Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 26, 2021

गावठाणांचे ड्रोन भूमापन दृष्टीक्षेपात 

ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गातील 32 गावठाणांच्या ठिकाणी शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे भूमापन केले जाणार आहे. तेथील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे नियोजन सुरू झाले आहे. याचाच भाग म्हणून गावठाण भूमापन यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीच्या सभेत केले. 

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्षा सौ. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, समिती सचिव तथा जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक डॉ. विजय वीर, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, भूमि अभिलेख कणकवली उप अधीक्षक डॉ. सौरभ तुपकर, प्रियदा साकोरे गटविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधीक्षक डॉ. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक डॉ. तुपकर व श्रीमती साकोरे यांनी पीपीटी सादर केली. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करताना तेथील ग्रामस्थांना विश्‍वासात घेण्याचे आवाहन केले. अधीक्षक डॉ. वीर यांनी भारतीय सर्व्हेक्षण विभाग, भूमि अभिलेख व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यात ग्रामसेवक व तलाठी यांची भूमिका महत्वाची आहे. यासाठी शासनाने गावस्तरावर मंडल अधिकारी, तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. ही समिती या कामावर नियंत्रण ठेवणार आहे, असे सांगितले. 

योजनेचे फायदे 
सध्या गावठणात राहणाऱ्या रहिवाशांकडे मालमत्तांबाबत कोणतेच कागदपत्र नाहीत. त्या जमिनी शासनाच्या नावे आहेत. या प्रक्रियेमुळे शासनाच्या मिळकतींचे संरक्षण होईल. मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमा निश्‍चित होतील. रहिवाशांच्या मालकी हक्काचे अभिलेख व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. सीमा निश्‍चिती झाल्याने सरकारी मिळकतींवरचे अतिक्रमण रोखता येणार आहे. मिळकतींना बाजारपेठेत तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावणार आहे. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होणार. पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी. कामात पारदर्शकता व अचूकता. थ्री डी इमेज प्राप्त होत असल्याने विविध विकास यंत्रणा व विभागाना नियोजन करताना सुलभता येणार आहे. 

...ही आहेत गावठाणे 
कुडाळ तालुक्‍यातील पाट, अणाव, सावंतवाडी तालुक्‍यात चौकुळ, मासुरे, नेने, गाळे, केगद, फणसवडे, कलंबिस्त. दोडामार्ग तालुक्‍यात मोर्ले, घोटगेवाडी, वझरे. कणकवली तालुक्‍यात पियाळी, माईन, नागवे, लोरे, करंजे, दिगवळे, हुमरठ. देवगड तालुक्‍यात रेंबवली, लिंगडाळ, वरेरी, तोरसोळे, किंजवडे, धालावली. मालवण तालुक्‍यात त्रिंबक, सडेवाडी, पिरावाडी, कट्टा, बगाडवाडी, धामापुर, अपराधवाडी या 32 गावांत गावठाण आहे. वैभववाडी व वेंगुर्ले तालुक्‍यात एकही गावठाण क्षेत्र नाही. 

काय साध्य होणार ? 
गावठाणातील मालमत्ताचे जीआयएस आधारित रेखांकन व मूल्यांकन करणे. गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे. गावठाणातील प्रत्येक खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा करणे. गावठाणातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना भूमापन क्रमांक देणे. प्रत्येक मिळकतीची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या तरतूदीनुसार मिळकत पत्रिका तयार करणे व त्याचे वाटप करणे. गावातील मालमत्ता कर (नमूना क्रमांक 8) अद्यावत व ते जीआयएस लिंक करणे. गावातील ग्राम पंचायतींचे व शासनाचे असेट रजिस्टर तयार करणे, ही ड्रोन भूमापनचे उद्देश आहे. 

जिल्ह्यात 32 गावांत गावठाण क्षेत्र आहे. त्याची माहिती घेतली आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात अन्य गावठाण क्षेत्र असल्यास उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यात अजुन गावे किंवा क्षेत्र मिळाल्यास त्याचाही समावेश यात करता येईल. 
- डॉ. विजय वीर, जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

गावठाणांचे ड्रोन भूमापन दृष्टीक्षेपात  ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गातील 32 गावठाणांच्या ठिकाणी शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे भूमापन केले जाणार आहे. तेथील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे नियोजन सुरू झाले आहे. याचाच भाग म्हणून गावठाण भूमापन यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीच्या सभेत केले.  ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्षा सौ. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, समिती सचिव तथा जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक डॉ. विजय वीर, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, भूमि अभिलेख कणकवली उप अधीक्षक डॉ. सौरभ तुपकर, प्रियदा साकोरे गटविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधीक्षक डॉ. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक डॉ. तुपकर व श्रीमती साकोरे यांनी पीपीटी सादर केली.  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करताना तेथील ग्रामस्थांना विश्‍वासात घेण्याचे आवाहन केले. अधीक्षक डॉ. वीर यांनी भारतीय सर्व्हेक्षण विभाग, भूमि अभिलेख व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यात ग्रामसेवक व तलाठी यांची भूमिका महत्वाची आहे. यासाठी शासनाने गावस्तरावर मंडल अधिकारी, तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. ही समिती या कामावर नियंत्रण ठेवणार आहे, असे सांगितले.  योजनेचे फायदे  सध्या गावठणात राहणाऱ्या रहिवाशांकडे मालमत्तांबाबत कोणतेच कागदपत्र नाहीत. त्या जमिनी शासनाच्या नावे आहेत. या प्रक्रियेमुळे शासनाच्या मिळकतींचे संरक्षण होईल. मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमा निश्‍चित होतील. रहिवाशांच्या मालकी हक्काचे अभिलेख व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. सीमा निश्‍चिती झाल्याने सरकारी मिळकतींवरचे अतिक्रमण रोखता येणार आहे. मिळकतींना बाजारपेठेत तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावणार आहे. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होणार. पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी. कामात पारदर्शकता व अचूकता. थ्री डी इमेज प्राप्त होत असल्याने विविध विकास यंत्रणा व विभागाना नियोजन करताना सुलभता येणार आहे.  ...ही आहेत गावठाणे  कुडाळ तालुक्‍यातील पाट, अणाव, सावंतवाडी तालुक्‍यात चौकुळ, मासुरे, नेने, गाळे, केगद, फणसवडे, कलंबिस्त. दोडामार्ग तालुक्‍यात मोर्ले, घोटगेवाडी, वझरे. कणकवली तालुक्‍यात पियाळी, माईन, नागवे, लोरे, करंजे, दिगवळे, हुमरठ. देवगड तालुक्‍यात रेंबवली, लिंगडाळ, वरेरी, तोरसोळे, किंजवडे, धालावली. मालवण तालुक्‍यात त्रिंबक, सडेवाडी, पिरावाडी, कट्टा, बगाडवाडी, धामापुर, अपराधवाडी या 32 गावांत गावठाण आहे. वैभववाडी व वेंगुर्ले तालुक्‍यात एकही गावठाण क्षेत्र नाही.  काय साध्य होणार ?  गावठाणातील मालमत्ताचे जीआयएस आधारित रेखांकन व मूल्यांकन करणे. गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे. गावठाणातील प्रत्येक खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा करणे. गावठाणातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना भूमापन क्रमांक देणे. प्रत्येक मिळकतीची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या तरतूदीनुसार मिळकत पत्रिका तयार करणे व त्याचे वाटप करणे. गावातील मालमत्ता कर (नमूना क्रमांक 8) अद्यावत व ते जीआयएस लिंक करणे. गावातील ग्राम पंचायतींचे व शासनाचे असेट रजिस्टर तयार करणे, ही ड्रोन भूमापनचे उद्देश आहे.  जिल्ह्यात 32 गावांत गावठाण क्षेत्र आहे. त्याची माहिती घेतली आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात अन्य गावठाण क्षेत्र असल्यास उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यात अजुन गावे किंवा क्षेत्र मिळाल्यास त्याचाही समावेश यात करता येईल.  - डॉ. विजय वीर, जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bGwOJj
Read More
कृषी यांत्रिकीमध्ये यंदाही वेटिंग? 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - उन्नत शेती समृद्ध शेती अंतर्गत किती कृषी यांत्रिकीकरण अभियान शेतकऱ्यांना गेल्यावर्षी कोरोना कालावधीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेता आला नाही. यंदा 10 जानेवारी पर्यंत तब्बल 7 हजार 778 शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. तर पहिल्या टप्प्यातील 315 जणांची यादीही प्रसिद्ध झाली आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी 1 कोटी 33 लाखाचे अनुदानही मंजूर झाले असले तरी मार्च पर्यंत आर्थिक वर्ष संपत असल्याने एकच महिना शेतकऱ्यांना कृषी अवजारांना अनुदान वितरणासाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव वेटींगवरच राहणार आहे. 

जिल्ह्यात 80 हजार हेक्‍टरच्यावर भात शेती व इतर पिकांची शेती करण्यात येते मोठ्या प्रमाणावर भात शेती असल्याने अनेक शेतकऱ्यांना यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्‍यक असते. पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास मजुरी, कामगार याची नितांत आवश्‍यकता भासते ;मात्र अलिकडच्या काळात ही गरज यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात येते. यांत्रिकीकरणामुळे कमी वेळेत कमी खर्चात मजूरा अभावी काम पूर्ण होते.

शेतीमध्ये एमआरजीएस, श्री पद्धत आणि यांत्रिकीकरणाचा मोठा फायदा शेतकऱ्याला होतो ; मात्र सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे यंत्राचा उपयोग शेतीसाठी करता येत नाही. यासाठी केंद्र व राज्य सरकारने तसेच सेस अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या सहाय्याने शेती करण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेती अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान राबवले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सह अपंग घटकांनाही कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ मिळतो. 2016 ते 19 पर्यंत जवळपास 12 कोटी रुपये अनुदान तत्वावर शेती अवजारासाठी वितरित करण्यात आलेले आहे. 2016 पासून कृषी अवजारासाठी अनुदान मिळावे यासाठी प्रस्ताव करणाऱ्यांच्या संख्येत दीड ते दोन पटीने वाढ पाहावयास मिळत आहे. शेतकरी महाडीबीटीवरून आपली सर्व माहिती योजनेसह संकेत स्थळावर भरतो, यातील सर्वात आधी माहिती सादर करणारे लाभार्थी विचारात घेऊन त्यांच्या अर्जाची छाननी मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येते.

यानंतर टप्प्याटप्प्याने काही शेतकऱ्यांची निवड करून शासनाकडून संकेत स्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येते. यानंतर शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे पाहून संबंधित तालुक्‍याच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडून पूर्वसंमती घेऊन आपले नाव यादीत आल्याची कल्पना देऊन अवजारे वितरकाकडून विकत घ्यावी. विकत घेतलेल्या अवजाराची पावती संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना सादर करावी संबंधित शेतकऱ्याचा कोणताही कागद अपूर्ण असल्यास त्याची माहिती तालुका कृषी अधिकारी त्या शेतकऱ्याला देतो यानंतर सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यावर 

जिल्हास्तरावर पाठविण्यात येते या माहितीची पाहणी करून अंतिम मंजुरी देण्यात येते आणि रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित करण्यात येते. यावर्षी कोरनामुळे हा कालावधी पुढे गेला आता अवघा एकच महिना अनुदान वितरण करण्यासाठी शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नाव यादी प्रसिद्ध झाले आहे त्यांनी लवकरात लवकर यादी पाहून अवजारे खरेदी करून त्याची पावती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जवळ सादर करावी असे आवाहन करण्यात येत आहे. केंद्र शासनाचे 60 आणि राज्य शासनाचे 40 टक्के अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना अवजाराची रक्कम प्राप्त होते आठ ते दहा दिवसात ही रक्कम खात्यावर जमा करण्यात येते 

गेल्या वर्षी 4 हजार 500 अर्ज प्राप्त झालेल्या आणि वेटिंग वर असलेल्या अर्जांची संख्या होती. त्यातील काही जणांना लाभ घेता आला ;मात्र तरीही अनेक प्रस्ताव वेटिंगवर राहिले आहेत. यंदा एकूण सुमारे 7 हजार 778 प्रस्ताव वेटिंग वर आहेत. गेल्या वर्षी वेटिंग व राहिलेले यांचा यात समावेश आहे. गतवर्षीच्या 30 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. नंतर ती वाढवून 10 जानेवारी पर्यंत देण्यात आली होती. यंदा जवळपास 7 हजार 778 जणांची नोंद संबंधित करण्यात आली आहे.

त्यातील यादी त्यांची नावे आली आहेत व जे लवकरात लवकर पावती सादर करणार आहेत अशांना कृषी अवजारांचा फायदा मिळणार आहे; मात्र यासाठी अवघा एकच महिना शिल्लक राहिला आहे. यानंतर ज्या लाभार्थ्यांना पुढील आर्थिक वर्षात लाभ मिळणार आहे. 
गतवर्षी तीन योजनेचे पैसे प्राप्त झाल्याने या जवळपास 7 कोटी रुपयांचे मंजुरीसाठी तरतूद करण्यात आली होती. या वर्षी एकाच योजनेचे पैसे आल्याने 1 कोटी 33 लाख अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. 

*वर्ष*अर्ज*अनुदान (लक्षांक) 
*2016-17*850*3 कोटी 45 लाख 
*2017-18*2590*6 कोटी17 लाख 
*2018-19*4396*1 कोटी 90 लाख 
*2019-20*3000*7 कोटी 
*2020-21*7778*1 कोटी 33 लाख 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कृषी यांत्रिकीमध्ये यंदाही वेटिंग?  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - उन्नत शेती समृद्ध शेती अंतर्गत किती कृषी यांत्रिकीकरण अभियान शेतकऱ्यांना गेल्यावर्षी कोरोना कालावधीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेता आला नाही. यंदा 10 जानेवारी पर्यंत तब्बल 7 हजार 778 शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. तर पहिल्या टप्प्यातील 315 जणांची यादीही प्रसिद्ध झाली आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी 1 कोटी 33 लाखाचे अनुदानही मंजूर झाले असले तरी मार्च पर्यंत आर्थिक वर्ष संपत असल्याने एकच महिना शेतकऱ्यांना कृषी अवजारांना अनुदान वितरणासाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव वेटींगवरच राहणार आहे.  जिल्ह्यात 80 हजार हेक्‍टरच्यावर भात शेती व इतर पिकांची शेती करण्यात येते मोठ्या प्रमाणावर भात शेती असल्याने अनेक शेतकऱ्यांना यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्‍यक असते. पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास मजुरी, कामगार याची नितांत आवश्‍यकता भासते ;मात्र अलिकडच्या काळात ही गरज यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात येते. यांत्रिकीकरणामुळे कमी वेळेत कमी खर्चात मजूरा अभावी काम पूर्ण होते. शेतीमध्ये एमआरजीएस, श्री पद्धत आणि यांत्रिकीकरणाचा मोठा फायदा शेतकऱ्याला होतो ; मात्र सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे यंत्राचा उपयोग शेतीसाठी करता येत नाही. यासाठी केंद्र व राज्य सरकारने तसेच सेस अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या सहाय्याने शेती करण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेती अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान राबवले आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सह अपंग घटकांनाही कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ मिळतो. 2016 ते 19 पर्यंत जवळपास 12 कोटी रुपये अनुदान तत्वावर शेती अवजारासाठी वितरित करण्यात आलेले आहे. 2016 पासून कृषी अवजारासाठी अनुदान मिळावे यासाठी प्रस्ताव करणाऱ्यांच्या संख्येत दीड ते दोन पटीने वाढ पाहावयास मिळत आहे. शेतकरी महाडीबीटीवरून आपली सर्व माहिती योजनेसह संकेत स्थळावर भरतो, यातील सर्वात आधी माहिती सादर करणारे लाभार्थी विचारात घेऊन त्यांच्या अर्जाची छाननी मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. यानंतर टप्प्याटप्प्याने काही शेतकऱ्यांची निवड करून शासनाकडून संकेत स्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येते. यानंतर शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे पाहून संबंधित तालुक्‍याच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडून पूर्वसंमती घेऊन आपले नाव यादीत आल्याची कल्पना देऊन अवजारे वितरकाकडून विकत घ्यावी. विकत घेतलेल्या अवजाराची पावती संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना सादर करावी संबंधित शेतकऱ्याचा कोणताही कागद अपूर्ण असल्यास त्याची माहिती तालुका कृषी अधिकारी त्या शेतकऱ्याला देतो यानंतर सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यावर  जिल्हास्तरावर पाठविण्यात येते या माहितीची पाहणी करून अंतिम मंजुरी देण्यात येते आणि रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित करण्यात येते. यावर्षी कोरनामुळे हा कालावधी पुढे गेला आता अवघा एकच महिना अनुदान वितरण करण्यासाठी शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नाव यादी प्रसिद्ध झाले आहे त्यांनी लवकरात लवकर यादी पाहून अवजारे खरेदी करून त्याची पावती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जवळ सादर करावी असे आवाहन करण्यात येत आहे. केंद्र शासनाचे 60 आणि राज्य शासनाचे 40 टक्के अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना अवजाराची रक्कम प्राप्त होते आठ ते दहा दिवसात ही रक्कम खात्यावर जमा करण्यात येते  गेल्या वर्षी 4 हजार 500 अर्ज प्राप्त झालेल्या आणि वेटिंग वर असलेल्या अर्जांची संख्या होती. त्यातील काही जणांना लाभ घेता आला ;मात्र तरीही अनेक प्रस्ताव वेटिंगवर राहिले आहेत. यंदा एकूण सुमारे 7 हजार 778 प्रस्ताव वेटिंग वर आहेत. गेल्या वर्षी वेटिंग व राहिलेले यांचा यात समावेश आहे. गतवर्षीच्या 30 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. नंतर ती वाढवून 10 जानेवारी पर्यंत देण्यात आली होती. यंदा जवळपास 7 हजार 778 जणांची नोंद संबंधित करण्यात आली आहे. त्यातील यादी त्यांची नावे आली आहेत व जे लवकरात लवकर पावती सादर करणार आहेत अशांना कृषी अवजारांचा फायदा मिळणार आहे; मात्र यासाठी अवघा एकच महिना शिल्लक राहिला आहे. यानंतर ज्या लाभार्थ्यांना पुढील आर्थिक वर्षात लाभ मिळणार आहे.  गतवर्षी तीन योजनेचे पैसे प्राप्त झाल्याने या जवळपास 7 कोटी रुपयांचे मंजुरीसाठी तरतूद करण्यात आली होती. या वर्षी एकाच योजनेचे पैसे आल्याने 1 कोटी 33 लाख अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.  *वर्ष*अर्ज*अनुदान (लक्षांक)  *2016-17*850*3 कोटी 45 लाख  *2017-18*2590*6 कोटी17 लाख  *2018-19*4396*1 कोटी 90 लाख  *2019-20*3000*7 कोटी  *2020-21*7778*1 कोटी 33 लाख  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dS8Bma
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २७ फेब्रुवारी २०२१

पंचांग -
शनिवार : माघ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ६.४९, चंद्रास्त सकाळी ७.३०, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ६.३८, माघस्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती दुपारी १.४७, भारतीय सौर फाल्गुन ८ शके १९४२. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१२ : श्रेष्ठ कवी आणि नाटककार कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म. ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविलेले ते मराठीतील दुसरे साहित्यिक. 
१९३१ : सशस्त्र क्रांतीच्या लढ्यातील काकोरी कट व लाहोर कट यातील नेते चंद्रशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू.
१९९९ : पंधरा वर्ष सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.
२००२ : फैजाबाद-अहमदाबाद एक्‍स्प्रेसचा एक डबा गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ समाजकंटकांनी पेटवून दिल्यामुळे ५७ प्रवासी मृत्युमुखी व ४३ जखमी.
२००३ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील जैवरसायनशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ.मोहंमद इस्लाम खान यांना केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार जाहीर. ‘ग्लायकोबॉयॉलॉजी’ आणि ‘बायोनॅनोटेक्‍नॉलॉजी’ या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल हा सन्मान मिळाला आहे.

दिनमान -
मेष : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.
वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत रहाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संततिसौख्य लाभेल.
वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
धनु : प्रवास सुखकर होतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना दक्षता हवी.
कुंभ : वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २७ फेब्रुवारी २०२१ पंचांग - शनिवार : माघ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ६.४९, चंद्रास्त सकाळी ७.३०, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ६.३८, माघस्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती दुपारी १.४७, भारतीय सौर फाल्गुन ८ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१२ : श्रेष्ठ कवी आणि नाटककार कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म. ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविलेले ते मराठीतील दुसरे साहित्यिक.  १९३१ : सशस्त्र क्रांतीच्या लढ्यातील काकोरी कट व लाहोर कट यातील नेते चंद्रशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू. १९९९ : पंधरा वर्ष सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक. २००२ : फैजाबाद-अहमदाबाद एक्‍स्प्रेसचा एक डबा गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ समाजकंटकांनी पेटवून दिल्यामुळे ५७ प्रवासी मृत्युमुखी व ४३ जखमी. २००३ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील जैवरसायनशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ.मोहंमद इस्लाम खान यांना केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार जाहीर. ‘ग्लायकोबॉयॉलॉजी’ आणि ‘बायोनॅनोटेक्‍नॉलॉजी’ या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल हा सन्मान मिळाला आहे. दिनमान - मेष : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत रहाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संततिसौख्य लाभेल. वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. धनु : प्रवास सुखकर होतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना दक्षता हवी. कुंभ : वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3r0ZwuX
Read More
अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणार "मृत्युंजय दूत'

ओरोस (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मृत्यू तसेच जखमी होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यावर उपाय म्हणून अपघातातील मृत्यू तसेच जखमींना तत्काळ मदत मिळावी म्हणून सोमवार (ता. 1) पासून "हायवे मृत्युंजय दूत' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. अपर महा पोलिस संचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे, अशी माहिती वाहतूक मदत पोलिस केंद्राचे सहायक निरीक्षक अरुण जाधव यांनी आज दिली. 

अपघाताचे प्रमाण वाढत आहे. देशात दरवर्षी दीड लाख लोक रस्ते अपघातात जीव गमावतात. अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात. अपघातग्रस्तांना योग्य आणि वेळेवर उपचार होण्यासाठी डॉ. उपाध्याय यांनी जखमींना मदत मिळावी म्हणून हायवे मृत्युंजय दूत ही योजना आणली आहे. महामार्ग पोलिसांकडे याची जबाबदारी आहे. 
राज्याच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती त्यांच्याकडे असणार आहे. हायवे मृत्युंजय दूताकडे ओळखपत्र असेल. त्यांच्या कामावरून प्रमाणपत्रसुद्धा दिले जाणार आहे. केंद्राच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे चांगले काम करणाऱ्या दूतांची नावे कळविण्यात येऊन त्यांना पुरस्काराची शिफारस करण्यात येणार आहे. 

काय आहे संकल्पना? 
राज्य महामार्गावर राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मॉल, पेट्रोल पंप, ढाबा, हॉटेलमधील कर्मचारी व जवळच्या गावातील नागरिकांच्या ग्रुपमधून हायवे मृत्युंजय दूत तयार केले जाणार आहेत. खासगी, सरकारी, निमसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांना प्रथमोपचाराचे व अपघातग्रस्तांना कशा प्रकारे हाताळायचे, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हायवे मृत्युंजय दूताकडे स्ट्रेचर आणि प्राथमिक उपचारांचे साहित्य असणार आहे. हायवेवरील सर्व प्रकारच्या हॉस्पिटल, दवाखाने यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवण्यात येणार आहे. रुग्णवाहिका कोठे असतात आणि 108 क्रमांक रुग्णवाहिकेसाठी असतो, त्याची सर्व माहिती दूताकडे असणार आहे. अपघातानंतर गोल्डन अवरमध्ये कार्य केले पाहिजे, याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

""राज्यात अपघातात वाढ होत आहे. त्यातील मृत्यूचे प्रमाण कसे कमी करता येतील, याकडे लक्ष देऊन ही नवी योजना सुरू केली आहे. जखमींना वेळेवर योग्य उपचार मिळाला तर प्राणहानी कमी होईल. त्यामुळेच हायवे मृत्युंजय दूत योजना संपूर्ण राज्यात सुरू होत आहे. संपूर्ण राज्यात दूतांचे एक हजार ग्रुप करण्यात येणार आहेत. एका ग्रुपमध्ये चार ते पाच सदस्य असतील. योजनेमुळे जवळपास अपघातातील 60 ते 70 टक्के मृत्यू रोखता येतील.'' 
- अरुण जाधव, सहायक पोलिस निरीक्षक 
 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणार "मृत्युंजय दूत' ओरोस (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मृत्यू तसेच जखमी होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यावर उपाय म्हणून अपघातातील मृत्यू तसेच जखमींना तत्काळ मदत मिळावी म्हणून सोमवार (ता. 1) पासून "हायवे मृत्युंजय दूत' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. अपर महा पोलिस संचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे, अशी माहिती वाहतूक मदत पोलिस केंद्राचे सहायक निरीक्षक अरुण जाधव यांनी आज दिली.  अपघाताचे प्रमाण वाढत आहे. देशात दरवर्षी दीड लाख लोक रस्ते अपघातात जीव गमावतात. अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात. अपघातग्रस्तांना योग्य आणि वेळेवर उपचार होण्यासाठी डॉ. उपाध्याय यांनी जखमींना मदत मिळावी म्हणून हायवे मृत्युंजय दूत ही योजना आणली आहे. महामार्ग पोलिसांकडे याची जबाबदारी आहे.  राज्याच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती त्यांच्याकडे असणार आहे. हायवे मृत्युंजय दूताकडे ओळखपत्र असेल. त्यांच्या कामावरून प्रमाणपत्रसुद्धा दिले जाणार आहे. केंद्राच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे चांगले काम करणाऱ्या दूतांची नावे कळविण्यात येऊन त्यांना पुरस्काराची शिफारस करण्यात येणार आहे.  काय आहे संकल्पना?  राज्य महामार्गावर राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मॉल, पेट्रोल पंप, ढाबा, हॉटेलमधील कर्मचारी व जवळच्या गावातील नागरिकांच्या ग्रुपमधून हायवे मृत्युंजय दूत तयार केले जाणार आहेत. खासगी, सरकारी, निमसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांना प्रथमोपचाराचे व अपघातग्रस्तांना कशा प्रकारे हाताळायचे, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हायवे मृत्युंजय दूताकडे स्ट्रेचर आणि प्राथमिक उपचारांचे साहित्य असणार आहे. हायवेवरील सर्व प्रकारच्या हॉस्पिटल, दवाखाने यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवण्यात येणार आहे. रुग्णवाहिका कोठे असतात आणि 108 क्रमांक रुग्णवाहिकेसाठी असतो, त्याची सर्व माहिती दूताकडे असणार आहे. अपघातानंतर गोल्डन अवरमध्ये कार्य केले पाहिजे, याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  ""राज्यात अपघातात वाढ होत आहे. त्यातील मृत्यूचे प्रमाण कसे कमी करता येतील, याकडे लक्ष देऊन ही नवी योजना सुरू केली आहे. जखमींना वेळेवर योग्य उपचार मिळाला तर प्राणहानी कमी होईल. त्यामुळेच हायवे मृत्युंजय दूत योजना संपूर्ण राज्यात सुरू होत आहे. संपूर्ण राज्यात दूतांचे एक हजार ग्रुप करण्यात येणार आहेत. एका ग्रुपमध्ये चार ते पाच सदस्य असतील. योजनेमुळे जवळपास अपघातातील 60 ते 70 टक्के मृत्यू रोखता येतील.''  - अरुण जाधव, सहायक पोलिस निरीक्षक    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3pWr1nX
Read More
चव्हाण प्रकरणात संवेदनशीलता दाखवा ः तावडे

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप होतात. त्यावेळी राजकीय नेतृत्वाने संवेदनशीलता दाखवित निर्णय घेणे आवश्‍यक असतो. त्यामुळे पुजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाई करीत राजकीय संवेदनशीलता दाखवावी, असे मत भाजप नेते विनोद तावडे यांनी येथे व्यक्त केले. 

जिल्हा दौऱ्यावर आलेले श्री. तावडे यांचे येथील भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते अतुल काळसेकर, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, राजा राणे, बाळा हरयाण, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते. 

तावडे म्हणाले, ""पुजा चव्हाण प्रकरणात कारवाई व्हावी, अशी अपेक्षा राज्यातील जनतेला आहे. राजकीय नेतृत्व संवेदनशील असेल तर नक्कीच कारवाई होईल. पेट्रोल, डिझेलचे दर जगात वाढत आहे. त्यामुळे आपल्या देशात देखील वाढले आहेत; परंतु जे विरोधक राज्यात पेट्रोल डिझेलचा कांगावा करीत आहेत. त्यांनी आजुबाजुच्या राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर कमी आहेत हे पाहावे. त्या राज्यांतील सरकारांना जमते ते महाराष्ट्रातील सरकारला काम जमत नाही याचे आत्मपरीक्षण करावे त्यांनतरच टीका करावी.'' 

1 मार्चपासुन सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे कोरोनाची संख्या वाढवुन सांगितली जात आहे. हा राजकीय कोरोना आहे, अशी टीका भाजपच्या नेत्यांकडुन केली जात आहे. यासंदर्भात श्री. तावडेंना विचारले असता ते म्हणाले, ""समाजातील सर्व व्यवस्था आता सुरू झाली आहे. कोरोनामुळे आता काहीही थांबलेले नाही. त्यामुळे केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळण्यासाठी कोरोनाचा वापर होऊ नये, असे आमचे मत आहे. राज्यातील अनेक प्रश्नावर या अधिवेशनात चर्चा व्हायला हवी. अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या सर्व आमदारांना कोरोना टेस्ट करून प्रवेश दिला जातो. आवश्‍यक ती खबरदारी घेवुन राज्य सरकारने पूर्ण वेळ अर्थसंकल्पशीय अधिवेशन घ्यावे. कोणतीही पळवाट काढु नये हीच आमची मागणी आहे.'' 

मुंबईत एका ठिकाणी सापडलेल्या स्फोटकाविषयी ते म्हणाले, ""या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे त्यावर काही भाष्य करता येणार नाही; परंतु दहशतवादाशी कुणीही एक सरकार लढत नाही तर आपण सर्वांनी एकत्रित लढायचे असते. त्यामुळे या विषयात राजकीय टीका होता कामा नये.'' 

पैकीच्या पैकी पाहिजेत 
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील नगरसेवकांनी जरी अन्य पक्षात प्रवेश केला असला तरी आपल्याला या नगरपंचायतीत पैकीच्या पैकी नगरसेवक पाहिजेत. त्यासाठी जोरदार प्रयत्न करा, बुथनिहाय काम करा, अशी सूचना त्यांनी उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना केली. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चव्हाण प्रकरणात संवेदनशीलता दाखवा ः तावडे वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप होतात. त्यावेळी राजकीय नेतृत्वाने संवेदनशीलता दाखवित निर्णय घेणे आवश्‍यक असतो. त्यामुळे पुजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाई करीत राजकीय संवेदनशीलता दाखवावी, असे मत भाजप नेते विनोद तावडे यांनी येथे व्यक्त केले.  जिल्हा दौऱ्यावर आलेले श्री. तावडे यांचे येथील भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते अतुल काळसेकर, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, राजा राणे, बाळा हरयाण, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते.  तावडे म्हणाले, ""पुजा चव्हाण प्रकरणात कारवाई व्हावी, अशी अपेक्षा राज्यातील जनतेला आहे. राजकीय नेतृत्व संवेदनशील असेल तर नक्कीच कारवाई होईल. पेट्रोल, डिझेलचे दर जगात वाढत आहे. त्यामुळे आपल्या देशात देखील वाढले आहेत; परंतु जे विरोधक राज्यात पेट्रोल डिझेलचा कांगावा करीत आहेत. त्यांनी आजुबाजुच्या राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर कमी आहेत हे पाहावे. त्या राज्यांतील सरकारांना जमते ते महाराष्ट्रातील सरकारला काम जमत नाही याचे आत्मपरीक्षण करावे त्यांनतरच टीका करावी.''  1 मार्चपासुन सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे कोरोनाची संख्या वाढवुन सांगितली जात आहे. हा राजकीय कोरोना आहे, अशी टीका भाजपच्या नेत्यांकडुन केली जात आहे. यासंदर्भात श्री. तावडेंना विचारले असता ते म्हणाले, ""समाजातील सर्व व्यवस्था आता सुरू झाली आहे. कोरोनामुळे आता काहीही थांबलेले नाही. त्यामुळे केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळण्यासाठी कोरोनाचा वापर होऊ नये, असे आमचे मत आहे. राज्यातील अनेक प्रश्नावर या अधिवेशनात चर्चा व्हायला हवी. अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या सर्व आमदारांना कोरोना टेस्ट करून प्रवेश दिला जातो. आवश्‍यक ती खबरदारी घेवुन राज्य सरकारने पूर्ण वेळ अर्थसंकल्पशीय अधिवेशन घ्यावे. कोणतीही पळवाट काढु नये हीच आमची मागणी आहे.''  मुंबईत एका ठिकाणी सापडलेल्या स्फोटकाविषयी ते म्हणाले, ""या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे त्यावर काही भाष्य करता येणार नाही; परंतु दहशतवादाशी कुणीही एक सरकार लढत नाही तर आपण सर्वांनी एकत्रित लढायचे असते. त्यामुळे या विषयात राजकीय टीका होता कामा नये.''  पैकीच्या पैकी पाहिजेत  वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील नगरसेवकांनी जरी अन्य पक्षात प्रवेश केला असला तरी आपल्याला या नगरपंचायतीत पैकीच्या पैकी नगरसेवक पाहिजेत. त्यासाठी जोरदार प्रयत्न करा, बुथनिहाय काम करा, अशी सूचना त्यांनी उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना केली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3pWPQAk
Read More
सावंतवाडीत रस्ते, नळयोजनेला प्राधान्य 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेचा आज 30 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक नगराध्यक्ष संजू परब यांनी सादर केले. यात रस्ते व नळपाणी योजनेला प्राधान्य देण्यात आले. 19 हजार लिटर पिण्याच्या पाणी पुरवठ्यामागे केलेल्या दरवाढीला शिवसेनेच्या नगरसेविकांनी विरोध असल्याचे सांगितले; मात्र नगराध्यक्षांनी 12 विरुद्ध 4, असा ठराव मंजूर घेवून हे अंदाजपत्रक संमत केल्याचे सांगितले. 

येथील पालिकेचा 2021-2022 चे अंदाजपत्रक नगराध्यक्ष परब यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत सादर केले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, राजू बेग, मनोज नाईक, उदय नाईक, सुरेंद्र बांदेकर, नासिर शेख, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर आदी उपस्थित होते. या सभेस शिवसेना गटनेते अनारोजीन लोबो, भाजप नगरसेवक ऍड. परीमल नाईक, स्वीकृत नगरसेवक जयेंद्र परुळेकर हे अनुपस्थित होते. 

सुरवातीस शिल्लक 36 कोटी 27 लाख 80 हजार 562 रुपये तर एकूण जमा 30 कोटी 47 लाख 53 हजार 100 रुपये एकूण खर्च 36 कोटी 60 लाख 10 हजार रुपये अंदाजपत्रक आहे. तरतुदींमध्ये 64 कोटी 30 लाखाचे अंदाजपत्रक आहे. यावेळी विकासाचे नियोजन करत असताना घनकचरा आणि पाणीपुरवठा यासाठी 50 टक्के खर्च प्रस्तावित करण्यात आला आला. 

मुख्याधिकारी म्हणाले, ""30 कोटींचे अंदाजपत्रक मांडत असताना हा आकड्यांचा खेळ नाही तर पाणीपुरवठा योजनेसाठी 46 कोटीची योजना तयार केली आहे. यामध्ये 10 टक्के पालिकेला द्यावे लागणार आहेत. नगरोत्थानमधून या खर्चासाठी नाममात्र भाडेवाढ सुचविली आहे.'' 

नगरसेवक बांदेकर म्हणाले, की मुळात पाणीपुरवठ्याची टाकी भरत नाही. यावर सुधारणा करण्याऐवजी नागरिकांच्या माथी भाडेवाढ मारली जात असेल तर ते चुकीचे आहे. आपणाकडे नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या भाडेवाढीला आमचा तीव्र विरोध आहे. यावेळी झालेल्या चर्चेत भारती मोरे, मागास कल्याण सभापती वाडकर, श्रीमती सुकी यांनीही विरोध दर्शवला. 

नगराध्यक्ष परब म्हणाले, ""19 हजार लिटर पाणी पुरवठा केवळ दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दहा लिटरमध्ये केवळ दोन पैसे इतकी वाढ केली आहे. शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी ही अल्पवाढ अपरिहार्य आहे.'' दरम्यान, नगरसेवक शेख यांनी बांदेकर यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

नगरसेवक नाईक म्हणाले, तुम्ही तावातावाने का बोलता? अल्पभाडेवाढीचा ठराव मांडण्यात आला असून यावर पुन्हा पुन्हा बोलू नका.'' त्यामुळे बांदेकर आणि नाईक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी सौ. वाडकर म्हणाल्या, की पाण्याची समस्या असताना दरवाढ नको. ही दरवाढीची योग्य वेळ नाही.'' 

नगरसेवक नेवगीही चर्चेत सहभागी झाले. चर्चेअंती शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेत ठराव 4 विरुद्ध 12 मताने मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष परब म्हणाले, ""यापूर्वी भूमिगत विद्युत वाहिनीसाठी आलेले 11 कोटी आणि संत गाडगेबाबा भाजीमंडईसाठी आलेले पाच कोटी परत जाण्यामध्ये यापूर्वीचे सत्ताधारी कारणीभूत आहेत.'' 

असा आहे अर्थसंकल्प 
अंदाजपत्रकात महसुली जमा 15 कोटी 80 लाख 53 हजार 100 तर महसुली खर्च 15 कोटी 50 हजार इतका दाखवला आहे. भांडवली जमामध्ये 14 कोटी 67 लाख रुपये तर भांडवली खर्च 21 कोटी दहा लाख दहा हजार इतका दाखवला आहे. पालिकेला मालमत्ता करातून दोन कोटी 55 लाख रुपये, पाणी बिलातून एक कोटी 59 लाख रुपये, भाजी मार्केट मधून 32 लाख रुपये, अन्य भाडे 87 लाख रुपये, विकास शुल्क 50 लाख रुपये तर महसुली अनुदान 17 कोटी 56 लाख रुपये इतकी महसुली जमाचे स्त्रोत दाखवले आहेत. महसुली खर्चाच्या प्रमुख स्त्रोतामध्ये मालमत्ता देखभाल खर्च 3 कोटी 90 लाख रुपये, मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांसाठी 25 लाख रुपये, महिला व बाल कल्याणकारी योजनांकरिता 10 लाख रुपये, दिव्यांगाच्या कल्याणकारी योजनांसाठी 20 लाख रुपये, आस्थापन खर्च व निवृत्ती वेतन खर्च आठ कोटी 20 लाख 93 हजार दाखवला आहे. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडीत रस्ते, नळयोजनेला प्राधान्य  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेचा आज 30 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक नगराध्यक्ष संजू परब यांनी सादर केले. यात रस्ते व नळपाणी योजनेला प्राधान्य देण्यात आले. 19 हजार लिटर पिण्याच्या पाणी पुरवठ्यामागे केलेल्या दरवाढीला शिवसेनेच्या नगरसेविकांनी विरोध असल्याचे सांगितले; मात्र नगराध्यक्षांनी 12 विरुद्ध 4, असा ठराव मंजूर घेवून हे अंदाजपत्रक संमत केल्याचे सांगितले.  येथील पालिकेचा 2021-2022 चे अंदाजपत्रक नगराध्यक्ष परब यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत सादर केले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, राजू बेग, मनोज नाईक, उदय नाईक, सुरेंद्र बांदेकर, नासिर शेख, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर आदी उपस्थित होते. या सभेस शिवसेना गटनेते अनारोजीन लोबो, भाजप नगरसेवक ऍड. परीमल नाईक, स्वीकृत नगरसेवक जयेंद्र परुळेकर हे अनुपस्थित होते.  सुरवातीस शिल्लक 36 कोटी 27 लाख 80 हजार 562 रुपये तर एकूण जमा 30 कोटी 47 लाख 53 हजार 100 रुपये एकूण खर्च 36 कोटी 60 लाख 10 हजार रुपये अंदाजपत्रक आहे. तरतुदींमध्ये 64 कोटी 30 लाखाचे अंदाजपत्रक आहे. यावेळी विकासाचे नियोजन करत असताना घनकचरा आणि पाणीपुरवठा यासाठी 50 टक्के खर्च प्रस्तावित करण्यात आला आला.  मुख्याधिकारी म्हणाले, ""30 कोटींचे अंदाजपत्रक मांडत असताना हा आकड्यांचा खेळ नाही तर पाणीपुरवठा योजनेसाठी 46 कोटीची योजना तयार केली आहे. यामध्ये 10 टक्के पालिकेला द्यावे लागणार आहेत. नगरोत्थानमधून या खर्चासाठी नाममात्र भाडेवाढ सुचविली आहे.''  नगरसेवक बांदेकर म्हणाले, की मुळात पाणीपुरवठ्याची टाकी भरत नाही. यावर सुधारणा करण्याऐवजी नागरिकांच्या माथी भाडेवाढ मारली जात असेल तर ते चुकीचे आहे. आपणाकडे नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या भाडेवाढीला आमचा तीव्र विरोध आहे. यावेळी झालेल्या चर्चेत भारती मोरे, मागास कल्याण सभापती वाडकर, श्रीमती सुकी यांनीही विरोध दर्शवला.  नगराध्यक्ष परब म्हणाले, ""19 हजार लिटर पाणी पुरवठा केवळ दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दहा लिटरमध्ये केवळ दोन पैसे इतकी वाढ केली आहे. शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी ही अल्पवाढ अपरिहार्य आहे.'' दरम्यान, नगरसेवक शेख यांनी बांदेकर यांना रोखण्याचा प्रयत्न केला.  नगरसेवक नाईक म्हणाले, तुम्ही तावातावाने का बोलता? अल्पभाडेवाढीचा ठराव मांडण्यात आला असून यावर पुन्हा पुन्हा बोलू नका.'' त्यामुळे बांदेकर आणि नाईक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी सौ. वाडकर म्हणाल्या, की पाण्याची समस्या असताना दरवाढ नको. ही दरवाढीची योग्य वेळ नाही.''  नगरसेवक नेवगीही चर्चेत सहभागी झाले. चर्चेअंती शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेत ठराव 4 विरुद्ध 12 मताने मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष परब म्हणाले, ""यापूर्वी भूमिगत विद्युत वाहिनीसाठी आलेले 11 कोटी आणि संत गाडगेबाबा भाजीमंडईसाठी आलेले पाच कोटी परत जाण्यामध्ये यापूर्वीचे सत्ताधारी कारणीभूत आहेत.''  असा आहे अर्थसंकल्प  अंदाजपत्रकात महसुली जमा 15 कोटी 80 लाख 53 हजार 100 तर महसुली खर्च 15 कोटी 50 हजार इतका दाखवला आहे. भांडवली जमामध्ये 14 कोटी 67 लाख रुपये तर भांडवली खर्च 21 कोटी दहा लाख दहा हजार इतका दाखवला आहे. पालिकेला मालमत्ता करातून दोन कोटी 55 लाख रुपये, पाणी बिलातून एक कोटी 59 लाख रुपये, भाजी मार्केट मधून 32 लाख रुपये, अन्य भाडे 87 लाख रुपये, विकास शुल्क 50 लाख रुपये तर महसुली अनुदान 17 कोटी 56 लाख रुपये इतकी महसुली जमाचे स्त्रोत दाखवले आहेत. महसुली खर्चाच्या प्रमुख स्त्रोतामध्ये मालमत्ता देखभाल खर्च 3 कोटी 90 लाख रुपये, मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांसाठी 25 लाख रुपये, महिला व बाल कल्याणकारी योजनांकरिता 10 लाख रुपये, दिव्यांगाच्या कल्याणकारी योजनांसाठी 20 लाख रुपये, आस्थापन खर्च व निवृत्ती वेतन खर्च आठ कोटी 20 लाख 93 हजार दाखवला आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bGwOZP
Read More
कारखाने जोमात मात्र शेतकरी कोमात ! ऊसतोड मजूर, मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

केत्तूर (सोलापूर) : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगाने पुढे सरकत आहे. गतवर्षी सगळीकडेच चांगला पाऊस झाल्याने उसाचे जास्त उत्पादन झाल्याचे चित्र असले तरी, यावर्षी साखर कारखान्यांकडे ऊसतोड यंत्रणा कमी असल्याने याचा फटका ऊसतोड मजूर घेत आहेत. ते अक्षरशः शेतकऱ्यांची आर्थिक लूटच करीत असल्याचे चित्र आहे व नाइलाजाने शेतकरीही मूग गिळून गप्प आहेत. 

अशा परिस्थितीत कारखान्याशी संबंधित पुढारी व मोठे शेतकरी यांच्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची मात्र गळचेपी होत आहे. सगळी यंत्रणा मोठ्या शेतकऱ्यांकडे ऊसतोड करीत असल्याने लहान शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नाही. त्यामुळे त्यांची मात्र हेळसांड होत आहे. 

आपल्याला ऊसतोड मिळावी म्हणून शेतकरी साखर कारखान्यांकडे हेलपाटे मारून बेजार होत आहेत. आज या, उद्या या म्हणून कारखाना प्रशासन त्यांना पुन्हा माघारी पिटाळत आहे. जरी ऊसतोड मिळाली तरी एका खेपेला 1800 ते 2000 रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जात असून, ऊसतोड मजूर, ड्रायव्हर, मुकादम यांना मासे, मटण याच्या पार्ट्याही द्याव्या लागत आहेत. यापूर्वीच वाढे बांधण्यासाठी टनाला 80 ते 100 रुपये ऊसतोड मजुरांना द्यावे लागत होते. शेतकऱ्यांना या उसाकडे बघण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. 

गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने उलटले तरी देखील आडसाली उसाला अद्याप ऊसतोड मिळत नाही. 17 ते 19 महिने झाले तरी ऊसतोड नसल्याने या उसाच्या साखर उत्पादनात घट होणार आहे. वरचेवर उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. काही ठिकाणी वाढत्या उन्हामुळे आडसाली ऊस वाळून चालला आहे. 

सध्या ऊसतोड मजूर, चालक, मुकादम यांच्याकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे सामान्य शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. ऊसतोड हवी असेल तर ट्रॅक्‍टर मालक, चालक, ऊसतोड मुकादम तसेच ऊसतोड मजुरांना गाठावे लागत आहे व ऊसतोड मजुरांची उठाठेव हांजी- हांजी करताना नाकीनऊ येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी मात्र पुरता बेजार व घायाळ होत आहे. कारखाना प्रशासन मात्र याकडे बघ्याची भूमिका घेत आहे, हे विशेष. 

ऊसतोडणी यंत्रणा अपुरी मात्र गाळप जोमात 
कारखाना सुरू झाल्यापासून सर्वच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असून, कारखान्यांचे गाळप मात्र व्यवस्थित व सुरळीत सुरू आहे. कारखाने जोमात सुरू असले तरी अल्पभूधारक शेतकरी मात्र "कोमात' चालले आहेत. 

उजनी लाभक्षेत्र परिसरातील बहुतांश ऊस तोडणीअभावी अजूनही शेतातच उभा आहे. आता ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात वाढत्या कोरोनाचा फटका बसतो की काय म्हणून आपला ऊस गाळप व्हावा यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. 

ऊसतोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने मजुरांची कमतरता होती, त्याचा फटका आता जाणवू लागला आहे. त्यातच कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने संकटात मात्र वाढ झाली आहे. ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवताना ऊस उत्पादक शेतकरी त्यामुळे हैराण झाला आहे. गतवर्षी झालेल्या जोरदार पावसाचा उसाच्या पिकाला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. एकरी टनेजमध्ये वाढ झाली आहे. सध्या ज्यादा पैसे देऊनही तोड मिळत नसल्याने कारखाना कर्मचारी व शेतकरी यांच्यात वादावादीचे प्रकारही होत आहेत. 

साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सद्य:स्थिती 
उजनी लाभक्षेत्रातील ऊस पट्ट्यात सध्या बारामती ऍग्रो, शेटफळ (ता. इंदापूर), अंबालिका शुगर, बारडगाव (ता. कर्जत), मकाई सहकारी साखर कारखाना, भिलारवाडी (ता. करमाळा), कमलाई शुगर, पांडे (ता. करमाळा) याबरोबरच श्रीराम शुगर, हळगाव (ता. जामखेड) व माढेश्वरी शुगर, माढा हे कारखाने ऊसतोड करीत आहेत तर भैरवनाथ शुगर, विहाळ (ता. करमाळा) ने आपला गाळप हंगाम संपवला आहे. शिल्लक राहिलेला ऊस पाहता गाळप हंगाम एप्रिल किंवा मे अखेरपर्यंत लांबण्याचे चित्र दिसत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कारखाने जोमात मात्र शेतकरी कोमात ! ऊसतोड मजूर, मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केत्तूर (सोलापूर) : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगाने पुढे सरकत आहे. गतवर्षी सगळीकडेच चांगला पाऊस झाल्याने उसाचे जास्त उत्पादन झाल्याचे चित्र असले तरी, यावर्षी साखर कारखान्यांकडे ऊसतोड यंत्रणा कमी असल्याने याचा फटका ऊसतोड मजूर घेत आहेत. ते अक्षरशः शेतकऱ्यांची आर्थिक लूटच करीत असल्याचे चित्र आहे व नाइलाजाने शेतकरीही मूग गिळून गप्प आहेत.  अशा परिस्थितीत कारखान्याशी संबंधित पुढारी व मोठे शेतकरी यांच्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची मात्र गळचेपी होत आहे. सगळी यंत्रणा मोठ्या शेतकऱ्यांकडे ऊसतोड करीत असल्याने लहान शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नाही. त्यामुळे त्यांची मात्र हेळसांड होत आहे.  आपल्याला ऊसतोड मिळावी म्हणून शेतकरी साखर कारखान्यांकडे हेलपाटे मारून बेजार होत आहेत. आज या, उद्या या म्हणून कारखाना प्रशासन त्यांना पुन्हा माघारी पिटाळत आहे. जरी ऊसतोड मिळाली तरी एका खेपेला 1800 ते 2000 रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जात असून, ऊसतोड मजूर, ड्रायव्हर, मुकादम यांना मासे, मटण याच्या पार्ट्याही द्याव्या लागत आहेत. यापूर्वीच वाढे बांधण्यासाठी टनाला 80 ते 100 रुपये ऊसतोड मजुरांना द्यावे लागत होते. शेतकऱ्यांना या उसाकडे बघण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही.  गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने उलटले तरी देखील आडसाली उसाला अद्याप ऊसतोड मिळत नाही. 17 ते 19 महिने झाले तरी ऊसतोड नसल्याने या उसाच्या साखर उत्पादनात घट होणार आहे. वरचेवर उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. काही ठिकाणी वाढत्या उन्हामुळे आडसाली ऊस वाळून चालला आहे.  सध्या ऊसतोड मजूर, चालक, मुकादम यांच्याकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे सामान्य शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. ऊसतोड हवी असेल तर ट्रॅक्‍टर मालक, चालक, ऊसतोड मुकादम तसेच ऊसतोड मजुरांना गाठावे लागत आहे व ऊसतोड मजुरांची उठाठेव हांजी- हांजी करताना नाकीनऊ येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी मात्र पुरता बेजार व घायाळ होत आहे. कारखाना प्रशासन मात्र याकडे बघ्याची भूमिका घेत आहे, हे विशेष.  ऊसतोडणी यंत्रणा अपुरी मात्र गाळप जोमात  कारखाना सुरू झाल्यापासून सर्वच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असून, कारखान्यांचे गाळप मात्र व्यवस्थित व सुरळीत सुरू आहे. कारखाने जोमात सुरू असले तरी अल्पभूधारक शेतकरी मात्र "कोमात' चालले आहेत.  उजनी लाभक्षेत्र परिसरातील बहुतांश ऊस तोडणीअभावी अजूनही शेतातच उभा आहे. आता ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात वाढत्या कोरोनाचा फटका बसतो की काय म्हणून आपला ऊस गाळप व्हावा यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे.  ऊसतोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने मजुरांची कमतरता होती, त्याचा फटका आता जाणवू लागला आहे. त्यातच कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने संकटात मात्र वाढ झाली आहे. ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवताना ऊस उत्पादक शेतकरी त्यामुळे हैराण झाला आहे. गतवर्षी झालेल्या जोरदार पावसाचा उसाच्या पिकाला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. एकरी टनेजमध्ये वाढ झाली आहे. सध्या ज्यादा पैसे देऊनही तोड मिळत नसल्याने कारखाना कर्मचारी व शेतकरी यांच्यात वादावादीचे प्रकारही होत आहेत.  साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सद्य:स्थिती  उजनी लाभक्षेत्रातील ऊस पट्ट्यात सध्या बारामती ऍग्रो, शेटफळ (ता. इंदापूर), अंबालिका शुगर, बारडगाव (ता. कर्जत), मकाई सहकारी साखर कारखाना, भिलारवाडी (ता. करमाळा), कमलाई शुगर, पांडे (ता. करमाळा) याबरोबरच श्रीराम शुगर, हळगाव (ता. जामखेड) व माढेश्वरी शुगर, माढा हे कारखाने ऊसतोड करीत आहेत तर भैरवनाथ शुगर, विहाळ (ता. करमाळा) ने आपला गाळप हंगाम संपवला आहे. शिल्लक राहिलेला ऊस पाहता गाळप हंगाम एप्रिल किंवा मे अखेरपर्यंत लांबण्याचे चित्र दिसत आहे.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sxTuCo
Read More
पुण्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

‘जीएसटी’तील जाचक तरतुदींबाबत केंद्र सरकारवर नाराजी
पुणे - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यातील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आयोजित केलेल्या देशव्यापी व्यापार बंदला शुक्रवारी पुण्यात (ता. २६) चांगला प्रतिसाद मिळाला. उपनगरांतही अनेक ठिकाणे दुकाने बंद होती. 

शहरातील लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, रविवार पेठ, वडारवाडी, पाषाण, सूस, कोथरूड, वारजे, सिंहगड रोड, धायरी, वडगाव  बिबवेवाडी, खराडी, चंदननगर, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, लोहगाव, पौड रोड, बीटी कवडे रोड, मुंढवा, शिवाजीनगर,  कर्वेनगर, शास्त्रीनगर, नांदेड फाटा तसेच जिल्ह्यातील बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती ‘कॅट’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहर आणि परिसरातील घाऊक आणि किरकोळ व्यवसायाची दुकाने बंद होती. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही भागांतील अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकाने सायंकाळी सहानंतर खुली झाली. काही व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा देत काळ्या फिती लावून दुकाने उघडी ठेवली. परंतु, त्यांची संख्या अत्यल्प होती. 

बंदमध्ये पुणे मर्च॔टस चेंबरसह पुणे व्यापारी महासंघातील सदस्य तसेच पिंपरी चिंचवड मधील ३८ व्यापारी संघटना सहभागी झाल्या. कायद्यात नेमक्या काय सुधारणा व्यापाऱ्यांना अपेक्षित आहेत, या बाबत कर सल्लागार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री, व्यापारमंत्री, सेक्रेटरी यांना भेटून निवेदन दिले आहे. त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले आहे, असे कुंभोजकर यांनी सांगितले.

PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला

भुसार बाजारात कडकडीत बंद
मार्केट यार्ड : मार्केटयार्डात दि पूना मर्चंट चेंबरने केलेल्या आवाहनाला घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘कॅट’ महाराष्ट्रचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘‘ जीएसटी करप्रणालीत चार वर्षात सुमारे एक हजार नोटिफिकेशन व सुधारणांमुळे ही कर प्रणाली अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची ठरत आहे.’’

अजित बोरा म्हणाले, ‘‘ नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आपली बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करणे, हे करदात्यावर अन्याय करणारे आहे.’’

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल

निवेदन सादर
दि पूना मर्चंट चेंबर तर्फे जीएसटी कायद्यातील जाचक कायदे रद्द करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी दि पूना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा तसेच प्रवीण चोरबेले उपस्थित होते.

प्रमुख मागण्या 

जीवनाश्यक खाद्यन्न वस्तूंवर जीएसटी नसावा

एकदा भरलेले रिटर्न जर चुकीचे असेल तर ती दुरुस्त करण्याची तरतूद असावी.

विविध प्रकारचे लेजर ठेवण्यापेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे. 

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद ‘जीएसटी’तील जाचक तरतुदींबाबत केंद्र सरकारवर नाराजी पुणे - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यातील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आयोजित केलेल्या देशव्यापी व्यापार बंदला शुक्रवारी पुण्यात (ता. २६) चांगला प्रतिसाद मिळाला. उपनगरांतही अनेक ठिकाणे दुकाने बंद होती.  शहरातील लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, रविवार पेठ, वडारवाडी, पाषाण, सूस, कोथरूड, वारजे, सिंहगड रोड, धायरी, वडगाव  बिबवेवाडी, खराडी, चंदननगर, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, लोहगाव, पौड रोड, बीटी कवडे रोड, मुंढवा, शिवाजीनगर,  कर्वेनगर, शास्त्रीनगर, नांदेड फाटा तसेच जिल्ह्यातील बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती ‘कॅट’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  शहर आणि परिसरातील घाऊक आणि किरकोळ व्यवसायाची दुकाने बंद होती. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही भागांतील अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकाने सायंकाळी सहानंतर खुली झाली. काही व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा देत काळ्या फिती लावून दुकाने उघडी ठेवली. परंतु, त्यांची संख्या अत्यल्प होती.  बंदमध्ये पुणे मर्च॔टस चेंबरसह पुणे व्यापारी महासंघातील सदस्य तसेच पिंपरी चिंचवड मधील ३८ व्यापारी संघटना सहभागी झाल्या. कायद्यात नेमक्या काय सुधारणा व्यापाऱ्यांना अपेक्षित आहेत, या बाबत कर सल्लागार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री, व्यापारमंत्री, सेक्रेटरी यांना भेटून निवेदन दिले आहे. त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले आहे, असे कुंभोजकर यांनी सांगितले. PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला भुसार बाजारात कडकडीत बंद मार्केट यार्ड : मार्केटयार्डात दि पूना मर्चंट चेंबरने केलेल्या आवाहनाला घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘कॅट’ महाराष्ट्रचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘‘ जीएसटी करप्रणालीत चार वर्षात सुमारे एक हजार नोटिफिकेशन व सुधारणांमुळे ही कर प्रणाली अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची ठरत आहे.’’ अजित बोरा म्हणाले, ‘‘ नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आपली बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करणे, हे करदात्यावर अन्याय करणारे आहे.’’ मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल निवेदन सादर दि पूना मर्चंट चेंबर तर्फे जीएसटी कायद्यातील जाचक कायदे रद्द करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी दि पूना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा तसेच प्रवीण चोरबेले उपस्थित होते. प्रमुख मागण्या  जीवनाश्यक खाद्यन्न वस्तूंवर जीएसटी नसावा एकदा भरलेले रिटर्न जर चुकीचे असेल तर ती दुरुस्त करण्याची तरतूद असावी. विविध प्रकारचे लेजर ठेवण्यापेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bGpZaJ
Read More
आठवणींतले कुसुमाग्रज... 

माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझे परमपूज्य आई-वडील, गुरुजन आणि अनेक मार्गदर्शक, तसेच साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च स्थान असलेले आणि माझे श्रद्धास्थान कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा मोलाचा सहभाग आहे. कुसुमाग्रजांची माझी पहिली भेट मी शाळकरी विद्यार्थी असताना झाली. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ कविता शिक्षकांनी शिकवली. कवितेचा अर्थ समजावून सांगताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नाशिकचे असल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर कुसुमाग्रजांना भेटण्याची इच्छा उफाळून आली. मधल्या सुटीत मित्रांशी बोलताना चंदन बेदरकर नावाचा विद्यार्थी मला म्हणाला, ‘अरे अरविंद, आम्ही तात्यासाहेबांच्या शेजारीच राहतो. मी तर रोजच तात्यांना भेटतो.’

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावर मी चंदनला म्हटले, ‘अरे, तू मला तात्यांकडे घेऊन जाशील काय?’ संध्याकाळी तात्यांना भेटायला जायचे ठरले. ठरल्याप्रमाणे मी चंदनबरोबर तात्यांच्या घरी पोचलो. तात्यांनीच दार उघडले. मी झटकन त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. मी चंदनच्याच वर्गात आहे, असे सांगताच ‘व्वा छान’ म्हटले. कोणते विषय विशेष आवडतात असे विचारताच मराठी आणि कविता तर आनंदाची गोष्ट आहे. ‘तुला कोणती कविता आवडते,’ असे तात्यांनी म्हणताच सकाळी शिक्षकांनी शिकवलेली ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ ही कविता म्हटली. तात्यांनी शाबासकी आणि टेबलावरच्या दोन सफरचंदाच्या फोडी दिल्या. मी तात्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. तात्यांचा आशीर्वाद मिळाल्याचा तो परिसस्पर्श आठवला की मन आनंदून जाते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माध्यमिक शिक्षणानंतर पदवीच्या शिक्षणासाठी मी पुण्यास जाण्यासाठी वडिलांचा विरोध होता. मात्र तात्यांच्या संमतीमुळे पुण्याला शिक्षणासाठी पाठविण्यास वडिलांनी होकार दिला. माझ्या वडिलांचा वाढदिवस हा तात्यांच्या वाढदिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीस असे. 

वृत्तपत्र विद्या पदवी प्राप्त केल्यावर मी नाशिकच्या एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ केला. त्यानंतर जुलै १९७७ मध्ये माझी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती झाली. कालांतराने नाशिक विभागासाठी बदली झाली याच काळात ‘सप्तशृंग दर्शन’ पुस्तक लिहिण्याद्वारे ग्रंथलेखनाकडे वळलो. पुस्तकाला तात्यांचा आशीर्वादपर अभिप्राय लाभल्याने मी सुखावलो. माझी १९८६मध्ये पुण्याला बदली झाली. 
दरम्यान, पायी वारी आळंदी ते पंढरपूर अशी करतानाच वारीविषयक संशोधनाचा निश्‍चय केला होता. नाशिकला आल्यावर तात्यासाहेबांना भेटून प्रबंधाची प्रगती सांगितली. तात्यांनी माझ्या अभ्यासाचे आणि परिश्रमाचे कौतुक केले. वर्षभरात प्रबंधाच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पूर्ण होऊन मला डॉक्‍टरेट पदवी मिळाली. हे समजताच तात्यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले. 

माझ्या प्रबंधावरून ‘होय होय वारकरी’, ‘अभंगाची वारी’ ही दोन पुस्तके प्रकाशित केली. नाशिकला गेल्यावर तात्यांना भेटून दोन्ही पुस्तके दिली. याआधी १९९५ मध्ये माझे ‘चिंता आणि चिंतन’ पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याबद्दल आशीर्वादपर अभिप्राय मी पुस्तकाच्या मलपृष्ठावर तात्यांच्या अक्षरातील छायाचित्र घेऊन जसाच्या तसा छापला होता. 

तात्यांच्या वेळोवेळी झालेल्या सर्वच भेटींचे सुवर्णक्षण तब्बल २५-३० वर्षांच्या कालावधीतील आठवणींचा खजिना आहे. तात्यासाहेबांची माझी शेवटची भेट २७ फेब्रुवारी १९९९ रोजी झाली. तात्यांची प्रकृती बरी नसल्याने हॉस्पिटलमधून उपचारांनंतर त्यांना नुकतेच घरी आणले होते. दहा दिवसांनी कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाची सांगता झाली. मराठी मनावर अधिराज्य गाजविणारा हा ज्ञानमहर्षी काळाच्या पडद्याआड गेला. आजही कुसुमाग्रजांच्या सहवासातील ते सुवर्णक्षण आठवताना डोळे पाणावतात.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आठवणींतले कुसुमाग्रज...  माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझे परमपूज्य आई-वडील, गुरुजन आणि अनेक मार्गदर्शक, तसेच साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च स्थान असलेले आणि माझे श्रद्धास्थान कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा मोलाचा सहभाग आहे. कुसुमाग्रजांची माझी पहिली भेट मी शाळकरी विद्यार्थी असताना झाली. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ कविता शिक्षकांनी शिकवली. कवितेचा अर्थ समजावून सांगताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नाशिकचे असल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर कुसुमाग्रजांना भेटण्याची इच्छा उफाळून आली. मधल्या सुटीत मित्रांशी बोलताना चंदन बेदरकर नावाचा विद्यार्थी मला म्हणाला, ‘अरे अरविंद, आम्ही तात्यासाहेबांच्या शेजारीच राहतो. मी तर रोजच तात्यांना भेटतो.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यावर मी चंदनला म्हटले, ‘अरे, तू मला तात्यांकडे घेऊन जाशील काय?’ संध्याकाळी तात्यांना भेटायला जायचे ठरले. ठरल्याप्रमाणे मी चंदनबरोबर तात्यांच्या घरी पोचलो. तात्यांनीच दार उघडले. मी झटकन त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. मी चंदनच्याच वर्गात आहे, असे सांगताच ‘व्वा छान’ म्हटले. कोणते विषय विशेष आवडतात असे विचारताच मराठी आणि कविता तर आनंदाची गोष्ट आहे. ‘तुला कोणती कविता आवडते,’ असे तात्यांनी म्हणताच सकाळी शिक्षकांनी शिकवलेली ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ ही कविता म्हटली. तात्यांनी शाबासकी आणि टेबलावरच्या दोन सफरचंदाच्या फोडी दिल्या. मी तात्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. तात्यांचा आशीर्वाद मिळाल्याचा तो परिसस्पर्श आठवला की मन आनंदून जाते.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा माध्यमिक शिक्षणानंतर पदवीच्या शिक्षणासाठी मी पुण्यास जाण्यासाठी वडिलांचा विरोध होता. मात्र तात्यांच्या संमतीमुळे पुण्याला शिक्षणासाठी पाठविण्यास वडिलांनी होकार दिला. माझ्या वडिलांचा वाढदिवस हा तात्यांच्या वाढदिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीस असे.  वृत्तपत्र विद्या पदवी प्राप्त केल्यावर मी नाशिकच्या एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ केला. त्यानंतर जुलै १९७७ मध्ये माझी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती झाली. कालांतराने नाशिक विभागासाठी बदली झाली याच काळात ‘सप्तशृंग दर्शन’ पुस्तक लिहिण्याद्वारे ग्रंथलेखनाकडे वळलो. पुस्तकाला तात्यांचा आशीर्वादपर अभिप्राय लाभल्याने मी सुखावलो. माझी १९८६मध्ये पुण्याला बदली झाली.  दरम्यान, पायी वारी आळंदी ते पंढरपूर अशी करतानाच वारीविषयक संशोधनाचा निश्‍चय केला होता. नाशिकला आल्यावर तात्यासाहेबांना भेटून प्रबंधाची प्रगती सांगितली. तात्यांनी माझ्या अभ्यासाचे आणि परिश्रमाचे कौतुक केले. वर्षभरात प्रबंधाच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पूर्ण होऊन मला डॉक्‍टरेट पदवी मिळाली. हे समजताच तात्यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले.  माझ्या प्रबंधावरून ‘होय होय वारकरी’, ‘अभंगाची वारी’ ही दोन पुस्तके प्रकाशित केली. नाशिकला गेल्यावर तात्यांना भेटून दोन्ही पुस्तके दिली. याआधी १९९५ मध्ये माझे ‘चिंता आणि चिंतन’ पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याबद्दल आशीर्वादपर अभिप्राय मी पुस्तकाच्या मलपृष्ठावर तात्यांच्या अक्षरातील छायाचित्र घेऊन जसाच्या तसा छापला होता.  तात्यांच्या वेळोवेळी झालेल्या सर्वच भेटींचे सुवर्णक्षण तब्बल २५-३० वर्षांच्या कालावधीतील आठवणींचा खजिना आहे. तात्यासाहेबांची माझी शेवटची भेट २७ फेब्रुवारी १९९९ रोजी झाली. तात्यांची प्रकृती बरी नसल्याने हॉस्पिटलमधून उपचारांनंतर त्यांना नुकतेच घरी आणले होते. दहा दिवसांनी कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाची सांगता झाली. मराठी मनावर अधिराज्य गाजविणारा हा ज्ञानमहर्षी काळाच्या पडद्याआड गेला. आजही कुसुमाग्रजांच्या सहवासातील ते सुवर्णक्षण आठवताना डोळे पाणावतात. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/301dmRT
Read More
भडकलेल्या तेलाचे गृहिणींना 'चटके'

पिंपरी - सोयाबीन व शेंगदाणा या खाद्यतेलांचे भाव वाढल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी सोयाबीन, शेंगदाणा तेलाची एक लिटरची पिशवी ९५ ते ९८ रुपयांना होती. त्यात ३५ रुपये वाढ झाली आहे. यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसांसह मध्यमवर्गीय कुटुंबे देखील मेटाकुटीला आली आहेत, अशी प्रतिक्रिया मोशी प्राधिकरणातील गृहिणी सुनीता रायकर यांनी व्यक्त केली. अनेकांची आर्थिक ओढाताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख मात्र चढताच आहे. स्वयंपाकघरात तेलाचा वापर अनिवार्य आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे. गेल्या वर्षी सूर्यफूल तेलाचा दर ९८ ते १३४ रुपये प्रति लिटर होता. त्यात पुन्हा ४६ रुपयांची वाढ झाली असून, सध्या सूर्यफूल तेलाचा दर लिटरमागे १८० रुपये झाला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पामतेलाने कंबरडे मोडले
सर्वसामान्य आणि गरिबांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच पामतेलाने शंभरी गाठल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. सध्या बाजारात पामतेलाचा दर एक लिटरसाठी ११० ते ११५ रुपयांच्या दरम्यान आहे. गेल्या वर्षी तो ७५ ते ८५ रुपयांच्या आसपास होता. हॉटेल व्यावसायिकांकडून पाम तेलाची सर्वाधिक खरेदी केली जात आहे.

स्वयंपाकात तेल कमी करून कसे चालेल. गोड्या तेलाला महागाईच्या दराची फोडणी मिळाल्याने तळणीचे पदार्थ बनविण्यावर मर्यादा आल्या आहेत. प्रती लिटरचे दर १४० पासून १७० वर गेल्यामुळे चमचमीत पदार्थ आम्ही बनवत नाही. सरकारने गोडेतेल रेशनवर द्यावे.
- शेहनाज शेख (गृहिणी बिजलीनगर, चिंचवड)

वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की

खाद्यतेलाच्या अचानक किंमती वाढल्याने जेवणाच्या थाळीची पंचाईत झाली आहे.
- गौरी साकुरे, खानावळ-आकुर्डी

सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाची सतत वाढ होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक आणि वितरण खर्च वाढला आहे. १५ लिटर तेलाचा डबा १३०० रुपयांवरून २१०० रुपये झाला आहे. दररोज बदलत असलेल्या किमतीमुळे होलसेल खरेदीत नुकसान होत आहे. ग्राहक आणि विक्रेते यांना खाद्यतेलाची दरवाढ परवडत नाही. सरकारच्या धोरणामुळे किरकोळ व्यापारी नुकसानीत आहेत.
- निकिता आतकरे, तेल व्यापारी चिखली

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

भडकलेल्या तेलाचे गृहिणींना 'चटके' पिंपरी - सोयाबीन व शेंगदाणा या खाद्यतेलांचे भाव वाढल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी सोयाबीन, शेंगदाणा तेलाची एक लिटरची पिशवी ९५ ते ९८ रुपयांना होती. त्यात ३५ रुपये वाढ झाली आहे. यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसांसह मध्यमवर्गीय कुटुंबे देखील मेटाकुटीला आली आहेत, अशी प्रतिक्रिया मोशी प्राधिकरणातील गृहिणी सुनीता रायकर यांनी व्यक्त केली. अनेकांची आर्थिक ओढाताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख मात्र चढताच आहे. स्वयंपाकघरात तेलाचा वापर अनिवार्य आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे. गेल्या वर्षी सूर्यफूल तेलाचा दर ९८ ते १३४ रुपये प्रति लिटर होता. त्यात पुन्हा ४६ रुपयांची वाढ झाली असून, सध्या सूर्यफूल तेलाचा दर लिटरमागे १८० रुपये झाला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पामतेलाने कंबरडे मोडले सर्वसामान्य आणि गरिबांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच पामतेलाने शंभरी गाठल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. सध्या बाजारात पामतेलाचा दर एक लिटरसाठी ११० ते ११५ रुपयांच्या दरम्यान आहे. गेल्या वर्षी तो ७५ ते ८५ रुपयांच्या आसपास होता. हॉटेल व्यावसायिकांकडून पाम तेलाची सर्वाधिक खरेदी केली जात आहे. स्वयंपाकात तेल कमी करून कसे चालेल. गोड्या तेलाला महागाईच्या दराची फोडणी मिळाल्याने तळणीचे पदार्थ बनविण्यावर मर्यादा आल्या आहेत. प्रती लिटरचे दर १४० पासून १७० वर गेल्यामुळे चमचमीत पदार्थ आम्ही बनवत नाही. सरकारने गोडेतेल रेशनवर द्यावे. - शेहनाज शेख (गृहिणी बिजलीनगर, चिंचवड) वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की खाद्यतेलाच्या अचानक किंमती वाढल्याने जेवणाच्या थाळीची पंचाईत झाली आहे. - गौरी साकुरे, खानावळ-आकुर्डी सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाची सतत वाढ होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक आणि वितरण खर्च वाढला आहे. १५ लिटर तेलाचा डबा १३०० रुपयांवरून २१०० रुपये झाला आहे. दररोज बदलत असलेल्या किमतीमुळे होलसेल खरेदीत नुकसान होत आहे. ग्राहक आणि विक्रेते यांना खाद्यतेलाची दरवाढ परवडत नाही. सरकारच्या धोरणामुळे किरकोळ व्यापारी नुकसानीत आहेत. - निकिता आतकरे, तेल व्यापारी चिखली Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3pZN79l
Read More
काय हे! स्वॅब अहवालासाठी नागरिकांना करावी लागते प्रतीक्षा

पुणे - कोरोना वेगाने वाढत असतानाही स्वॅब देऊन पाच-पाच दिवसांनंतरही रिपोर्ट मिळत नाहीत, अशी अवस्था महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची असल्याचे शुक्रवारी दिसले. रिपोर्ट मिळेपर्यंत नागरिक मानसिक ताणाखाली असतात, याचा भानही यंत्रणेला नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किंवा कोरोनाची स्पष्ट लक्षणे असणाऱ्या रुग्णांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधून आणि काही केंद्रांमधून ही सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर पाच-पाच दिवस स्वॅबचा रिपोर्ट मिळत नाही, अशी माहिती सणस केंद्रावरील रुग्णांनी केल्या.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निखिल गुजराथी म्हणाले, ‘‘सणस केंद्रावर जाऊन स्वॅब दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचा रिपोर्ट येणे आवश्यक होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही, हे दुसऱ्या दिवशी कळाले नाही. त्यानंतर सातत्याने चार दिवस पाठपुरावा केला. पण, त्यानंतरही पाचव्या दिवशी रिपोर्ट मिळाले.’’

रोहन बोधनकर म्हणाले, ‘‘याच केंद्रावर स्वॅब दिलेला. पण, रिपोर्ट आला नाही, हेच उत्तर चार दिवस मिळत होते. रिपोर्ट येईपर्यंत घराबाहेर पडता येत नव्हते. कारण, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका त्यात आहे. इतर प्रयोगशाळांमधून दुसऱ्या दिवशी रिपोर्ट मिळतो. मग, महापालिकेत पाच-पाच दिवस का लागतात?’

PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला

दहा तासांत तयार होतो अहवाल
पुण्यातील बहुतांश स्वॅब तपासण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले जातात. तेथे दहा तासांत अहवाल तयार होतो. मग, तो केंद्रांना आणि पुढे रुग्णांपर्यंत जाण्यासाठी पाच दिवस का लागतात, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल

...आणि फोन बंद केला
माझ्या नातेवाइकांची कोरोनाची चाचणी केली आहे. रिपोर्ट काय आला हे दोन दिवसांनंतरही कळाले नाही. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. पण, केंद्रावर येऊन विचारा, असे उत्तर दिले. पॉझिटिव्ह असेल तर येताना माझ्या संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग नाही का होणार,’ या प्रश्नानंतर कर्मचारी फोन बंद करतो, अशी आरोग्य विभागाची अवस्था असल्याचा अनुभव आरती कदम सांगतात.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

काय हे! स्वॅब अहवालासाठी नागरिकांना करावी लागते प्रतीक्षा पुणे - कोरोना वेगाने वाढत असतानाही स्वॅब देऊन पाच-पाच दिवसांनंतरही रिपोर्ट मिळत नाहीत, अशी अवस्था महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची असल्याचे शुक्रवारी दिसले. रिपोर्ट मिळेपर्यंत नागरिक मानसिक ताणाखाली असतात, याचा भानही यंत्रणेला नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किंवा कोरोनाची स्पष्ट लक्षणे असणाऱ्या रुग्णांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधून आणि काही केंद्रांमधून ही सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर पाच-पाच दिवस स्वॅबचा रिपोर्ट मिळत नाही, अशी माहिती सणस केंद्रावरील रुग्णांनी केल्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा निखिल गुजराथी म्हणाले, ‘‘सणस केंद्रावर जाऊन स्वॅब दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचा रिपोर्ट येणे आवश्यक होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही, हे दुसऱ्या दिवशी कळाले नाही. त्यानंतर सातत्याने चार दिवस पाठपुरावा केला. पण, त्यानंतरही पाचव्या दिवशी रिपोर्ट मिळाले.’’ रोहन बोधनकर म्हणाले, ‘‘याच केंद्रावर स्वॅब दिलेला. पण, रिपोर्ट आला नाही, हेच उत्तर चार दिवस मिळत होते. रिपोर्ट येईपर्यंत घराबाहेर पडता येत नव्हते. कारण, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका त्यात आहे. इतर प्रयोगशाळांमधून दुसऱ्या दिवशी रिपोर्ट मिळतो. मग, महापालिकेत पाच-पाच दिवस का लागतात?’ PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला दहा तासांत तयार होतो अहवाल पुण्यातील बहुतांश स्वॅब तपासण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले जातात. तेथे दहा तासांत अहवाल तयार होतो. मग, तो केंद्रांना आणि पुढे रुग्णांपर्यंत जाण्यासाठी पाच दिवस का लागतात, असा प्रश्‍न विचारला जात आहे.  मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल ...आणि फोन बंद केला माझ्या नातेवाइकांची कोरोनाची चाचणी केली आहे. रिपोर्ट काय आला हे दोन दिवसांनंतरही कळाले नाही. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. पण, केंद्रावर येऊन विचारा, असे उत्तर दिले. पॉझिटिव्ह असेल तर येताना माझ्या संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग नाही का होणार,’ या प्रश्नानंतर कर्मचारी फोन बंद करतो, अशी आरोग्य विभागाची अवस्था असल्याचा अनुभव आरती कदम सांगतात. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dRmyjW
Read More
आरटीई २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी येत्या ३ मार्चपासून अर्ज करता येणार

पुणे - खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना येत्या बुधवारपासून (ता.३) ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागातर्फे २५ टक्के जागा उपलब्ध असणाऱ्या शाळांना नोंदणीसाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या प्रवेश प्रक्रियेतंर्गत शाळा नोंदणीसाठी कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षी प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत राज्यातील नऊ हजार ४३१ शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी केवळ ९६ हजार ८०१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील ९८५ शाळांनी नोंदणी पूर्ण केली असून त्यातील १४ हजार ७४१ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल

दरम्यान सर्व जिल्ह्यातील शाळांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे जगताप यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा येत्या बुधवारपासून उपलब्ध होणार आहे. पालकांना २१ मार्चपर्यंत हे ऑनलाइन अर्ज भरता येतील, असेही जगताप यांनी सांगितले आहे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आरटीई २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी येत्या ३ मार्चपासून अर्ज करता येणार पुणे - खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना येत्या बुधवारपासून (ता.३) ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागातर्फे २५ टक्के जागा उपलब्ध असणाऱ्या शाळांना नोंदणीसाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या प्रवेश प्रक्रियेतंर्गत शाळा नोंदणीसाठी कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यावर्षी प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत राज्यातील नऊ हजार ४३१ शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी केवळ ९६ हजार ८०१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील ९८५ शाळांनी नोंदणी पूर्ण केली असून त्यातील १४ हजार ७४१ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल दरम्यान सर्व जिल्ह्यातील शाळांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे जगताप यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा येत्या बुधवारपासून उपलब्ध होणार आहे. पालकांना २१ मार्चपर्यंत हे ऑनलाइन अर्ज भरता येतील, असेही जगताप यांनी सांगितले आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/37N0aof
Read More
एजंट उठले जमिनींच्या मुळावर!

भोर, हवेलीतील चित्र; फोनमुळे शेतकरी त्रस्त
खेड-शिवापूर - ‘हॅलो, शेठ तुमच्या त्या साठ गुंठ्याच्या प्लॉटची कागदपत्रे आली होती आमच्याकडे. काय रेट होईल प्लॉटचा?’, असे फोन येऊ लागल्यावर आपली जमीन कोणी विकायला काढली, असा प्रश्न परिसरातील जमीन मालकांना पडू लागला आहे. जमीन मालकांना काहीही कल्पना नसताना एजंट लोक अनेकांच्या जमिनींची कागदपत्रे बाजारात फिरवू लागले आहेत. या प्रकाराने परिसरातील भोर आणि हवेली पट्ट्यातील अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत. जमीन खरेदी विक्री व्यवहाराला लॉकडाऊन संपल्यानंतर काही प्रमाणात तेजी आली आहे. पुणे शहरातील अनेक व्यावासायिक, कंपन्या खेड-शिवापूर परिसरातील भोर आणि हवेलीच्या पट्ट्यात स्थलांतरित होत आहेत. तसेच अनेक जण सेकंड होम, फार्म हाऊससाठी किंवा गुंतवणूक म्हणून या भागात जमीन खरेदी करत आहेत. त्यामुळे या भागात जमीन खरेदी-विक्रीच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे. 

मात्र, या सगळ्या प्रकारात ज्यांना जमीनी विकायच्या नाहीत, अशा लोकांनाही त्रास होऊ लागला आहे.जमीन विकायची नसतानाही एजंट लोक त्यांच्या जमिनीची कागदपत्रे विक्रीसाठी असल्याचे सांगून बाजारात फिरवू लागले आहेत. त्यामुळे अशा जमीन मालकांना ‘तुमच्या अमुक-अमुक गावातील जागेची कागदपत्रे आली होती आपल्याकडे. द्यायचा का प्लॉट? मग काय रेट होईल?’, अशी विचारणा करणारे फोन येऊ लागले आहेत. या प्रकाराने अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केवळ जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून कमिशन मिळविण्यासाठी जमीन एजंट, असे प्रकार करत आहेत. हे एजंट तेवढ्यावरच थांबत नाहीत. तर गावागावातील अनेक शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर या एजंटांचा डोळा आहे. अशी सामाईक क्षेत्र विकण्याची गरज नसतानाही एजंट लोक त्यांच्याशी संपर्क साधतात. जमीन विकण्यास नकार दिल्यावर सामाईक क्षेत्रातील अनेकांपैकी एक जणाचा किंवा त्यांच्या बहिणीचा हिस्सा विकत घ्यायचा आणि मग बाकीचे क्षेत्र विकायला भाग पाडायचे, असे प्रकार होऊ लागले आहेत.

PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला

1) लॉकडाउननंतर जमीन खरेदी-विक्री तेजीत
2) एजंटांचे जमीन विक्रीबाबत मालकांना फोन
3) जमिनींची कागदपत्रे परस्पर बाजारात
4) कमिशन मिळविण्यासाठी एजंटांची खटाटोप
5) शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर डोळा

आमचे सामाईक क्षेत्र आहे. ते क्षेत्र आम्हाला विकायचे नाही, तरीही त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मला अनेक जणांचे क्षेत्र विकायचे आहे का? अशी विचारणा करणारे फोन येऊ लागल्याने मी त्रस्त झालो आहे. आमच्या जमिनीची कागदपत्रे कोणी बाजारात फिरवली, याचा शोध घेऊन मी पोलिसात तक्रार देणार आहे.
- दादा पवार, शेतकरी, खोपी (ता. भोर)

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

एजंट उठले जमिनींच्या मुळावर! भोर, हवेलीतील चित्र; फोनमुळे शेतकरी त्रस्त खेड-शिवापूर - ‘हॅलो, शेठ तुमच्या त्या साठ गुंठ्याच्या प्लॉटची कागदपत्रे आली होती आमच्याकडे. काय रेट होईल प्लॉटचा?’, असे फोन येऊ लागल्यावर आपली जमीन कोणी विकायला काढली, असा प्रश्न परिसरातील जमीन मालकांना पडू लागला आहे. जमीन मालकांना काहीही कल्पना नसताना एजंट लोक अनेकांच्या जमिनींची कागदपत्रे बाजारात फिरवू लागले आहेत. या प्रकाराने परिसरातील भोर आणि हवेली पट्ट्यातील अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत. जमीन खरेदी विक्री व्यवहाराला लॉकडाऊन संपल्यानंतर काही प्रमाणात तेजी आली आहे. पुणे शहरातील अनेक व्यावासायिक, कंपन्या खेड-शिवापूर परिसरातील भोर आणि हवेलीच्या पट्ट्यात स्थलांतरित होत आहेत. तसेच अनेक जण सेकंड होम, फार्म हाऊससाठी किंवा गुंतवणूक म्हणून या भागात जमीन खरेदी करत आहेत. त्यामुळे या भागात जमीन खरेदी-विक्रीच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे.  मात्र, या सगळ्या प्रकारात ज्यांना जमीनी विकायच्या नाहीत, अशा लोकांनाही त्रास होऊ लागला आहे.जमीन विकायची नसतानाही एजंट लोक त्यांच्या जमिनीची कागदपत्रे विक्रीसाठी असल्याचे सांगून बाजारात फिरवू लागले आहेत. त्यामुळे अशा जमीन मालकांना ‘तुमच्या अमुक-अमुक गावातील जागेची कागदपत्रे आली होती आपल्याकडे. द्यायचा का प्लॉट? मग काय रेट होईल?’, अशी विचारणा करणारे फोन येऊ लागले आहेत. या प्रकाराने अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केवळ जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून कमिशन मिळविण्यासाठी जमीन एजंट, असे प्रकार करत आहेत. हे एजंट तेवढ्यावरच थांबत नाहीत. तर गावागावातील अनेक शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर या एजंटांचा डोळा आहे. अशी सामाईक क्षेत्र विकण्याची गरज नसतानाही एजंट लोक त्यांच्याशी संपर्क साधतात. जमीन विकण्यास नकार दिल्यावर सामाईक क्षेत्रातील अनेकांपैकी एक जणाचा किंवा त्यांच्या बहिणीचा हिस्सा विकत घ्यायचा आणि मग बाकीचे क्षेत्र विकायला भाग पाडायचे, असे प्रकार होऊ लागले आहेत. PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला 1) लॉकडाउननंतर जमीन खरेदी-विक्री तेजीत 2) एजंटांचे जमीन विक्रीबाबत मालकांना फोन 3) जमिनींची कागदपत्रे परस्पर बाजारात 4) कमिशन मिळविण्यासाठी एजंटांची खटाटोप 5) शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर डोळा आमचे सामाईक क्षेत्र आहे. ते क्षेत्र आम्हाला विकायचे नाही, तरीही त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मला अनेक जणांचे क्षेत्र विकायचे आहे का? अशी विचारणा करणारे फोन येऊ लागल्याने मी त्रस्त झालो आहे. आमच्या जमिनीची कागदपत्रे कोणी बाजारात फिरवली, याचा शोध घेऊन मी पोलिसात तक्रार देणार आहे. - दादा पवार, शेतकरी, खोपी (ता. भोर) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sBMSTz
Read More