नियम धाब्यावर; सावंतवाडी बाजारपेठेत तोबा गर्दी सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाउन व मंगळवारनंतर सरसकट लॉकडाउनची शक्यता आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठेत खरेदीसाठी आज तोबा गर्दी पाहायला मिळाली. कुठलेही सामाजिक अंतर व नियमांचे पालन न करता बाजारपेठेत व दुकानांमध्ये झालेली ही गर्दी कोरोना प्रादुर्भावास कारणीभूत ठरू शकते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. शनिवार व रविवार दोन दिवस व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. त्यामुळे आज बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीच्या रुपाने त्याचा परिणाम दिसून आला. उद्या (ता. 13) येणारा गुढीपाडवा आणि 14 एप्रिलला लॉकडाउनची होणारी घोषणा लक्षात घेता खेड्यापाड्यातील तसेच शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडत बाजारपेठेत गर्दी केली. पाडव्याचा मुहूर्त काढत अनेकांनी नवनवीन वस्तू खरेदीसाठी उत्सुकता दाखविली होती. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीक तसेच कपड्याच्या, भांड्याच्या व सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातही गर्दी दिसून आली. एकूणच आजच्या दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले. नियमांची ऐशीतैशी गतवर्षी कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउन केले होते. त्यामुळे एकूणच आर्थिक व्यवस्थाच कोलमडली होती. सद्यस्थितीत पुन्हा वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी येत्या बुधवारी लॉकडाउनची घोषणा होणार आहे, हे लॉकडाउन किती दिवसाचे असेल, हे निश्चित नसल्याने आज अनेकांनी बाजारात धाव घेतली. एकीकडे व्यापारी लॉकडाउन नको; पण कडक निर्बंध लादा, असे सांगतात. मात्र आज कुठलेच व्यापारी नियम पाळताना दिसले नाहीत. दुकानात होणारी गर्दी कोरोनाला आंमत्रण देणारी ठरली. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 12, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3g68HaE Read More Read more No comments:
बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी भाजप आक्रमक सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बांदा- दोडामार्ग रस्त्यावरून आज पुन्हा भाजपने बांधकाम विभागाला धारेवर धरले. आम्ही पुकारलेले तिरडी आंदोलन तुमच्या आश्वासनामुळे केले नाही; मग आतापर्यंत रस्त्याचे काम का नाही झाले? असा संतप्त सवाल पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना केला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. अखेर आजच या कामाची ऑनलाइन निविदा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली. पालकमंत्री उदय सावंत व आमदार दीपक केसरकर जनतेची दिशाभूल करत असून पालकमंत्र्यांच्या भावाला ठेका मिळत नसल्याने हे काम अडवल्याचा आरोपही नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. बांदा - दोडामार्ग रस्त्यावर पडलेले खड्डे आणि होणारे अपघात लक्षात घेता सावंतवाडी आणि दोडामार्ग भाजपच्यावतीने रस्त्याबाबत आवाज उठविण्यात आला होता. रस्त्याचे काम महिन्याभरात मार्गी न लागल्यास तिरडी आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी रस्तेकामाबाबत आश्वासन देऊन तिरडी आंदोलन करण्यापासून पदाधिकाऱ्यांना रोखले होते; मात्र मे महिना जवळ आला तरी रस्त्याच्या कामाबाबत काहीच हालचाली दिसून न आल्याने आज पुन्हा बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता माने यांना जाब विचारला. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष परब, पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, नगरसेवक मनोज नाईक, बंटी राजपुरोहित, डी. के. सावंत, मकरंद तोरसकर, केतन आजगावकर, विनोद राऊळ, बाळा आकेरकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष परब म्हणाले, ""बांदा-दोडामार्ग रस्ता दुरवस्थेवरुन लोकांचा अंत पाहू नका. एकीकडे पालकमंत्री स्थानिक आमदार रस्त्याबाबत जनतेला आश्वासन देत आहेत; मात्र प्रत्यक्षात काहीच नाही. निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळे या जिल्ह्याची वाताहत झाली असून तब्बल तीन वेळा निवडून दिलेले स्थानिक आमदार केसरकर हे कुचकामी ठरले आहे.'' एकनाथ नाडकर्णी म्हणाले, ""तिरडी आंदोलन करू नका. रस्तेकाम मार्गी लावू, असा शब्द दिला त्याचे काय झाले? भीक मांगो आंदोलनही केले; मात्र या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील रस्ते होत असताना मात्र महत्वाच्या या रस्त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही.'' यावेळी तब्बल दोन तास ठिय्या मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आजच ऑनलाइन निविदा काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी तिथून माघार घेतली. 55 लाख गेले कुठे? बांदा - दोडामार्ग रस्त्यासाठी देखभाल दुरुस्तीचे 55 लाख रुपये मंजूर असल्याचे कार्यकारी अभियंता माने यांनी सांगितले. मग ते 55 लाख रुपये गेले कुठे? असा सवाल करत संबंधित ठेकेदाराला पाचारण करण्यात आले. दोन वर्षांपासून एक कोटीची कामे केली. पैकी केवळ चार लाख रुपये "बांधकाम'कडून बिलापोटी मिळाल्याचे ठेकेदाराने सांगितले. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचेही तो म्हणाला. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 12, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/32bnJnj Read More Read more No comments:
1200 रुपयांचे रेमडेसिव्हिर डॉक्टरने विकले 25 हजारांना! नाशिकमधील धक्कादायक घटना म्हसरूळ (नाशिक) : कोरोना संसर्गाच्या लाटेचा फायदा घेणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांचे किस्से बाहेर येत असताना ज्या इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा सुरू आहे, ते बाराशे रुपये किमतीचे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विकणाऱ्या डॉक्टरला आप्तस्वकीयांची सतर्कता व पोलिस वेळेवर पोचल्याने रविवारी (ता. ११) रात्री रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. काय घडले नेमके? बाराशे रुपयाचे रेमडेसिव्हिर २५ हजारांना देण्याचे ठरले देवळाली कॅम्प व शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णासाठी तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी फिरफिर करणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते यांना एक क्रमांक मिळाला. त्यांनी संबंधित क्रमांकावर कॉल केला. तो कट करण्यात आला. काही वेळातच संबंधितांनी कॉल केला. यात बाराशे रुपये किमतीचे रेमडेसिव्हिर प्रतिइंजेक्शन २५ हजार रुपयांना देण्याचे ठरले. संबंधित इंजेक्शन देण्यासाठी अमृतधाम परिसरात रात्र आठ ते साडेआठच्या दरम्यान आले. मात्र मोहिते यांच्याकडे अवघे १६ हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यांनी संबंधितांना अमृतधाम परिसरातील ॲक्सिस बँकेच्या एटीएमवर बोलविले. या वेळी सद्गरू हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र मुळूक त्या ठिकाणी आले. डॉ. मुळूक येण्याअगोदर मोहिते यांनी पोलिसांना घटना कळविली. हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात; पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल दरम्यान, एटीएमवर डॉ. मुळूक आले असता मोहिते यांच्यासमवेत असलेल्या मित्राने ते आलेल्या वाहनाचे मोबाईलमध्ये छायाचित्र घेतले. ही बाब डॉ. मुळूक यांच्या लक्षात येताच त्यांनी पैसे तिथेच टाकून वाहनात बसून निघाले. दरम्यान, पोलिस गाडीही त्याच वेळी आली, त्यांनी वाहनाचा पाठलाग करीत डॉ. मुळूक यांना अडविले. त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना इंजेक्शन मिळून आले. डॉ. मुळूक व तक्रारदारांना पोलिसांनी पंचवटी पोलिस ठाण्यात आणले. रात्री बारापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, सद्गुरू हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र मुळूक व त्यांचे सहकारी संचालक डॉ. भाबड यांनी डॉ. मुळूक संचालक असून, आज मात्र त्यांची सुटी असल्याबाबत सांगितले. हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3g37Nf9 Read More Read more No comments:
कोरेगावातील कोरोना केअर सेंटरसाठी आमदार महेश शिंदेंचे माेठे याेगदान कोरेगाव (जि. सातारा) : अपुऱ्या साधनसामग्रीमुळे गेले काही दिवस बंद असलेले येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीनंतर पूर्ववत सुरू करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीचे सदस्य सुनील बर्गे यांनी ही माहिती दिली. सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांना उपचार देण्यासाठी कोरेगाव तालुक्यात सुविधा उपलब्ध नसल्याचे तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या साधनसामग्रीमुळे इमारत असूनही उपचार सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तत्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी लागणारी साधनसामग्री स्वत:च तत्काळ उपलब्ध करून दिली आणि कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या. या बैठकीस प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, राहुल बर्गे, जयवंत पवार, महेश बर्गे, राहुल बर्गे, निवास मेरूकर उपस्थित होते. Weekend Lockdown : हातात विळा घेत खासदारांनी खपली गव्हाची केली कापणी दरम्यान, बैठक संपताच उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर सुरू झाल्याची व आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेमुळे कोरेगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांना दिलासा मिळाल्याची माहिती सुनील बर्गे यांनी दिली. गेल्या वर्षी आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चाने उभारलेल्या कोविड रुग्णालयामध्ये हजारो रुग्णांना उपचार मिळाले असून, कोरेगाव शहरासाठी त्यांनी सुसज्ज रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली आहे. आता येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना उपचाराची सोय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहेत. ढेबेवाडीतील Covid Hospital कोमात; उपचारांसाठी रुग्णांसह नातेवाईकांवर दाहीदिशा फिरण्याची वेळ Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/2QkbaDq Read More Read more No comments:
मुंबईत आता 'या' रुग्णालयांमध्ये रेमडेसेवीरचा पुरवठा बंद मुंबई: कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसेवीर इंजेक्शनबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. रेमडेसेवीर इंजेक्शन कोविड नसलेल्या रुग्णालयांना पुरवले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसेवीर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी एफडीएने ही कठोर पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत वितरकांना आता नॉन कोविड रुग्णालयांना रेमडेसेवीर इंजेक्शन न पुरवण्याचे आदेश दिले आहेत. एफडीएनेही याबाबत परिपत्रक जारी केले आहे. मुंबईसह राज्यात कोरोना उपचारांसाठी लागणारे रेमडेसेवीर इंजेक्शनची कमतरता आहे. काही वितरक याचा गैरफायदा घेत आहेत आणि इंजेक्शनचा काळा बाजार करत आहेत. या सर्व प्रकाराला एफडीएने गांभीर्याने घेतले आहे. काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी एफडीएने कठोर पावले उचलली आहेत. एफडीएचे सहआयुक्त जी. बी. बायळे यांनी शनिवारी एक परिपत्रकही जारी केले आहे. या परिपत्रकाअंतर्गत कोविड समर्पित असलेले रुग्णालय आणि वैद्यकीय दुकान असलेल्या रुग्णालये याच रुग्णालयात वितरक रेमडेसेवीर इंजेक्शन पुरवतील. मुंबईतल्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, पालिकेनं घेतला महत्त्वाचा निर्णय शिवाय, ज्या कोविड रुग्णालयात वैद्यकीय दुकाने नाहीत त्या रुग्णालयांनाही वितरक आणि किरकोळ विक्रेते इंजेक्शन पुरवतील. एवढेच नव्हे तर कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या सूचनानुसार एफडीएने रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन देण्याचे आदेश दिले आहेत. एफडीएने वितरकांना मुंबईत किती कोविड रुग्णालये आहेत याची यादी दिली आहे. त्यानुसारच, इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. यात 115 रुग्णालयांचा समावेश आहे. मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 115 रुग्णालयात रेमेडिसवीरचा पुरवठा रेमेडिसवीरचा काळा बाजार रोखण्यासाठी आणि रुग्णांना हे औषध मिळावे यासाठी त्याची विक्री होणाऱ्या 115 रुग्णालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राज्य सरकारी, पालिका प्रशासन, लष्करी आणि खासगी रुग्णालये असे मिळून 115 रुग्णालये आहेत. यात सात राज्य सरकारी रुग्णालये, 86 खासगी हॉस्पिटल, 21 पालिका रुग्णालये आणि 1 लष्करी रुग्णालय आहे. ------------------------------ (संपादन- पूजा विचारे) Remedesavir not be supplied Non covid hospitals fda decision Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/39ZpWqk Read More Read more No comments:
Corona Updates: औरंगाबादेत बाराशे कोरोनाबाधित वाढले, आणखी दीड हजार रुग्ण बरे औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता.११) दिवसभरात १ हजार २८० कोरोनाबाधित आढळले. बरे झालेल्या आणखी १ हजार ४३५ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात महापालिका क्षेत्रातील ९०० तर ग्रामीण भागातील ५३५ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या ९८ हजार ६९२ वर पोचली आहे. सध्या १५ हजार ३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ८१ हजार ३३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उपचारादरम्यान आणखी २९ जणांचा मत्यू झाला. मृतांची संख्या १ हजार ९८१ वर पोचली आहे. जिद्दीला सलाम! आजोबांनी ९२ व्या वर्षी कोरोनावर केली मात वैजापूर येथील पुरुष (वय ६०), मोठीअली (ता. खुलताबाद) येथील महिला (६५), पैठण येथील महिला (७०), हनुमानगर, गारखेडा येथील पुरुष (६९), वाळूज येथील महिला (७५), सिटी चौक येथील पुरुष (६०), वडगाव (ता. औरंगाबाद) येथील पुरुष (३३), पुरनवाडी (ता. कन्नड) येथील (५५), रामनगर, औरंगाबाद येथील महिला (३५), पहाडसिंगपुरा येथील महिला (६९), बायजीपुरा येथील पुरुष (६१), सिल्लोड येथील पुरुष (४०), मिसारवाडी येथील महिला (२६), गावठाण हिंगोली (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (७५), येथील आंबेडकरनगरातील पुरुष (३९), खोकडपुऱ्यातील महिला (६२), टीव्ही सेंटर, हडको येथील पुरुष (६८), बोधेगाव बुद्रक (ता. फुलंब्री) येथील महिला (७५), रांजणगाव शेणपुंजी (ता.गंगापूर) येथील महिला (३२), चिकलठाणा एमआयडीसी भागातील पुरुषाचा (६९) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या पंगतीला तृप्त करणाऱ्यांवर अर्धपोटी राहण्याची वेळ, केटरिंग व्यवसायाचे मोडले कंबरडे बिल्डा, फुलंब्री येथील पुरुष (६३), शिवनगर, कन्नड येथील महिला (८०), फिरदोस गार्डन, पडेगाव औरंगाबाद येथील महिलेचा (४७) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. विरमगाव (ता. फुलंब्री) येथील महिला (६६), मनजित नगर, औरंगाबाद येथील पुरुष (७०), ब्लू बेल अपार्टमेंट, प्रोझोन मॉल परिसरातील पुरुष (५४), आदित्य नगर, गारखेडा येथील महिला (७३), शिवशंकर कॉलनीतील महिलेचा (८५) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. --- कोरोना मीटर -- आतापर्यंतचे बाधित ९८६९२ बरे झालेले ८१३३० उपचार घेणारे १५३८१ आतापर्यंत मृत्यू : १९८१ संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3al4Kvl Read More Read more No comments:
Adventurous चा आनंद घ्यायचा आहे?, मग एकदा 'या' रोडवरुन जरुर Long Drive करा.. सातारा : आपलं आयुष्य परीपूर्ण जगण्यासाठी प्रत्येकजण लाँग ड्राईव्हसाठी अधिक उत्साही असतो. लोक आठवड्याच्या शेवटी बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. टू-व्हिलर अथवा कारसह एका शहरातून दुसर्या शहरात प्रवास करतात. दरम्यान, त्यांचे असे म्हणणे आहे, की यामुळे त्यांना शहरास जवळून ओळखण्याची आणि स्थानिक पाककृतीची चव चाखण्याची संधी मिळते. तथापि, असे काही लोक आहेत, ज्यांना साहसी स्टंट करायला फार आवडते. यासाठी ते लाॅंग ड्राईव्हचा स्वीकार करतात. जर तुम्हालाही धोकादायक रस्त्यांवरून वाहन चालवायचे असेल, तर एकदा या रस्त्यावरुन नक्की गाडी चालवा. तज्ञांच्या मते, या रस्त्यांवर वाहन चालविण्यास विशेष कौशल्ये असणे आवश्यक आहे. चला, तर मग जाणून घेऊयात या धोकादायक रस्त्याबद्दल.. Three Level Zigzag Road हा रस्ता सिक्कीममध्ये आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 11200 फूट इतकी असून या रस्त्यावर 100 पेक्षा जास्त हेयरपीनसारखी वक्र वळणे आहेत. यासाठी Three Level Zigzag Road वर वाहन चालविणे अत्यंत अवघड आहे. तसेच, या रस्त्यावर वाहन चालविण्यास परवानगी देखील आवश्यक आहे. परंतु, हृदयविकाराच्या रूग्णांना या रस्त्यावर कोणतीही परवानगी नाही. येथूनच आपण हिमालयातील अनोखी दृश्ये देखील पाहू शकता. जगातील दुसर्या क्रमांकाच्या तवांग मठावर चीनचा कब्जा; जाणून घ्या 1680 च्या दशकातली सर्वात रंजक कहाणी कोल्ली हिल कोल्ली हिल्स तामिळनाडूपासून अवघ्या 47 किलोमीटर अंतरावर आहे. या टेकड्या अत्यंत धोकादायक आहेत. या कोल्ली हिल्सवर 70 हून अधिक वळणे आहेत, ज्यातून वाहन चालवणे खूपच अवघड आहे. या टेकडीला 'मृत्यूची दरी' असेही म्हणतात. तथापि, येथील घनदाट जंगल आणि सुंदर खोरे डोंगरांच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत. 1583 च्या काळातील आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिराविषयी माहितीय?; जाणून घ्या रंजक आणि रहस्यमय कहाणी रोहतांग पास रोहतांग पास हे नाव आपण ऐकलेच असेल. मनालीपासून 53 कि.मी. अंतरावर रोहतांग आहे. या रस्त्यावर अनेक वक्र वळणं असून हे उत्तर भारतातील सर्वात उंच शिखरावर वसलेलं आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान रोहतांग पास खुला करण्यात येतो. यानंतर हिमवृष्टीमुळे रस्ता बंद केला जातो. या रस्त्यावर काळजीपूर्वक ड्राइव्ह करणे अनिवार्य आहे. याशिवाय तुम्ही मुन्नार रोड, चांग-ला, नॅशनल हायवे-22 इत्यादी रस्त्यांवरील साहसी रस्त्यांचा आनंदही घेऊ शकता. निसर्ग सौंदर्याचा खजिना असलेलं उत्तराखंड ऐतिहासिकदृष्ट्याही फेमस; जाणून घ्या देवभूमीचे खास रहस्य Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3al3BE3 Read More Read more No comments:
बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहात, स्मार्ट सर्चसह अभ्यास करा नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची लाट पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. या प्रकरणात, मागील वर्षाप्रमाणे या वेळीसुद्धा तुम्ही अभ्यासासाठी ऑनलाइन व्यासपीठाची मदत घेणार आहात. कोरोनामुळे ऑनलाइन अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे, परंतु येथे समस्या अशी आहे की शिक्षक आपल्यास सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपलब्ध नसतील. अशा परिस्थितीत आपण Google च्या साधनांसह हुशारीने शोध घेत असाल तर आपण ऑनलाइन कोणत्याही विषयाशी संबंधित समस्या सहजपणे सोडवू शकाल. हे लक्षात घेऊन Google ने काही शोध साधने आणली आहेत, जे अभ्यासाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात आपली मदत करू शकतात. तसेच काहीजण इतर शोध इंजिनची (Search Engine) मदत घेऊ शकतात, जे विशेषतः विद्यार्थी आणि शिक्षकांच्या लक्षात ठेवून विकसित केले गेले आहेत. शैक्षणिक स्त्रोत शोधण्यात हे उपयुक्त ठरू शकते. Google साधने स्टीम कॉन्सेप्ट: गूगलवर 'स्टेम' (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) संकल्पनेशी संबंधित गोष्टी शोधणे आता चांगले परिणाम दर्शवेल. आपण विज्ञान आणि गणितांशी संबंधित Google वर शोध घेत असाल तर त्या विषयाशी संबंधित बर्याच शैक्षणिक संसाधने देखील दिसून येतील, जसे की आपण येथे 'केमिकल बाँड' शोधता, मग शैक्षणिक विहंगावलोकन मध्ये त्यासंबंधी उपयुक्त उदाहरणे आणि संकल्पना देखील आम्ही सक्षम होऊ. स्पष्टीकरण देणार्या व्हिडिओंमध्ये प्रवेश करणे. विद्यार्थ्यांना येथे 2000 हून अधिक स्टीम संकल्पना आढळतील. सराव करून समस्या सोडवा: जितका तुम्ही सराव कराल तितके परिपूर्ण व्हाल. गुगलने आता समस्या सोडवणे सोपे केले आहे. Google च्या परस्परसंवादी वैशिष्ट्याच्या मदतीने आपण हायस्कूल गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यासारख्या विषयांवर सहज अभ्यास करू शकाल. चांगली गोष्ट अशी आहे की सर्व प्रकारचे शैक्षणिक संसाधने एकाच ठिकाणी आढळतील. जर तुम्हाला 'केमिकल बाँड प्रॅक्टिकल प्रॉब्लम' यासारख्या गोष्टींचा सराव करायचा असेल तर आपण बीबीसी बिटसाइज, बिजू, सीके 12, ग्रेट माइंड इत्यादी शैक्षणिक प्रदात्यांच्या सामग्रीमध्ये फक्त एका क्लिकवर प्रवेश करू शकाल. येथे सराव सोबत संकल्पना समजून घेणेही आपणास सोपे होईल. 3 डी मॉडेल्समधील धडे स्वीकारले: कोण म्हणतो की आपण आपल्या लिव्हिंग रूमला सायन्स लॅबमध्ये रूपांतरित करू शकत नाही. गूगलच्या थ्रीडी Approड स्वीकृत रिअल्टी कॉन्सेप्टद्वारे रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि शरीरशास्त्र संकल्पनांशी संबंधित 200 हून अधिक संकल्पना घरी 3 डी मॉडेल्समध्ये पाहता येतील. 'एआर ऑन मोबाइल' टूलच्या मदतीने आपण बोहर मॉडेलपासून मानवी शरीर रचनांसह सर्व काही थ्रीडीमध्ये पाहू शकता. हे रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादी संकल्पना 3 डी मॉडेलमध्ये दिसू देते. जेव्हा आपण शोधात केमिकल बॉन्डसारखे काहीतरी टाइप करता तेव्हा स्क्रीनवर एक अॅनिमेटेड प्रतिमा दिसून येते, जी आपण एआरमध्ये निवडण्यास निवडू शकता. इतकेच नाही तर आपण एसटीईएमशी संबंधित कठीण प्रश्नांमध्ये अडकल्यास आपण येथे त्यांचे निराकरण करण्यास सक्षम असाल. गुगल विद्वान गूगल स्कॉलर (https://scholar.google.com) शैक्षणिक संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा शोधण्यासाठी एक चांगले शोध इंजिन आहे. जरी हे अगदी Google च्या सामान्य शोध इंजिनसारखे असले तरी शैक्षणिक शोधाशी संबंधित चांगले परिणाम मिळतील. यात माझी लायब्ररी आणि माझे प्रोफाइल यासारखे वैशिष्ट्ये देखील आहेत. आपण नंतर वाचण्यासाठी लायब्ररीत लेख जतन करू आणि ठेवू शकता. मायक्रोसॉफ्ट अॅकॅडमी गूगल स्कॉलरला हा एक चांगला पर्याय आहे. येथे देखील शैक्षणिक शोधाशी संबंधित चांगले परिणाम दिसतील. मी सांगत आहे की हे एक वेब शोध इंजिन आहे जे शैक्षणिक प्रकाशन आणि साहित्याशी संबंधित आहे. हे 22 कोटीहून अधिक प्रकाशने आणि 8.8 कोटीहून अधिक लेखांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असेल. मायक्रोसॉफ्ट Academyकॅडमीमध्ये (https://academic.microsoft.com) आपल्याला संस्था, परिषद, लेखक, कागद, जर्नल, विषय इ. शी संबंधित विभाग देखील आढळतील जे शोध अधिक सुलभ करतात. रिसर्चगेट विज्ञान प्रवाहाशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी, ते एक चांगले शोध इंजिन असल्याचे सिद्ध होऊ शकते. आपण येथे 13.5 कोटीहून अधिक प्रकाशनांशी संबंधित परिणामांवर प्रवेश करू शकाल. रिसर्चगेट (रिसर्चगेट.नेट) अभियांत्रिकी, गणित, जीवशास्त्र, संगणक विज्ञान, औषध, क्लेमेंट चेंज, फिजिक्स, सोशल सायन्स, केमिस्ट्री इत्यादी विषयांचा समावेश करते. अर्थात विज्ञानाशी संबंधित कोणताही विषय, तो तुम्हाला खूप मदत करू शकतो. हे वैज्ञानिक समुदायाशी संपर्क साधण्याची संधी देखील प्रदान करते. वर्ल्डवाइडसायन्स हे विज्ञानाशी संबंधित एक शोध इंजिन देखील आहे. ही साइट 70 देशांमधील डेटाबेस वापरते. जेव्हा एखादा वापरकर्ता येथे क्वेरी टाइप करतो, तो जगभरातील डेटाबेस शोधतो आणि संबंधित जर्नल्स आणि शैक्षणिक संसाधनांमधून इंग्रजी आणि अनुवादित दोन्ही परिणाम प्रदर्शित करतो. वर्ल्डवाइड सायन्स (वर्ल्डवाइड सायन्स.ऑर्ग) चांगले विज्ञान संबंधित परिणाम साध्य करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ असू शकते. आभासी शिक्षण संसाधन केंद्र शैक्षणिक माहितीशी संबंधित ही वेबसाइट आहे. व्हर्च्युअल लर्निंग रिसोर्सेस सेंटर (व्हर्चुअलआरसी.कॉम) शाळा आणि विद्यापीठे यांचा समावेश असलेल्या शैक्षणिक प्रकल्पांसाठी अधिकृत माहिती प्रदान करते. येथे 10,000 पेक्षा जास्त वेबपृष्ठ अनुक्रमणिका आहेत, जे सत्यतेसह ठेवल्या जातात. वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मजकूर संग्रहण, कला-इतिहास, चरित्रशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकीय, अर्थशास्त्र, गणित, माहिती तंत्रज्ञान इत्यादी गोष्टी येथे समाविष्ट आहेत. ही सर्च इंजिन मुलांसाठी खास आहेत मुलांशी शोधण्यासाठी संबंधित अनेक शोध इंजिन आहेत, जिथे ते अभ्यासाची सामग्री सुरक्षितपणे शोधू शकतात. सेफ सर्च किड्स एक सानुकूल शोध इंजिन आहे जे Google सुरक्षित शोध वैशिष्ट्ये वापरते. हे मुलांसाठी धोकादायक सामग्री फिल्टर करते आणि अवरोधित करते. चांगली गोष्ट म्हणजे मुले त्याचा सहज वापर करू शकतात. Safesearchkids.com हे मुलांसाठी सुरक्षित शोध इंजिन देखील आहे, जे गूगल आधारित आहे. त्याची खास गोष्ट अशी आहे की मुले येथे इयत्ता ग्रेड -1 ते इयत्ता 8 पर्यंत सामग्री शोधू शकतील. विश्वकोशात किडझट्यूब, किड्स टॉक इत्यादी पर्याय आहेत जे मुलांसाठी उपयुक्त ठरू शकतात. kidzsearch.com मुलांशी संबंधित उपयुक्त शोध इंजिन प्लॅटफॉर्म देखील आहे. येथे मुले विज्ञान तंत्र, सामाजिक अभ्यास, कला, प्राणी, गणित इत्यादी संबंधित सामग्री सहज शोधू शकतात. kidtopia.info हे मुलांशी संबंधित एक सुरक्षित व्हिज्युअल शोध इंजिन आहे, जे Google ने तयार केले आहे. यात मुले मुलं मुलांना विश्वकोश तथ्य, व्हिडिओ, प्रतिमा, बातम्या इत्यादी शोधू शकतात. येथे मुलांना अभ्यासाशी संबंधित तथ्य सहज सापडतील. kiddle.co Google लेन्ससह गणिताची समस्या सोडवा आपल्याला गणितांशी संबंधित समस्या सोडविण्यास अडचणी आहेत? आपण गृहपाठ दरम्यान "x ^ 2-3x-4 = 0" सारखे समीकरण सोडविण्यास अक्षम असल्यास, Google लेन्स आपल्याला यास मदत करू शकतात. Google लेन्स आपल्याला 70 पेक्षा जास्त भाषांमध्ये चरण-दर-चरण गणिताच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करू शकतात. आपण Android फोन वापरत असल्यास, होम बटण दाबा आणि Google सहाय्यक उघडा. गूगल लेन्सचा पर्याय येथे सापडेल. त्यावर टॅप करा. येथे आपण आपल्या फोनवर थेट Google लेन्स देखील शोधू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण Google Play Store वरून नवीनतम आवृत्ती देखील डाउनलोड करू शकता. Google लेन्समध्ये प्रवेश केल्यानंतर, कॅमेरा अॅपला प्रवेश करण्याची परवानगी दिली जावी. येथे आपल्याला गृहपाठ फिल्टर निवडावे लागेल. आता गणिताच्या प्रश्नांकडे कॅमेरा दाखविताच, हे प्रश्न ओळखले जातात (हायलाइट्स) नंतर समीकरण बटणावर टॅप करा, लेन्स आपले प्रश्न सोडवेल. हे तुम्हांला टप्प्या टप्प्याने निराकरण देखील दर्शवते. एसपींपासून आयजीपर्यंत सर्व पोलिसांना माझे सांगणे आहे, आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुमचे पगार होतात Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3uMTSOz Read More Read more No comments:
रामायणातील 'राम सेतू'बद्दल 'या' 6 गोष्टी माहिती आहेत?; जाणून घ्या 7 हजार वर्षांपूर्वीची इतिहासाची रंजक कहाणी सातारा : 'राम सेतू'ला सामान्यत: अॅडम ब्रिज म्हणून देखील ओळखले जाते. हा एक वादग्रस्त पूल आहे आणि तो नैसर्गिक आहे की मानवनिर्मित?, यावर कित्येक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. तथापि, एका अमेरिकन सायन्स चॅनलच्या मतानुसार, हा पूल मानवनिर्मित असून काही शास्त्रज्ञांच्या मते, चुनखडीच्या गोळ्याने बांधलेला हा पूल नैसर्गिक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच, राम सेतूचा उल्लेख रामायणातही आढळतो. रामायणानुसार, हा पूल भगवान श्रीराम आणि त्यांच्या वानर सेनेने बांधल्याचे इतिहासात दाखले आढळतात. जेव्हा लंकेचा राजा रावणाने माता सीतचे हरण करुन तिला पळवून नेले होते, त्यामुळे या पुलाला स्वतःचे असे धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. तामिळनाडूत देखील असाच एक पूल आहे, जो अजूनही हवाई दृश्य प्रदान करतो. तसेच हा पूल येथील पंबन बेटांसह श्रीलंकेच्या मन्नार बेटाला जोडला जातो. तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला राम सेतू पुलाशी संबंधित काही आश्चर्यकारक घटकांबद्दल सांगत आहोत, जे तुम्हाला नक्कीच आवडेल.. जगातील दुसर्या क्रमांकाच्या तवांग मठावर चीनचा कब्जा; जाणून घ्या 1680 च्या दशकातली सर्वात रंजक कहाणी वॉकेबल ब्रिज असे म्हणतात की, रामाचा पूल समुद्र सपाटीपासून उंचावर होता. काही ऐतिहासिक नोंदीसुद्धा असे सूचित करतात, की 15 व्या शतकापर्यंत हा पूल सहज चालताना पार केला जात होता. हा पूल जमिनीपासून सुमारे 3 ते 30 फूट खोलवर असल्याचे काही दाखले देखील उपलब्ध आहेत. आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही न उलगडलेले 'सेतू'चे रहस्य हा पूल अनेक लोकांना आश्चर्यचकित करीत असतो. परंतु, त्याच्या बांधकामाशी संबंधित अनेक शास्त्रज्ञांना अद्यापही उलगडा करता आली नाही अथवा त्याचे निराकरण देखील होऊ शकले नाही. या पुलाच्या बांधकामात दगडांना जोडण्यासाठी वापरल्या जाणार्या तंत्राबद्दल कोणालाही माहिती नाही. जगभरातील शास्त्रज्ञांनी यावर व्यापक संशोधन केले, परंतु तरीही त्यांना कोणतेही नेमके कारण सांगता आले नाही. 1583 च्या काळातील आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिराविषयी माहितीय?; जाणून घ्या रंजक आणि रहस्यमय कहाणी या पुलाला एक नाही, बरीच नावे.. तामिळनाडूतील रामेश्वरममधील राम सेतूचे नाव तुम्हाला माहित असलेच, परंतु तुम्हाला हे माहित आहे का?, या पुलाला इतरही अनेक नावे आहेत. याला अॅडम ब्रिज, नल सेतू आणि सेतू बंधा असेही म्हणतात. हा पूल राम आणि त्यांच्या सैन्याने बांधला असल्याने त्याला राम सेतू असेही म्हंटले जाते. त्याच बरोबर त्याला नल सेतू असेही म्हणतात. कारण, नलानेच रामायणानुसार पुलाची रचना केली होती. अॅडम ब्रिज हे नाव काही प्राचीन इस्लामिक ग्रंथांची देन आहे. या पुलाजवळून कोणतेही जहाज जावू शकत नाही! सन 1480 मध्ये समुद्रात मोठे चक्रीवादळ झाल्याने हा पूल पाण्याखाली गेला होता. तथापि, राम सेतू आजही पाण्याखालीच आहे, परंतु अद्याप जहाजे येथे जाऊ शकत नाहीत. खरंच, काही ठिकाणी पाणी पातळीच्या उथळ आहे. तसेच हा पूल पूर्णपणे पाण्यात बुडलेला नाही. त्यामुळे श्रीलंकेला जाण्यासाठी भारतातील जहाजांना दुसरा मार्ग अवलंब करावा लागतो. निसर्ग सौंदर्याचा खजिना असलेलं उत्तराखंड ऐतिहासिकदृष्ट्याही फेमस; जाणून घ्या देवभूमीचे खास रहस्य रहस्यमय आणि आश्चर्यकारक हा पूल 7000 वर्ष जुना आहे, असे समुद्रशास्त्राच्या अभ्यासातून दिसून आले आहे. याचा अर्थ असा की, हा पूल चिनची भिंत आणि इजिप्शियन पिरॅमिड इत्यादींपेक्षाही जुना आहे. वास्तविक, ही रचना 3 ते 4 हजार वर्षे जुनी आहे, तर राम सेतू किमान सात हजार वर्षे जुना असल्याचे काही इतिहासाचे दाखले सांगतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/2Rj9SZY Read More Read more No comments:
भारतामध्ये सायन्स शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असलेले करिअरचे ऑप्शन कोल्हापूर : भारतामध्ये बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंग शिवाय अनेक करिअरचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या लेखाद्वारे 12 वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी कोणकोणत्या डिग्री कोर्सला प्रवेश घेऊ शकतात याबाबतची माहिती देत आहोत. मॅथ्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, बारावी सायन्स नंतर इंजिनिअरिंग व्यतिरिक्त अनेक तीन वर्षाचे रेगुलर ग्रॅज्युएट कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्स देशातल्या बहुतांश सर्व युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. हे कोर्स नियमित शिक्षण पद्धतीमध्ये असतात. तुम्हाला एखाद्या विषयात ऑनर्स करावे लागते. याअंतर्गत तुम्हाला थेरी बरोबरच प्रॅक्टिकलचे ही मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग दिले जाते. मॅथ्स ग्रुपच्या विद्यार्थ्यासाठी असलेले विशेष अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस पुढीलप्रमाणे बीएससी आईटी बीएससी कंप्यूटर साइंस बीएससी केमेस्ट्री बीएससी मैथेमेटिक्स बीएससी फिजिक्स बीएससी होटल मैनेजमेंट बीएससी नौटिकल साइंस बीएससी इलेक्ट्रानिक्स बीएससी इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अथवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरचे ऑप्शन्स आहेत. पीसीबी किंवा पीसीएमबी ग्रुप चे स्टुडन्ट अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हलचे विविध अभ्यासक्रम निवडू शकतात. अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला विद्यार्थी एमबीबीएस निवड करू शकतात एमबीबीएस हा एक देशात अत्यंत लोकप्रिय मेडिकल कोर्स आहे. याशिवाय विद्यार्थी अन्य अंडर ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सची निवड करू शकतात जसे की बीडीएस (दंत चिकत्सा) बीएएमएस (आयुर्वेद) बीएचएमएस (होम्योपैथी) बी.फार्मा (फार्मेसी) बीपीटी (फिजियोथेरेपी) बम्स (यूनानी चिकित्सा) बीएएसएलपी (ऑडियोलॉजी और स्पीच-लैंग्वेज थेरेपी) भारतामध्ये सायन्स शाखेकडील विद्यार्थ्यांसाठी करिअर स्कोप भारतामध्ये दहावीनंतर सायन्स शाखेकडे गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक लोकप्रिय आणि त्यांना आवडणाऱ्या करिअरचा समावेश असतो. या शाखेमध्ये लोकप्रियता या कारणासाठी आहे की यातून भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक आकर्षक संधी उपलब्ध होतात. हायस्कूलमध्ये विज्ञान शाखा निवडल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्याच बरोबर पुढे जाऊन कोणत्याही दुसऱ्या शाखेचा अभ्यास ते करू शकतात आणि कोणत्याही क्षेत्रात ते आपले करिअर घडू शकतात. मॅथ्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा करीयर बाबत पर्यायाचा विचार सुरु होतो त्यावेळी मॅथ्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांना अनेक मोठे फायदे असतात. आपल्या कोर्सच्या आधारे ते इंजिनियर, सायंटिस्ट, वकील, सरकारी कर्मचारी, पायलट, फार्मासिस्ट, आर्किटेक्ट, शिक्षक, व्यवस्थापक, डिझायनर, कॉम्प्युटर तज्ञ असे काहीही होऊ शकतात. बायोलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी बायोलॉजी विभागातील विद्यार्थ्यांना करियरसाठी अनेक पर्याय खुले असतात. मुख्यता डॉक्टर सायंटिस्ट, दंतचिकित्सक, ऑर्थोडेंटिस्ट, फार्मासिस्ट, डॉक्टर ,नर्स याबरोबरच अन्य विषयाला ते प्रवेश घेऊ शकतात. या विद्यार्थ्यांना शिक्षक, वकील, डिझायनर असे अन्य करिअरचे पर्यायही निवडू शकतात. सायन्स विषयाची लोकप्रियता शैक्षणिक विश्वामध्ये सायन्स विभाग विद्यार्थ्यांना लोकप्रिय ठरले आहे. कारण हे विद्यार्थी अनेक रोमांचक आणि आकर्षक असे पर्याय त्यांना उपलब्ध असतात. बऱ्याचदा आई-वडील हे दहावी शिक्षणानंतर आपल्या विद्यार्थ्यांना सायन्स विभागाकडे जाण्यासाठी प्रेरित करत असतात. कारण ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हल ला प्रोफेशनल आणि सायंटिफिक कोर्स साठी प्रवेश घेणे यामध्ये अनिर्वाय असते. सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना खासकरून नैसर्गिक घटनेशी संबंधित विविध वस्तु आणि त्यातील पद्धतशीरपणे असलेली वैज्ञानिक अभ्यास त्याचबरोबर त्यांना यामध्ये प्रात्यक्षिके सुद्धा करावे लागते. मुख्य विषय सायन्स क्षेत्र हे एक विस्तृत आणि व्यापक आहे या अंतर्गत जवळपास सर्व गोष्टी समाविष्ट होतात, जे आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, ऐकू शकतो, आपण जाणू शकतो. ज्या ठिकाणी आपण राहतो हीच फक्त दुनिया नाही तर हे एक संपूर्ण ब्रह्मांड सायन्सच्या आवाक्यामध्ये येते. खास करून विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीच्या शिक्षणा वेळी प्रामुख्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याचा अभ्यास करावा लागतो. याशिवाय एक सक्तीच्या भाषा विषयाचा पर्याय निवडावा लागतो. याशिवाय गणित हा एक विषय आहे जो आपण मुख्य विषय किंवा ऐच्छिक विषय सुद्धा ठेवू शकतो. वैज्ञानिक अभ्यासामध्ये सध्याच्या एकूण विज्ञानाची वाटचाल पाहता कॉम्प्युटर सायन्स हासुद्धा एक फाउंडेशन कोर्स म्हणून याअंतर्गत सध्या समाविष्ट झाला आहे. फिजिक्स हे एक नैसर्गिक विज्ञान आहे या अंतर्गत मुख्यता वस्तू आणि त्याची त्याचे भौतिक गुणधर्म याचा अभ्यास केला जातो याशिवाय या विषयाच्या माध्यमातून कशाप्रकारे ऊर्जा आणि दाब हे एक साथ एकाच वेळी काम करू शकतात हा विषय आपल्या भोवताली पसरलेल्या ब्रह्मांडाचा अभ्यास करतो. फिजिक्स हे एक नैसर्गिक विज्ञानाचा भाग आहे जो विद्यार्थ्यांना सर्वात लहान अनु आणि परमाणु बरोबरच सर्वात मोठे चांदण्या आणि ब्रह्मांडाचे ही अभ्यास करण्याची संधी देते. अकरावी आणि बारावीच्या वर्गामध्ये फिजिक्स बरोबरच विजशास्त्र, खगोलशास्त्र, लहरी ध्वनी आणि प्रकाश याचाही अभ्यास केला जातो. केमिस्ट्री या विषयांमध्ये विविध पदार्थांचा अभ्यास केला जातो त्याचबरोबर त्यांच्यावर होणाऱ्या विविध प्रक्रिया मुळे ते कसे परिवर्तीत होतात हे सुद्धा केमिस्ट्री या विषयांमध्ये समजते. केमिस्ट्री मध्ये स्ट्रक्चर, कंपोझिशन, विहेवियर आणि प्रॉपर्टीज तसेच केमिकल रिएक्शन या माध्यमाने त्याच्या गुणांमध्ये कसे बदल होतहोता याचाही अभ्यास केला जातो. हा विषय फिजिक्स या विषयाशी सुसंगत असा आहे. या मध्ये फिजिक्स या विषयाचे अनेक कन्सेप्ट शिकवले जातात. बायोलॉजी या विषयांमध्ये जिवंत आणि मृत अशा दोन्ही जीवांचा अभ्यास केला जातो. यामध्ये जीवन आणि विभिन्न जीवित जीवांचा अभ्यास केला जातो. याचा मुख्य विषय पृथ्वीवरील विविध जीवसृष्टी, त्यांचा विकास, संरचना कार्य आणि . विभागणी ची प्रक्रिया समजून घेणे होय. बायलॉजी मध्ये तीन प्रमुख विषय विभाग पडतात प्राणिशास्त्र : या शाखेमध्ये पशु संबंधित सर्व अभ्यास केला जातो त्यात त्याची रचना त्याचे शारीरिक विज्ञान याबाबत ही अभ्यास केला जातो वनस्पती शास्त्र: वनस्पती शास्त्र अंतर्गत विविध वनस्पती आणि झाडांचा त्याचबरोबर त्याची संबंधित अन्य गोष्टींचा अभ्यास केला जातो. मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी मधील ही एक अशी शाखा आहे या अंतर्गत सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. यात बॅक्टेरिया,व्हायरस अशा सूक्ष्मजीवांचा ही अभ्यास समावेश होतो.सायन्स विभाग विषयांची निवड सायन्स विभागांतर्गत विद्यार्थी दोन विभागाचे निवड करू शकतात पीसीएम भौतिकशास्त्र (फिजिक्स)+ रसायनशास्त्र( केमिस्ट्री) गणित(मॅथ्स) या विभागाला मॅथेमॅटिक्स ग्रुप ने जाणले जाते. या विषयाची निवड मुख्यता इंजिनीरिंग शाखेकडे जाण्यासाठी होते. जे विद्यार्थी अकरावी मध्ये हे विषय घेतात ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स आणि त्या संबंधित विषयांचा अभ्यास तसेच एक भाषा विषय निवडतात. पीसीएमबी भौतिकशास्त्र (फिजिक्स)+ रसायनशास्त्र( केमिस्ट्री) गणित(मॅथ्स)+ जीवशास्त्र (बायोलॉजी) पीसीएमबी ग्रुप ला बायोलॉजी ग्रुप असे मानले जाते आणि हा विषय तेच विद्यार्थी निवडतात ज्यांना मेडिकल अथवा त्या संबंधित अन्य विभागांमध्ये करिअर निवडायचे असते. हे ग्रुप घेणाऱ्यांना मुख्यता फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स आणि त्याच बरोबर मायक्रोबायोलॉजी याचाही अभ्यास करावा लागतो. याचबरोबर अन्य अभ्यासक्रमात एक अनिर्वाय भाषा किंवा कॉम्प्युटर सायन्स अथवा आयटी हेसुद्धा शिकावे लागते. विज्ञान विभागातील उच्च अभ्यासक्रमाची संधी बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अनेक बहुपर्यायी कोर्स तसेच करिअरची विस्तृत शृंखला उपलब्ध असते. सायन्स विभागातील विद्यार्थ्यांना हा सर्वात मोठा फायदा होतो की ते पोस्ट ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट लेव्हल पर्यंत आर्ट्स किंवा कॉमर्स चा पर्यायही निवडू शकतात. परंतु अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन मध्ये सायन्स विभागातील विषय निवडता येत नाहीत. सायन्स विभागातील विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगले करिअरचे पर्याय खालील प्रमाणे आहेत. इंजिनीयर जे विद्यार्थी सायन्स विषय निवडतात त्यांना इंजिनीयर विषय अत्यंत लोकप्रिय असतो. दरवर्षी देशात सुमारे अकरा लाख विद्यार्थी सायन्स विभागातून इंजीनियरिंग प्रवेश परीक्षेसाठी बसतात यावरून या विषयाची असणारी लोकप्रियता स्पष्ट होते. इंजीनियरिंग विभागातून अनेक विद्यार्थ्यांना आयआयटीसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेत शिकण्याची संधी मिळते याव्यतिरिक्त इंजीनियरिंग मधील अनेक वेगवेगळे विभाग आहेत. त्यामध्ये विद्यार्थी आपला पर्याय निवडू शकतात या अंतर्गत मैकेनिकल इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग सिविल इंजीनियरिंग केमिकल इंजीनियरिंग कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग हे पर्याय आहेत मेडिकल ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी बॅचलर डिग्री कोर्स बायलॉजी ग्रुपच्या विद्यार्थ्यांनाही मेडिकल फील्ड मधील अनेक पर्याय उपलब्ध असतात ज्यामधून ते डिग्री करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना एका विशिष्ट विषयांमध्ये प्राविण्य मिळवणे अनिर्वाय ठरते. या कोर्सनंतर विद्यार्थी संशोधन क्षेत्रातही काम करू शकतात किंवा ते शिक्षक म्हणून हे आपले करियर बनवू शकतात. मेडिकल ग्रुपमधील विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय असलेले बॅचलर डिग्री कोर्स खालील प्रमाणे आहेत. बीएससी बायोकेमेस्ट्री बीएससी बायोलॉजी बीएससी एनवायरनमेंट साइंस बीएससी बायोटेक्नोलॉजी बीएससी नर्सिंग बीएससी अक्यूपेशनल थेरेपी बीएससी फिजियोथेरेपी बीएससी रेडियोलोजी बीएससी बायो इन्फॉर्मेटिक्स बीएससी एन्थ्रोपोलॉजी बीएससी माइक्रोबायोलॉजी बीएससी जुलॉजी बीएससी फोरेंसिक साइंस बीएससी एग्रिकल्चर बीएससी पैथोलॉजी बिझनेस बिझनेस अँड मॅनेजमेंट कोर्स आहे ज्याची निवड सायन्स विभागातील विद्यार्थी ही करू शकतात. या क्षेत्रामध्ये करिअर करून ते आपली गुणवत्ता आणि संधी वाढवू शकतात. अनेक ग्रॅज्युएट लेव्हल चे बिझनेस मॅनेजमेंट कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत .ज्याची निवड ते आपापल्या सोयीप्रमाणे अथवा त्या विषयातील असणाऱ्या त्यांना रुची प्रमाणे करू शकतात. कोर्सेस खालील प्रमाणे आहेत बैचलर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन (बीबीए) बैचलर ऑफ मैनेजमेंट स्टडीज़ (बीएमएस) बैचलर ऑफ बिजनेस मैनेजमेंट (बीएमएम) बैचलर ऑफ होटल मैनेजमेंट (बीएचएम) इंटीग्रेटेड बीबीए + एमबीए प्रोग्राम (5 साल) विज्ञान व्यतिरिक्त बॅचलर डिग्री कोर्सेस सायन्स विभागातील विद्यार्थी सायन्स विषय शिवाय अन्य विषयाची डिग्री कोर्स निवडू शकतात. विद्यार्थ्यांसाठी एक नवा मार्ग असतो कारण आर्ट्स कॉमर्स आणि अन्य संबंधित विषयांमधील प्रमुख प्रोफेशनल कोर्स सुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध असतात. या क्षेत्रांमध्ये काही लोकप्रिय कोर्सेस पुढीलप्रमाणे आहेत. बीकॉम (सांख्यिकी / गणित) बीएसडब्ल्यू - सोशल वर्क मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम एनिमेशन और मल्टीमीडिया इवेंट मैनेजमेंट कायदा कायदा हा एक असा कोर्स आहे. जो बारावी सायन्स नंतर सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध असतो. सायन्स विभागातील विद्यार्थी हा विषय ग्रॅज्युएशन लेव्हल पर्यंत घेऊ शकतात. इंटिग्रेटेड कोर्स सुद्धा त्यांना पर्याय असतो. परंतु अशा कॉलेजची संख्या अत्यंत कमी आहे आणि यामध्ये भविष्यात चांगली संधी असते. या अंतर्गत खालील पर्याय उपलब्ध आहेत. बीएससी + एलएलबी बीटेक. + एलएलबी बीकॉम + एलएलबी बीबीए + एलएलबी विद्यार्थी त्यांना आवडेल असे विषय कसे निवडावे अकरावी आणि बारावी सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी योग्य त्या विषयाची निवड करणे महत्त्वपूर्ण ठरते. या दरम्यान विद्यार्थी ज्या विषयाची निवड करतात त्याच्याच आधारावर ते पुढे अकॅडमी अभ्यास किंवा करिअर संबंधित निर्णय घेऊ शकतात. यासाठी योग्य विषय निवडणे विद्यार्थ्यांना आवश्यक असते. हे विषय निवडताना खालील गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची आवड विद्यार्थी नेहमी त्यांना ज्या विषयात रुची आहे अशाच विषयात अभ्यास करणे आणि त्यात आनंद घेत असतात. कोणत्याही दबावाखाली न येता अथवा कोणी काय करत आहे हे न पाहता आवडीच्या विषयाची निवड करावी. जर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स चांगले वाटत असेल आणि हे शिकत असताना तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्र खुणावत असेल तर पीसीएम हाच ग्रुप तुमच्यासाठी चांगला ठरतो. विद्यार्थ्यांनीच समजून घ्यावी आपली क्षमता आणि तुमच्यामध्ये असणारे कमकुवतपणा आपल्या हिताच्या व्यतिरिक्त विद्यार्थी विषय निवडताना आपल्याकडे असणारी क्षमता आणि असणारा कमकुवतपणा याचा विचार करणे आवश्यक आहे. उदाहरणात जर तुम्ही पीसीबी ची निवड केला आणि तुम्ही जर बायलॉजी मध्ये विशेष आवड दाखवत असाल परंतु दहावीच्या अभ्यासक्रम दरम्यान तुम्ही चांगले मार्क पाडला नाही तर अशा परिस्थितीत तुमची निवड योग्य होऊ शकत नाही. कारण पुढे जाऊन तुम्हाला यासाठी एक तर खूप कष्ट करुन अभ्यास करावा लागेल किंवा तुम्हाला हा विषय न समजल्यामुळे भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/2QjbItf Read More Read more No comments:
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे तीन प्राणायाम दररोज सकाळी केलेच पाहिजेत अकोला : प्राण म्हणजे 'जीवन शक्ती' आणि आयमा म्हणजे 'त्यावर कार्य करणे'. प्राण हा शरीरातील चैतन्याचा स्रोत आहे आणि त्या जीवनशक्तीसाठी सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे श्वास. जर आपण योग्यरित्या श्वास घेतला तर असा विश्वास आहे की आपण शरीरात उपस्थित असलेल्या विषारी पदार्थांचा नाश करू शकतो. कायाकल्प आणि सेल पुनरुत्पादनासाठी आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि शरीरात ऑक्सिजन येऊ देण्याचा श्वास हा सर्वात वेगवान मार्ग आहे. म्हणूनच प्राणायाम किंवा श्वासोच्छ्वास करण्याचे व्यायाम प्राचीन काळी खूप लोकप्रिय होते. या व्यायामामुळे केवळ श्वासोच्छवास व श्वासोच्छ्वास संबंधित कामांची बचत होते आणि ती सुधारतेच, परंतु शरीराची इतर महत्त्वपूर्ण कार्ये देखील सुधारित करतात. आपण या श्वासाच्या व्यायामाने आपल्या शरीरास विषारी पदार्थांपासून मुक्त कसे करू शकता आणि आपल्या प्रतिकारशक्तीस कसे बळकट करू शकता हे जाणून घेऊ या महत्त्वाची बातमी - आई मला खेळायला जायचं, जाऊ दे न वं..! मुलं हट्ट करत असतील तर निवडा 'हे' पर्याय प्राणायामचे फायदे प्राणायाम रोगप्रतिकारक शक्तीची कार्यप्रणाली सुधारित करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ओळखला जातो.हे आपल्या शरीराच्या एकूण आरोग्यावर कार्य करते आणि आपल्या प्रणालीतील पेशी, ऊती आणि ग्रंथींना बळकट करते. हृदयातील अडथळे दूर करण्यात मदत करते आणि हृदयातील गंभीर समस्या दूर करते. मज्जातंतू आणि आपल्या मेंदूतून कोणत्याही तणाव, चिंता आणि नैराश्यातून मुक्त करते.त्यामुळे शरीरात ऑक्सिजन आणि रक्त प्रवाह सुधारतो. श्वास घेण्याची तंत्रे हा व्यायाम विशेषत: ब्रोन्कियल अडथळे दूर करण्यात आणि रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करण्यासाठी चांगला आहे. याव्यतिरिक्त, ते वक्षस्थळाच्या स्नायूंच्या गटात रक्त पंप करते, स्नायू आणि कमरेसंबंधी रीढ़ प्रदेशात तणाव कमी करते. आपले हात आणि गुडघा मजल्यावर ठेवून सुरुवात करा. मग श्वास घेताना, आपल्या छातीचा पुढील भाग पुढे सरकवा, आपला घसा (घशात खळ कसा काढायचा) वरच्या बाजूस खेचा आणि आपल्या खांद्या जवळ आणि आपल्या मणक्याचे मध्यम क्षेत्र खाली ठेवा. आता आपल्या खालच्या घशाला स्पर्श करताना, आपल्या हनुवटीने घसा मागे खेचा. रीढ़ वरच्या बाजूस हलवून आपली छाती संकलित करा आणि आपल्या खांद्यावर मागे खेचा. हा व्यायाम अत्यंत मुक्त शरीरावर केला पाहिजे, ज्यामुळे प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी दररोज सुमारे 5 मिनिटे सतत वर आणि खाली वक्र तयार होतो. कपालभाती प्राणायाम कपालभाति प्राणायाम प्रणाली डिटॉक्सिफाई आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ओळखले जातात: मणक्यांसह सरळ बसून आणि आपल्या गुडघ्यावर आपले हात ठेवून प्रारंभ करा. नंतर आपल्या ओटीपोटातील स्नायू संकुचित करून आपल्या मणक्याच्या दिशेने आतून ओढा आणि ऑक्सिजन आणि श्वास सोडा. नंतर अधिक परिणामांसाठी दररोज 15-20 वेळा आराम करा आणि पुन्हा करा. अधिक वाचा - ‘कोरोना नाहीच, मला कोरोना होणार नाही’ हा भ्रम चुकीचा; पोस्टकोविड परिणामांची वेळीच काळजी घ्या भस्त्रिका प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम श्वास व्यायाम करण्यासाठी, आपण पद्मासन किंवा कमळाच्या स्थितीत सपाट पृष्ठभागावर आरामात बसून सुरुवात करावी. आता, आपल्या फुफ्फुसांना आपल्या दोन्ही नाकपुड्यांमधून श्वासोच्छवासाने भरा, आपले तोंड बंद ठेवून, नंतर, आपल्या तोंडाने प्राप्त होणाऱ्या आवाजाने श्वास बाहेर टाकण्यास सुरुवात करा. हे करण्यासाठी, प्रत्येक वेळी आपण हे करता तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि नंतर संपूर्ण श्वास घ्या. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी प्रत्येक वेळी किमान 10 मिनिटांसाठी दिवसातून दोनदा हा व्यायाम करा. हे आपल्याला निरोगी ठेवते आणि सर्दी, खोकला आणि कोणत्याही प्रकारच्या फ्लूपासून प्रभावीपणे मुक्त होते. हे घश्याशी संबंधित परिस्थिती सुधारण्यास देखील मदत करू शकते. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3tgBJs8 Read More Read more No comments:
महिलांनाे! जाणून घ्या पत्रकारिता, फॅशन डिझाईनिंगच्या करिअरबद्दल भारतातील महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करित आहेत. त्यांच्या आज अवतीभवती खूप करिअरचे पर्याय आहेत. नर्स आणि शिक्षक या व्यतिरिक्तही खूप पर्याय उपलब्ध आहेत. पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन प्रोफेशन खूपच आव्हानात्मक आणि जोखीमपूर्ण आहे. असे असतानाही बहुतेक महिला या करिअरची निवड करताना दिसत आहेत. येथे जाॅब सॅटिसफॅक्शनसोबतच प्रसिद्धही मिळते. डिजिटल मीडियामुळे पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनचे कार्यक्षेत्र वाढले आहे. आता बातमीदार, काॅपी रायटर्स, प्रोड्युसर, अँकर्स, एक्स्पर्ट्स आणि स्तंभलेखक म्हणून काम करता येते. पात्रता पदवीची डिग्री मिळविण्यासाठी तुम्हाला १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर डिग्री मिळविण्यासाठी पदवीची डिग्री मिळविणे अत्यावश्यक आहे. शैक्षणिक संस्था इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली एशियन काॅलेज आॅफ जर्नालिझम, चेन्नई जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली डिपार्टमेंट आॅफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे सिम्बायसिस इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन, पुणे नवी दिल्ली वायएमसीए, नवी दिल्ली भारतीय विद्या भवन, दिल्ली आणि मुंबई. नोकरीची संधी कुठे? वेगवेगळे वर्तमानपत्रे, वृत्तसंस्था, मासिके, संकेतस्थळे, सरकारी आणि प्रायव्हेट चॅनल्स आपल्या कार्यालयांमध्ये पत्रकारांना बातमीदारी, संपादन आणि काॅपी रायटिंगच्या कामावर ठेवते. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रे आणि वृत्त वाहिन्यांमध्ये खूप सारे नोकऱ्यांची संधी आहे. जाहिरात क्षेत्र सध्या जाहिरात हे क्षेत्र खूप आकर्षक आणि आवडते प्रोफेशनम्हणून पुढे येत आहे. इथे तुम्हाला गंमतीने बरोबरच सर्जनशीलतेला संधी आहे. पात्रता पदवी पातळीवरचे जाहिरातविषयक कोर्ससाठी पात्रता १२ उत्तीर्ण गरजेचे आहे. पदव्युत्तरसाठी पदवी आवश्यक आहे. जाहिरातीचे करिअर सुरु करण्याचे सर्वात चांगली पद्धत म्हणजे कोणत्याही अॅड एजन्सीमध्ये नोकरी करा. शैक्षणिक संस्था भारती विद्या भवन : मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली सेंटर फाॅर मास मीडिया, वायएमसीए, नवी दिल्ली केसी काॅलेज आॅफ मॅनेजमेंट, मुंबई मुद्रा इन्स्टिट्यूट आॅफ कम्युनिकेशन्स, अहमदाबाद नरसी मोंजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई सेंट झेव्हियर्स काॅलेज आॅफ कम्युनिकेशन्स, मुंबई नोकरीची संधी तुम्हाला अॅड एजन्सी, रेडिओ चॅनल्स, मीडिया हाऊसेस, ई काॅमर्स स्टोर्स, एफएमसीजी कंपन्या आणि पीआर एजन्सीमध्ये नोकरी मिळू शकते . फॅशन डिझाईनिंग आजकल प्रत्येकाला नीटनेटक राहिला आवडते. आपला इतरांवर प्रभाव पडावा यासाठी प्रयत्न चालू असतात. फॅशन डिझाईनिंग सर्वांत आवडीचे करिअर पर्याय आहे. पात्रता फॅशन डिझाईनिंग कोर्स करण्यासाठी प्राथमिक पात्रता म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे होय. तुम्ही दोन प्रकारचे कोर्स करु शकता - फॅशन टेक्नोलाॅजीत पदवीची डिग्री आणि फॅशन डिझाईनिंगमध्ये बॅचलरची डिग्री शैक्षणिक संस्था सीईपीजेड इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नाॅलाॅजी, मुंबई जेडी इंन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नोलाॅजी ( विभिन्न शहर) नॅशनल इन्स्टिट्यू आॅफ फॅशन डिझाईन, कोलकत्ता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नोलाॅजी(नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, गांधीनगर पर्ल अॅकडेमी आॅफ फॅशन, नवी दिल्ली सोफिया पाॅलिटेक्निक, मुंबई नोकरीची संधी एका कुशल आणि हुशार फॅशन डिझायनरला अपॅरल कंपन्या, निर्यात गृहे आणि राॅ मटेरियल उद्योगात एक स्टायलिस्ट किंवा डिझाईनर म्हणून नोकरी मिळू शकते. चांगला अनुभव मिळाल्यानंतर तुम्ही फॅशन बुटीकही उघडू शकता. कोणत्याही फॅशन डिझायनिंग ग्रॅज्युएटसाठी व्हिज्युल मर्केडायजिंग, काॅस्च्युम डिझायनिंग आणि फॅशन रायटिंगसह इतर चांगले करिअर पर्याय आहेत. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3sar5S7 Read More Read more No comments:
रेमडेसिव्हिरचा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमीच; बदलत्या नियमांमुळे रुग्णांचे नातेवाईक त्रस्त नाशिक ः काही दिवसांपासून तुटवड्यामुळे कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळविण्यासाठी दमछाक करावी लागत आहे. डॉक्टरांकडून मागणी केल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून रविवारी (ता. ११) इंजेक्शनचा शोध दिवसभर सुरू राहीला. बदलत्या नियमांमुळे रुग्णांचे नातेवाईक त्रस्त शहर परिसरातील औषध विक्रेत्यांची बैठक रविवारी (ता. ११) अन्न व औषध प्रशासन कार्यालयात झाली. तीत सुधारित आदेशाच्या अनुषंगाने विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. असे असले तरी दुसरीकडे रुग्णांच्या नातेवाइकांची इंजेक्शनसाठी धावपळ सुरूच आहे. यापूर्वी डॉक्टरांच्या चिठ्ठवर (प्रिस्क्रीप्शन) व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर इंजेक्शन मिळत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाहणी केल्यानंतर जारी केलेल्या आदेशांनंतर यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रांसह डॉक्टरांच्या सही व शिक्यासह शिफारसपत्र देणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढलेल्या आदेशानंतर विक्रेत्यांच्या दुकानापुढील रांगा ओसरल्या. हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा नियम बदलले तरीही तुटवडा कायम बदलत्या नियमांमुळे नातेवाइकांची अतिरिक्त दमछाक झाली. यात पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून, आता रुग्णालयांनी मागणीपत्र द्यायचे आहे. प्रक्रियेत होणाऱ्या सातत्याच्या बदलांमुळे संभ्रम निर्माण होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असला, तरी सातत्याने नियमांमध्ये होणाऱ्या बदलांमुळेही रुग्णाचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत.तरी जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा कायम असल्याचे ‘सकाळ’च्या पडताळणीत आढळून आले. रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नाहीच एकीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा कायम असून, दुसरीकडे ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा प्रश्नही मिटलेला नाही. ऑक्सिजनचा नियमित पुरवठा होत नसल्याने नवीन रुग्ण दाखल करून घेता येणे शक्य नसल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले. अशात आता उद्योगांसाठी राखीव २० टक्के ऑक्सिजनचाही वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी व्हावा, अशी मागणी होत आहे. रुग्णालयांना थेट इंजेक्शन खरेदीसाठी शर्तींच्या आधारे परवानगी : सह-आयुक्त दुष्यंत भामरे रविवारी (ता. ११) दुपारी उशीरा रेमडेसिव्हिरचे एकूण तीन हजार ४३४ व्हायल उपलब्ध झाले. अटी व शर्तींच्या अधीन राहून व कायद्यातील तरतुदींनुसार रुग्णालयांनी त्यांच्या स्तरावर इंजेक्शनची खरेदी करण्याची मुभा देत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह-आयुक्त दुष्यंत भामरे यांनी दिली. ते म्हणाले, की रुग्णालयात दाखल रुग्णांसाठीच या इंजेक्शनचा वापर करायचा असून, एमआरपीपेक्षा जादा पैसे न आकारण्याच्याही सूचना दिल्या आहेत. नव्याने अवलंबलेल्या कार्यपद्धतीमुळे इंजेक्शनचा काळाबाजार कमी होईल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, भरारी पथकाच्या माध्यमातून वितरण प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates April 11, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3d6NUlA Read More Read more No comments: