पंचांग गणित पद्धतीत सूक्ष्मता व अचूकता आणली.
१९०८ : पदार्थ वैज्ञानिक एन्रिको फर्मी यांचा जन्म. न्यूट्रॉन कणांवरील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त.
१९३२ : मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व साहित्यिक हमीद दलवाई यांचा जन्म.
१९६६ : नामवंत कायदेपंडित, मद्रासचे कायदामंत्री, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलेले सर सी. पी. रामस्वामी अय्यर यांचे निधन. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेत सभासद या नात्याने त्यांनी काम केले. त्रावणकोर, अन्नमलई व बनारस विद्यापीठांचे ते कुलगुरू होते.
१९९७ : ‘इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट’ (आयआरएस-१ डी) या भारतातील पहिल्या अतिप्रगत दूरसंवेदक उपग्रहाचे ‘पीएसएलव्ही-सी १’ या ध्रुवीय उपग्रह वाहकाद्वारे श्रीहरिकोटा येथील शार तळावरून यशस्वी प्रक्षेपण.
२००१ : राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ऑल इंग्लंड विजेता पी. गोपीचंद याला सर्वोच्च प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.

दिनमान -
मेष : शेअर मार्केटचा अंदाज घेवून गुंतवणूक कराल. मनोरंजनाकडे कल राहील. 
वृषभ : नोकरी, व्यवसायात अस्थिरता जाणवेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. 
मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल. सौख्य लाभेल.
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुप्त वार्ता कळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
सिंह : उत्साह व उमेद वाढेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 
कन्या : कर्ज प्रकरणे पुढे ढकलावीत. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. खर्च वाढेल.
तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. गुंतवणुकीस आजचा दिवस चांगला आहे.
धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. छोटे प्रवास होतील. 
मकर : आर्थिक चढ-उतार जाणवतील. कुटुंबासाठी वेळ व पैसा खर्च होईल. 
कुंभ : वैवाहिक जीवन सुखकर राहील. भागीदारीत गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. 
मीन : धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. आत्मविश्‍वासाचा अभाव राहील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 सप्टेंबर पंचांग - मंगळवार - अधिक अश्‍विन शु.13, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, प्रदोष, चंद्रोदय सायं. 5.09, चंद्रास्त प.4.14, भारतीय सौर 7, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८९० ः पंचांगकर्ते ल. गो. ऊर्फ नानाशास्त्री दाते यांचा जन्म. जुने पंचांग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाते पंचांगाचे संस्थापक. त्यांनी पंचांग गणित पद्धतीत सूक्ष्मता व अचूकता आणली. १९०८ : पदार्थ वैज्ञानिक एन्रिको फर्मी यांचा जन्म. न्यूट्रॉन कणांवरील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त. १९३२ : मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व साहित्यिक हमीद दलवाई यांचा जन्म. १९६६ : नामवंत कायदेपंडित, मद्रासचे कायदामंत्री, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलेले सर सी. पी. रामस्वामी अय्यर यांचे निधन. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेत सभासद या नात्याने त्यांनी काम केले. त्रावणकोर, अन्नमलई व बनारस विद्यापीठांचे ते कुलगुरू होते. १९९७ : ‘इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट’ (आयआरएस-१ डी) या भारतातील पहिल्या अतिप्रगत दूरसंवेदक उपग्रहाचे ‘पीएसएलव्ही-सी १’ या ध्रुवीय उपग्रह वाहकाद्वारे श्रीहरिकोटा येथील शार तळावरून यशस्वी प्रक्षेपण. २००१ : राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ऑल इंग्लंड विजेता पी. गोपीचंद याला सर्वोच्च प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान. दिनमान - मेष : शेअर मार्केटचा अंदाज घेवून गुंतवणूक कराल. मनोरंजनाकडे कल राहील.  वृषभ : नोकरी, व्यवसायात अस्थिरता जाणवेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.  मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल. सौख्य लाभेल. कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुप्त वार्ता कळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. सिंह : उत्साह व उमेद वाढेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  कन्या : कर्ज प्रकरणे पुढे ढकलावीत. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. खर्च वाढेल. तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. गुंतवणुकीस आजचा दिवस चांगला आहे. धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. छोटे प्रवास होतील.  मकर : आर्थिक चढ-उतार जाणवतील. कुटुंबासाठी वेळ व पैसा खर्च होईल.  कुंभ : वैवाहिक जीवन सुखकर राहील. भागीदारीत गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.  मीन : धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. आत्मविश्‍वासाचा अभाव राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kSMqwc
Read More
सीआरझेड सुनावणीस विरोध, मालवणात जोरदार घोषणा

मालवण (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या आनलाईन जनसुनावणीस वारंवार येत असलेल्या नेटवर्कच्या अडथळ्यांमुळे या सुनावणीस मालवणवासीयांचा तीव्र विरोध असल्याचे पत्र गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे सुपूर्द करत पंचायत समितीच्या सभागृहातून जमलेल्या सुमारे 75 हून अधिक सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी आणि हरकतदार बाहेर पडले. 

सभागृहात प्रशासकीय अधिकारी थांबून होते. यावेळी उपस्थितांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. या सुनावणीसाठी कडक पोलिस बंदोबस्त पंचायत समितीच्या आवारात तैनात होता. पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात सुविधा होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजित केलेल्या या जनसुनावणीत हरकतदारांना मते मांडण्यासाठी वेळ 
दिला होता. यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून पंचायत समितीच्या आवारात हरकतदार आणि मच्छीमार तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता सुनावणीचे प्रक्षेपण दिसू लागले होते.

यावेळी सभापती अजिंक्‍य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर, माजी उपसभापती अशोक बागवे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, विष्णू मोंडकर, राकेश कुंटे, डॉ. चंद्रशेखर परब, हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर, एस. के. वायंगणकर, मिलींद झाड, विष्णू मेस्त्री, सतीश खोत, रविंद्र खानविलकर, सागर चव्हाण, ज्ञानेश्वर सादये, शरद माडये, दिपक कुडाळकर, विठ्ठल कवटकर, प्रदीप आचरेकर, तुळशीदास कोयंडे, राहुल कोयंडे, घन:श्‍याम कुबल, राजन कुमठेकर, दत्तात्रय पडवळ, शंकर मेस्त्री, संजय नाटळकर, अभय पाटकर, गणेश माडये, दर्शन वेंगुर्लेकर, साईनाथ माडये, मंदार गोवेकर, दिलीप घारे, बाबी जोगी आदी उपस्थित होते.

सुनावणी सुरू झाल्यानंतर कुणाचे काय समजेना. त्यामुळे सुनावणी बंद करण्याची मागणी केली. हरकत नोंदविताना तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले, ही जनसुनावणी बेकायदेशीर आहे. किनारपट्टीवरील भूमीपुत्रांना विस्थापित करण्यासाठी चालविलेला डाव असल्याचा आरोप केला. सुनावणी समोरासमोर झाली पाहिजे.

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, ही जनसुनावणी नसून मनसुनावणी आहे. मच्छीमारांना विश्‍वासात घेवून लोकप्रतिनिधींना माहिती देवूनच हा सीआरझेडचा आराखडा बनविला गेला पाहिजे. जनतेच्या बाजूने जोपर्यंत आराखडा बनणार नाही, तोपर्यंत विरोध कायम राहिल. 
महेंद्र पराडकर म्हणाले, ""आराखडा मराठीतून उपलब्ध होणे गरजेचे आहे. मच्छीमारांच्या वसाहती उद्धस्त करण्याचा डाव असल्याने नकाशात कोळीवाडे समाविष्ठ करण्यात यावेत.'' 

निषेधाचे पत्र सुपूर्द 
दरम्यान, विरोध वाढत असल्याचे लक्षात घेता गटविकास अधिकाऱ्यांनी सर्वांचा विरोध असेल तर तशाप्रकारचे पत्र आद्या, आम्ही ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो, असे स्पष्ट केले. यानंतर उपस्थितांनी निषेधाचे पत्र गटविकास अधिकाऱ्यांकडे देत जनसुनावणी रद्द करून तालुकास्तरावर घेण्याची मागणी केली. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सीआरझेड सुनावणीस विरोध, मालवणात जोरदार घोषणा मालवण (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या आनलाईन जनसुनावणीस वारंवार येत असलेल्या नेटवर्कच्या अडथळ्यांमुळे या सुनावणीस मालवणवासीयांचा तीव्र विरोध असल्याचे पत्र गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे सुपूर्द करत पंचायत समितीच्या सभागृहातून जमलेल्या सुमारे 75 हून अधिक सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी आणि हरकतदार बाहेर पडले.  सभागृहात प्रशासकीय अधिकारी थांबून होते. यावेळी उपस्थितांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. या सुनावणीसाठी कडक पोलिस बंदोबस्त पंचायत समितीच्या आवारात तैनात होता. पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात सुविधा होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजित केलेल्या या जनसुनावणीत हरकतदारांना मते मांडण्यासाठी वेळ  दिला होता. यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून पंचायत समितीच्या आवारात हरकतदार आणि मच्छीमार तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता सुनावणीचे प्रक्षेपण दिसू लागले होते. यावेळी सभापती अजिंक्‍य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर, माजी उपसभापती अशोक बागवे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, विष्णू मोंडकर, राकेश कुंटे, डॉ. चंद्रशेखर परब, हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर, एस. के. वायंगणकर, मिलींद झाड, विष्णू मेस्त्री, सतीश खोत, रविंद्र खानविलकर, सागर चव्हाण, ज्ञानेश्वर सादये, शरद माडये, दिपक कुडाळकर, विठ्ठल कवटकर, प्रदीप आचरेकर, तुळशीदास कोयंडे, राहुल कोयंडे, घन:श्‍याम कुबल, राजन कुमठेकर, दत्तात्रय पडवळ, शंकर मेस्त्री, संजय नाटळकर, अभय पाटकर, गणेश माडये, दर्शन वेंगुर्लेकर, साईनाथ माडये, मंदार गोवेकर, दिलीप घारे, बाबी जोगी आदी उपस्थित होते. सुनावणी सुरू झाल्यानंतर कुणाचे काय समजेना. त्यामुळे सुनावणी बंद करण्याची मागणी केली. हरकत नोंदविताना तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले, ही जनसुनावणी बेकायदेशीर आहे. किनारपट्टीवरील भूमीपुत्रांना विस्थापित करण्यासाठी चालविलेला डाव असल्याचा आरोप केला. सुनावणी समोरासमोर झाली पाहिजे. शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, ही जनसुनावणी नसून मनसुनावणी आहे. मच्छीमारांना विश्‍वासात घेवून लोकप्रतिनिधींना माहिती देवूनच हा सीआरझेडचा आराखडा बनविला गेला पाहिजे. जनतेच्या बाजूने जोपर्यंत आराखडा बनणार नाही, तोपर्यंत विरोध कायम राहिल.  महेंद्र पराडकर म्हणाले, ""आराखडा मराठीतून उपलब्ध होणे गरजेचे आहे. मच्छीमारांच्या वसाहती उद्धस्त करण्याचा डाव असल्याने नकाशात कोळीवाडे समाविष्ठ करण्यात यावेत.''  निषेधाचे पत्र सुपूर्द  दरम्यान, विरोध वाढत असल्याचे लक्षात घेता गटविकास अधिकाऱ्यांनी सर्वांचा विरोध असेल तर तशाप्रकारचे पत्र आद्या, आम्ही ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो, असे स्पष्ट केले. यानंतर उपस्थितांनी निषेधाचे पत्र गटविकास अधिकाऱ्यांकडे देत जनसुनावणी रद्द करून तालुकास्तरावर घेण्याची मागणी केली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GlmSZv
Read More
सीआरझेड सुधारीत आराखड्याबाबत टिकेचे आसूड

ओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तर न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला. 

जिल्ह्यातील सीआरझेड ई-सुनावणीचे आयोजन केले होते. नेटवर्कअभावी ही सुनावणी रद्द करण्यात आली. सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. केसरकर म्हणाले, ""सीआरझेड सुधारित आराखडा जनतेवर अन्याय करणारा आहे. यात पाडलेले एक ते चार भाग कुठे व कशासाठी करण्यात आले हे निश्‍चित होत नाही. यात विकासाचे नियोजन दिसत नाही.

जिल्ह्यातील खड्ड्यांचे पुर्नभरण झाले पाहिजे. अन्यथा हा भाग विकासापासून वंचित राहिल. आराखडा करताना अभ्यास केलेला दिसत नाही. काही वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत आढळले ते तसेच आहे. योग्य न्याय न मिळाल्यास अन्यायाविरोधात न्यायालयात जावू शकतो.'' 
ई-सुनावणीचे मुख्यस्थळ असलेल्या जिल्हा नियोजन नवीन सभागृहात सहभागी झालेल्या आमदार नाईक यांनी ई-सुनावणीला विरोध करीत सुधारित आराखड्याचा मराठी अनुवाद पहिला. समुद्र किनाऱ्याच्या उच्चतम भरती पासून संरक्षित करण्यात आलेले 50 ते 100 मीटर अंतर कोणते हे निश्‍चित होत नाही. भाग 2 मध्ये मालवण शहर घेतले आहे. हे शहर जुने आहे. येथे पारंपरिक मच्छीमार व्यवसाय चालतो. किल्ल्यावर जाणारा मार्ग आहे. येथे शिवकालीन समुद्र किनारा आहे. गरज पडल्यास त्या किल्ल्याची दुरुस्ती करावी लागणार. याबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवर राहिले पाहिजेत, अशी मागणी नाईक यांनी केली. 

ऑनलाईन सहभाग घेताना आमदार नितेश राणे यांनी सुनावणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मध्येच रोखले. तुम्हीच बोलत राहणार, की आम्हाला बोलू देणार? असा प्रश्‍न केला. त्यानंतर लोकप्रतिनिधीना बोलू दिले. यावेळी बोलताना त्यांचे संभाषण ऐकू येत नव्हते. यावेळी त्यांनी ई-सुनावणीला तीव्र विरोध करीत तालुकावार ऑफलाईन सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली. तसेच सुनावणी योग्य पद्धतीने न झाल्यास जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा दिला. 

खासदार विनायक राऊत ऑनलाईन सहभागी झाले होते. ते कायम बोलत होते; पण त्यांचे संभाषण ऐकूच येत नव्हते. ते प्रदूषण व पर्यावरण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वत्सा नायर व मनीषा म्हैसकर यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी ही सुनावणी रद्द करण्यास परवानगी दिली आहे, असे सांगत होते; मात्र प्रशासनाने सुनावणी सुरुच ठेवली होती. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सुनावणी होत आहे का? असा प्रश्‍न करीत पर्यावरण व प्रदूषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत का? असा प्रश्‍न केला; मात्र सुनावणी अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे टाळले. 

आता मुंबई वारी नाही 
यावेळी जनसुनावणी अधिकाऱ्यांनी 2011च्या सीआरझेड आराखड्यात 100 मीटर अंतर संरक्षित केले होते. 2019च्या आराखड्यात केवळ 50 मीटर अंतर संरक्षित केले आहे. पूर्वीच्या आराखड्यानुसार घर बांधणी परवानगीसाठी मंत्रालयात जावे लागत होते. आता 300 स्क्वेअर फुट घरांची परवानगी स्थानिक पातळीवर मिळणार आहे. सीआरझेड केवळ समुद्रापुरता मर्यादित नाही. समुद्राला जोडणाऱ्या नदी, खाडीचा प्रवाह आहे तिथपर्यंत सीआरझेड असतो, असे सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सीआरझेड सुधारीत आराखड्याबाबत टिकेचे आसूड ओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तर न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला.  जिल्ह्यातील सीआरझेड ई-सुनावणीचे आयोजन केले होते. नेटवर्कअभावी ही सुनावणी रद्द करण्यात आली. सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. केसरकर म्हणाले, ""सीआरझेड सुधारित आराखडा जनतेवर अन्याय करणारा आहे. यात पाडलेले एक ते चार भाग कुठे व कशासाठी करण्यात आले हे निश्‍चित होत नाही. यात विकासाचे नियोजन दिसत नाही. जिल्ह्यातील खड्ड्यांचे पुर्नभरण झाले पाहिजे. अन्यथा हा भाग विकासापासून वंचित राहिल. आराखडा करताना अभ्यास केलेला दिसत नाही. काही वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत आढळले ते तसेच आहे. योग्य न्याय न मिळाल्यास अन्यायाविरोधात न्यायालयात जावू शकतो.''  ई-सुनावणीचे मुख्यस्थळ असलेल्या जिल्हा नियोजन नवीन सभागृहात सहभागी झालेल्या आमदार नाईक यांनी ई-सुनावणीला विरोध करीत सुधारित आराखड्याचा मराठी अनुवाद पहिला. समुद्र किनाऱ्याच्या उच्चतम भरती पासून संरक्षित करण्यात आलेले 50 ते 100 मीटर अंतर कोणते हे निश्‍चित होत नाही. भाग 2 मध्ये मालवण शहर घेतले आहे. हे शहर जुने आहे. येथे पारंपरिक मच्छीमार व्यवसाय चालतो. किल्ल्यावर जाणारा मार्ग आहे. येथे शिवकालीन समुद्र किनारा आहे. गरज पडल्यास त्या किल्ल्याची दुरुस्ती करावी लागणार. याबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवर राहिले पाहिजेत, अशी मागणी नाईक यांनी केली.  ऑनलाईन सहभाग घेताना आमदार नितेश राणे यांनी सुनावणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मध्येच रोखले. तुम्हीच बोलत राहणार, की आम्हाला बोलू देणार? असा प्रश्‍न केला. त्यानंतर लोकप्रतिनिधीना बोलू दिले. यावेळी बोलताना त्यांचे संभाषण ऐकू येत नव्हते. यावेळी त्यांनी ई-सुनावणीला तीव्र विरोध करीत तालुकावार ऑफलाईन सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली. तसेच सुनावणी योग्य पद्धतीने न झाल्यास जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा दिला.  खासदार विनायक राऊत ऑनलाईन सहभागी झाले होते. ते कायम बोलत होते; पण त्यांचे संभाषण ऐकूच येत नव्हते. ते प्रदूषण व पर्यावरण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वत्सा नायर व मनीषा म्हैसकर यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी ही सुनावणी रद्द करण्यास परवानगी दिली आहे, असे सांगत होते; मात्र प्रशासनाने सुनावणी सुरुच ठेवली होती. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सुनावणी होत आहे का? असा प्रश्‍न करीत पर्यावरण व प्रदूषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत का? असा प्रश्‍न केला; मात्र सुनावणी अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे टाळले.  आता मुंबई वारी नाही  यावेळी जनसुनावणी अधिकाऱ्यांनी 2011च्या सीआरझेड आराखड्यात 100 मीटर अंतर संरक्षित केले होते. 2019च्या आराखड्यात केवळ 50 मीटर अंतर संरक्षित केले आहे. पूर्वीच्या आराखड्यानुसार घर बांधणी परवानगीसाठी मंत्रालयात जावे लागत होते. आता 300 स्क्वेअर फुट घरांची परवानगी स्थानिक पातळीवर मिळणार आहे. सीआरझेड केवळ समुद्रापुरता मर्यादित नाही. समुद्राला जोडणाऱ्या नदी, खाडीचा प्रवाह आहे तिथपर्यंत सीआरझेड असतो, असे सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2G1zLIK
Read More
महाबली हनुमानाला का घ्यावा लागला होता वानर रूपात जन्म? ; आख्यायिका वाचून व्हाल थक्क 

नागपूर : भारतीय पौराणिक कथांच्या अनुसार ७ दिव्य आणि अमर पुरुषांपैकी एक हनुमान म्हणजेच महाबली मारुती आहेत हे आपण ऐकलंच असेल. हनुमानावर अनेकांची श्रद्धा आहे. महाबली आणि सामर्थ्यशाली हनुमानाने सीता मातेला शोधण्यासाठी प्रभू श्रीरामांची मदत केली होती. त्यावेळी संपूर्ण वानरसेना लढली होती. पण हनुमानाच्या जन्माची कहाणी तुम्हाला माहिती आहे का?  महादेवाच्या या अवताराला वानर रूपात जन्म का घ्यावा लागला? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.    

पौराणिक कथानुसार पवनपुत्र हनुमानाची आई माता अंजनी ह्या आपल्या पूर्वीच्या जन्मात देवराज इंद्र यांच्या महालातील अप्सरा होत्या. त्यांचे नाव पुंजीकस्थला असे होते. एकदम चपळ आणि दिसायला सुंदर असल्यामुळे त्या इंद्र्दार्बरी होत्या. एकवेळी त्यांनी आपल्या चंचलतेमुळे तपश्चर्या करण्यात मग्न असलेल्या एका ऋषीसोबत गैरवर्तन केले होते. तेव्हा ऋषीमुनीने रागात तिला श्राप दिला कि तू वानरीच्या रुपात आयुष्य जगशील.

मासे खाणाऱ्यांनो, तुमच्यासाठी खास बातमी! अशा पद्धतीने ओळखा ताज्या आणि शिळ्या माशांमधला फरक

त्यानंतर पुंजीकस्थलाने क्षमायाचना करत ऋषीकडे आपला श्राप वापस घेण्याची विनती केली. तिला आपल्या चुकीची जाणीव झालीय हे पाहून ऋषींनी दया दाखवत सांगितले की तुझा जन्म वानर कुळात होईल आणि तू एक खूप कीर्तिवान, यशस्वी पुत्राला जन्म देशील.

ऋषींनी श्राप दिल्यांनतर एके दिवशी इंद्र्देवाने पुंजीकस्थलाला वर मागण्यास सांगितले.  तेव्हा पुंजीकस्थलाने इंद्रदेवाला सांगितले जर शक्य असेल तर मला ऋषीद्वारा दिल्या गेलेल्या श्रापातून मुक्त करा. इंद्र्देवाने पूर्ण वृतांत एकल्यानंतर सांगितले की तूला पृथ्वी लोकात जाऊन वास्तव्य करावे लागेल. तेथे तुला एका राजकुमाराशी प्रेम होईल आणि तो तुझा पती बनेल. विवाहानंतर तू  महादेवांच्या अवताराला जन्म देशील आणि या श्रापातून तुझी मुक्तता होईल.

इंद्रदेवांचा आदेश मानून पुंजीकस्थला “अंजनी” च्या रुपात धरतीलोकात वास्तव्य करू लागली. एकदा तिला एक युवक दिसला ज्याच्याकडे ती आकर्षित झाली. जसेही त्या युवकाने अंजनीकडे बघितले की लगेच अंजनीचा चेहरा वानराचा झाला. अंजनीने त्या युवकापासून आपला चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु जेव्हा त्या युवकाने अंजनीचा चेहरा पहिला तेव्हा तो आनंदून गेला. 
अंजनीने युवकाकडे पहिले तर तोसुद्धा वानर रुपात होता. युवकाने अंजनीला सांगितले कि मी वानरराज केसरी आहे. आणि जेव्हा वाटेल तेव्हा मनुष्य रूप धारण करू शकतो. दोघानंही एकमेकांवर प्रेम झाले होते आणि दोघेही विवाह बंधनात अडकले.

झाला अंजनीपुत्राचा जन्म 

विवाहानंतर अनेक वर्ष बिना संततीचे राहिल्यानंतर अंजनी मातंग ऋषीकडे जाऊन पोहचली. आणि त्यांना आपले दुखः सांगितले. तेव्हा मातंग ऋषीने तिल नारायण पर्वतावर स्थित असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन १२ वर्ष उपवास करून तप करण्यास सांगितले. तपादरम्यान वायुदेवाने अंजनीच्या तपावर खुश होऊन वरदान दिले कि तिला अग्नी,सूर्य ,वेदाचा मर्मज्ञ आणि वीर बलशाली
पुत्र प्राप्ती होईल.

त्यांतर अंजनीने भगवान महादेवाची कठोर आराधना केली तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन तिला वरदान मागितल्यास सांगिते. तेव्हा अंजनीने ऋषीद्वारा दिल्या गेलेल्या श्रापाची गोष्ट सांगितली कि मला या श्रापातून मुक्त व्हायचे असेल तर महादेवाच्या अवताराला मला जन्म द्यावा लागेल त्यामुळे कृपा करुन तुम्ही बालरूपात माझ्या गर्भात जन्म घ्या.

हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज 

महादेवांनी अंजनीला आशीर्वाद दिले आणि हनुमानाच्या रुपात अंजनीच्या गर्भातून जन्म घेतला. आणि अशा रीतीने  महादेवांना ऋषीच्या श्रापातून अंजनाला मुक्त करण्यासाठी हनुमान रुपी वानररुपात जन्म  घ्यावा लागला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाबली हनुमानाला का घ्यावा लागला होता वानर रूपात जन्म? ; आख्यायिका वाचून व्हाल थक्क  नागपूर : भारतीय पौराणिक कथांच्या अनुसार ७ दिव्य आणि अमर पुरुषांपैकी एक हनुमान म्हणजेच महाबली मारुती आहेत हे आपण ऐकलंच असेल. हनुमानावर अनेकांची श्रद्धा आहे. महाबली आणि सामर्थ्यशाली हनुमानाने सीता मातेला शोधण्यासाठी प्रभू श्रीरामांची मदत केली होती. त्यावेळी संपूर्ण वानरसेना लढली होती. पण हनुमानाच्या जन्माची कहाणी तुम्हाला माहिती आहे का?  महादेवाच्या या अवताराला वानर रूपात जन्म का घ्यावा लागला? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.     पौराणिक कथानुसार पवनपुत्र हनुमानाची आई माता अंजनी ह्या आपल्या पूर्वीच्या जन्मात देवराज इंद्र यांच्या महालातील अप्सरा होत्या. त्यांचे नाव पुंजीकस्थला असे होते. एकदम चपळ आणि दिसायला सुंदर असल्यामुळे त्या इंद्र्दार्बरी होत्या. एकवेळी त्यांनी आपल्या चंचलतेमुळे तपश्चर्या करण्यात मग्न असलेल्या एका ऋषीसोबत गैरवर्तन केले होते. तेव्हा ऋषीमुनीने रागात तिला श्राप दिला कि तू वानरीच्या रुपात आयुष्य जगशील. मासे खाणाऱ्यांनो, तुमच्यासाठी खास बातमी! अशा पद्धतीने ओळखा ताज्या आणि शिळ्या माशांमधला फरक त्यानंतर पुंजीकस्थलाने क्षमायाचना करत ऋषीकडे आपला श्राप वापस घेण्याची विनती केली. तिला आपल्या चुकीची जाणीव झालीय हे पाहून ऋषींनी दया दाखवत सांगितले की तुझा जन्म वानर कुळात होईल आणि तू एक खूप कीर्तिवान, यशस्वी पुत्राला जन्म देशील. ऋषींनी श्राप दिल्यांनतर एके दिवशी इंद्र्देवाने पुंजीकस्थलाला वर मागण्यास सांगितले.  तेव्हा पुंजीकस्थलाने इंद्रदेवाला सांगितले जर शक्य असेल तर मला ऋषीद्वारा दिल्या गेलेल्या श्रापातून मुक्त करा. इंद्र्देवाने पूर्ण वृतांत एकल्यानंतर सांगितले की तूला पृथ्वी लोकात जाऊन वास्तव्य करावे लागेल. तेथे तुला एका राजकुमाराशी प्रेम होईल आणि तो तुझा पती बनेल. विवाहानंतर तू  महादेवांच्या अवताराला जन्म देशील आणि या श्रापातून तुझी मुक्तता होईल. इंद्रदेवांचा आदेश मानून पुंजीकस्थला “अंजनी” च्या रुपात धरतीलोकात वास्तव्य करू लागली. एकदा तिला एक युवक दिसला ज्याच्याकडे ती आकर्षित झाली. जसेही त्या युवकाने अंजनीकडे बघितले की लगेच अंजनीचा चेहरा वानराचा झाला. अंजनीने त्या युवकापासून आपला चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु जेव्हा त्या युवकाने अंजनीचा चेहरा पहिला तेव्हा तो आनंदून गेला.  अंजनीने युवकाकडे पहिले तर तोसुद्धा वानर रुपात होता. युवकाने अंजनीला सांगितले कि मी वानरराज केसरी आहे. आणि जेव्हा वाटेल तेव्हा मनुष्य रूप धारण करू शकतो. दोघानंही एकमेकांवर प्रेम झाले होते आणि दोघेही विवाह बंधनात अडकले. झाला अंजनीपुत्राचा जन्म  विवाहानंतर अनेक वर्ष बिना संततीचे राहिल्यानंतर अंजनी मातंग ऋषीकडे जाऊन पोहचली. आणि त्यांना आपले दुखः सांगितले. तेव्हा मातंग ऋषीने तिल नारायण पर्वतावर स्थित असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन १२ वर्ष उपवास करून तप करण्यास सांगितले. तपादरम्यान वायुदेवाने अंजनीच्या तपावर खुश होऊन वरदान दिले कि तिला अग्नी,सूर्य ,वेदाचा मर्मज्ञ आणि वीर बलशाली पुत्र प्राप्ती होईल. त्यांतर अंजनीने भगवान महादेवाची कठोर आराधना केली तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन तिला वरदान मागितल्यास सांगिते. तेव्हा अंजनीने ऋषीद्वारा दिल्या गेलेल्या श्रापाची गोष्ट सांगितली कि मला या श्रापातून मुक्त व्हायचे असेल तर महादेवाच्या अवताराला मला जन्म द्यावा लागेल त्यामुळे कृपा करुन तुम्ही बालरूपात माझ्या गर्भात जन्म घ्या. हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज  महादेवांनी अंजनीला आशीर्वाद दिले आणि हनुमानाच्या रुपात अंजनीच्या गर्भातून जन्म घेतला. आणि अशा रीतीने  महादेवांना ऋषीच्या श्रापातून अंजनाला मुक्त करण्यासाठी हनुमान रुपी वानररुपात जन्म  घ्यावा लागला.  संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jeN2Md
Read More