मांगेली सरपंच अखेर पायउतार, भाजपला धक्का साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव अखेर संमत झाला. श्री. गवस यांना केवळ त्यांचेच मत मिळाले. अविश्‍वास ठराव आठ विरुद्ध एक मताने संमत झाला. श्री. गवस पायउतार होणे हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. यापुर्वी आयी येथील भाजपच्या प्रार्थना मुरगोडी यांच्या विरोधातही अविश्‍वास ठराव मंजूर झाला आहे. भाजपने थेट लोकांमधून निवडून आलेल्या दोघा सरपंचांना गमावले आहे.  श्री. गवस यांच्याविरुद्ध उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी ठरावावर सुनावणी घेण्यासाठी सोमवारी (ता.28) मांगेली ग्रामपंचायतीत विशेष बैठक बोलावली होती. त्यावेळी उपसरपंच विश्‍वनाथ गवस, सदस्य एकनाथ गवस, संतोष गवस, वेदिका गवस, सुचिता गवस, पूनम गवस, विनिता गवस आणि सेजल वर्णेकर यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने तर श्री. गवस यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे ठराव एक विरुद्ध आठ मतांनी संमत झाला. यावेळी माजी सरपंच विजय गवस, विजय गवस, विजय गवस, दीपक गवस, ज्ञानेश्‍वर गवस आदी उपस्थित होते. श्री. गवस भाजयुमोचे तालुका सचिव तर सरपंच संघटनेचे तालुका सहसचिव होते. निवडून आल्यानंतर सरपंच म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीवर सर्व सदस्य नाराज होते.  वरिष्ठांनी गांभीर्याने घ्यावे  भाजपची जिल्ह्यात सत्ता आहे, असे असताना तालुक्‍यातील भाजपचे सरपंच एकामागोमाग पायउतार होत आहेत. ही पक्षासाठी भूषणावह गोष्ट नाही. जिल्हास्तरीय पक्ष नेतृत्व कमी पडत असल्याने आणि ज्यांनी पक्षाला बळ दिले त्यांना अडचणीच्या काळात सहकार्य मिळत नसल्याने असे प्रकार होत आहेत. त्याबद्दल पंचायत समिती सदस्य बाळा नाईक आणि उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांनी आता तरी गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 29, 2020

मांगेली सरपंच अखेर पायउतार, भाजपला धक्का साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव अखेर संमत झाला. श्री. गवस यांना केवळ त्यांचेच मत मिळाले. अविश्‍वास ठराव आठ विरुद्ध एक मताने संमत झाला. श्री. गवस पायउतार होणे हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. यापुर्वी आयी येथील भाजपच्या प्रार्थना मुरगोडी यांच्या विरोधातही अविश्‍वास ठराव मंजूर झाला आहे. भाजपने थेट लोकांमधून निवडून आलेल्या दोघा सरपंचांना गमावले आहे.  श्री. गवस यांच्याविरुद्ध उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी ठरावावर सुनावणी घेण्यासाठी सोमवारी (ता.28) मांगेली ग्रामपंचायतीत विशेष बैठक बोलावली होती. त्यावेळी उपसरपंच विश्‍वनाथ गवस, सदस्य एकनाथ गवस, संतोष गवस, वेदिका गवस, सुचिता गवस, पूनम गवस, विनिता गवस आणि सेजल वर्णेकर यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने तर श्री. गवस यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे ठराव एक विरुद्ध आठ मतांनी संमत झाला. यावेळी माजी सरपंच विजय गवस, विजय गवस, विजय गवस, दीपक गवस, ज्ञानेश्‍वर गवस आदी उपस्थित होते. श्री. गवस भाजयुमोचे तालुका सचिव तर सरपंच संघटनेचे तालुका सहसचिव होते. निवडून आल्यानंतर सरपंच म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीवर सर्व सदस्य नाराज होते.  वरिष्ठांनी गांभीर्याने घ्यावे  भाजपची जिल्ह्यात सत्ता आहे, असे असताना तालुक्‍यातील भाजपचे सरपंच एकामागोमाग पायउतार होत आहेत. ही पक्षासाठी भूषणावह गोष्ट नाही. जिल्हास्तरीय पक्ष नेतृत्व कमी पडत असल्याने आणि ज्यांनी पक्षाला बळ दिले त्यांना अडचणीच्या काळात सहकार्य मिळत नसल्याने असे प्रकार होत आहेत. त्याबद्दल पंचायत समिती सदस्य बाळा नाईक आणि उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांनी आता तरी गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2SaYgpc

No comments:

Post a Comment