Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 29, 2020

N 95 मास्कचा पुन्हा वापर करणं शक्य आहे का ? संशोधनातून माहिती झाली उघड 

मुंबई : एन 95 मास्कचा आता आपण पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. N95 मास्कला संक्रमणमुक्त म्हणजेच डिसइन्फेक्ट करण्याची नवी पद्धत शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हीट आणि ह्युमिडीटी म्हणजेच उष्ण आणि आर्द्रतेचा संयोग करून एन 95 मास्क आता संक्रमण मुक्त करू शकतो.

एसएलएसी म्हणजेच नॅशनल एक्सीलिरेटर लॅबोरेटरी, स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी आणि यूनिवर्सिटी ऑफ टेक्सासच्या चिकित्सा शाखेतील संशोधकांनी हा शोध लावला असून त्यात उच्च रिलेटिव ह्यूमिडिटी मध्ये एन95 मास्क ला हळूहळू गरम केल्याने त्यातील गुणवत्तेत काहीही परिणाम न होता मास्क च्या आतील SARS-CoV-2 विषाणुला निष्क्रिय होत असल्याचे स्पष्ट झाले.

महत्त्वाची बातमी : भाजपवर निशाणा साधत अनिल देशमुख म्हणालेत; CBI ने आता सांगावं, सुशांतची हत्या होती की आत्महत्या

संशोधकांपैकी वरिष्ठ संशोधक 'स्टिवन चू' यांनी सांगितले की, कोरोना संक्रमण काळात मास्क वापरणे मोठी समस्या बनली आहे. एक डझन पेक्षा अधिक मास्क प्रत्येकाला वापराव लागत असल्याने मास्कचा साठा जमवावा लागतो. खास करून डॉक्टर आणि नर्ससाठी मोठी समस्या उभी राहिली आहे. मात्र या नव्या संशोधनामुळे यावर तोडगा निघाला असून आता केवळ कॉफी ब्रेक मध्ये देखील ते आपल्या मास्कचं निर्जंतूकीकरण करू शकतात.

शोधातील निष्कर्ष 
या नव्या संशोधनात यूनिवर्सिटी ऑफ टेक्सास मधील चिकित्सा शाखेचे विषाणु विज्ञान तज्ञ स्कॉट वीवर आणि स्टैनफोर्ड/एसएलएसी चे प्रोफेसर यी कुई तसेच वाह चिउ यांनी मास्कला संक्रमण-मुक्त करण्यासाठी हीट एंड ह्यूमिडिटी च्या प्रयोगावर आपलं लक्ष केंद्रीत केलं.

प्रयोगासाठी आणलेले नमूने रिलेटिव ह्यूमिडिटी सह 25 से 95 डिग्री सेल्सियस तापमान मध्ये 30 मिनिट गरम केले. 25 सप्टेंबररोजी एसीएस नॅनो पत्रिकेमध्ये या संशोधनातील निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले.

महत्त्वाची बातमी : 'तुम्ही खासदार आहात; बोलताना भान ठेवणं अपेक्षित आहे'; संजय राऊतांना न्यायालयाचा सल्ला

20 वेळा करू शकतो वापर
अधिक आर्द्रता तसेच उष्णतेमुळे मास्कवरील विषाणूंची संख्या कमी झाली आहे. मात्र अधिक तापमानात मास्क जळण्याची भिती देखील होती. मास्कवरील विषाणूला मारण्याच्या प्रयत्नात मास्कसाठी वापरण्यात आलेल्या पदर्थाची क्षमता प्रभावित होण्याची शक्यता होती.

मास्कसाठी 85 डिग्री सेल्सियस हे योग्य तापमान होते​, ज्यात रिलेटिव ह्यूमिडीटी 100 टक्के होती. या तापमानात मास्क ठेवल्यानंतर संशोधकांना मास्कवर कोविड चे विषाणू दिसले नाहीत. इतकेच नाही तर मास्कला किमान 20 वेळा वापरण्या योग्य बनवू शकतो हे ही स्पष्ट झाले. याशिवाय कोरोना सह  ताप तसेच चिकनगुनियासाठी कारणीभूत असणा-या विषाणूंना देखील अशा प्रकारे नष्ट करू शकतो.

reuse of n 95 mask is possible research done by stanford university

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

N 95 मास्कचा पुन्हा वापर करणं शक्य आहे का ? संशोधनातून माहिती झाली उघड  मुंबई : एन 95 मास्कचा आता आपण पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. N95 मास्कला संक्रमणमुक्त म्हणजेच डिसइन्फेक्ट करण्याची नवी पद्धत शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हीट आणि ह्युमिडीटी म्हणजेच उष्ण आणि आर्द्रतेचा संयोग करून एन 95 मास्क आता संक्रमण मुक्त करू शकतो. एसएलएसी म्हणजेच नॅशनल एक्सीलिरेटर लॅबोरेटरी, स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी आणि यूनिवर्सिटी ऑफ टेक्सासच्या चिकित्सा शाखेतील संशोधकांनी हा शोध लावला असून त्यात उच्च रिलेटिव ह्यूमिडिटी मध्ये एन95 मास्क ला हळूहळू गरम केल्याने त्यातील गुणवत्तेत काहीही परिणाम न होता मास्क च्या आतील SARS-CoV-2 विषाणुला निष्क्रिय होत असल्याचे स्पष्ट झाले. महत्त्वाची बातमी : भाजपवर निशाणा साधत अनिल देशमुख म्हणालेत; CBI ने आता सांगावं, सुशांतची हत्या होती की आत्महत्या संशोधकांपैकी वरिष्ठ संशोधक 'स्टिवन चू' यांनी सांगितले की, कोरोना संक्रमण काळात मास्क वापरणे मोठी समस्या बनली आहे. एक डझन पेक्षा अधिक मास्क प्रत्येकाला वापराव लागत असल्याने मास्कचा साठा जमवावा लागतो. खास करून डॉक्टर आणि नर्ससाठी मोठी समस्या उभी राहिली आहे. मात्र या नव्या संशोधनामुळे यावर तोडगा निघाला असून आता केवळ कॉफी ब्रेक मध्ये देखील ते आपल्या मास्कचं निर्जंतूकीकरण करू शकतात. शोधातील निष्कर्ष  या नव्या संशोधनात यूनिवर्सिटी ऑफ टेक्सास मधील चिकित्सा शाखेचे विषाणु विज्ञान तज्ञ स्कॉट वीवर आणि स्टैनफोर्ड/एसएलएसी चे प्रोफेसर यी कुई तसेच वाह चिउ यांनी मास्कला संक्रमण-मुक्त करण्यासाठी हीट एंड ह्यूमिडिटी च्या प्रयोगावर आपलं लक्ष केंद्रीत केलं. प्रयोगासाठी आणलेले नमूने रिलेटिव ह्यूमिडिटी सह 25 से 95 डिग्री सेल्सियस तापमान मध्ये 30 मिनिट गरम केले. 25 सप्टेंबररोजी एसीएस नॅनो पत्रिकेमध्ये या संशोधनातील निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले. महत्त्वाची बातमी : 'तुम्ही खासदार आहात; बोलताना भान ठेवणं अपेक्षित आहे'; संजय राऊतांना न्यायालयाचा सल्ला 20 वेळा करू शकतो वापर अधिक आर्द्रता तसेच उष्णतेमुळे मास्कवरील विषाणूंची संख्या कमी झाली आहे. मात्र अधिक तापमानात मास्क जळण्याची भिती देखील होती. मास्कवरील विषाणूला मारण्याच्या प्रयत्नात मास्कसाठी वापरण्यात आलेल्या पदर्थाची क्षमता प्रभावित होण्याची शक्यता होती. मास्कसाठी 85 डिग्री सेल्सियस हे योग्य तापमान होते​, ज्यात रिलेटिव ह्यूमिडीटी 100 टक्के होती. या तापमानात मास्क ठेवल्यानंतर संशोधकांना मास्कवर कोविड चे विषाणू दिसले नाहीत. इतकेच नाही तर मास्कला किमान 20 वेळा वापरण्या योग्य बनवू शकतो हे ही स्पष्ट झाले. याशिवाय कोरोना सह  ताप तसेच चिकनगुनियासाठी कारणीभूत असणा-या विषाणूंना देखील अशा प्रकारे नष्ट करू शकतो. reuse of n 95 mask is possible research done by stanford university News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EKUTlR
Read More
कोरोनाबाधित रुग्णांना दुधी भोपळा खाण्याचे हे आहेत फायदे !  

औरंगाबाद : संभाव्य व्याधींपासून दूर ठेवणाऱ्या दुधी भोपळ्याला गुणकारी ही उपमा दिली गेली, ती उगाचच नव्हे. त्याच्या आरोग्यवर्धक गुणांमुळेच. हल्ली कोविड-१९ रुग्णांसाठी रक्तदाबाचा त्रास हा धोका ठरत आहे; पण दुधी भोपळ्याचा आहारात समावेश केल्यास उच्चरक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते व संभाव्य धोक्यापासून आपण दूर राहू शकतो. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दुधी भोपळ्याचा रस थंडीच्या दिवसात अधिक लाभदायक असतो. दुधी भोपळ्यात विषनाशक गुण असतात. यात १२ टक्के पाण्याचे प्रमाण असून याची चव इतर भाज्यांपेक्षा निराळी असते. नियमित व्यायाम, शारीरिक श्रमानंतर रोज १०० ग्राम दुधी भोपळ्याचा रस प्या, त्यामुळे पोट भरल्यासारखे राहते व भूक लागत नाही परिणामी वजन नियंत्रित राहते. दुधी भोपळ्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस प्रथिने असतात. वजन कमी करण्यास सायंकाळी दुधी भोपळ्याचे सुप पिल्याने फायदा होतो. उष्णतेचा त्रास होत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात खडीसाखर टाकून पिल्याने त्रास कमी होतो.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ताप आल्यानंतर दुधी भोपळ्याचे सूप पिणे गुणकारी ठरते. ताप वाढत असल्यास दुधी भोपळ्याचा कीस कपाळी लावल्यास फायदा होतो. शांत झोपेसाठीही दुधी भोपळ्याचे तेल डोके व तळव्यांना लावल्यास आराम मिळतो. भोपळा पित्तनाशक असून डोके दुखत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात मध घालून प्यायला हवा. गर्भवती महिलांनी आहारात दुधी भोपळ्याचा समावेश केल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. लहान मुलांसाठीही दुधी भोपळा आरोग्यदायी असून विस्मरणावर परिणामकारक आहे. बुद्धी तल्लख होते; पण दुधी भोपळा उकडून व चांगला शिजवून खायला हवा. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भोपळा उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवतो :
जर आपण नियमितपणे एक ग्लास दुधी भोपळ्याचे रस पीत असाल तर आपली उच्चरक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात नियंत्रित राहील. हा रस दररोज २०० ग्राम प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. 

असा हा गुणकारी भोपळा 

-भोपळ्याच्या रसात अधिक मात्रेत पाणी असते, ते शरीर थंड ठेवते. 

-लघवीत जळजळ होत असेल तर दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस सेवन करावा. 

-दुधी भोपळा केसांवरही गुणकारी आहे. 

-केस पांढरे होणे व गळणे या समस्येसाठी दुधी भोपळ्याचा रस प्यावा. 

-या रसात तिळाच्या तेलाचे मिश्रण करून केसांच्या मुळाशी लावल्याने केस गळती कमी होते. 

- रोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस पिल्यास पचनक्षमता वाढण्यास मदत होते. 

-पोटाचे आजार कमी करण्यास मदत होते.

(संपादन-प्रताप अवचार) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाबाधित रुग्णांना दुधी भोपळा खाण्याचे हे आहेत फायदे !   औरंगाबाद : संभाव्य व्याधींपासून दूर ठेवणाऱ्या दुधी भोपळ्याला गुणकारी ही उपमा दिली गेली, ती उगाचच नव्हे. त्याच्या आरोग्यवर्धक गुणांमुळेच. हल्ली कोविड-१९ रुग्णांसाठी रक्तदाबाचा त्रास हा धोका ठरत आहे; पण दुधी भोपळ्याचा आहारात समावेश केल्यास उच्चरक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते व संभाव्य धोक्यापासून आपण दूर राहू शकतो.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! दुधी भोपळ्याचा रस थंडीच्या दिवसात अधिक लाभदायक असतो. दुधी भोपळ्यात विषनाशक गुण असतात. यात १२ टक्के पाण्याचे प्रमाण असून याची चव इतर भाज्यांपेक्षा निराळी असते. नियमित व्यायाम, शारीरिक श्रमानंतर रोज १०० ग्राम दुधी भोपळ्याचा रस प्या, त्यामुळे पोट भरल्यासारखे राहते व भूक लागत नाही परिणामी वजन नियंत्रित राहते. दुधी भोपळ्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस प्रथिने असतात. वजन कमी करण्यास सायंकाळी दुधी भोपळ्याचे सुप पिल्याने फायदा होतो. उष्णतेचा त्रास होत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात खडीसाखर टाकून पिल्याने त्रास कमी होतो. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ताप आल्यानंतर दुधी भोपळ्याचे सूप पिणे गुणकारी ठरते. ताप वाढत असल्यास दुधी भोपळ्याचा कीस कपाळी लावल्यास फायदा होतो. शांत झोपेसाठीही दुधी भोपळ्याचे तेल डोके व तळव्यांना लावल्यास आराम मिळतो. भोपळा पित्तनाशक असून डोके दुखत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात मध घालून प्यायला हवा. गर्भवती महिलांनी आहारात दुधी भोपळ्याचा समावेश केल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. लहान मुलांसाठीही दुधी भोपळा आरोग्यदायी असून विस्मरणावर परिणामकारक आहे. बुद्धी तल्लख होते; पण दुधी भोपळा उकडून व चांगला शिजवून खायला हवा.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. भोपळा उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवतो : जर आपण नियमितपणे एक ग्लास दुधी भोपळ्याचे रस पीत असाल तर आपली उच्चरक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात नियंत्रित राहील. हा रस दररोज २०० ग्राम प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.  असा हा गुणकारी भोपळा  -भोपळ्याच्या रसात अधिक मात्रेत पाणी असते, ते शरीर थंड ठेवते.  -लघवीत जळजळ होत असेल तर दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस सेवन करावा.  -दुधी भोपळा केसांवरही गुणकारी आहे.  -केस पांढरे होणे व गळणे या समस्येसाठी दुधी भोपळ्याचा रस प्यावा.  -या रसात तिळाच्या तेलाचे मिश्रण करून केसांच्या मुळाशी लावल्याने केस गळती कमी होते.  - रोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस पिल्यास पचनक्षमता वाढण्यास मदत होते.  -पोटाचे आजार कमी करण्यास मदत होते. (संपादन-प्रताप अवचार)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n635yb
Read More
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणूक पुन्हा लांबली

ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्याने राज्यातील सहकारी संस्थाच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत या निवडणुका पुढे गेल्याने जिल्हा बॅंकेसह सुमारे साडेचारशे सहकारी संस्थाच्या निवडणुका अडकल्या आहेत. शासनाने सलग तिसऱ्या वेळी हा निर्णय घेतला आहे. 

राज्य शासनाने क्रांतीज्योती महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना ही कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यामुळे 27 जानेवारीला आदेश काढत तीन महिन्यांसाठी निवडणुका पुढे नेल्या होत्या. एप्रिलपर्यंत ही स्थगिती असताना मार्चमध्ये कोरोनाचा जोरदार शिरकाव झाला. त्यामुळे एप्रिलमध्ये पुन्हा कोरोना विषाणुमुळे या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या. आता 28 सप्टेंबरला पुन्हा नव्याने आदेश काढत शासनाने 31 डिसेंबरपर्यंत तिसऱ्या वेळी निवडणुका पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश शासनाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी काढले आहेत. 

राज्यातील कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. सहकारी संस्था निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शी होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 93 कक मधील तरतूदीनुसार उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेशीत केलेल्या सहकारी संस्था निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत घेण्यात येवू नयेत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

106 संस्थाच्या प्रक्रिया होवून थांबल्या 
जिल्ह्यात एकूण एक हजार 223 संस्था आहेत. यात अ वर्गामध्ये एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंक आहे. या बॅंकेची मुदत मेमध्ये संपली आहे. ब वर्गात 279 संस्था असून यातील 180 संस्थाच्या निवडणुका 2020 मध्ये होणार होत्या. क वर्गात 223 संस्थांपैकी 114 तर ड वर्गातील 720 पैकी 211 अशा एकूण 506 संस्थाच्या निवडणुका 2020 मध्ये होणार होत्या. यातील थोड्याच संस्थाच्या 27 जानेवारीपूर्वी निवडणुका झाल्या आहेत. साडेचारशे संस्थाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यातील 34 संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. 72 संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. उर्वरित संस्थाची प्रक्रिया सुरुच झालेली नाही.

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणूक पुन्हा लांबली ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्याने राज्यातील सहकारी संस्थाच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत या निवडणुका पुढे गेल्याने जिल्हा बॅंकेसह सुमारे साडेचारशे सहकारी संस्थाच्या निवडणुका अडकल्या आहेत. शासनाने सलग तिसऱ्या वेळी हा निर्णय घेतला आहे.  राज्य शासनाने क्रांतीज्योती महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना ही कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यामुळे 27 जानेवारीला आदेश काढत तीन महिन्यांसाठी निवडणुका पुढे नेल्या होत्या. एप्रिलपर्यंत ही स्थगिती असताना मार्चमध्ये कोरोनाचा जोरदार शिरकाव झाला. त्यामुळे एप्रिलमध्ये पुन्हा कोरोना विषाणुमुळे या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या. आता 28 सप्टेंबरला पुन्हा नव्याने आदेश काढत शासनाने 31 डिसेंबरपर्यंत तिसऱ्या वेळी निवडणुका पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश शासनाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी काढले आहेत.  राज्यातील कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. सहकारी संस्था निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शी होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 93 कक मधील तरतूदीनुसार उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेशीत केलेल्या सहकारी संस्था निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत घेण्यात येवू नयेत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.  106 संस्थाच्या प्रक्रिया होवून थांबल्या  जिल्ह्यात एकूण एक हजार 223 संस्था आहेत. यात अ वर्गामध्ये एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंक आहे. या बॅंकेची मुदत मेमध्ये संपली आहे. ब वर्गात 279 संस्था असून यातील 180 संस्थाच्या निवडणुका 2020 मध्ये होणार होत्या. क वर्गात 223 संस्थांपैकी 114 तर ड वर्गातील 720 पैकी 211 अशा एकूण 506 संस्थाच्या निवडणुका 2020 मध्ये होणार होत्या. यातील थोड्याच संस्थाच्या 27 जानेवारीपूर्वी निवडणुका झाल्या आहेत. साडेचारशे संस्थाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यातील 34 संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. 72 संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. उर्वरित संस्थाची प्रक्रिया सुरुच झालेली नाही. संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n4V5gU
Read More
वरची देवलीत अवैध वाळू उपसा

मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील वरची देवली वाघवणे येथे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू उपशासाठी परराज्यातील कामगार दाखल झाले आहेत. हे कामगार क्वारंटाईन न राहता खाडीपात्रात वाळू उपशास उतरत आहेत. पुलालगत उपसा होत असल्याने पुलाला धोका आहे. खाडीपात्रात होड्यांची संख्या वाढली असून मेरिटाईम बोर्डाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

वरची देवली, खालची देवली भागात सध्या अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. या भागातील वाळू पट्ट्याचा लिलाव झाला नसतानाही वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. वाळू उपशाच्या कामासाठी सध्या मोठ्या प्रमाणात कामगारही गावात दाखल झाले आहेत; मात्र ते क्वारंटाइन न राहता थेट खाडीपात्रात वाळू काढण्यास उतरत असल्याचे दिसून आले आहे.

शिवाय गावातही त्यांचा बिनधास्त वावर सुरू आहे. वाळू उपसा करणाऱ्या डंपरवर कारवाई होताना दिसते; मात्र वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर प्रशासन केव्हा कारवाई करणार? सध्या खाडीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होड्या उतरविण्यात आल्या असून होड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. 

कारवाईची गरज 
याकडे मेरिटाईम बोर्डाचे दुर्लक्ष असून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. वाळूच्या बेसुमार उपशामुळे देवली पुलाला धोका निर्माण झाला आहे. वाळू उपशामुळे खार बंधाराही खचला असून त्यामुळे भविष्यात लोकवस्ती, शेती, माड बागायतीस धोका आहे. त्यामुळे महसूल, मेरिटाईम बोर्डाने याची तत्काळ दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वरची देवलीत अवैध वाळू उपसा मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील वरची देवली वाघवणे येथे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू उपशासाठी परराज्यातील कामगार दाखल झाले आहेत. हे कामगार क्वारंटाईन न राहता खाडीपात्रात वाळू उपशास उतरत आहेत. पुलालगत उपसा होत असल्याने पुलाला धोका आहे. खाडीपात्रात होड्यांची संख्या वाढली असून मेरिटाईम बोर्डाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  वरची देवली, खालची देवली भागात सध्या अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. या भागातील वाळू पट्ट्याचा लिलाव झाला नसतानाही वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. वाळू उपशाच्या कामासाठी सध्या मोठ्या प्रमाणात कामगारही गावात दाखल झाले आहेत; मात्र ते क्वारंटाइन न राहता थेट खाडीपात्रात वाळू काढण्यास उतरत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय गावातही त्यांचा बिनधास्त वावर सुरू आहे. वाळू उपसा करणाऱ्या डंपरवर कारवाई होताना दिसते; मात्र वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर प्रशासन केव्हा कारवाई करणार? सध्या खाडीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होड्या उतरविण्यात आल्या असून होड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे.  कारवाईची गरज  याकडे मेरिटाईम बोर्डाचे दुर्लक्ष असून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. वाळूच्या बेसुमार उपशामुळे देवली पुलाला धोका निर्माण झाला आहे. वाळू उपशामुळे खार बंधाराही खचला असून त्यामुळे भविष्यात लोकवस्ती, शेती, माड बागायतीस धोका आहे. त्यामुळे महसूल, मेरिटाईम बोर्डाने याची तत्काळ दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30hmgv6
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 सप्टेंबर

पंचांग -
बुधवार - अधिक अश्‍विन शु.14, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सायं. 5.45, चंद्रास्त प. 5.04, भारतीय सौर 8, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९३ : मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील उमरगा, किल्लारी व औसा परिसरात भीषण भूकंप. आठ गावे भुईसपाट झाली.  वीस हजारांपेक्षा जास्त लोक ठार तर दहा हजार लोक जखमी झाले.
२००० : देशातील रासायनिक उद्योगक्षेत्राच्या प्रगतीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशन अँड केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्ड (सीईडब्ल्यू) या संस्थेतर्फे ‘हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार जाहीर.
२००० : ‘जागर’ नाट्यसंस्थेचे संस्थापक, हौशी रंगभूमीवरील जाणकार दिग्दर्शक व वास्तुशिल्पकार अशोक अनंत जोशी यांचे निधन.
२००१ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव जिवाजीराव शिंदे यांचे विमान अपघातात निधन.
२००४ : हैदराबाद मुक्तिसंग्रामातील धुरंधर, लढवय्ये आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विजयेंद्र काबरा यांचे निधन. 
२००४ : लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे आणि ज्येष्ठ नृत्य कलावंत रोहिणी भाटे यांना डेक्कन कॉलेजतर्फे ‘डॉक्‍टर ऑफ लेटर्स’ ही सन्माननीय पदवी जाहीर.

दिनमान -
मेष : अधिकारपद लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.
वृषभ : नावलौकिक व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 
मिथुन : कामानिमित्त छोटे प्रवास होतील. साहित्याच्या क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. 
कर्क : महत्त्वाची कामे, प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत. आत्मविश्‍वास कमी राहील.
सिंह : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. 
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. 
तुळ : अधिकारपद लाभेल. मोठमोठ्या व्यक्तींच्या ओळखी होतील. आर्थिक लाभ होईल.
वृश्‍चिक : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. 
धनु : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींना गुरूकृपा लाभेल. सुसंधी लाभतील.
मकर : उधारी, उसनवारी वसूल होईल. उमेद वाढेल. आपली मते इतरांना पटवून द्याल. 
कुंभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.  
मीन : मनस्ताप होणाऱ्या घटना घडतील. ऐशारामाकडे कल राहील. संकटे उद्भवतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 सप्टेंबर पंचांग - बुधवार - अधिक अश्‍विन शु.14, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सायं. 5.45, चंद्रास्त प. 5.04, भारतीय सौर 8, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९९३ : मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील उमरगा, किल्लारी व औसा परिसरात भीषण भूकंप. आठ गावे भुईसपाट झाली.  वीस हजारांपेक्षा जास्त लोक ठार तर दहा हजार लोक जखमी झाले. २००० : देशातील रासायनिक उद्योगक्षेत्राच्या प्रगतीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशन अँड केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्ड (सीईडब्ल्यू) या संस्थेतर्फे ‘हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार जाहीर. २००० : ‘जागर’ नाट्यसंस्थेचे संस्थापक, हौशी रंगभूमीवरील जाणकार दिग्दर्शक व वास्तुशिल्पकार अशोक अनंत जोशी यांचे निधन. २००१ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव जिवाजीराव शिंदे यांचे विमान अपघातात निधन. २००४ : हैदराबाद मुक्तिसंग्रामातील धुरंधर, लढवय्ये आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विजयेंद्र काबरा यांचे निधन.  २००४ : लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे आणि ज्येष्ठ नृत्य कलावंत रोहिणी भाटे यांना डेक्कन कॉलेजतर्फे ‘डॉक्‍टर ऑफ लेटर्स’ ही सन्माननीय पदवी जाहीर. दिनमान - मेष : अधिकारपद लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. वृषभ : नावलौकिक व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.  मिथुन : कामानिमित्त छोटे प्रवास होतील. साहित्याच्या क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.  कर्क : महत्त्वाची कामे, प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत. आत्मविश्‍वास कमी राहील. सिंह : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.  कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.  तुळ : अधिकारपद लाभेल. मोठमोठ्या व्यक्तींच्या ओळखी होतील. आर्थिक लाभ होईल. वृश्‍चिक : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.  धनु : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींना गुरूकृपा लाभेल. सुसंधी लाभतील. मकर : उधारी, उसनवारी वसूल होईल. उमेद वाढेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.  कुंभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.   मीन : मनस्ताप होणाऱ्या घटना घडतील. ऐशारामाकडे कल राहील. संकटे उद्भवतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2So8suN
Read More
घ्या जाणून ! वाहन विमा कंपनी क्लेम का फेटाळते? 

औरंगाबाद : वाहनाचा विमा उतरवला म्हणजे तुम्ही निर्धास्त होऊ शकत नाही. कारण विमा कंपनीने अनेक हक्क राखून ठेवलेले असतात. काही हक्क कायदेशीर पद्धतीने विमा कंपनीला मिळालेले आहेत. त्यामुळेच वाहनचालक, मालकाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यात कसूर झाला तर विमा कंपनी तुमचा दावा फेटाळून लावू शकते. दावा केवळ वाहनापुरता असेल तर ठीक; पण मृत्यूचा दावा असेल तर मात्र आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते हे समजून घेण्याची गरज आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
वाहनाचा विमा वेळेत नोंदवणे ही चांगली बाब आहे. मात्र, वैध विमा असला म्हणजे झाले असे नाही. त्याच्या जोडीला वैध वाहन परवाना, वाहनाचे वैध कागदपत्र आणि वाहनाची योग्य परिस्थिती (फिटनेस) अशा अनेक बाबा महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय विमा कंपनी क्लेम मंजूर करतच नाही. 

वाहनचालक परवाना 
वाहनाचा विमा असला तरीही योग्य आणि वैध वाहन परवाना आवश्यक असतो. वाहनाच्या अपघाताच्या वेळी चालकाजवळ योग्य परवाना आवश्यक आहे. टू व्हीलर, थ्री व्हीलर टीआर, फोर व्हीलर एलएमव्ही, फोर व्हीलर टीआर, अवजड वाहतूक ट्रान्स व अन्य अशा विविध प्रकारचे परवाने असतात. चालकाजवळ यातील योग्य आणि वैध परवाना (वेळीच नूतनीकरण केलेला) आवश्यक असतो. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा कंपनी वैध विमा असतानाही दावा फेटाळून लावते. त्यामुळे वेळेत वाहन परवाना नूतनीकरण करा. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वाहनाचे कागदपत्र 
विमा दावा करताना वैध वाहनचालक परवाना, वैध विमा प्रमाणपत्र, वैध नोंदणी प्रमाणपत्र, वैध कर प्रमाणपत्र, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), परिवहन वाहनासाठी वैध परवाना, परिवहन वाहनासाठी वैध योग्यता प्रमाणपत्र, विमा कंपनीच्या प्राधिकृत सर्वेयरचा रिपोर्ट आवश्यक आहे. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा क्लेम नाकारला जातो. 

मद्य प्राशन केले असेल तर... 
अपघाताच्या वेळी चालकाने मद्य प्राशन केलेले असेल तर विमा कंपनीला दावा फेटाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारात कुठलेही न्यायालय तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही. अपघातानंतर चालक अथवा प्रवासी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले तर रुग्णालय ही माहिती पोलिसांना देते. दारूचा अंमल रेकॉर्डवर आल्यानंतर विमा कंपनी दावा फेटाळून लावते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खासगी वाहन, व्यावसायिक वापर 
वैयक्तिक खासगी वापराचे वाहन (पांढरी पाटी) व्यावसायिक कामासाठी (पिवळी पाटी) वापरता येत नाही. जर तुम्ही तसे केले आणि गाडीला अपघात झाला तर विमा कंपनी तुमचे दावे फेटाळून लावेल. तसेच ओव्हरशीट असेल तरीही कंपनी दावा फेटाळून लावते. 

 

वाहनाचा उपयोग नियमाप्रमाणे होत नसल्यास आणि वैध योग्य परवाना, कागदपत्र नसले तर किंवा ओव्हरशीट, मद्यप्राशन करून वाहन चालवणे यामुळे दावा फेटाळला जाऊ शकतो; मात्र त्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करता येतो. 
-ॲड. संदेशकुमार शिंदे, मोटार अपघात दावे तज्ज्ञ 

(संपादन-प्रताप अवचार) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घ्या जाणून ! वाहन विमा कंपनी क्लेम का फेटाळते?  औरंगाबाद : वाहनाचा विमा उतरवला म्हणजे तुम्ही निर्धास्त होऊ शकत नाही. कारण विमा कंपनीने अनेक हक्क राखून ठेवलेले असतात. काही हक्क कायदेशीर पद्धतीने विमा कंपनीला मिळालेले आहेत. त्यामुळेच वाहनचालक, मालकाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यात कसूर झाला तर विमा कंपनी तुमचा दावा फेटाळून लावू शकते. दावा केवळ वाहनापुरता असेल तर ठीक; पण मृत्यूचा दावा असेल तर मात्र आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते हे समजून घेण्याची गरज आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! वाहनाचा विमा वेळेत नोंदवणे ही चांगली बाब आहे. मात्र, वैध विमा असला म्हणजे झाले असे नाही. त्याच्या जोडीला वैध वाहन परवाना, वाहनाचे वैध कागदपत्र आणि वाहनाची योग्य परिस्थिती (फिटनेस) अशा अनेक बाबा महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय विमा कंपनी क्लेम मंजूर करतच नाही.  वाहनचालक परवाना  वाहनाचा विमा असला तरीही योग्य आणि वैध वाहन परवाना आवश्यक असतो. वाहनाच्या अपघाताच्या वेळी चालकाजवळ योग्य परवाना आवश्यक आहे. टू व्हीलर, थ्री व्हीलर टीआर, फोर व्हीलर एलएमव्ही, फोर व्हीलर टीआर, अवजड वाहतूक ट्रान्स व अन्य अशा विविध प्रकारचे परवाने असतात. चालकाजवळ यातील योग्य आणि वैध परवाना (वेळीच नूतनीकरण केलेला) आवश्यक असतो. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा कंपनी वैध विमा असतानाही दावा फेटाळून लावते. त्यामुळे वेळेत वाहन परवाना नूतनीकरण करा.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वाहनाचे कागदपत्र  विमा दावा करताना वैध वाहनचालक परवाना, वैध विमा प्रमाणपत्र, वैध नोंदणी प्रमाणपत्र, वैध कर प्रमाणपत्र, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), परिवहन वाहनासाठी वैध परवाना, परिवहन वाहनासाठी वैध योग्यता प्रमाणपत्र, विमा कंपनीच्या प्राधिकृत सर्वेयरचा रिपोर्ट आवश्यक आहे. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा क्लेम नाकारला जातो.  मद्य प्राशन केले असेल तर...  अपघाताच्या वेळी चालकाने मद्य प्राशन केलेले असेल तर विमा कंपनीला दावा फेटाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारात कुठलेही न्यायालय तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही. अपघातानंतर चालक अथवा प्रवासी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले तर रुग्णालय ही माहिती पोलिसांना देते. दारूचा अंमल रेकॉर्डवर आल्यानंतर विमा कंपनी दावा फेटाळून लावते.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. खासगी वाहन, व्यावसायिक वापर  वैयक्तिक खासगी वापराचे वाहन (पांढरी पाटी) व्यावसायिक कामासाठी (पिवळी पाटी) वापरता येत नाही. जर तुम्ही तसे केले आणि गाडीला अपघात झाला तर विमा कंपनी तुमचे दावे फेटाळून लावेल. तसेच ओव्हरशीट असेल तरीही कंपनी दावा फेटाळून लावते.    वाहनाचा उपयोग नियमाप्रमाणे होत नसल्यास आणि वैध योग्य परवाना, कागदपत्र नसले तर किंवा ओव्हरशीट, मद्यप्राशन करून वाहन चालवणे यामुळे दावा फेटाळला जाऊ शकतो; मात्र त्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करता येतो.  -ॲड. संदेशकुमार शिंदे, मोटार अपघात दावे तज्ज्ञ  (संपादन-प्रताप अवचार)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jgFite
Read More
मांगेली सरपंच अखेर पायउतार, भाजपला धक्का

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव अखेर संमत झाला. श्री. गवस यांना केवळ त्यांचेच मत मिळाले. अविश्‍वास ठराव आठ विरुद्ध एक मताने संमत झाला. श्री. गवस पायउतार होणे हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. यापुर्वी आयी येथील भाजपच्या प्रार्थना मुरगोडी यांच्या विरोधातही अविश्‍वास ठराव मंजूर झाला आहे. भाजपने थेट लोकांमधून निवडून आलेल्या दोघा सरपंचांना गमावले आहे. 

श्री. गवस यांच्याविरुद्ध उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी ठरावावर सुनावणी घेण्यासाठी सोमवारी (ता.28) मांगेली ग्रामपंचायतीत विशेष बैठक बोलावली होती. त्यावेळी उपसरपंच विश्‍वनाथ गवस, सदस्य एकनाथ गवस, संतोष गवस, वेदिका गवस, सुचिता गवस, पूनम गवस, विनिता गवस आणि सेजल वर्णेकर यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने तर श्री. गवस यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे ठराव एक विरुद्ध आठ मतांनी संमत झाला. यावेळी माजी सरपंच विजय गवस, विजय गवस, विजय गवस, दीपक गवस, ज्ञानेश्‍वर गवस आदी उपस्थित होते. श्री. गवस भाजयुमोचे तालुका सचिव तर सरपंच संघटनेचे तालुका सहसचिव होते. निवडून आल्यानंतर सरपंच म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीवर सर्व सदस्य नाराज होते. 

वरिष्ठांनी गांभीर्याने घ्यावे 
भाजपची जिल्ह्यात सत्ता आहे, असे असताना तालुक्‍यातील भाजपचे सरपंच एकामागोमाग पायउतार होत आहेत. ही पक्षासाठी भूषणावह गोष्ट नाही. जिल्हास्तरीय पक्ष नेतृत्व कमी पडत असल्याने आणि ज्यांनी पक्षाला बळ दिले त्यांना अडचणीच्या काळात सहकार्य मिळत नसल्याने असे प्रकार होत आहेत. त्याबद्दल पंचायत समिती सदस्य बाळा नाईक आणि उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांनी आता तरी गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मांगेली सरपंच अखेर पायउतार, भाजपला धक्का साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव अखेर संमत झाला. श्री. गवस यांना केवळ त्यांचेच मत मिळाले. अविश्‍वास ठराव आठ विरुद्ध एक मताने संमत झाला. श्री. गवस पायउतार होणे हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. यापुर्वी आयी येथील भाजपच्या प्रार्थना मुरगोडी यांच्या विरोधातही अविश्‍वास ठराव मंजूर झाला आहे. भाजपने थेट लोकांमधून निवडून आलेल्या दोघा सरपंचांना गमावले आहे.  श्री. गवस यांच्याविरुद्ध उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी ठरावावर सुनावणी घेण्यासाठी सोमवारी (ता.28) मांगेली ग्रामपंचायतीत विशेष बैठक बोलावली होती. त्यावेळी उपसरपंच विश्‍वनाथ गवस, सदस्य एकनाथ गवस, संतोष गवस, वेदिका गवस, सुचिता गवस, पूनम गवस, विनिता गवस आणि सेजल वर्णेकर यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने तर श्री. गवस यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे ठराव एक विरुद्ध आठ मतांनी संमत झाला. यावेळी माजी सरपंच विजय गवस, विजय गवस, विजय गवस, दीपक गवस, ज्ञानेश्‍वर गवस आदी उपस्थित होते. श्री. गवस भाजयुमोचे तालुका सचिव तर सरपंच संघटनेचे तालुका सहसचिव होते. निवडून आल्यानंतर सरपंच म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीवर सर्व सदस्य नाराज होते.  वरिष्ठांनी गांभीर्याने घ्यावे  भाजपची जिल्ह्यात सत्ता आहे, असे असताना तालुक्‍यातील भाजपचे सरपंच एकामागोमाग पायउतार होत आहेत. ही पक्षासाठी भूषणावह गोष्ट नाही. जिल्हास्तरीय पक्ष नेतृत्व कमी पडत असल्याने आणि ज्यांनी पक्षाला बळ दिले त्यांना अडचणीच्या काळात सहकार्य मिळत नसल्याने असे प्रकार होत आहेत. त्याबद्दल पंचायत समिती सदस्य बाळा नाईक आणि उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांनी आता तरी गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SaYgpc
Read More
रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद 

कणकवली (सिंधुदुर्ग) - लॉकडाउनमुळे प्रवासी मजुरांसह बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गमावल्या. ज्यामुळे त्यांना रोजीरोटीपासून अन्नापर्यंतची समस्या होती. अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत मोफत रेशन जाहीर केले. त्याअंतर्गत कोणत्याही राज्यात राहणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. केंद्रीय अन्न मंत्रालयाने रेशन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी अंतिम तारीख उद्यापर्यंत (ता.30) दिली आहे. आधार लिंक नसल्यास मोफत धान्य वितरण बंद होणार आहे. 

कोरोना रोखण्यासाठी देश लॉकडाउन झाला. त्यामुळे गरीब कुटुंबाच्या अन्नाचा प्रश्‍न गंभीरपणे उभा राहिला. अशा काळात सरकारने मोफत राशन वाटप करून दिलासा दिला आहे. मोफत धान्यवाटप आताही सुरूच आहे; मात्र ज्या शिधापत्रकधारकांनी अद्याप रेशनकार्ड आधारशी जोडलेले नाहीत. त्यांना यापुढील काळात मोफत धान्य सुविधेचा लाभ मिळणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे रेशन मिळणार आहे. त्यांचे रेशनकार्ड देखील रद्द केले जाणार नाही; परंतु जर आधार त्यांच्याशी जोडला गेला तर भविष्यात त्यांना सहज धान्य मिळेल. आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार रेशनकार्डपैकी 90 टक्के आधारशी जोडली गेली आहेत. 10 टक्के लोक अद्याप यामध्ये सामील झालेले नसल्याचे समोर आले आहे. 

अशी आहे प्रक्रिया 
रेशनकार्डला आधारशी जोडण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करू शकता. यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन (यूआयडीएआय) या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर त्यात लॉग इन करावे लागेल. ऑप्शनवर क्‍लिक केल्यानंतर पत्ता, तपशील भरावा लागेल. ज्यात आपला जिल्हा व राज्य निवडले जाईल. सर्व माहिती संकेतस्थावर भरल्यानंतर आपले रेशनकार्ड आधारशी लिंक केले जाईल. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद  कणकवली (सिंधुदुर्ग) - लॉकडाउनमुळे प्रवासी मजुरांसह बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गमावल्या. ज्यामुळे त्यांना रोजीरोटीपासून अन्नापर्यंतची समस्या होती. अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत मोफत रेशन जाहीर केले. त्याअंतर्गत कोणत्याही राज्यात राहणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. केंद्रीय अन्न मंत्रालयाने रेशन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी अंतिम तारीख उद्यापर्यंत (ता.30) दिली आहे. आधार लिंक नसल्यास मोफत धान्य वितरण बंद होणार आहे.  कोरोना रोखण्यासाठी देश लॉकडाउन झाला. त्यामुळे गरीब कुटुंबाच्या अन्नाचा प्रश्‍न गंभीरपणे उभा राहिला. अशा काळात सरकारने मोफत राशन वाटप करून दिलासा दिला आहे. मोफत धान्यवाटप आताही सुरूच आहे; मात्र ज्या शिधापत्रकधारकांनी अद्याप रेशनकार्ड आधारशी जोडलेले नाहीत. त्यांना यापुढील काळात मोफत धान्य सुविधेचा लाभ मिळणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे रेशन मिळणार आहे. त्यांचे रेशनकार्ड देखील रद्द केले जाणार नाही; परंतु जर आधार त्यांच्याशी जोडला गेला तर भविष्यात त्यांना सहज धान्य मिळेल. आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार रेशनकार्डपैकी 90 टक्के आधारशी जोडली गेली आहेत. 10 टक्के लोक अद्याप यामध्ये सामील झालेले नसल्याचे समोर आले आहे.  अशी आहे प्रक्रिया  रेशनकार्डला आधारशी जोडण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करू शकता. यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन (यूआयडीएआय) या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर त्यात लॉग इन करावे लागेल. ऑप्शनवर क्‍लिक केल्यानंतर पत्ता, तपशील भरावा लागेल. ज्यात आपला जिल्हा व राज्य निवडले जाईल. सर्व माहिती संकेतस्थावर भरल्यानंतर आपले रेशनकार्ड आधारशी लिंक केले जाईल.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30ku1R1
Read More
बाबरी मशीद पाडण्याचा आरोप असलेल्या या पाच व्यक्तींविषयी तुम्हाला माहिती आहे का?
बाबरी मशीद खटला: लालकृष्ण अडवाणींसह सर्व आरोपींनी हजर राहावे; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
वैभववाडीत प्रशिक्षण खर्च संशयाच्या भोवऱ्यात 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रूपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणापासून ते पेन खरेदीपर्यंत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. या सर्व प्रकारात पीपीई खरेदीत स्वत:चा हंडा भरून घेतलेल्या "त्या' अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा आहे. 
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत तालुक्‍यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे 15 व 16 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले होते. ग्रामपंचायत आराखड्यासंदर्भात हे दोन दिवशीय प्रशिक्षण होते. 

या प्रशिक्षण कार्यक्रमावर पंचायत समिती स्तरावरून 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च झाला आहे. यामध्ये जेवण व नाष्ट्यावर तब्बल 41 हजार 520 रूपये, प्रोजेक्‍टर, बॅनर आणि इतर 16 हजार रूपये, साऊंड सिस्टीमवर 9 हजार रूपये, चहा व पाणी 9 हजार 675 रूपये, स्टेशनरी साहित्य 39 हजार 220 रूपये आणि मार्गदर्शक तज्ञांना मानधन म्हणून 14 हजार रूपये, असे एकुण 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च दाखविला आहे. या दोन दिवशीय प्रशिक्षणाला 130 प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे दाखविले आहे.

प्रशिक्षणासाठी एका शेतकरी गटाला दोन दिवसांचे जेवण, नाष्टा आणि चहाचे काम 20 हजार रूपयाला देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याच्या नावे 41 हजार 520 रूपयांचा धनादेश देवून त्यांच्याकडून इतर खर्च देखील याच रक्कमेतून करावयाचा असल्याचे सांगुन त्यांच्याकडून 21 हजार रूपये एका अधिकाऱ्याने परत घेतले. एक दिवस शाकाहरी आणि एक दिवस चिकन जेवण त्या गटाने दिले. प्रत्यक्षात बिल मात्र स्पेशल सुरमई जेवणाचे काढले आहे. एक थाळीचा दर 250 रूपये दाखविण्यात आला आहे. चहा त्याच गटाने पुरविला असताना स्वतंत्र चहावर 4 हजार 875 रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. याशिवाय पाण्यावर देखील अवास्तव खर्च दाखविण्यात आला आहे. 

पंचायत समितीच्या मालकीची साऊंड सिस्टीम आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला हीच साऊंड सिस्टीम वापरण्यात आली; परंतु साऊंड सिस्टीमचे भाडे म्हणून 9 हजार रूपये खर्च झाला आहे. स्टेशनरीवर केलेला खर्चही अवाजवी आहे. प्रशिक्षणार्थीना एक दोन रूपयाचे पेन आणि चार पाच रूपयाचे पॅड दिले होते; परंतु दिलेला पेन 30 रूपये किंमतीचा आणि पॅड 30 रूपये किंमतीचे आहे.

शासन निर्णयाची झेरॉक्‍स काढून तयार केलेल्या पुस्तकाची किंमत 180 रूपये आहे. स्टेशनरीवर तब्बल 39 हजार 220 रूपये खर्च झाला आहे. या प्रशिक्षणात दिलेल्या स्टेशनरी साहित्य, चहा, जेवण, नाष्टा यासंदर्भात अनेक सरपंच आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रशिक्षणाला सुरमई जेवण कधीच दिले नसल्याचे सांगितले. पंचायत समितीचे पदाधिकारी देखील या खर्चाबद्दल अनभिज्ञ आहेत. 

वैभववाडी पंचायत समितीचा कार्यभार आताच स्वीकारला आहे. सध्या एका कामासाठी दुसरीकडे आहे; परंतु आल्यानंतर या खर्चासंदर्भात माहिती घेईन आणि योग्य तो निर्णय घेईन. 
- विद्या गमरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैभववाडी 

प्रशिक्षणावर नेमका किती आणि कसा खर्च झाला, याची माहिती घेवून त्याची खातरजमा केली जाईल. जर चुकीच्या पद्धतीने खर्च झाला असेल तर त्यासंदर्भात नक्कीच ती बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात येईल. 
- अक्षता डाफळे, सभापती, पंचायत समिती वैभववाडी 

सरपंच आणि ग्रामसेवक प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला खर्चात घोळ असेल तर त्याबाबतीत शहानिशा करून मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. 
- लक्ष्मण रावराणे, माजी सभापती, पंचायत समिती सदस्य

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वैभववाडीत प्रशिक्षण खर्च संशयाच्या भोवऱ्यात  वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रूपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणापासून ते पेन खरेदीपर्यंत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. या सर्व प्रकारात पीपीई खरेदीत स्वत:चा हंडा भरून घेतलेल्या "त्या' अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा आहे.  राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत तालुक्‍यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे 15 व 16 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले होते. ग्रामपंचायत आराखड्यासंदर्भात हे दोन दिवशीय प्रशिक्षण होते.  या प्रशिक्षण कार्यक्रमावर पंचायत समिती स्तरावरून 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च झाला आहे. यामध्ये जेवण व नाष्ट्यावर तब्बल 41 हजार 520 रूपये, प्रोजेक्‍टर, बॅनर आणि इतर 16 हजार रूपये, साऊंड सिस्टीमवर 9 हजार रूपये, चहा व पाणी 9 हजार 675 रूपये, स्टेशनरी साहित्य 39 हजार 220 रूपये आणि मार्गदर्शक तज्ञांना मानधन म्हणून 14 हजार रूपये, असे एकुण 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च दाखविला आहे. या दोन दिवशीय प्रशिक्षणाला 130 प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे दाखविले आहे. प्रशिक्षणासाठी एका शेतकरी गटाला दोन दिवसांचे जेवण, नाष्टा आणि चहाचे काम 20 हजार रूपयाला देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याच्या नावे 41 हजार 520 रूपयांचा धनादेश देवून त्यांच्याकडून इतर खर्च देखील याच रक्कमेतून करावयाचा असल्याचे सांगुन त्यांच्याकडून 21 हजार रूपये एका अधिकाऱ्याने परत घेतले. एक दिवस शाकाहरी आणि एक दिवस चिकन जेवण त्या गटाने दिले. प्रत्यक्षात बिल मात्र स्पेशल सुरमई जेवणाचे काढले आहे. एक थाळीचा दर 250 रूपये दाखविण्यात आला आहे. चहा त्याच गटाने पुरविला असताना स्वतंत्र चहावर 4 हजार 875 रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. याशिवाय पाण्यावर देखील अवास्तव खर्च दाखविण्यात आला आहे.  पंचायत समितीच्या मालकीची साऊंड सिस्टीम आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला हीच साऊंड सिस्टीम वापरण्यात आली; परंतु साऊंड सिस्टीमचे भाडे म्हणून 9 हजार रूपये खर्च झाला आहे. स्टेशनरीवर केलेला खर्चही अवाजवी आहे. प्रशिक्षणार्थीना एक दोन रूपयाचे पेन आणि चार पाच रूपयाचे पॅड दिले होते; परंतु दिलेला पेन 30 रूपये किंमतीचा आणि पॅड 30 रूपये किंमतीचे आहे. शासन निर्णयाची झेरॉक्‍स काढून तयार केलेल्या पुस्तकाची किंमत 180 रूपये आहे. स्टेशनरीवर तब्बल 39 हजार 220 रूपये खर्च झाला आहे. या प्रशिक्षणात दिलेल्या स्टेशनरी साहित्य, चहा, जेवण, नाष्टा यासंदर्भात अनेक सरपंच आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रशिक्षणाला सुरमई जेवण कधीच दिले नसल्याचे सांगितले. पंचायत समितीचे पदाधिकारी देखील या खर्चाबद्दल अनभिज्ञ आहेत.  वैभववाडी पंचायत समितीचा कार्यभार आताच स्वीकारला आहे. सध्या एका कामासाठी दुसरीकडे आहे; परंतु आल्यानंतर या खर्चासंदर्भात माहिती घेईन आणि योग्य तो निर्णय घेईन.  - विद्या गमरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैभववाडी  प्रशिक्षणावर नेमका किती आणि कसा खर्च झाला, याची माहिती घेवून त्याची खातरजमा केली जाईल. जर चुकीच्या पद्धतीने खर्च झाला असेल तर त्यासंदर्भात नक्कीच ती बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात येईल.  - अक्षता डाफळे, सभापती, पंचायत समिती वैभववाडी  सरपंच आणि ग्रामसेवक प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला खर्चात घोळ असेल तर त्याबाबतीत शहानिशा करून मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.  - लक्ष्मण रावराणे, माजी सभापती, पंचायत समिती सदस्य संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n24mGt
Read More
बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाती

कुडाळ (सिंधुदुर्ग) - पावशी धरणात काल (ता.28) सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या अभिषेक दळवी (वय 21) या युवकाचा मृतदेह आज दुपारी सापडला. काल रात्री साडेआठपर्यंत शोध घेऊनही त्याचा शोध लागला नव्हता. आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच बाळा कोरगावकर यांनी व्यक्त केली. 

पावशी धरणवाडी येथील अभिषेक हा युवक मित्रांसमवेत काल (ता.28) सायंकाळी पावशी धरणवाडी येथील धरणात पोहण्यास गेला होता. तलाव पावसाने पूर्ण भरलेला असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याची पातळी खोलवर होती. अलीकडेच हा युवक कधीतरी पोहण्यासाठी जात असे.

काल सायंकाळी तो बुडाल्याचे समजताच पावशी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन त्याचा शोध घेतला. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सरपंच बाळा कोरगावकर, माजी सभपती राजन जाधव, पप्या तवटे, उपसरपंच दीपक आगणे यांनी भेट दिली. येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 8.30 पर्यंत शोध मोहीम सुरू होती. काळोख झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली. आज मालवण येथील स्कुबा डायव्हिंग दाखल झाले होते. त्यांनी होडीतून शोध मोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह आढळला. 

आपत्कालीन यंत्रणेबाबत संताप 
ज्यावेळी काल सायंकाळी शोधमोहीम सुरू असताना आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली; मात्र या मागणीला सहकार्य मिळाले नाही. याबाबत सरपंच बाळा कोरगावकर यांनी संताप व्यक्त केला. अभिषेकची घरची परिस्थिती हलाखीची असून एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्‍चात आई आहे. त्याच्या जाण्याने दळवी कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाती कुडाळ (सिंधुदुर्ग) - पावशी धरणात काल (ता.28) सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या अभिषेक दळवी (वय 21) या युवकाचा मृतदेह आज दुपारी सापडला. काल रात्री साडेआठपर्यंत शोध घेऊनही त्याचा शोध लागला नव्हता. आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच बाळा कोरगावकर यांनी व्यक्त केली.  पावशी धरणवाडी येथील अभिषेक हा युवक मित्रांसमवेत काल (ता.28) सायंकाळी पावशी धरणवाडी येथील धरणात पोहण्यास गेला होता. तलाव पावसाने पूर्ण भरलेला असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याची पातळी खोलवर होती. अलीकडेच हा युवक कधीतरी पोहण्यासाठी जात असे. काल सायंकाळी तो बुडाल्याचे समजताच पावशी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन त्याचा शोध घेतला. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सरपंच बाळा कोरगावकर, माजी सभपती राजन जाधव, पप्या तवटे, उपसरपंच दीपक आगणे यांनी भेट दिली. येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 8.30 पर्यंत शोध मोहीम सुरू होती. काळोख झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली. आज मालवण येथील स्कुबा डायव्हिंग दाखल झाले होते. त्यांनी होडीतून शोध मोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह आढळला.  आपत्कालीन यंत्रणेबाबत संताप  ज्यावेळी काल सायंकाळी शोधमोहीम सुरू असताना आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली; मात्र या मागणीला सहकार्य मिळाले नाही. याबाबत सरपंच बाळा कोरगावकर यांनी संताप व्यक्त केला. अभिषेकची घरची परिस्थिती हलाखीची असून एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्‍चात आई आहे. त्याच्या जाण्याने दळवी कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3487nfP
Read More
या १० कामांना जाणार असाल तर आधार कार्ड नेण्यास चुकूनही विसरू नका; अन्यथा सेवांचे दरवाजे होणार बंद

नागपूर : सामन्यांचा अधिकार असे संबोधल्या जाणाऱ्या 'आधार कार्ड' ला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. विमानाच्या तिकिटापासून ते रेशनच्या धान्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवल्याशिवाय काम होत नाही. अगदी नवजात बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे आधार कार्ड असणे अनिवार्य झाले आहे.

आधार कार्ड म्हणजे आपण भारतीय असण्याचा पुरावा आहे. आता प्रत्येक कामात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. एखाद्या कामानिमित्त गेलात आणि तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला परत पाठवण्यात येते या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. पण आता अजिबात चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशी १० ठिकाणे सांगणार आहोत जिथे आधार कार्ड सक्तीचे आहे.       

स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवायचे आहे, तर जाणून घ्या महत्वाच्या बाबी

या ठिकाणी जाताना सोबत ठेवा आधार कार्ड 

बँकेत नवीन खाते सुरू करण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य.

५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँकिंग व्यवहारासाठी आधार नंबर अनिवार्य

म्युच्युअल फंडच्या अकाउंटसाठीही आधार अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी सरकारने मुदत दिली आहे. जर आधार नंबर दिला नाही तर संबंधित खाते निष्क्रिय होईल.

मोबाइल नंबरसाठी ई - केवायसी : दूरसंचार मंत्रालयाने सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की, ग्राहकांच्या आधार कार्डच्या साहाय्याने ई व्हेरिफिकेशन करावे.

कोणताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याचा आधार नंबर ईपीएफशी जोडलेला असेल.

सरकारी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार नंबर बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य आहे.

जर आपल्याला प्राप्तिकर रिटर्न दाखल करायचा असेल वा बँक खाते सुरू करायचे आहे, तर तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार आहे. अनेक सामाजिक आणि सरकारी उपक्रमांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अन्य काही योजनांसाठीही लवकरच आधार बंधनकारक होणार आहे.

आपल्याकडे आधार कार्ड असल्यास प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्ड आपल्या पॅन  कार्डशी लिंक करावे लागेल. आधारमुळे प्राप्तिकरचे ई-व्हेरिफिकेशन सोपे होईल.

पालकांनो सावधान! मुलांवर कधीही हात उगारू नका; नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम

वैयक्तिक दस्तऐवज संग्रहित (डिजिटल लॉकर) करण्यासाठी सरकारने आॅनलाइन लॉकर प्रणाली सुरू केली आहे. डिजीलॉकर सुरू करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य.

गॅस सबसिडीचा थेट हस्तांतरणाचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार नंबर आवश्यक केलेला आहे.

ईपीएफप्रमाणेच पेन्शन प्राप्त करण्यासाठीही आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. फसवणूक होऊ नये, यासाठी हे केले आहे.

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

या १० कामांना जाणार असाल तर आधार कार्ड नेण्यास चुकूनही विसरू नका; अन्यथा सेवांचे दरवाजे होणार बंद नागपूर : सामन्यांचा अधिकार असे संबोधल्या जाणाऱ्या 'आधार कार्ड' ला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. विमानाच्या तिकिटापासून ते रेशनच्या धान्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवल्याशिवाय काम होत नाही. अगदी नवजात बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे आधार कार्ड असणे अनिवार्य झाले आहे. आधार कार्ड म्हणजे आपण भारतीय असण्याचा पुरावा आहे. आता प्रत्येक कामात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. एखाद्या कामानिमित्त गेलात आणि तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला परत पाठवण्यात येते या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. पण आता अजिबात चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशी १० ठिकाणे सांगणार आहोत जिथे आधार कार्ड सक्तीचे आहे.        स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवायचे आहे, तर जाणून घ्या महत्वाच्या बाबी या ठिकाणी जाताना सोबत ठेवा आधार कार्ड  बँकेत नवीन खाते सुरू करण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य. ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँकिंग व्यवहारासाठी आधार नंबर अनिवार्य म्युच्युअल फंडच्या अकाउंटसाठीही आधार अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी सरकारने मुदत दिली आहे. जर आधार नंबर दिला नाही तर संबंधित खाते निष्क्रिय होईल. मोबाइल नंबरसाठी ई - केवायसी : दूरसंचार मंत्रालयाने सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की, ग्राहकांच्या आधार कार्डच्या साहाय्याने ई व्हेरिफिकेशन करावे. कोणताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याचा आधार नंबर ईपीएफशी जोडलेला असेल. सरकारी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार नंबर बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य आहे. जर आपल्याला प्राप्तिकर रिटर्न दाखल करायचा असेल वा बँक खाते सुरू करायचे आहे, तर तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार आहे. अनेक सामाजिक आणि सरकारी उपक्रमांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अन्य काही योजनांसाठीही लवकरच आधार बंधनकारक होणार आहे. आपल्याकडे आधार कार्ड असल्यास प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्ड आपल्या पॅन  कार्डशी लिंक करावे लागेल. आधारमुळे प्राप्तिकरचे ई-व्हेरिफिकेशन सोपे होईल. पालकांनो सावधान! मुलांवर कधीही हात उगारू नका; नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम वैयक्तिक दस्तऐवज संग्रहित (डिजिटल लॉकर) करण्यासाठी सरकारने आॅनलाइन लॉकर प्रणाली सुरू केली आहे. डिजीलॉकर सुरू करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य. गॅस सबसिडीचा थेट हस्तांतरणाचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार नंबर आवश्यक केलेला आहे. ईपीएफप्रमाणेच पेन्शन प्राप्त करण्यासाठीही आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. फसवणूक होऊ नये, यासाठी हे केले आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n4KNNJ
Read More