पावसाची विश्रांती, भात कापणीला वेग आचरा (सिंधुदुर्ग) - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे. कापलेले भात वाळवायचे कुठे? त्यामुळे ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे, ते तातडीने भात झोडणीचे काम उरकून घेत आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असताना दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे.  सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिंता आहे. येथील परिसरात खाडी लगतची, मळे शेतीत पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने भातशेती कुजू लागली आहे. बहुतांशी भागात भाताला कोंब आले आहेत. सध्या सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळात कापणी केलेले भात वाळवायचे कुठे? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना आहे. अशातच शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली आहे. ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे ते शेतकरी तातडीने भात झोडणी करुन मिळेल ते भात गोळा करत आहेत.  वन्य प्राण्यांचाही उपद्रव  अती कोसळणाऱ्या पावसाने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. माकड, डुकरांसह इतर वन्य प्राण्यांकडूनही भुईमूग शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणासोबत वन्य प्राण्यांचाही त्रास वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 28, 2020

पावसाची विश्रांती, भात कापणीला वेग आचरा (सिंधुदुर्ग) - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे. कापलेले भात वाळवायचे कुठे? त्यामुळे ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे, ते तातडीने भात झोडणीचे काम उरकून घेत आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असताना दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे.  सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिंता आहे. येथील परिसरात खाडी लगतची, मळे शेतीत पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने भातशेती कुजू लागली आहे. बहुतांशी भागात भाताला कोंब आले आहेत. सध्या सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळात कापणी केलेले भात वाळवायचे कुठे? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना आहे. अशातच शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली आहे. ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे ते शेतकरी तातडीने भात झोडणी करुन मिळेल ते भात गोळा करत आहेत.  वन्य प्राण्यांचाही उपद्रव  अती कोसळणाऱ्या पावसाने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. माकड, डुकरांसह इतर वन्य प्राण्यांकडूनही भुईमूग शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणासोबत वन्य प्राण्यांचाही त्रास वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3kTEtH8

No comments:

Post a Comment