गोवो कोरोनामुक्त, तरीही अशी सतर्कता बांदा (सिंधुदुर्ग) - महाराष्ट्रातून गोव्यात अत्यावश्‍यक सेवा व नाशवंत मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांना पत्रादेवी (गोवा) येथील तपासणी नाक्‍यावर कसून तपासणी करून सोडण्यात येत आहे. एका वाहनाची सुमारे अर्धा तास तपासणी होत असल्याने सीमेवर बांदा (महाराष्ट्र) हद्दीत सुमारे 2 किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  गोवा हे देशातील पहिले राज्य कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात सापडलेले सातही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महाराष्ट्र सीमेवरून गोव्यात प्रवेश देणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी, तसेच चालक, वाहकांची परिपूर्ण वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश द्यावा, अशा सक्त सूचना गोवा प्रशासनाने दिल्या आहेत.  महाराष्ट्रातून गोव्यात दूध, भाजीपाला, मासे, अंडी यासह नाशवंत मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी (गोवा) येथे गोवा पोलिसांचा तपासणी नाका आहे. बांदा पोलिसांकडून कुठलीही आडकाठी न करता वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. पत्रादेवी नाक्‍यावर तपासणीसाठी गोवा शासनाकडून एकच काउंटर देण्यात आले आहे. या काउंटरवर पोलिस एन्ट्री केल्यावर वैद्यकीय तपासणी केली जाते. अवजड वाहन सील असल्यास या ठिकाणी उपस्थित असलेल्या दंडाधिकारी यांच्या परवानगीने गाडीची पूर्णपणे तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतरच खात्री झाल्यावर अवजड वाहनांना गोव्यात प्रवेश देण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेसाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागत असल्याने नाशवंत मालाच्या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. गोवा शासनाच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या हद्दीत सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  भविष्यासाठी काळजी  याबाबत गोवा पोलिस अधिकारी नरेश मानगादकर यांना विचारले असता ते म्हणाले, गोवा शासनाच्या निर्देशानुसारच तपासणी होत आहे. गोवा हे कोरोनामुक्त राज्य आहे. भविष्याचा विचार करून गोव्यात येणाऱ्यांची परिपूर्ण तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 23, 2020

गोवो कोरोनामुक्त, तरीही अशी सतर्कता बांदा (सिंधुदुर्ग) - महाराष्ट्रातून गोव्यात अत्यावश्‍यक सेवा व नाशवंत मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांना पत्रादेवी (गोवा) येथील तपासणी नाक्‍यावर कसून तपासणी करून सोडण्यात येत आहे. एका वाहनाची सुमारे अर्धा तास तपासणी होत असल्याने सीमेवर बांदा (महाराष्ट्र) हद्दीत सुमारे 2 किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  गोवा हे देशातील पहिले राज्य कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात सापडलेले सातही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महाराष्ट्र सीमेवरून गोव्यात प्रवेश देणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी, तसेच चालक, वाहकांची परिपूर्ण वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश द्यावा, अशा सक्त सूचना गोवा प्रशासनाने दिल्या आहेत.  महाराष्ट्रातून गोव्यात दूध, भाजीपाला, मासे, अंडी यासह नाशवंत मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी (गोवा) येथे गोवा पोलिसांचा तपासणी नाका आहे. बांदा पोलिसांकडून कुठलीही आडकाठी न करता वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. पत्रादेवी नाक्‍यावर तपासणीसाठी गोवा शासनाकडून एकच काउंटर देण्यात आले आहे. या काउंटरवर पोलिस एन्ट्री केल्यावर वैद्यकीय तपासणी केली जाते. अवजड वाहन सील असल्यास या ठिकाणी उपस्थित असलेल्या दंडाधिकारी यांच्या परवानगीने गाडीची पूर्णपणे तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतरच खात्री झाल्यावर अवजड वाहनांना गोव्यात प्रवेश देण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेसाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागत असल्याने नाशवंत मालाच्या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. गोवा शासनाच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या हद्दीत सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  भविष्यासाठी काळजी  याबाबत गोवा पोलिस अधिकारी नरेश मानगादकर यांना विचारले असता ते म्हणाले, गोवा शासनाच्या निर्देशानुसारच तपासणी होत आहे. गोवा हे कोरोनामुक्त राज्य आहे. भविष्याचा विचार करून गोव्यात येणाऱ्यांची परिपूर्ण तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bB46Im

No comments:

Post a Comment