"अरूणा'चे काम प्रकल्पग्रस्तांनी रोखले  वैभववाडी (सिंधुदुर्ग) - अरूणा धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद केल्यामुळे अरूणा प्रकल्पग्रस्तांनी आज दुपारी प्रकल्पाच्या पिचींगचे काम रोखले. धरणात बुडालेल्या घरांचा पंचनामा करण्यासाठी पाण्याचा विसर्ग करणे आवश्‍यक होते; परंतु हेतुपुरस्सर प्रशासनाने हा विसर्ग थांबविल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे यांनी केला आहे.  अरूणा प्रकल्पाच्या पाण्यात बुडालेल्या काही प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा पंचनामा होण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करणे गरजेचे आहे. 4 जानेवारीपासून धरणातील पाण्याचा विसर्ग प्रकल्प प्रशासनाकडून सुरू करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात धरणातील पाण्याचा विसर्ग कमी होत असल्यामुळे आखवणेतील धाकुबाई मंदीर सभोवतालचे पाणी कमी होताना दिसत आहे. पाण्याचा विसर्ग असाच सुरू राहीला असता तर पाण्यात बुडालेल्या घरांची मोजदाद होऊ शकली असती. त्यामुळे ही मोजदाद किवा घरांच्या नुकसानीचा पंचनामा होऊ नये, या हेतूने प्रकल्प प्रशासनाने अचानक धरणातील पाण्याचा विसर्ग रोखला, असा आरोप करीत लढा संघर्षाचा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेच्या माध्यमातून प्रकल्पाच्या पिचींगचे काम रोखण्यात आले. आज दुपारी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी श्री. कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, पांडुरंग जाधव यांच्यासह अनेकांनी काम बंद केले. यावेळी प्रशासनाच्या भुमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. पिंचींगचे काम करणाऱ्या मशीनसमोर प्रकल्पग्रस्तांनी ठाण मांडल्यामुळे काही काळ पिचींगचे काम बंद ठेवण्यात आले.  काहींची घरे बुडाली  अरूणा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील काही प्रकल्पग्रस्तांची घरे पाण्याखाली बुडाली आहेत. या मुद्‌द्‌यांसह प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्‍नांसाठी प्रकल्पग्रस्त विविध पातळ्यांवर आंदोलन छेडत आहेत. प्रकल्पात 130 घरे बुडाली, असा दावा प्रकल्पग्रस्तांचा आहे तर प्रशासनाकडून काही किरकोळ घरे पाण्याखाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे धरणातील पातळी कमी झाली तरच नेमकी किती घरे पाण्याखाली आहेत हे निश्‍चित होणार आहे. दरम्यान, आजच्या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.   संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 2, 2021

"अरूणा'चे काम प्रकल्पग्रस्तांनी रोखले  वैभववाडी (सिंधुदुर्ग) - अरूणा धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद केल्यामुळे अरूणा प्रकल्पग्रस्तांनी आज दुपारी प्रकल्पाच्या पिचींगचे काम रोखले. धरणात बुडालेल्या घरांचा पंचनामा करण्यासाठी पाण्याचा विसर्ग करणे आवश्‍यक होते; परंतु हेतुपुरस्सर प्रशासनाने हा विसर्ग थांबविल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे यांनी केला आहे.  अरूणा प्रकल्पाच्या पाण्यात बुडालेल्या काही प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा पंचनामा होण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करणे गरजेचे आहे. 4 जानेवारीपासून धरणातील पाण्याचा विसर्ग प्रकल्प प्रशासनाकडून सुरू करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात धरणातील पाण्याचा विसर्ग कमी होत असल्यामुळे आखवणेतील धाकुबाई मंदीर सभोवतालचे पाणी कमी होताना दिसत आहे. पाण्याचा विसर्ग असाच सुरू राहीला असता तर पाण्यात बुडालेल्या घरांची मोजदाद होऊ शकली असती. त्यामुळे ही मोजदाद किवा घरांच्या नुकसानीचा पंचनामा होऊ नये, या हेतूने प्रकल्प प्रशासनाने अचानक धरणातील पाण्याचा विसर्ग रोखला, असा आरोप करीत लढा संघर्षाचा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेच्या माध्यमातून प्रकल्पाच्या पिचींगचे काम रोखण्यात आले. आज दुपारी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी श्री. कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, पांडुरंग जाधव यांच्यासह अनेकांनी काम बंद केले. यावेळी प्रशासनाच्या भुमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. पिंचींगचे काम करणाऱ्या मशीनसमोर प्रकल्पग्रस्तांनी ठाण मांडल्यामुळे काही काळ पिचींगचे काम बंद ठेवण्यात आले.  काहींची घरे बुडाली  अरूणा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील काही प्रकल्पग्रस्तांची घरे पाण्याखाली बुडाली आहेत. या मुद्‌द्‌यांसह प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्‍नांसाठी प्रकल्पग्रस्त विविध पातळ्यांवर आंदोलन छेडत आहेत. प्रकल्पात 130 घरे बुडाली, असा दावा प्रकल्पग्रस्तांचा आहे तर प्रशासनाकडून काही किरकोळ घरे पाण्याखाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे धरणातील पातळी कमी झाली तरच नेमकी किती घरे पाण्याखाली आहेत हे निश्‍चित होणार आहे. दरम्यान, आजच्या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.   संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2O1Lbje

No comments:

Post a Comment