निसर्ग खुलला... धबधबे प्रवाहित..नदी, नाले तुडुंब ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला आहे. काल (ता. 15) मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे आज सर्वत्र पाणीच पाणी झाले. जिल्ह्यातील नदी-नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. कुडाळ तालुक्‍यातील आंबेरी पुलावर पाणी आल्याने माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे बळिराजा सुखावला आहे. शेतीची कामे सुरू झाली असून शेतकरी नांगरणी आणि भात लावणी करताना दिसून येत आहेत.  जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने दाखल झालेला पाऊस मॉन्सून स्वरूपात पडायला सुरुवात झाली आहे. यावर्षी मॉन्सून वेळेत दाखल होऊन सातत्याने कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणी करून शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस अधून मधून मुसळधार पाऊस पडत होता; मात्र तो समाधानकारक पडत असल्याने बळिराजाला शेतीच्या कामांसाठी फलदायी ठरत आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली आहे. शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडत असल्याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसत आहे.  जिल्ह्यात काल (ता. 15) मध्यरात्रीपासून जोरदार सुरू झालेल्या पावसाने आज सकाळीसुद्धा जोरदार बॅटिंग केली. या पावसाने पूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पाऊस असल्याने आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही; परंतु सर्वत्र पाणीच पाणी होते; मात्र पावसाने नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा आपत्ती कक्षात झालेली नव्हती.  जोरदार पावसामुळे कुडाळ तालुक्‍यातील ब्रिटिशकालीन आंबेरी पुलावर पाणी आले आहे. माणगावपासून शिवापूरपर्यंतच्या 27 गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्व वाहनधारकांच्या नजरा पुलावरील पाणी कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशाच प्रकारे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते.  सिंधुदुर्गात गेल्या 24 तासांत 67.7 च्या सरासरीने 541.6 मि.मी., तर आतापर्यंत 669.7 च्या सरासरीने 5357.6 मि.मी. पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग 53 (517), सावंतवाडी 125 (787), वेंगुर्ले 66.2 (611.6), कुडाळ 53 (534), मालवण 70 (865), कणकवली 68 (593), देवगड 31 (732), वैभववाडी 75 (718) असा पाऊस पडला आहे.  धबधबा प्रवाहित  आंबोली येथील धबधबा या मुसळधार पावसामुळे प्रवाहित झाला आहे. येथे वर्षा पर्यटनाचा हंगाम मोठा असतो. आंबोलीचे अर्थकारण बऱ्याच अंशी यावर चालते; मात्र यंदा कोरोनामुळे वर्षा पर्यटन बहरण्याची शक्‍यता कमी आहे. धबधबा मात्र लवकर प्रवाहित झाला आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 16, 2020

निसर्ग खुलला... धबधबे प्रवाहित..नदी, नाले तुडुंब ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला आहे. काल (ता. 15) मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे आज सर्वत्र पाणीच पाणी झाले. जिल्ह्यातील नदी-नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. कुडाळ तालुक्‍यातील आंबेरी पुलावर पाणी आल्याने माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे बळिराजा सुखावला आहे. शेतीची कामे सुरू झाली असून शेतकरी नांगरणी आणि भात लावणी करताना दिसून येत आहेत.  जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने दाखल झालेला पाऊस मॉन्सून स्वरूपात पडायला सुरुवात झाली आहे. यावर्षी मॉन्सून वेळेत दाखल होऊन सातत्याने कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणी करून शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस अधून मधून मुसळधार पाऊस पडत होता; मात्र तो समाधानकारक पडत असल्याने बळिराजाला शेतीच्या कामांसाठी फलदायी ठरत आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली आहे. शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडत असल्याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसत आहे.  जिल्ह्यात काल (ता. 15) मध्यरात्रीपासून जोरदार सुरू झालेल्या पावसाने आज सकाळीसुद्धा जोरदार बॅटिंग केली. या पावसाने पूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पाऊस असल्याने आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही; परंतु सर्वत्र पाणीच पाणी होते; मात्र पावसाने नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा आपत्ती कक्षात झालेली नव्हती.  जोरदार पावसामुळे कुडाळ तालुक्‍यातील ब्रिटिशकालीन आंबेरी पुलावर पाणी आले आहे. माणगावपासून शिवापूरपर्यंतच्या 27 गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्व वाहनधारकांच्या नजरा पुलावरील पाणी कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशाच प्रकारे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते.  सिंधुदुर्गात गेल्या 24 तासांत 67.7 च्या सरासरीने 541.6 मि.मी., तर आतापर्यंत 669.7 च्या सरासरीने 5357.6 मि.मी. पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग 53 (517), सावंतवाडी 125 (787), वेंगुर्ले 66.2 (611.6), कुडाळ 53 (534), मालवण 70 (865), कणकवली 68 (593), देवगड 31 (732), वैभववाडी 75 (718) असा पाऊस पडला आहे.  धबधबा प्रवाहित  आंबोली येथील धबधबा या मुसळधार पावसामुळे प्रवाहित झाला आहे. येथे वर्षा पर्यटनाचा हंगाम मोठा असतो. आंबोलीचे अर्थकारण बऱ्याच अंशी यावर चालते; मात्र यंदा कोरोनामुळे वर्षा पर्यटन बहरण्याची शक्‍यता कमी आहे. धबधबा मात्र लवकर प्रवाहित झाला आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ekTjU0

No comments:

Post a Comment