कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन नारिकांनी करणे गरजेचे; डॅा. राजेश टोपे भोसरी - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढती आहे. मात्र या रुग्णसंख्येत लक्षणेविरहीत (असिम्टोमेटिक) रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना संसर्गिक रुग्णांची संख्या कमी आहे. अधिक प्रमाणात कोरोना संसंर्गिक रुग्ण घरी विलगीकरण आणि औषपचाराने बरे होत आहेत. असे असले तरी कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नारिकांनी करणे गरजेचे आहे. अशीच रुग्ण संख्या सतत वाढत राहिली तर राज्य शासनाला नाइलाजास्तव लॅाकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल.  मात्र लॅाकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल असे राज्याचे आरोग्यमंत्री डॅा. राजेश टोपे यांनी भोसरीतील इंद्रायणीनगरात एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सोमवारी (ता. २२) सांगितले. या वेळी महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे, नगरसेवक विक्रांत लांडे आदी उपस्थित होते. या वेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॅा. टोपे म्हणाले, "सध्या ४५ ते ६० वयोगटापर्यंतच्या नागरिकांना कोरोनापासून बचाव होण्यासाठी लस दिली जात आहे. लवकरच ही वयोमर्यादा २५ ते ६० अशी करण्यात येईल. मात्र २५ ते ४५ वयोगटातील गरोदर महिला,  विविध आजाराने ग्रस्त नागरिक यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्राकडून आलेल्या लसी महाराष्ट्र शासनाने नागरिकांना दिल्या नाहीत अशी ओरड विरोधी पक्षांकडून केली जात असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना  डॅा. टोपे म्हणाले, "केंद्राकडून आलेली लस राज्याच्या प्रत्येक भागात पोचविली जाते. त्याचप्रमाणे या लसी राज्यातील नागरिकांना दिल्या जात आहेत. केंद्राकडून आलेल्या लसी दिल्या जात नसल्याची  विरोकांची ओरड निरर्थक आहे.  त्याचप्रमाणे नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे आले पाहिजे." पिंपरी-चिंचवड, पुणे शहर परिसरातील लघुउद्योजक आणि व्यावसायिकांनी धास्ती घेतल्याचे विचारल्यावर डॅा. टोपे म्हणाले, "उद्योजक आणि व्यावसायिकांनी धास्ती घेण्याचे कारण नाही. लॅाकडाऊन हा निश्चिंतपणे शेवटचाच पर्याय असणार आहे." - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणावर डॅा. टोपे म्हणाले, "या प्रकरणात राज्य शासन संवेदनशील आहे. या प्रकरणात आदरणीय शरद पवारसाहेब स्वतः जातीने लक्ष घालत आहेत.  विरोधकांनी  या प्रकरणाचा बाऊ करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी बालिशपणाची आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. " गृहमंत्रीपदासाठी तुमचे नाव घेतले जाते आहे, यावर मिश्कील हसत डॅा. टोपे म्हणाले, "फक्त प्रसार माध्यमेच अस सांगत आहेत. यात तथ्य नाही." Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 22, 2021

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन नारिकांनी करणे गरजेचे; डॅा. राजेश टोपे भोसरी - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढती आहे. मात्र या रुग्णसंख्येत लक्षणेविरहीत (असिम्टोमेटिक) रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना संसर्गिक रुग्णांची संख्या कमी आहे. अधिक प्रमाणात कोरोना संसंर्गिक रुग्ण घरी विलगीकरण आणि औषपचाराने बरे होत आहेत. असे असले तरी कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नारिकांनी करणे गरजेचे आहे. अशीच रुग्ण संख्या सतत वाढत राहिली तर राज्य शासनाला नाइलाजास्तव लॅाकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल.  मात्र लॅाकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल असे राज्याचे आरोग्यमंत्री डॅा. राजेश टोपे यांनी भोसरीतील इंद्रायणीनगरात एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सोमवारी (ता. २२) सांगितले. या वेळी महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे, नगरसेवक विक्रांत लांडे आदी उपस्थित होते. या वेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॅा. टोपे म्हणाले, "सध्या ४५ ते ६० वयोगटापर्यंतच्या नागरिकांना कोरोनापासून बचाव होण्यासाठी लस दिली जात आहे. लवकरच ही वयोमर्यादा २५ ते ६० अशी करण्यात येईल. मात्र २५ ते ४५ वयोगटातील गरोदर महिला,  विविध आजाराने ग्रस्त नागरिक यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्राकडून आलेल्या लसी महाराष्ट्र शासनाने नागरिकांना दिल्या नाहीत अशी ओरड विरोधी पक्षांकडून केली जात असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना  डॅा. टोपे म्हणाले, "केंद्राकडून आलेली लस राज्याच्या प्रत्येक भागात पोचविली जाते. त्याचप्रमाणे या लसी राज्यातील नागरिकांना दिल्या जात आहेत. केंद्राकडून आलेल्या लसी दिल्या जात नसल्याची  विरोकांची ओरड निरर्थक आहे.  त्याचप्रमाणे नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे आले पाहिजे." पिंपरी-चिंचवड, पुणे शहर परिसरातील लघुउद्योजक आणि व्यावसायिकांनी धास्ती घेतल्याचे विचारल्यावर डॅा. टोपे म्हणाले, "उद्योजक आणि व्यावसायिकांनी धास्ती घेण्याचे कारण नाही. लॅाकडाऊन हा निश्चिंतपणे शेवटचाच पर्याय असणार आहे." - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणावर डॅा. टोपे म्हणाले, "या प्रकरणात राज्य शासन संवेदनशील आहे. या प्रकरणात आदरणीय शरद पवारसाहेब स्वतः जातीने लक्ष घालत आहेत.  विरोधकांनी  या प्रकरणाचा बाऊ करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी बालिशपणाची आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. " गृहमंत्रीपदासाठी तुमचे नाव घेतले जाते आहे, यावर मिश्कील हसत डॅा. टोपे म्हणाले, "फक्त प्रसार माध्यमेच अस सांगत आहेत. यात तथ्य नाही." Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sdBfCt

No comments:

Post a Comment