एवढे प्राॅल्बेम? सांगा कसा होईल ऑनलाइन शिक्षणाचा `श्रीगणेशा`? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील मळगाव येथे असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीच्या मोबाईल व इंटरनेट यंत्रणेमध्ये वारंवार होत असलेल्या बिघाडाच्या पार्श्‍वभूमीवर आज तेथील शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी खासदार विनायक राऊत यांचीच भेट घेऊन त्यांच्यासमोर समस्या कथन केली. यावेळी भारत संचार निगम लिमिटेडचे सदस्य रुपेश राऊळ, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, अनारोजीन लोबो, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, महेश शिरोडकर आदी उपस्थित होते.  यावेळी भारत संचार निगम लिमिटेड जिल्हा व्यवस्थापक एस. आर. मंजी व उपव्यवस्थापक देशमुख हेही उपस्थित होते. मळगाव गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मोबाईल टॉवर बंद होऊन मोबाईल सेवा खंडित होते. गेल्या काही दिवसांपासून मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. यासाठी इंटरनेटच्या रेंजची आवश्‍यकता असून इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्यामुळे या मुलांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. इंटरनेटची 2 जी रेंज वा थ्रीजी सुद्धा चालत नसल्यामुळे याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यासाठी हे विद्यार्थी सावंतवाडी येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या कार्यालयमध्ये आले होते. त्यांनी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या प्रांगणात खासदार राऊत यांची भेट घेऊन समस्या कथन केली.  खासदारांचे आश्‍वासन  दोन दिवसांत इंटरनेट सेवा तसेच मोबाइल सेवा सुरळीत करण्याचे आश्‍वासन खासदारांनी दिले. वीजपुरवठा खंडित झाल्यास डिझेलवर चालणारा जनरेटर व कामगार नेमण्याचे आश्‍वासन दिले. खासदार राऊत यांनी पुणे येथील बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक साईना यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला ही समस्या तत्काळ सोडण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 19, 2020

एवढे प्राॅल्बेम? सांगा कसा होईल ऑनलाइन शिक्षणाचा `श्रीगणेशा`? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील मळगाव येथे असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीच्या मोबाईल व इंटरनेट यंत्रणेमध्ये वारंवार होत असलेल्या बिघाडाच्या पार्श्‍वभूमीवर आज तेथील शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी खासदार विनायक राऊत यांचीच भेट घेऊन त्यांच्यासमोर समस्या कथन केली. यावेळी भारत संचार निगम लिमिटेडचे सदस्य रुपेश राऊळ, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, अनारोजीन लोबो, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, महेश शिरोडकर आदी उपस्थित होते.  यावेळी भारत संचार निगम लिमिटेड जिल्हा व्यवस्थापक एस. आर. मंजी व उपव्यवस्थापक देशमुख हेही उपस्थित होते. मळगाव गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मोबाईल टॉवर बंद होऊन मोबाईल सेवा खंडित होते. गेल्या काही दिवसांपासून मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. यासाठी इंटरनेटच्या रेंजची आवश्‍यकता असून इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्यामुळे या मुलांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. इंटरनेटची 2 जी रेंज वा थ्रीजी सुद्धा चालत नसल्यामुळे याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यासाठी हे विद्यार्थी सावंतवाडी येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या कार्यालयमध्ये आले होते. त्यांनी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या प्रांगणात खासदार राऊत यांची भेट घेऊन समस्या कथन केली.  खासदारांचे आश्‍वासन  दोन दिवसांत इंटरनेट सेवा तसेच मोबाइल सेवा सुरळीत करण्याचे आश्‍वासन खासदारांनी दिले. वीजपुरवठा खंडित झाल्यास डिझेलवर चालणारा जनरेटर व कामगार नेमण्याचे आश्‍वासन दिले. खासदार राऊत यांनी पुणे येथील बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक साईना यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला ही समस्या तत्काळ सोडण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fBANHe

No comments:

Post a Comment