सोशल मीडियावर कोरोनाबाबत या पोस्टमुळे वाढतेय नैराश्य, वाचा सविस्तर नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबळी वाढत आहे. त्यामुळे भीती पसरली आहे. त्याचवेळी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र सोशल मीडियावर प्रशासनाचे प्रयत्न, बरे होणाऱ्या रुग्णांच्या सकारात्मक पोस्टऐवजी बळी, बाधितांची आकडेवारी जाहीर करणाऱ्या पोस्टचीच बजबजपुरी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांत कोरोनाबाबत काळजीऐवजी भीती वाढत असल्याचे चित्र आहे. लॉकडाउन काळात संयम बाळगणाऱ्या नेटकऱ्यांनी पुन्हा कोरोनाबाबत सकारात्मक होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर सध्या कोरोनाबाबत नकारात्मक घटनांचे व्हिडिओ, क्लिप्सची लाट आली आहे. त्याचे प्रतिकूल परिणामही समाजावर होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाबतची आकडेवारी दररोज आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध केली जात आहे. यात बाधित, बळींच्या आकड्यासोबतच उपचार घेत असलेले, उपचारातून बरे झालेल्या नागरिकांचीही आकडेवारी असते. याच आकडेवारीचा संदर्भ घेत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर अनेकांच्या पोस्ट दिसत आहे. यात अनेकांकडून बळी, बाधितांच्या आकडेवारीचा ऊहापोह केला जात आहे. त्यामुळे नागरिकांत भीती वाढत असल्याचा निष्कर्ष सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नोंदविला. नेटकऱ्यांनी कोरोनातून मुक्त झालेले, यशस्वी उपचार घेत असलेल्या रुग्णांचीही माहिती पोस्ट केली तर नागरिकांत सकारात्मक वातावरण तयार होईल, असे पारसे यांनी सांगितले. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केल्यास कोरोनाबाबतची भीती नाहीशी होईलच, शिवाय नागरिकही यातून बरं होता येते या भावनेसह जीवनशैली अंगीकारतील. आयुक्त राधाकृष्णन यांनी कोरोनाग्रस्तांसाठी केल्या या उपाययोजना, वाचा सविस्तर -  मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउन काळात घरात बसून सोशल मीडियायावरून अनेक सकारात्मक पोस्ट टाकून मानसिक बळ वाढवले. आता त्यापेक्षाही भयंकर स्थिती आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी भीती पसरविणाऱ्या पोस्ट न टाकता कोरोनाबाधितांचा आत्मविश्वास वाढेल, अशा पोस्ट टाकण्याची गरज आहे. प्रशासनाचे दोष दाखविणाऱ्या पोस्ट अधिक आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत प्रशासनाबाबत विश्वास निर्माण करणारी माहिती सोशल मीडियातून पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.   सोशल मीडियाचा सकारात्मक वापर अवश्य आहे. कोरोनाच्या संकटकाळात नकारात्मक माहितीचा प्रसार करण्याऐवजी कोरोनामुक्त झालेले नागरिक, त्यांची आकडेवारी, त्यांचे यशस्वी प्रयत्न यावर नेटकऱ्यांनी भर दिला तर कोरोनाशी लढणाऱ्या बाधितांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण होईल. नकारात्मक पोस्टमधून सामाजिक नैराश्य पसरवण्याचा धोका टाळण्याची जबाबदारी नेटकऱ्यांनी घ्यावी. अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 8, 2020

सोशल मीडियावर कोरोनाबाबत या पोस्टमुळे वाढतेय नैराश्य, वाचा सविस्तर नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबळी वाढत आहे. त्यामुळे भीती पसरली आहे. त्याचवेळी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र सोशल मीडियावर प्रशासनाचे प्रयत्न, बरे होणाऱ्या रुग्णांच्या सकारात्मक पोस्टऐवजी बळी, बाधितांची आकडेवारी जाहीर करणाऱ्या पोस्टचीच बजबजपुरी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांत कोरोनाबाबत काळजीऐवजी भीती वाढत असल्याचे चित्र आहे. लॉकडाउन काळात संयम बाळगणाऱ्या नेटकऱ्यांनी पुन्हा कोरोनाबाबत सकारात्मक होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर सध्या कोरोनाबाबत नकारात्मक घटनांचे व्हिडिओ, क्लिप्सची लाट आली आहे. त्याचे प्रतिकूल परिणामही समाजावर होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाबतची आकडेवारी दररोज आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध केली जात आहे. यात बाधित, बळींच्या आकड्यासोबतच उपचार घेत असलेले, उपचारातून बरे झालेल्या नागरिकांचीही आकडेवारी असते. याच आकडेवारीचा संदर्भ घेत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर अनेकांच्या पोस्ट दिसत आहे. यात अनेकांकडून बळी, बाधितांच्या आकडेवारीचा ऊहापोह केला जात आहे. त्यामुळे नागरिकांत भीती वाढत असल्याचा निष्कर्ष सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नोंदविला. नेटकऱ्यांनी कोरोनातून मुक्त झालेले, यशस्वी उपचार घेत असलेल्या रुग्णांचीही माहिती पोस्ट केली तर नागरिकांत सकारात्मक वातावरण तयार होईल, असे पारसे यांनी सांगितले. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केल्यास कोरोनाबाबतची भीती नाहीशी होईलच, शिवाय नागरिकही यातून बरं होता येते या भावनेसह जीवनशैली अंगीकारतील. आयुक्त राधाकृष्णन यांनी कोरोनाग्रस्तांसाठी केल्या या उपाययोजना, वाचा सविस्तर -  मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउन काळात घरात बसून सोशल मीडियायावरून अनेक सकारात्मक पोस्ट टाकून मानसिक बळ वाढवले. आता त्यापेक्षाही भयंकर स्थिती आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी भीती पसरविणाऱ्या पोस्ट न टाकता कोरोनाबाधितांचा आत्मविश्वास वाढेल, अशा पोस्ट टाकण्याची गरज आहे. प्रशासनाचे दोष दाखविणाऱ्या पोस्ट अधिक आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत प्रशासनाबाबत विश्वास निर्माण करणारी माहिती सोशल मीडियातून पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.   सोशल मीडियाचा सकारात्मक वापर अवश्य आहे. कोरोनाच्या संकटकाळात नकारात्मक माहितीचा प्रसार करण्याऐवजी कोरोनामुक्त झालेले नागरिक, त्यांची आकडेवारी, त्यांचे यशस्वी प्रयत्न यावर नेटकऱ्यांनी भर दिला तर कोरोनाशी लढणाऱ्या बाधितांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण होईल. नकारात्मक पोस्टमधून सामाजिक नैराश्य पसरवण्याचा धोका टाळण्याची जबाबदारी नेटकऱ्यांनी घ्यावी. अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/337THRK

No comments:

Post a Comment