लाॅकडाऊन उठविल्यानंतरही उद्योजकांसमोर आहेत या अडचणी   इचलकरंजी : शहरातील सुमारे 45 हजार कामगार येत्या नजीकच्या काळात आपल्या गावी परतणार आहेत. याचा मोठा फटका यंत्रमाग व्यवसायाला बसणार असून शहरातील जेमतेम 20 ते 25 टक्केच यंत्रमाग सद्यस्थितीला सुरू झाले आहेत. या यंत्रमागावर काम करणार्‍या कामगारांना गावाकडे जाण्यास परवानगी मिळाल्यास सुरू असलेले कारखाने ठप्प होण्याची भिती व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.  इचलकरंजी शहर व परिसरात सुमारे 1 लाख 25 हजार यंत्रमाग आहेत. यामध्ये सुमारे 20 हजार एअरजेटसह अत्याधुनिक यंत्रमाग आहेत. यातील जेमतेम 25 ते 30 टक्के कारखाने सद्या सुरू आहेत. तर साध्या 1 लाख यंत्रमागामधील सुमारे 10 ते 15 टक्केच यंत्रमाग सुरू झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली. सद्यस्थितीत जे यंत्रमागधारक ट्रेडींगवाल्यांकडून बिमे घेऊन कापड उत्पादन करतात त्यांनी नवीन बिमे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उपलब्ध बिमे असेपर्यंतच यंत्रमाग चालणार आहेत. दुसर्‍या बाजूस अडत व्यापार्‍यांनी तयार झालेले कापड चेकींग न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तयार झालेले कापडही विक्रीसाठी पुढे जाणार नसल्याचे चित्र आहे. शहरात सुमारे 60 ते 65 हजार कामगार बाहेरून येऊन राहिलेले आहेत. यातील 40 ते 45 हजार कामगार आपल्या मुळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत. बाहेरील राज्यातील कामगारांनी ऑनलाईन परवाना मागितला असून ते मिळताच हे कामगार परतणार आहेत. दुसर्‍या बाजूस हे कामगार गावी जाण्यासाठी अद्यापही चार ते आठ दिवसाचा अवधी आहे. परवानगीनंतर ते गावी गेल्यानंतर त्यांना किमान 14 दिवस विलीगीकरण कक्षात रहावे लागणार आहे. त्यानंतर ते आपल्या घरी परतणार असून त्यानंतर किमान 15 दिवस तरी ते आपल्या घरात राहतील. या दरम्यान लॉकडाऊन उठल्यास किती प्रमाणात कामगार परत येतात याबाबत अनिश्‍चितता आहे. हे पण वाचा - फडणविसांनी पडळकरांना धनगर समाजाला भ्रमित करण्याचे बक्षिस दिले.  हे पण वाचा - ...अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मागितली माफी   सध्या कामगारांना गावी जाण्यास लवरकर परवानगी मिळाली नाही तर हेच कामगार लॉकडाऊन उठल्यानंतर गावी जाणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतर कारखाने सुरू झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणात कामगारांची टंचाई भासणार आहे. -विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 8, 2020

लाॅकडाऊन उठविल्यानंतरही उद्योजकांसमोर आहेत या अडचणी   इचलकरंजी : शहरातील सुमारे 45 हजार कामगार येत्या नजीकच्या काळात आपल्या गावी परतणार आहेत. याचा मोठा फटका यंत्रमाग व्यवसायाला बसणार असून शहरातील जेमतेम 20 ते 25 टक्केच यंत्रमाग सद्यस्थितीला सुरू झाले आहेत. या यंत्रमागावर काम करणार्‍या कामगारांना गावाकडे जाण्यास परवानगी मिळाल्यास सुरू असलेले कारखाने ठप्प होण्याची भिती व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.  इचलकरंजी शहर व परिसरात सुमारे 1 लाख 25 हजार यंत्रमाग आहेत. यामध्ये सुमारे 20 हजार एअरजेटसह अत्याधुनिक यंत्रमाग आहेत. यातील जेमतेम 25 ते 30 टक्के कारखाने सद्या सुरू आहेत. तर साध्या 1 लाख यंत्रमागामधील सुमारे 10 ते 15 टक्केच यंत्रमाग सुरू झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली. सद्यस्थितीत जे यंत्रमागधारक ट्रेडींगवाल्यांकडून बिमे घेऊन कापड उत्पादन करतात त्यांनी नवीन बिमे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उपलब्ध बिमे असेपर्यंतच यंत्रमाग चालणार आहेत. दुसर्‍या बाजूस अडत व्यापार्‍यांनी तयार झालेले कापड चेकींग न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तयार झालेले कापडही विक्रीसाठी पुढे जाणार नसल्याचे चित्र आहे. शहरात सुमारे 60 ते 65 हजार कामगार बाहेरून येऊन राहिलेले आहेत. यातील 40 ते 45 हजार कामगार आपल्या मुळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत. बाहेरील राज्यातील कामगारांनी ऑनलाईन परवाना मागितला असून ते मिळताच हे कामगार परतणार आहेत. दुसर्‍या बाजूस हे कामगार गावी जाण्यासाठी अद्यापही चार ते आठ दिवसाचा अवधी आहे. परवानगीनंतर ते गावी गेल्यानंतर त्यांना किमान 14 दिवस विलीगीकरण कक्षात रहावे लागणार आहे. त्यानंतर ते आपल्या घरी परतणार असून त्यानंतर किमान 15 दिवस तरी ते आपल्या घरात राहतील. या दरम्यान लॉकडाऊन उठल्यास किती प्रमाणात कामगार परत येतात याबाबत अनिश्‍चितता आहे. हे पण वाचा - फडणविसांनी पडळकरांना धनगर समाजाला भ्रमित करण्याचे बक्षिस दिले.  हे पण वाचा - ...अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मागितली माफी   सध्या कामगारांना गावी जाण्यास लवरकर परवानगी मिळाली नाही तर हेच कामगार लॉकडाऊन उठल्यानंतर गावी जाणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतर कारखाने सुरू झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणात कामगारांची टंचाई भासणार आहे. -विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3dtDEkv

No comments:

Post a Comment