ना कामावर कायम, ना पुरेसे वेतन  गेल्या १६ वर्षापासून मानधनावर काम करतोय. मात्र, कायम कधी होणार माहीत नाही. झगडा सुरू आहे. एकीकडे कायम कर्मचाऱ्यांना वेतनाचा फरक मिळत आहे. दुसरीकडे आमच्या वेतनातील दोन हजार रुपये कपात करण्यात आले आहेत. अशाप्रकारे आमच्यावर अन्याय केला जात आहे. ना कामावर कायम, ना पुरेसे वेतन. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मानधनावरील कर्मचारी मोहन जाधव यांची ही व्यथा आहे. त्यांच्याप्रमाणेच मानधन तत्त्वावरील सुमारे ३५० आरोग्य कर्मचारी कायम होण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. वायसीएममध्ये गेल्या १६ वर्षांपासून हे चतुर्थ आणि तृतीय श्रेणीतील आरोग्य कर्मचारी मानधनावर काम करीत आहेत. त्यांनी कोरोनाकाळात सुटी न घेता काम केले. या कर्मचाऱ्यांना अवेळी पगार मिळतो. सतत कोणत्याही शिफ्टमध्ये काम. इतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांपासूनही वंचित. यासंबंधी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वारंवार विषय मांडण्यात आला. यासंबंधी राज्य सरकारकडे या कर्मचाऱ्यांनी कायम करण्याची मागणी केली. तर न्यायालयातही दाद मागितली आहे. कोरोनातही कायम करण्याची विषय समोर आल्याने ही फाइल दुर्लक्षित राहिल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात येत आहे. तर फाइल आमच्या विभागात नाही संबंधितांना विचारा’ अशी उत्तरे या कर्मचाऱ्यांना मिळत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला कायम करण्याची मागणी ते करत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अन्याय कशासाठी? मानधनावरील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात सुरू केली आहे. तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दोन हजार तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून चौदाशे रुपये कपात करण्यात येत आहे. हा अन्याय कशासाठी असा सवाल मानधनावरील कर्मचाऱ्यांनी केला आहे. दहा वर्षे काम करणाऱ्या मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा ठराव आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत अधिक माहिती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. पण पुढे कार्यवाही झाली नाही. आमचे वय ४० च्या पुढे असल्याने इतर ठिकाणी नोकरी मिळणेही अवघड आहे. - वैशाली कांबळे, आया मार्च २०२० पासून कोरोनामुळे कामाचा ताण मोठा होता. सतत रुग्ण, अविरत उपचार, मृत रुग्णांची सोय आदी कामे करावी लागत होती. गरजेच्या वेळी आम्ही प्रामाणिकपणे काम केले असून आतातरी आमचा विचार व्हावा. - अनिता पवार, आया  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काही वेळा अंत्यविधीचीही करावी लागणारी व्यवस्था अशी अतिरिक्त अनेक कामे करत आहोत. आम्हाला प्रचंड ताणाखाली काम करावे लागले. कायम असलेले कर्मचारी अनेकदा सुटीवर जात असल्याने अतिरिक्त कामाचा ताण आमच्यावर होता. - बसवराज कुंभार, वॉर्डबॉय आम्हाला सुटीची मुभा नव्हती. अगदीच कधी सुटी काढायची वेळ आली तर पगारातील पैसे कमी केले जायचे. कायम नसल्याने कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही. तसेच पगार वेळेवर नसतो. - मोहन जाधव, रुग्णवाहिका चालक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

ना कामावर कायम, ना पुरेसे वेतन  गेल्या १६ वर्षापासून मानधनावर काम करतोय. मात्र, कायम कधी होणार माहीत नाही. झगडा सुरू आहे. एकीकडे कायम कर्मचाऱ्यांना वेतनाचा फरक मिळत आहे. दुसरीकडे आमच्या वेतनातील दोन हजार रुपये कपात करण्यात आले आहेत. अशाप्रकारे आमच्यावर अन्याय केला जात आहे. ना कामावर कायम, ना पुरेसे वेतन. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मानधनावरील कर्मचारी मोहन जाधव यांची ही व्यथा आहे. त्यांच्याप्रमाणेच मानधन तत्त्वावरील सुमारे ३५० आरोग्य कर्मचारी कायम होण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. वायसीएममध्ये गेल्या १६ वर्षांपासून हे चतुर्थ आणि तृतीय श्रेणीतील आरोग्य कर्मचारी मानधनावर काम करीत आहेत. त्यांनी कोरोनाकाळात सुटी न घेता काम केले. या कर्मचाऱ्यांना अवेळी पगार मिळतो. सतत कोणत्याही शिफ्टमध्ये काम. इतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांपासूनही वंचित. यासंबंधी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वारंवार विषय मांडण्यात आला. यासंबंधी राज्य सरकारकडे या कर्मचाऱ्यांनी कायम करण्याची मागणी केली. तर न्यायालयातही दाद मागितली आहे. कोरोनातही कायम करण्याची विषय समोर आल्याने ही फाइल दुर्लक्षित राहिल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात येत आहे. तर फाइल आमच्या विभागात नाही संबंधितांना विचारा’ अशी उत्तरे या कर्मचाऱ्यांना मिळत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला कायम करण्याची मागणी ते करत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अन्याय कशासाठी? मानधनावरील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात सुरू केली आहे. तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दोन हजार तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून चौदाशे रुपये कपात करण्यात येत आहे. हा अन्याय कशासाठी असा सवाल मानधनावरील कर्मचाऱ्यांनी केला आहे. दहा वर्षे काम करणाऱ्या मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा ठराव आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत अधिक माहिती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. पण पुढे कार्यवाही झाली नाही. आमचे वय ४० च्या पुढे असल्याने इतर ठिकाणी नोकरी मिळणेही अवघड आहे. - वैशाली कांबळे, आया मार्च २०२० पासून कोरोनामुळे कामाचा ताण मोठा होता. सतत रुग्ण, अविरत उपचार, मृत रुग्णांची सोय आदी कामे करावी लागत होती. गरजेच्या वेळी आम्ही प्रामाणिकपणे काम केले असून आतातरी आमचा विचार व्हावा. - अनिता पवार, आया  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काही वेळा अंत्यविधीचीही करावी लागणारी व्यवस्था अशी अतिरिक्त अनेक कामे करत आहोत. आम्हाला प्रचंड ताणाखाली काम करावे लागले. कायम असलेले कर्मचारी अनेकदा सुटीवर जात असल्याने अतिरिक्त कामाचा ताण आमच्यावर होता. - बसवराज कुंभार, वॉर्डबॉय आम्हाला सुटीची मुभा नव्हती. अगदीच कधी सुटी काढायची वेळ आली तर पगारातील पैसे कमी केले जायचे. कायम नसल्याने कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही. तसेच पगार वेळेवर नसतो. - मोहन जाधव, रुग्णवाहिका चालक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3d6RdHZ

No comments:

Post a Comment