Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 2, 2020

शीव स्मशानभूमीत नव्या दाहिन्या; कमी वेळेत आणि कमी सरणात होणार अंत्यसंस्कार 

मुंबई : शीव येथील स्मशानभूमीत आता कमी सरणात आणि नेहमीपेक्षा निम्म्या वेळात मृतदेहांचे दहन होणार आहे. या स्मशानभूमीत नव्याने दोन दाहिन्या बसवण्यात आल्या असून अवघ्या 100 ते 125 किलो सरणात आणि दीड ते दोन तासात पार्थिवावर दहन करणे शक्‍य होणार आहे. सध्या खुल्या पद्धतीने होणाऱ्या दहनात 400 किलो सरण लागत असून त्यासाठी चार तासांचा कालावधी लागतो. 

ड्रग्सशी संबंध आढळल्याने रिया चक्रवर्तीच्या भावाची उद्या चौकशी; सॅम्युअल मिरांडालाही नोटीस पाठवण्याची शक्यता

मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमीत दर वर्षी 55 हजार पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतात. त्यातील 45 हजार पार्थिवांचे पारंपरिक पद्धतीने, तर अवघ्या 10 हजार पार्थिवांचे अंत्यसंस्कार विद्युत किंवा गॅसदाहिनीत होते. 
प्रत्येक पार्थिवाच्या दहनासाठी 300 ते 400 किलो सरण लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होते. त्यावर मुंबई महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून उपाय शोधत होती. त्यातून या बंदिस्त दाहिन्यांचा पर्याय पुढे आला आहे. विद्युत अथवा गॅस दाहिन्यात पार्थिव ट्रॉलीवरून दाहिनीत सरकवला जातो. त्याच पद्धतीने ही बंदिस्त दाहिनी असून त्यात सरण रचून अंत्यसंस्कार करता येतात. या बंदिस्त पद्धतीत मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊन दाहिनीतील तापमान 850 ते 950 अंशापर्यंत जाते. त्यामुळे 100 ते 125 किलो सरणात दीड ते दोन तासांत पार्थिवाचे पूर्णपणे दहन केले जाते. शीव येथील स्मशानभूमीत या दाहिनी बसवण्यात आल्या असून त्यासाठी 98 लाख 88 हजार रुपये खर्च आला आहे. यात चिमणी, शेड तसेच तीन वर्षांची हमी समाविष्ट आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

प्रदूषणातही घट 
पारंपरिक पद्धतीने पार्थिवांचे दहन झाल्यास त्यातून 600 किलो हरितगृह वायू आणि मोठ्या प्रमाणात तरंगते धुलिकण निर्माण होतात. नव्या बंदिस्त दाहिनीत सरण कमी लागणार असून प्रदूषणाचे प्रमाण कमी होईलच. त्याबरोबर 90 ते 100 फूट उंचीच्या चिमणीतून हा धूर बाहेर सोडला जाणार आहे. त्याच वॉटर स्क्रबर बसविण्यात येणार असून ज्यामुळे धुळीचे कण आणि कार्बनडायऑक्‍साईडचे प्रमाणही कमी होईल.

----------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शीव स्मशानभूमीत नव्या दाहिन्या; कमी वेळेत आणि कमी सरणात होणार अंत्यसंस्कार  मुंबई : शीव येथील स्मशानभूमीत आता कमी सरणात आणि नेहमीपेक्षा निम्म्या वेळात मृतदेहांचे दहन होणार आहे. या स्मशानभूमीत नव्याने दोन दाहिन्या बसवण्यात आल्या असून अवघ्या 100 ते 125 किलो सरणात आणि दीड ते दोन तासात पार्थिवावर दहन करणे शक्‍य होणार आहे. सध्या खुल्या पद्धतीने होणाऱ्या दहनात 400 किलो सरण लागत असून त्यासाठी चार तासांचा कालावधी लागतो.  ड्रग्सशी संबंध आढळल्याने रिया चक्रवर्तीच्या भावाची उद्या चौकशी; सॅम्युअल मिरांडालाही नोटीस पाठवण्याची शक्यता मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमीत दर वर्षी 55 हजार पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतात. त्यातील 45 हजार पार्थिवांचे पारंपरिक पद्धतीने, तर अवघ्या 10 हजार पार्थिवांचे अंत्यसंस्कार विद्युत किंवा गॅसदाहिनीत होते.  प्रत्येक पार्थिवाच्या दहनासाठी 300 ते 400 किलो सरण लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होते. त्यावर मुंबई महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून उपाय शोधत होती. त्यातून या बंदिस्त दाहिन्यांचा पर्याय पुढे आला आहे. विद्युत अथवा गॅस दाहिन्यात पार्थिव ट्रॉलीवरून दाहिनीत सरकवला जातो. त्याच पद्धतीने ही बंदिस्त दाहिनी असून त्यात सरण रचून अंत्यसंस्कार करता येतात. या बंदिस्त पद्धतीत मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊन दाहिनीतील तापमान 850 ते 950 अंशापर्यंत जाते. त्यामुळे 100 ते 125 किलो सरणात दीड ते दोन तासांत पार्थिवाचे पूर्णपणे दहन केले जाते. शीव येथील स्मशानभूमीत या दाहिनी बसवण्यात आल्या असून त्यासाठी 98 लाख 88 हजार रुपये खर्च आला आहे. यात चिमणी, शेड तसेच तीन वर्षांची हमी समाविष्ट आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय प्रदूषणातही घट  पारंपरिक पद्धतीने पार्थिवांचे दहन झाल्यास त्यातून 600 किलो हरितगृह वायू आणि मोठ्या प्रमाणात तरंगते धुलिकण निर्माण होतात. नव्या बंदिस्त दाहिनीत सरण कमी लागणार असून प्रदूषणाचे प्रमाण कमी होईलच. त्याबरोबर 90 ते 100 फूट उंचीच्या चिमणीतून हा धूर बाहेर सोडला जाणार आहे. त्याच वॉटर स्क्रबर बसविण्यात येणार असून ज्यामुळे धुळीचे कण आणि कार्बनडायऑक्‍साईडचे प्रमाणही कमी होईल. ---------------------------------------------- (संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gOUiwd
Read More
ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराबाबत चीनचे मौन

बीजिंग - ऑस्ट्रेलियाच्या पत्रकार चेंग लेई यांच्या अटकेप्रकरणी चीनने मौन बाळगले. त्यांना 14 ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले, पण कोणतेही कारण देण्यात आले नाही. 27 तारखेला त्यांच्याशी बोलणे झाले, पण त्या सार्वजनिक ठिकाणी दिसलेल्या नाहीत. त्यांच्यावर कोणता आरोप ठेवण्यात आला का याचीही माहिती नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीजीटीएन (चायना ग्लोबल टेलीव्हीजन नेटवर्क) या इंग्रजी भाषेतील सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीच्या सुत्रसंचालिका म्हणून चेंग कार्यरत होत्या. कोरोना विषाणूच्या उगमाबाबत चौकशीची मागणी करण्यात ऑस्ट्रेलियाने पुढाकार घेतल्यानंतर उभय देशांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच व्यापारावरूनही खटके उडत आहेत. परराष्ट्र प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी याविषयीच्या प्रश्नाला बगल दिली. कोणताही तपशील देऊ शकत नाही, पण चीन हा कायद्याचे शासन असलेला देश आहे आणि आम्ही कायद्यानुसार हे प्रकरण हाताळू, असे त्यांनी स्पष्ट केले. चेग यांना घरीच स्थानबद्ध करण्यात आल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांनी दिले आहे. त्यांना दीर्घ काळ डांबून ठेवण्यात येईल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापार व पर्यटन मंत्री सायमन बर्मिंगहॅम यांनी सांगितले की, चेंग लेई यांच्याबद्दल आम्हाला खरोखरच चिंता वाटते.

दरम्यान, एएफपी वृत्तसंस्थेने वुईचॅटच्या माध्यमातून चेंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यास प्रतिसाद मिळू शकला नाही. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराबाबत चीनचे मौन बीजिंग - ऑस्ट्रेलियाच्या पत्रकार चेंग लेई यांच्या अटकेप्रकरणी चीनने मौन बाळगले. त्यांना 14 ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले, पण कोणतेही कारण देण्यात आले नाही. 27 तारखेला त्यांच्याशी बोलणे झाले, पण त्या सार्वजनिक ठिकाणी दिसलेल्या नाहीत. त्यांच्यावर कोणता आरोप ठेवण्यात आला का याचीही माहिती नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सीजीटीएन (चायना ग्लोबल टेलीव्हीजन नेटवर्क) या इंग्रजी भाषेतील सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीच्या सुत्रसंचालिका म्हणून चेंग कार्यरत होत्या. कोरोना विषाणूच्या उगमाबाबत चौकशीची मागणी करण्यात ऑस्ट्रेलियाने पुढाकार घेतल्यानंतर उभय देशांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच व्यापारावरूनही खटके उडत आहेत. परराष्ट्र प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी याविषयीच्या प्रश्नाला बगल दिली. कोणताही तपशील देऊ शकत नाही, पण चीन हा कायद्याचे शासन असलेला देश आहे आणि आम्ही कायद्यानुसार हे प्रकरण हाताळू, असे त्यांनी स्पष्ट केले. चेग यांना घरीच स्थानबद्ध करण्यात आल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांनी दिले आहे. त्यांना दीर्घ काळ डांबून ठेवण्यात येईल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापार व पर्यटन मंत्री सायमन बर्मिंगहॅम यांनी सांगितले की, चेंग लेई यांच्याबद्दल आम्हाला खरोखरच चिंता वाटते. दरम्यान, एएफपी वृत्तसंस्थेने वुईचॅटच्या माध्यमातून चेंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यास प्रतिसाद मिळू शकला नाही.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jDSFDy
Read More
हॅरिस, बायडेन आणि भारत

अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्या भारतविषयक भूमिका नीट लक्षात घ्यायला हव्यात. भारताचे महत्त्व त्यांनाही नाकारता येणार नाही, हे खरे; पण सध्या तरी त्यांच्या निवडीत आपण भारावून जावे, असे काही नाही.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कमला हॅरिस यांची अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाल्याचे भारतात बरेच स्वागत झाले. आता ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस ही जोडी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवेल. हॅरिस या भारतीय वंशाच्या असल्यामुळे (त्यांचे वडील जमैकन आणि आई भारतीय) अमेरिकेतील भारतीयांनी त्यांचे स्वागत केले असेल, असे गृहित धरले जाते. हॅरिस यांच्या नियुक्तीला आणखी महत्त्व आहे. या निवडणुकीत जर बायडेन जिंकले, तर पुढच्या निवडणुकीसाठी हॅरिस अध्यक्षीय उमेदवार असू शकतील. हॅरिस, बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्ष जर खरोखरी निवडणूक जिंकून सत्तेवर आले तर भारताच्या दृष्टीने त्याचे काय परिणाम होतील, हे बघण्यासारखे आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाची भारतासंदर्भातील धोरणे बघता तीन ते चार घटक महत्त्वाचे ठरतात. यात काश्‍मीर आणि अनुषंगाने पाकिस्तानबाबतचे धोरण, मानवी हक्कांबाबतची भूमिका, चीनसंदर्भातील धोरण आणि मर्यादित प्रमाणात अण्वस्त्राबाबतीत भूमिका. हॅरिस यांची आजपर्यंतची भूमिका पाहता त्या स्वतःला अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन समाजाशी जोडताना दिसतात. भारतीय संबंधांचा क्वचितच उल्लेख करतात. निवडीनंतर मात्र त्यांनी आपल्या तमीळ भाषेचा उल्लेख केलाय. अमेरिकन मीडियादेखील त्यांची ओळख आफ्रिकन-अमेरिकन म्हणून करतो; भारतीय वंशाच्या म्हणून नाही.

काश्‍मीर प्रश्‍नाबाबतीत बायडेन आणि हॅरिस यांच्यात संपूर्ण सहमती आहे. बायडेन यांनी त्यांच्या प्रचाराचा भाग म्हणून अमेरिकी-मुस्लिम समाजासाठीचा अजेंडा जाहीर केला होता. त्यात काश्‍मीर तसेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरूस्ती कायद्यासंदर्भात (सीएए) टीका केलेली दिसते. ‘सीएए’बाबत टीका करताना मात्र अमेरिकेतील मुस्लिम स्थलांतरितांवरील बंदी कायद्याबाबत वक्तव्य केलेले दिसत नाही. काश्‍मिरी जनता त्यांच्या लढ्यात एकाकी नाही, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तेथील समस्यांवर नजर ठेवून आहोत, वेळ पडल्यास तिथे हस्तक्षेपाची गरज आहे, ही हॅरीस यांची भूमिका आहे. बायडेनेदेखील भारतात मुस्लिम समाजाला चुकीची वागणूक दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. काश्‍मीर संदर्भातील ही भूमिका डेमोक्रॅटिक पक्षाच्या मानवी हक्कांसंदर्भातील भूमिकेशी निगडीत आहे.

भारतामध्ये मानवी हक्कांबाबत जागरूकता नाही, भारत सरकारद्वारे काश्‍मीर किंवा आसाममध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होते, ही डेमोक्रॅटिक पक्षाची भूमिका आहे. विशेषतः धार्मिक चौकटीतील मानवी हक्कांवरच्या आघाताबाबत हॅरिस आणि बायडेन यांनी अनेक वक्तव्य केली आहेत. त्यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये भारताविरोधात याबाबत सतत आवाज उठवला.

आण्विक शस्त्रांच्या प्रसाराबाबतची चर्चा आता थोडी मागे पडली; परंतु क्‍लिंटन किंवा ओबामा या अध्यक्षांनी भारताच्या आण्विक धोरणाबाबत टीकेचीच भूमिका घेतली होती. रिपब्लिकन पक्षाच्या जॉर्ज बुश यांच्या काळात भारत-अमेरिकेदरम्यान आण्विक सहकार्याचा करार झाला होता, त्याला डेमोक्रॅटिक पक्षाने पाठिंबा दिला होता; परंतु तो देतानाही अनेक अडचणी आणल्या होत्या.

अमेरिकेची चीनबाबतची भूमिका हादेखील वादाचा मुद्दा आहे. १९७२ मध्ये रिचर्ड निक्‍सन यांनी चीनला भेट देऊन अमेरिका-चीन संबंधात नवीन पर्व सुरू केले. तेव्हापासून ट्रम्प सत्तेवर येईपर्यंत सर्व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चीनबाबत मवाळ भूमिका घ्यायचे. ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष, ज्यांनी चीनविरोधी भूमिकेचे धाडस केले. डेमोक्रॅटिक पक्षाची चीनबाबतची भूमिका मवाळच होती. चीनशी संवादाने संबंध सुरळीत ठेवायचे, हे बराक ओबामा आणि त्यांचे उपाध्यक्ष बायडेन मानीत. चीनशी प्रतिबद्धता असावी, ही भूमिका होती.चीनमधील थ्यान अन्‌ मन चौकातील घटनेनंतर बिल क्‍लिंटन राजवटीत अमेरिकी खासगी उद्योगांना चीनमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन होते. त्या वेळी मानवी हक्कांची चौकट आड आली नव्हती. बायडेन यांची निवड आशियाई बाजारपेठेला फायदेशीर ठरू शकते. 

ज्यो बायडेन-कमला हॅरिस अमेरिकी निवडणुकीत यशस्वी झाले तर भारताला घातक ठरतील का, याचे उत्तर केवळ ‘हो’ किंवा ‘नाही’ असे देता येत नाही. काही गोष्टींबाबत त्यांचे सरकार भारताविरोधी भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. विशेषतः काश्‍मीरबाबत ते अमेरिकेतील इस्लामिक गट जे पाकिस्तानशी संबंध ठेवून आहेत, त्यांच्या बाजूने ठाकण्याची शक्‍यता आहे. काश्‍मीरचा मुद्दा हा मानवी हक्कांच्या चौकटीत मांडला, की त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप येते.

त्याचबरोबरीने ‘सीएए’सारख्या मुद्द्यांवर धार्मिक चौकटीत मानवी हक्कांची भूमिका मांडणे सोयीचे असते. डेमोक्रॅटिक पक्षाने अशा प्रकारची भूमिका पूर्वीदेखील घेतलेली होती. त्याचबरोबर आशिया-प्रशांत क्षेत्रात चीनविरोधात जी आज व्यूहरचना केली जाते, ज्याच्यात ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारताला बरोबर घेतले जाते आहे, त्यात बदल होऊ शकतो. ज्याप्रमाणे ट्रम्प यांनी चीनला धारेवर धरले, त्याप्रमाणे बायडेन सरकार करू शकेल का, याबाबत शंका आहे. आणखी एक भाग हा व्यक्तिगत संबंधांचा आहे. मोदी आणि ट्रम्प यांनी जो संवाद साधला त्या पातळीवर बायडेन संवाद करू शकतील का, याबाबत शंका आहे. त्याचे मुख्य कारण बायडेन यांची पूर्वीची कारकीर्द. ओबामा सरकारच्या भूमिकेशी ते जोडले गेले आहेत. ती भूमिका भारत- अमेरिकेदरम्यानच्या घनिष्ठ मैत्रीची निश्‍चितच नव्हती.

अर्थात, त्यापलीकडे जाऊन विचार करता असे जाणवते, की काही वर्षांत जागतिक सत्ता समीकरणे बरीच बदललेली आहेत. भारत-अमेरिकेदरम्यान जे संबंध सुधारले, ते बायडेनमुळे एकाएकी बदलतील, असे नाही. अमेरिकन राष्ट्रहिताच्या चौकटीत विचार करता भारत हे महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे, ज्याबरोबर चांगले संबंध असणे त्यांच्या हिताचे असणार आहे. ट्रम्प यांचे ‘अमेरिका प्रथम’ हे धोरण बायडेन फार बदलू शकणार नाहीत. कदाचित, अमेरिकेचे लक्ष पुन्हा युरोपकडे वळेल, पश्‍चिम आशियात इराणविरुद्धची भूमिका बदलेल, आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये पुन्हा सक्रिय सहभाग राहील. त्याचबरोबर आशिया-प्रशांत क्षेत्रावरील रोख कमी होईल. परंतु भारताच्या पातळीवर काही मुद्द्यांवर मतभेद वगळता मूलभूत बदल होतील, असे नाही.

अमेरिकी परराष्ट्रीय धोरणाच्या आखणीत हॅरिस यांचे कितपत प्रत्यक्ष योगदान असेल, हा पुढील काळात चर्चेचा विषय होऊ शकतो. पारंपरिकदृष्ट्या बघितले तर अमेरिकत उपाध्यक्षांचे योगदान मर्यादित स्वरूपाचे होते.

हॅरिसच्या निवडीचे भारतात ज्या जल्लोषाने स्वागत झाले, तसे त्याच उत्साहात अमेरिकेतील भारतीय समाजाने केलेले दिसत नाही. अमेरिकेतील भारतीय मुस्लिम संघटनेने ज्या तत्परतेने हॅरिस यांच्या निवडीचे स्वागत केले, त्या तत्परतेने इतर घटकांनी केलेले नाही. अमेरिकेतील भारतीय समाज आता अमेरिकी राजकारणात सक्रिय आहे. पूर्वी केवळ आर्थिक स्वास्थ्यात तो गुंतलेला असे. भारताच्या बदलत्या परराष्ट्रीय धोरणांमुळे त्यांची सक्रियता अमेरिकी राजकीय नेत्यांना जाणवत आहे. ट्रम्प काय किंवा हॅरिस काय, दोघेही याचा फायदा घेवू इच्छितात. मात्र केवळ हॅरिस यांच्यामुळे अमेरिकी धोरणात काही मूलभूत बदल होतील, अशी आशा चुकीची ठरेल. त्यामुळेच केवळ भारतीय वंशाच्या आधारे हॅरिस यांच्याबाबत आडाखे बांधण्याची चूक करता कामा नये.
(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषक आहेत.)

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हॅरिस, बायडेन आणि भारत अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्या भारतविषयक भूमिका नीट लक्षात घ्यायला हव्यात. भारताचे महत्त्व त्यांनाही नाकारता येणार नाही, हे खरे; पण सध्या तरी त्यांच्या निवडीत आपण भारावून जावे, असे काही नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कमला हॅरिस यांची अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाल्याचे भारतात बरेच स्वागत झाले. आता ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस ही जोडी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवेल. हॅरिस या भारतीय वंशाच्या असल्यामुळे (त्यांचे वडील जमैकन आणि आई भारतीय) अमेरिकेतील भारतीयांनी त्यांचे स्वागत केले असेल, असे गृहित धरले जाते. हॅरिस यांच्या नियुक्तीला आणखी महत्त्व आहे. या निवडणुकीत जर बायडेन जिंकले, तर पुढच्या निवडणुकीसाठी हॅरिस अध्यक्षीय उमेदवार असू शकतील. हॅरिस, बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्ष जर खरोखरी निवडणूक जिंकून सत्तेवर आले तर भारताच्या दृष्टीने त्याचे काय परिणाम होतील, हे बघण्यासारखे आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची भारतासंदर्भातील धोरणे बघता तीन ते चार घटक महत्त्वाचे ठरतात. यात काश्‍मीर आणि अनुषंगाने पाकिस्तानबाबतचे धोरण, मानवी हक्कांबाबतची भूमिका, चीनसंदर्भातील धोरण आणि मर्यादित प्रमाणात अण्वस्त्राबाबतीत भूमिका. हॅरिस यांची आजपर्यंतची भूमिका पाहता त्या स्वतःला अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन समाजाशी जोडताना दिसतात. भारतीय संबंधांचा क्वचितच उल्लेख करतात. निवडीनंतर मात्र त्यांनी आपल्या तमीळ भाषेचा उल्लेख केलाय. अमेरिकन मीडियादेखील त्यांची ओळख आफ्रिकन-अमेरिकन म्हणून करतो; भारतीय वंशाच्या म्हणून नाही. काश्‍मीर प्रश्‍नाबाबतीत बायडेन आणि हॅरिस यांच्यात संपूर्ण सहमती आहे. बायडेन यांनी त्यांच्या प्रचाराचा भाग म्हणून अमेरिकी-मुस्लिम समाजासाठीचा अजेंडा जाहीर केला होता. त्यात काश्‍मीर तसेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरूस्ती कायद्यासंदर्भात (सीएए) टीका केलेली दिसते. ‘सीएए’बाबत टीका करताना मात्र अमेरिकेतील मुस्लिम स्थलांतरितांवरील बंदी कायद्याबाबत वक्तव्य केलेले दिसत नाही. काश्‍मिरी जनता त्यांच्या लढ्यात एकाकी नाही, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तेथील समस्यांवर नजर ठेवून आहोत, वेळ पडल्यास तिथे हस्तक्षेपाची गरज आहे, ही हॅरीस यांची भूमिका आहे. बायडेनेदेखील भारतात मुस्लिम समाजाला चुकीची वागणूक दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. काश्‍मीर संदर्भातील ही भूमिका डेमोक्रॅटिक पक्षाच्या मानवी हक्कांसंदर्भातील भूमिकेशी निगडीत आहे. भारतामध्ये मानवी हक्कांबाबत जागरूकता नाही, भारत सरकारद्वारे काश्‍मीर किंवा आसाममध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होते, ही डेमोक्रॅटिक पक्षाची भूमिका आहे. विशेषतः धार्मिक चौकटीतील मानवी हक्कांवरच्या आघाताबाबत हॅरिस आणि बायडेन यांनी अनेक वक्तव्य केली आहेत. त्यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये भारताविरोधात याबाबत सतत आवाज उठवला. आण्विक शस्त्रांच्या प्रसाराबाबतची चर्चा आता थोडी मागे पडली; परंतु क्‍लिंटन किंवा ओबामा या अध्यक्षांनी भारताच्या आण्विक धोरणाबाबत टीकेचीच भूमिका घेतली होती. रिपब्लिकन पक्षाच्या जॉर्ज बुश यांच्या काळात भारत-अमेरिकेदरम्यान आण्विक सहकार्याचा करार झाला होता, त्याला डेमोक्रॅटिक पक्षाने पाठिंबा दिला होता; परंतु तो देतानाही अनेक अडचणी आणल्या होत्या. अमेरिकेची चीनबाबतची भूमिका हादेखील वादाचा मुद्दा आहे. १९७२ मध्ये रिचर्ड निक्‍सन यांनी चीनला भेट देऊन अमेरिका-चीन संबंधात नवीन पर्व सुरू केले. तेव्हापासून ट्रम्प सत्तेवर येईपर्यंत सर्व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चीनबाबत मवाळ भूमिका घ्यायचे. ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष, ज्यांनी चीनविरोधी भूमिकेचे धाडस केले. डेमोक्रॅटिक पक्षाची चीनबाबतची भूमिका मवाळच होती. चीनशी संवादाने संबंध सुरळीत ठेवायचे, हे बराक ओबामा आणि त्यांचे उपाध्यक्ष बायडेन मानीत. चीनशी प्रतिबद्धता असावी, ही भूमिका होती.चीनमधील थ्यान अन्‌ मन चौकातील घटनेनंतर बिल क्‍लिंटन राजवटीत अमेरिकी खासगी उद्योगांना चीनमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन होते. त्या वेळी मानवी हक्कांची चौकट आड आली नव्हती. बायडेन यांची निवड आशियाई बाजारपेठेला फायदेशीर ठरू शकते.  ज्यो बायडेन-कमला हॅरिस अमेरिकी निवडणुकीत यशस्वी झाले तर भारताला घातक ठरतील का, याचे उत्तर केवळ ‘हो’ किंवा ‘नाही’ असे देता येत नाही. काही गोष्टींबाबत त्यांचे सरकार भारताविरोधी भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. विशेषतः काश्‍मीरबाबत ते अमेरिकेतील इस्लामिक गट जे पाकिस्तानशी संबंध ठेवून आहेत, त्यांच्या बाजूने ठाकण्याची शक्‍यता आहे. काश्‍मीरचा मुद्दा हा मानवी हक्कांच्या चौकटीत मांडला, की त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप येते. त्याचबरोबरीने ‘सीएए’सारख्या मुद्द्यांवर धार्मिक चौकटीत मानवी हक्कांची भूमिका मांडणे सोयीचे असते. डेमोक्रॅटिक पक्षाने अशा प्रकारची भूमिका पूर्वीदेखील घेतलेली होती. त्याचबरोबर आशिया-प्रशांत क्षेत्रात चीनविरोधात जी आज व्यूहरचना केली जाते, ज्याच्यात ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारताला बरोबर घेतले जाते आहे, त्यात बदल होऊ शकतो. ज्याप्रमाणे ट्रम्प यांनी चीनला धारेवर धरले, त्याप्रमाणे बायडेन सरकार करू शकेल का, याबाबत शंका आहे. आणखी एक भाग हा व्यक्तिगत संबंधांचा आहे. मोदी आणि ट्रम्प यांनी जो संवाद साधला त्या पातळीवर बायडेन संवाद करू शकतील का, याबाबत शंका आहे. त्याचे मुख्य कारण बायडेन यांची पूर्वीची कारकीर्द. ओबामा सरकारच्या भूमिकेशी ते जोडले गेले आहेत. ती भूमिका भारत- अमेरिकेदरम्यानच्या घनिष्ठ मैत्रीची निश्‍चितच नव्हती. अर्थात, त्यापलीकडे जाऊन विचार करता असे जाणवते, की काही वर्षांत जागतिक सत्ता समीकरणे बरीच बदललेली आहेत. भारत-अमेरिकेदरम्यान जे संबंध सुधारले, ते बायडेनमुळे एकाएकी बदलतील, असे नाही. अमेरिकन राष्ट्रहिताच्या चौकटीत विचार करता भारत हे महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे, ज्याबरोबर चांगले संबंध असणे त्यांच्या हिताचे असणार आहे. ट्रम्प यांचे ‘अमेरिका प्रथम’ हे धोरण बायडेन फार बदलू शकणार नाहीत. कदाचित, अमेरिकेचे लक्ष पुन्हा युरोपकडे वळेल, पश्‍चिम आशियात इराणविरुद्धची भूमिका बदलेल, आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये पुन्हा सक्रिय सहभाग राहील. त्याचबरोबर आशिया-प्रशांत क्षेत्रावरील रोख कमी होईल. परंतु भारताच्या पातळीवर काही मुद्द्यांवर मतभेद वगळता मूलभूत बदल होतील, असे नाही. अमेरिकी परराष्ट्रीय धोरणाच्या आखणीत हॅरिस यांचे कितपत प्रत्यक्ष योगदान असेल, हा पुढील काळात चर्चेचा विषय होऊ शकतो. पारंपरिकदृष्ट्या बघितले तर अमेरिकत उपाध्यक्षांचे योगदान मर्यादित स्वरूपाचे होते. हॅरिसच्या निवडीचे भारतात ज्या जल्लोषाने स्वागत झाले, तसे त्याच उत्साहात अमेरिकेतील भारतीय समाजाने केलेले दिसत नाही. अमेरिकेतील भारतीय मुस्लिम संघटनेने ज्या तत्परतेने हॅरिस यांच्या निवडीचे स्वागत केले, त्या तत्परतेने इतर घटकांनी केलेले नाही. अमेरिकेतील भारतीय समाज आता अमेरिकी राजकारणात सक्रिय आहे. पूर्वी केवळ आर्थिक स्वास्थ्यात तो गुंतलेला असे. भारताच्या बदलत्या परराष्ट्रीय धोरणांमुळे त्यांची सक्रियता अमेरिकी राजकीय नेत्यांना जाणवत आहे. ट्रम्प काय किंवा हॅरिस काय, दोघेही याचा फायदा घेवू इच्छितात. मात्र केवळ हॅरिस यांच्यामुळे अमेरिकी धोरणात काही मूलभूत बदल होतील, अशी आशा चुकीची ठरेल. त्यामुळेच केवळ भारतीय वंशाच्या आधारे हॅरिस यांच्याबाबत आडाखे बांधण्याची चूक करता कामा नये. (लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषक आहेत.) Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z24xY1
Read More
‘ॲग्रोवन’ मधील ‘चकाट्या’ही ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये

पुणे - ‘ॲग्रोवन’मधून ‘चकाट्या’ या व्यंगचित्रांद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडणारे व्यंगचित्रकार लहू काळे यांची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रेखाटलेली सर्वाधिक ४ हजार ३४१ पॉकेट कार्टून २००७  ते २०१९ या कालावधीत ‘ॲग्रोवन’मधून सलग प्रसिद्ध झाली आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. याआधी भारतातील एकमेव कृषी दैनिक म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने ‘ॲग्रोवन’चा गौरव केला आहे.   

पुणे येथील केन्द्रीय विद्यालयात कला शिक्षक म्हणून काळे कार्यरत असून त्यांनी शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर रेखाटलेली ‘चकाट्या‘ ही पॉकेट कार्टूनस ‘ॲग्रोवन’मधून नियमित प्रसिद्ध होत आहेत. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘ॲग्रोवन’ मधील ‘चकाट्या’ही ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये पुणे - ‘ॲग्रोवन’मधून ‘चकाट्या’ या व्यंगचित्रांद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडणारे व्यंगचित्रकार लहू काळे यांची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रेखाटलेली सर्वाधिक ४ हजार ३४१ पॉकेट कार्टून २००७  ते २०१९ या कालावधीत ‘ॲग्रोवन’मधून सलग प्रसिद्ध झाली आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. याआधी भारतातील एकमेव कृषी दैनिक म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने ‘ॲग्रोवन’चा गौरव केला आहे.    पुणे येथील केन्द्रीय विद्यालयात कला शिक्षक म्हणून काळे कार्यरत असून त्यांनी शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर रेखाटलेली ‘चकाट्या‘ ही पॉकेट कार्टूनस ‘ॲग्रोवन’मधून नियमित प्रसिद्ध होत आहेत.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GltxmB
Read More
कोरोनाची अखेर नजरेच्या टप्प्यात?

कोरोनाची रुग्णांमध्ये सौम्य किंवा लक्षणेच न दिसणे, त्यावर मात करण्यासाठी त्यांच्या शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्‍ती यांच्यावरील संशोधनातून या आजाराचा शेवट जवळ येतोय, असे दिसतेय. मात्र, त्याला रोखण्यासाठीच्या कठोर उपाययोजनाही कठोरपणे पाळणे महत्वाचे आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णवाढीचा दर, अशा निर्देशांकाच्या भाषेत बोलायचे तर सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावलेला आणि मृत्यूदरही दिवसामागे घटत असला तरीही निव्वळ आकड्यांकडे पाहिले तर त्यामध्ये रोज मोठी वाढ दिसते. अशावेळी हा आजार नेमका केव्हा आटोक्‍यात येणार याबाबत ठाम सांगणे कठीण आहे. तथापि, त्याबाबतची जगभरातील संशोधने आणि निष्कर्ष आशादायी आणि या आजाराचा शेवट जवळ आल्याकडे निर्देश करणारे आहेत.

टी सेल इम्युनिटी
स्टॉकहोममधील ‘सेंटर फॉर इन्फेक्‍शियस मेडिसिन’च्या (स्वीडन) शास्त्रज्ञांचे संशोधन महत्त्वाचे आहे. लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणांच्या कोरोना रुग्णांमध्ये प्रतिपिंडे म्हणजेच अँटीबॉडीज विकसित होताना दिसत नाहीत. त्यामुळे या स्वरूपाच्या सौम्य संसर्गाच्या आजारापासून ॲन्टीबॉडी स्वरुपातील प्रतिकारशक्तीच न मिळाल्याने पुन्हा संसर्ग झाला तर त्यांना संरक्षण मिळू शकत नाही, असा काहींचा समज होता.

‘स्मरण पेशी’चे कार्य
या संशोधनात दोन गोष्टी समोर आल्या. ज्या व्यक्तींना मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसतात, त्यांच्यामध्ये आणि ज्या व्यक्ती लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे दाखवतात, अशा दोन्ही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत, हे कळले. इम्युनिटी व्यवस्थेत ‘बी’ आणि ‘टी’ अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. मध्यम ते तीव्र लक्षणांच्या व्यक्तींमध्ये इम्युनिटी संस्थेतील ‘बी सेल’ क्रियाशील होऊन अँटीबॉडीची निर्मिती होते. मात्र ज्या व्यक्तींमध्ये कोरोना आजाराची लक्षणे नसतात किंवा सौम्य असतात अशांमध्ये ‘टी सेल’ क्रियाशील होऊन ‘सायटोटॉक्‍सिक’ म्हणजे पेशी नष्ट करणाऱ्या ‘टी’ प्रकारच्या पेशी कार्यरत होतात. ज्या पेशींना विषाणूंची बाधा झाली, त्यांना विशिष्ट पद्धतीने नष्ट करण्याचे काम ‘टी सेल’ करतात.

याला ‘प्रोग्रॅम्ड सेल डेथ’ म्हणजे ‘नियोजनपूर्वक पेशीनाश’ म्हणतात. यात विशिष्ट विकर (इंझाईम) सायटोटॉक्‍सिक सेलमधून बाहेर पडतात आणि ते संसर्गग्रस्त पेशीमध्ये जाऊन तिला छिद्रे पाडतात. इतर रसायनांच्या मदतीने तिचा मृत्यू घडवतात. यामुळे ज्या पेशींना बाधा आहे, त्याच विषाणूसह नष्ट झाल्याने शरीरामध्ये विषाणूंचा फैलाव रोखला जातो. त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नाहीत, या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष रोगाची तीव्रता अत्यंत कमी होत असली तरी प्रतिपिंडे तयार होत वाहीत. त्यामुळे अशा सौम्य लक्षणांच्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आढळत नाहीत. तथापि, या ‘टी सेल’नंतर ‘मेमरी सेल’ कार्यान्वित करतात. त्यांना ‘स्मरण पेशी’देखील म्हणू शकतो. या ‘मेमरी सेल’ प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाच्या आहेत.

या व्यक्तींमध्ये जेव्हा हाच विषाणू दुसऱ्यांदा प्रवेशतो, तेव्हा संपूर्ण इम्युनिटी व्यवस्था क्रियाशील होते. त्याचा मुकाबला करते. त्यामुळे विषाणूचा फेरसंसर्ग टळतो. याचा अर्थ आज ज्या कोरोनाबाधितांना लक्षणे सौम्य आहेत किंवा नाहीतच त्यांच्या रक्तामध्ये जरी या आजाराच्या अँटीबॉडीज आढळल्या तरी त्यांच्या शरीरात मेमरी सेलच्या रुपाने प्रतिकारशक्ती निर्माण होते. ती पुन्हा होऊ शकणाऱ्या संसर्गाला तोंड देण्यासाठी पुरेशा समर्थ असते. नव्या संशोधनाचे हे निष्कर्ष महत्त्वाचे. आज जे कोरोनाबाधित आढळताहेत, त्यातील ७० टक्‍क्‍यांवर रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा असतीलच तर ती सौम्य आहेत. याचा अर्थ सर्व रुग्णांमध्ये सायटोटॉक्‍सिक टी सेलच्या मार्गाने प्रतिकारशक्तीची निर्मिती झाली असून, त्यांच्या शरीरात ‘मेमरी सेल‘ तयार झाल्यात. 

प्रतिकारशक्ती किती टिकेल? 
आजारानंतरच्या प्रतिकारशक्‍तीबाबत आणखी संशोधन ‘वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या इम्युनॉलॉजी’ विभागाने केलंय. ज्या प्रकारे सार्स या कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराची प्रतिकारशक्ती सुमारे तीन वर्षापर्यंत टिकते. त्याच प्रकारे कोरोनामुळे मिळणारी प्रतिकारशक्तीही तितक्‍याच दीर्घकाळ टिकू शकते, अशी मांडणी या शास्त्रज्ञांनी केली आहे. जर ही प्रतिकारशक्ती दोन-तीन वर्ष टिकणारी असेल तर त्याद्वारे निर्माण होणाऱ्या हर्ड इम्युनिटीचा (समूह प्रतिकारशक्ती) लाभ कोरोनाप्रसाराचा वेग रोखण्यास होऊ शकतो.

एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती बाधित झाली तरी, कुटुंबातील ८० ते ९० टक्के व्यक्तींना त्याचा संसर्ग होत नाही, असा निष्कर्ष जगातील संशोधनाच्या अभ्यासाअंती गांधीनगरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ’चे संचालक डॉ. दिलीप मावळणकर यांच्या पथकाने काढलाय. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या ‘क्वार्टरली रिव्ह्यू ऑफ मेडिसिन’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय.

विभागलेपण पथ्यावर
हे संशोधन समोर येत असतानाच युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील न्यूरोसायंटिस्ट कार्ल फ्रिस्टन यांनी प्रतिकारशक्तीतील ‘डार्क मॅटर’ ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते कोणत्याही देशातील सर्वच लोकांना कोरोनासारखा आजार होतो, असे गृहीत धरून रुग्णसंख्येचे अंदाज मांडतो.

परंतु वास्तव वेगळे असते. सर्वच लोक नवा आजार व्हावा इतके दुबळे नसतात. दोन मुख्य कारणांमुळे एखादा आजार काही व्यक्तींना होण्याची शक्‍यता कमी असते. एक म्हणजे कोरोनासारख्या इतर विषाणूजन्य आजारामुळे किंवा इतर आजार पूर्वी झाल्यामुळे ज्यांना प्रतिकारशक्ती मिळालेली आहे, अशांना तो होण्याची शक्‍यता कमी असते. कोरोनासारख्या आजाराचा प्रसार पाहताना आपण जणू काही समाजातील प्रत्येकाला प्रत्येकजण भेटणार, अशा पद्धतीने विचार करतो. परंतु समाज हा अनेकदा रेल्वेच्या डब्याप्रमाणे वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये विभागलेला असतो. परस्परांपासून विलग असतो. भौगोलिक स्थिती, जात, वर्ग, लिंग, वय अशा कारणांमुळे हे विलगीकरण होते. 

धोका २५ टक्‍क्‍यांनाच
कार्ल फ्रिस्टनच्या मते, समाजातील २५ टक्‍क्‍यांना नवीन आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती असू शकते, तर सुमारे ५० टक्के लोकसंख्या वेगवेगळ्या कारणांमुळे सामाजिक अलगीकरणामध्ये असते. त्यामुळे आजार होण्याची शक्‍यता समाजातील २५ टक्‍क्‍यांनाच असते. देश-काल परिस्थितीनुसार प्रत्येक समाजातील इम्युनॉलॉजीकल डार्क मॅटरचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.

कोरोनाविरुद्ध एखाद्या समाजात ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणजेच समूह प्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरता त्या समाजातील किमान ६० ते ७० टक्‍क्‍यांमध्ये आजाराविरुद्धची प्रतिकारशक्ती आवश्‍यक आहे, असे साथरोग शास्त्रज्ञ मानतात. तथापि कार्ल फ्रिस्टन यांची ही डार्क मॅटर थिअरी लक्षात घेता, आजाराची लागण होण्याची शक्‍यता पंचवीस ते तीस टक्‍क्‍यांना असल्याने खूप कमी प्रमाणात लोकांना लागण होऊनही त्या समाजामध्ये हर्ड इम्युनिटीचे परिणाम दिसू लागतात. आपल्याकडे अहमदाबाद, दिल्ली, मुंबई या ठिकाणी कोरोनाच्या प्रसाराचा मंदावलेला वेग त्याचेच निदर्शक आहे. एकंदरीतच  कोरोनाचा शेवट आता नजरेच्या टप्प्यात आहे. अर्थात काही महिन्यातच त्याच्या केसेस शून्यावर येतील, असे नाही. तो टाळण्यासाठीच्या खबरदारीचा विसर पडू देणे योग्य नव्हे. उलट, जबाबदारीने आणि काळजीपूर्वक पावले टाकणेच महत्वाचे आहे.

(लेखक ‘एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमा’चे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.)

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाची अखेर नजरेच्या टप्प्यात? कोरोनाची रुग्णांमध्ये सौम्य किंवा लक्षणेच न दिसणे, त्यावर मात करण्यासाठी त्यांच्या शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्‍ती यांच्यावरील संशोधनातून या आजाराचा शेवट जवळ येतोय, असे दिसतेय. मात्र, त्याला रोखण्यासाठीच्या कठोर उपाययोजनाही कठोरपणे पाळणे महत्वाचे आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रुग्णवाढीचा दर, अशा निर्देशांकाच्या भाषेत बोलायचे तर सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावलेला आणि मृत्यूदरही दिवसामागे घटत असला तरीही निव्वळ आकड्यांकडे पाहिले तर त्यामध्ये रोज मोठी वाढ दिसते. अशावेळी हा आजार नेमका केव्हा आटोक्‍यात येणार याबाबत ठाम सांगणे कठीण आहे. तथापि, त्याबाबतची जगभरातील संशोधने आणि निष्कर्ष आशादायी आणि या आजाराचा शेवट जवळ आल्याकडे निर्देश करणारे आहेत. टी सेल इम्युनिटी स्टॉकहोममधील ‘सेंटर फॉर इन्फेक्‍शियस मेडिसिन’च्या (स्वीडन) शास्त्रज्ञांचे संशोधन महत्त्वाचे आहे. लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणांच्या कोरोना रुग्णांमध्ये प्रतिपिंडे म्हणजेच अँटीबॉडीज विकसित होताना दिसत नाहीत. त्यामुळे या स्वरूपाच्या सौम्य संसर्गाच्या आजारापासून ॲन्टीबॉडी स्वरुपातील प्रतिकारशक्तीच न मिळाल्याने पुन्हा संसर्ग झाला तर त्यांना संरक्षण मिळू शकत नाही, असा काहींचा समज होता. ‘स्मरण पेशी’चे कार्य या संशोधनात दोन गोष्टी समोर आल्या. ज्या व्यक्तींना मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसतात, त्यांच्यामध्ये आणि ज्या व्यक्ती लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे दाखवतात, अशा दोन्ही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत, हे कळले. इम्युनिटी व्यवस्थेत ‘बी’ आणि ‘टी’ अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. मध्यम ते तीव्र लक्षणांच्या व्यक्तींमध्ये इम्युनिटी संस्थेतील ‘बी सेल’ क्रियाशील होऊन अँटीबॉडीची निर्मिती होते. मात्र ज्या व्यक्तींमध्ये कोरोना आजाराची लक्षणे नसतात किंवा सौम्य असतात अशांमध्ये ‘टी सेल’ क्रियाशील होऊन ‘सायटोटॉक्‍सिक’ म्हणजे पेशी नष्ट करणाऱ्या ‘टी’ प्रकारच्या पेशी कार्यरत होतात. ज्या पेशींना विषाणूंची बाधा झाली, त्यांना विशिष्ट पद्धतीने नष्ट करण्याचे काम ‘टी सेल’ करतात. याला ‘प्रोग्रॅम्ड सेल डेथ’ म्हणजे ‘नियोजनपूर्वक पेशीनाश’ म्हणतात. यात विशिष्ट विकर (इंझाईम) सायटोटॉक्‍सिक सेलमधून बाहेर पडतात आणि ते संसर्गग्रस्त पेशीमध्ये जाऊन तिला छिद्रे पाडतात. इतर रसायनांच्या मदतीने तिचा मृत्यू घडवतात. यामुळे ज्या पेशींना बाधा आहे, त्याच विषाणूसह नष्ट झाल्याने शरीरामध्ये विषाणूंचा फैलाव रोखला जातो. त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नाहीत, या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष रोगाची तीव्रता अत्यंत कमी होत असली तरी प्रतिपिंडे तयार होत वाहीत. त्यामुळे अशा सौम्य लक्षणांच्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आढळत नाहीत. तथापि, या ‘टी सेल’नंतर ‘मेमरी सेल’ कार्यान्वित करतात. त्यांना ‘स्मरण पेशी’देखील म्हणू शकतो. या ‘मेमरी सेल’ प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाच्या आहेत. या व्यक्तींमध्ये जेव्हा हाच विषाणू दुसऱ्यांदा प्रवेशतो, तेव्हा संपूर्ण इम्युनिटी व्यवस्था क्रियाशील होते. त्याचा मुकाबला करते. त्यामुळे विषाणूचा फेरसंसर्ग टळतो. याचा अर्थ आज ज्या कोरोनाबाधितांना लक्षणे सौम्य आहेत किंवा नाहीतच त्यांच्या रक्तामध्ये जरी या आजाराच्या अँटीबॉडीज आढळल्या तरी त्यांच्या शरीरात मेमरी सेलच्या रुपाने प्रतिकारशक्ती निर्माण होते. ती पुन्हा होऊ शकणाऱ्या संसर्गाला तोंड देण्यासाठी पुरेशा समर्थ असते. नव्या संशोधनाचे हे निष्कर्ष महत्त्वाचे. आज जे कोरोनाबाधित आढळताहेत, त्यातील ७० टक्‍क्‍यांवर रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा असतीलच तर ती सौम्य आहेत. याचा अर्थ सर्व रुग्णांमध्ये सायटोटॉक्‍सिक टी सेलच्या मार्गाने प्रतिकारशक्तीची निर्मिती झाली असून, त्यांच्या शरीरात ‘मेमरी सेल‘ तयार झाल्यात.  प्रतिकारशक्ती किती टिकेल?  आजारानंतरच्या प्रतिकारशक्‍तीबाबत आणखी संशोधन ‘वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या इम्युनॉलॉजी’ विभागाने केलंय. ज्या प्रकारे सार्स या कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराची प्रतिकारशक्ती सुमारे तीन वर्षापर्यंत टिकते. त्याच प्रकारे कोरोनामुळे मिळणारी प्रतिकारशक्तीही तितक्‍याच दीर्घकाळ टिकू शकते, अशी मांडणी या शास्त्रज्ञांनी केली आहे. जर ही प्रतिकारशक्ती दोन-तीन वर्ष टिकणारी असेल तर त्याद्वारे निर्माण होणाऱ्या हर्ड इम्युनिटीचा (समूह प्रतिकारशक्ती) लाभ कोरोनाप्रसाराचा वेग रोखण्यास होऊ शकतो. एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती बाधित झाली तरी, कुटुंबातील ८० ते ९० टक्के व्यक्तींना त्याचा संसर्ग होत नाही, असा निष्कर्ष जगातील संशोधनाच्या अभ्यासाअंती गांधीनगरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ’चे संचालक डॉ. दिलीप मावळणकर यांच्या पथकाने काढलाय. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या ‘क्वार्टरली रिव्ह्यू ऑफ मेडिसिन’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय. विभागलेपण पथ्यावर हे संशोधन समोर येत असतानाच युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील न्यूरोसायंटिस्ट कार्ल फ्रिस्टन यांनी प्रतिकारशक्तीतील ‘डार्क मॅटर’ ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते कोणत्याही देशातील सर्वच लोकांना कोरोनासारखा आजार होतो, असे गृहीत धरून रुग्णसंख्येचे अंदाज मांडतो. परंतु वास्तव वेगळे असते. सर्वच लोक नवा आजार व्हावा इतके दुबळे नसतात. दोन मुख्य कारणांमुळे एखादा आजार काही व्यक्तींना होण्याची शक्‍यता कमी असते. एक म्हणजे कोरोनासारख्या इतर विषाणूजन्य आजारामुळे किंवा इतर आजार पूर्वी झाल्यामुळे ज्यांना प्रतिकारशक्ती मिळालेली आहे, अशांना तो होण्याची शक्‍यता कमी असते. कोरोनासारख्या आजाराचा प्रसार पाहताना आपण जणू काही समाजातील प्रत्येकाला प्रत्येकजण भेटणार, अशा पद्धतीने विचार करतो. परंतु समाज हा अनेकदा रेल्वेच्या डब्याप्रमाणे वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये विभागलेला असतो. परस्परांपासून विलग असतो. भौगोलिक स्थिती, जात, वर्ग, लिंग, वय अशा कारणांमुळे हे विलगीकरण होते.  धोका २५ टक्‍क्‍यांनाच कार्ल फ्रिस्टनच्या मते, समाजातील २५ टक्‍क्‍यांना नवीन आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती असू शकते, तर सुमारे ५० टक्के लोकसंख्या वेगवेगळ्या कारणांमुळे सामाजिक अलगीकरणामध्ये असते. त्यामुळे आजार होण्याची शक्‍यता समाजातील २५ टक्‍क्‍यांनाच असते. देश-काल परिस्थितीनुसार प्रत्येक समाजातील इम्युनॉलॉजीकल डार्क मॅटरचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. कोरोनाविरुद्ध एखाद्या समाजात ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणजेच समूह प्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरता त्या समाजातील किमान ६० ते ७० टक्‍क्‍यांमध्ये आजाराविरुद्धची प्रतिकारशक्ती आवश्‍यक आहे, असे साथरोग शास्त्रज्ञ मानतात. तथापि कार्ल फ्रिस्टन यांची ही डार्क मॅटर थिअरी लक्षात घेता, आजाराची लागण होण्याची शक्‍यता पंचवीस ते तीस टक्‍क्‍यांना असल्याने खूप कमी प्रमाणात लोकांना लागण होऊनही त्या समाजामध्ये हर्ड इम्युनिटीचे परिणाम दिसू लागतात. आपल्याकडे अहमदाबाद, दिल्ली, मुंबई या ठिकाणी कोरोनाच्या प्रसाराचा मंदावलेला वेग त्याचेच निदर्शक आहे. एकंदरीतच  कोरोनाचा शेवट आता नजरेच्या टप्प्यात आहे. अर्थात काही महिन्यातच त्याच्या केसेस शून्यावर येतील, असे नाही. तो टाळण्यासाठीच्या खबरदारीचा विसर पडू देणे योग्य नव्हे. उलट, जबाबदारीने आणि काळजीपूर्वक पावले टाकणेच महत्वाचे आहे. (लेखक ‘एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमा’चे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.) Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lFDY4R
Read More

Tuesday, September 1, 2020

शार्ली एब्दो यांनी पुन्हा पैगंबर मोहम्मद यांच्यावरील व्यंगचित्र का छापलं?
फिरत्या विसर्जन हौदाकडे फिरवली पाठ, गणेश विसर्जन कॅनॉलमध्येच!

धायरी(पुणे) :अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस होय. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता, परंतू मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि आज विसर्जनासाठी देखील तितक्याच साधेपणाने पण, पवित्र मानसिक भावनेतून सर्वत्र मोठी लगबग सुरू होती. 

वडगाव, धायरी, नऱ्हे परिसरात 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'', आशा घोषणा देत घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन हे घरीच बादलीत करण्यात आले तर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यांनी बाप्पाचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या विसर्जन हौदांमध्ये करण्यात आले. गणेश मुर्ती संकलन व निर्माल्य संकलनची पालिकेने ज्या ठिकाणी सोय केले त्या ठिकाणी नागरिक जाऊन मुर्ती तसेच निर्माल्य देत होते. या वर्षी गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं नागरिकांनी साजरा केला.

गणेश मंडळांनी कोरोनामुळे या वर्षी गणेश उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले. येथील मंडळांनी स्टेज, विद्युत रोषणाई, स्पीकर, व विविध लहान मोठयांसाठी कार्यक्रम तसेच मिरवणूकसाठी लागणारे भव्य असे ढोल, ताशा, डीजे, लेझीम अशा अनेक गोष्टींना फाटा देत गणेश उत्सव सध्या पद्धतीने साजरा केला. महानगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या फिरत्या हौदांकडे गणेश भक्तांनी फिरवली पाठ, बाप्पाचे विसर्जन कॅनॉल मध्येच यावेळी मात्र, वडगाव फाटा येथील कॅनॉल जवळ महानगरपालिका एकही कर्मचारी कॅनॉलकडे फिरकले नाही. त्या बरोबर पोलीस बंदोबस्त देखील कॅनॉल परिसरात बघावयास मिळाला नाही.

गणपती विसर्जनासाठी स्थनिक लहान लहान मुले आपला जीव धोक्यात घालून कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात गणपती विसर्जन करत होते, तसेच कॅनॉल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिक कुठल्याही प्रकारची खबरदारी घेताने दिसत नव्हते. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती. महानगरपालिकेला दान केलेल्या मुर्त्या महानगरपालिका करणार काय? अशी परिसरामधील नागरिकांनमध्ये चर्चा सुरु होती.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

फिरत्या विसर्जन हौदाकडे फिरवली पाठ, गणेश विसर्जन कॅनॉलमध्येच! धायरी(पुणे) :अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस होय. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता, परंतू मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि आज विसर्जनासाठी देखील तितक्याच साधेपणाने पण, पवित्र मानसिक भावनेतून सर्वत्र मोठी लगबग सुरू होती.  वडगाव, धायरी, नऱ्हे परिसरात 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'', आशा घोषणा देत घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन हे घरीच बादलीत करण्यात आले तर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यांनी बाप्पाचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या विसर्जन हौदांमध्ये करण्यात आले. गणेश मुर्ती संकलन व निर्माल्य संकलनची पालिकेने ज्या ठिकाणी सोय केले त्या ठिकाणी नागरिक जाऊन मुर्ती तसेच निर्माल्य देत होते. या वर्षी गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं नागरिकांनी साजरा केला. गणेश मंडळांनी कोरोनामुळे या वर्षी गणेश उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले. येथील मंडळांनी स्टेज, विद्युत रोषणाई, स्पीकर, व विविध लहान मोठयांसाठी कार्यक्रम तसेच मिरवणूकसाठी लागणारे भव्य असे ढोल, ताशा, डीजे, लेझीम अशा अनेक गोष्टींना फाटा देत गणेश उत्सव सध्या पद्धतीने साजरा केला. महानगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या फिरत्या हौदांकडे गणेश भक्तांनी फिरवली पाठ, बाप्पाचे विसर्जन कॅनॉल मध्येच यावेळी मात्र, वडगाव फाटा येथील कॅनॉल जवळ महानगरपालिका एकही कर्मचारी कॅनॉलकडे फिरकले नाही. त्या बरोबर पोलीस बंदोबस्त देखील कॅनॉल परिसरात बघावयास मिळाला नाही. गणपती विसर्जनासाठी स्थनिक लहान लहान मुले आपला जीव धोक्यात घालून कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात गणपती विसर्जन करत होते, तसेच कॅनॉल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिक कुठल्याही प्रकारची खबरदारी घेताने दिसत नव्हते. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती. महानगरपालिकेला दान केलेल्या मुर्त्या महानगरपालिका करणार काय? अशी परिसरामधील नागरिकांनमध्ये चर्चा सुरु होती. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jGfmqN
Read More
सातारा : तब्बल 30 कोटींच्या निधीची विकासकामे रखडणार; दुर्लक्षाचा परिणाम

सातारा : जिल्हा परिषद व नगरपंचायत प्रशासनाचा तब्बल 30 कोटींचा निधी केवळ संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे परत गेला आहे. "बीडीएस'मधून निधी काढून घेण्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा निधी परत गेला आहे. 

जिल्हा परिषदेतील बांधकाम (उत्तर) विभागाचा सात कोटी 64 लाख, पाणीपुरवठा 93 लाख 73 हजार, समाजकल्याण विभागांतर्गत बौद्ध वस्ती सुधार योजनेचा सहा कोटी 64 लाख रुपये तसेच पालिकांना दिलेला दलित वस्ती सुविधा योजनेचा तब्बल 14 कोटी 40 लाख 26 हजार रुपयांच्या निधीचा त्यामध्ये समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग येण्यापूर्वीच जिल्हा परिषद व नगरपंचायत प्रशासनाला निधी उपलब्ध होतो. मार्चअखेरपर्यंत हा निधी "बीडीएस'मधून उचलण्यास संबंधित विभागांनी उशीर केला. परिणामी "बीडीएस' बंद झाल्याने निधी काढता आलेला नाही. या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेचा 15.60 कोटी, तर पालिका प्रशासनाला यावर्षी जादा मिळालेल्या निधीपैकी 14.40 कोटींचा निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाकडे परत गेला आहे.

कोरोनाची करुण कहाणी; आता कशी करेल, गणराया त्यांचे साकडे पुरे?
 
जिल्हा परिषदेतील बांधकाम उत्तर विभागाकडील साकव बांधण्यासाठी आलेला सात कोटी 64 लाख 66 हजार रुपये, पाणीपुरवठा विभागाकडील खास उपाययोजनांसाठी मिळालेला 93 लाख 73 हजार रुपये, समाजकल्याण विभागाला अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेसाठी आलेला सहा कोटी 64 लख 39 हजार रुपये असा एकूण 15 कोटी 60 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे. जिल्ह्यातील पालिकांना मिळालेल्या जादाचा दलित वस्ती सुविधा पुरविण्यासाठीचा 14 कोटी 40 लाख 16 हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे. 

बँड व्यावसायिकांवर कोरोनाचं विघ्न; ४५ हजार कलाकारांची उपासमार

अनेक विकासकामे रखडणार
 
अखर्चिक निधी परत गेल्यामुळे पालिका व जिल्हा परिषदेकडील दलित वस्ती सुधार योजनेची कामे यावर्षी निधीअभावी होणार नाहीत. तसेच साकवांच्या कामासाठी जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी आग्रही असतात. त्यासाठी आलेला सात कोटी 64 लाखांचा निधी परत गेल्याने ही कामेही आता होणार नाहीत. आता पुढील वर्षी मार्चमध्ये पुन्हा निधी उपलब्ध झाल्यावरच या कामांवर निधी टाकून ती पूर्ण करावी लागणार आहेत.

पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा

Edited By : Siddharth Latkar 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सातारा : तब्बल 30 कोटींच्या निधीची विकासकामे रखडणार; दुर्लक्षाचा परिणाम सातारा : जिल्हा परिषद व नगरपंचायत प्रशासनाचा तब्बल 30 कोटींचा निधी केवळ संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे परत गेला आहे. "बीडीएस'मधून निधी काढून घेण्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा निधी परत गेला आहे.  जिल्हा परिषदेतील बांधकाम (उत्तर) विभागाचा सात कोटी 64 लाख, पाणीपुरवठा 93 लाख 73 हजार, समाजकल्याण विभागांतर्गत बौद्ध वस्ती सुधार योजनेचा सहा कोटी 64 लाख रुपये तसेच पालिकांना दिलेला दलित वस्ती सुविधा योजनेचा तब्बल 14 कोटी 40 लाख 26 हजार रुपयांच्या निधीचा त्यामध्ये समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग येण्यापूर्वीच जिल्हा परिषद व नगरपंचायत प्रशासनाला निधी उपलब्ध होतो. मार्चअखेरपर्यंत हा निधी "बीडीएस'मधून उचलण्यास संबंधित विभागांनी उशीर केला. परिणामी "बीडीएस' बंद झाल्याने निधी काढता आलेला नाही. या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेचा 15.60 कोटी, तर पालिका प्रशासनाला यावर्षी जादा मिळालेल्या निधीपैकी 14.40 कोटींचा निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाकडे परत गेला आहे. कोरोनाची करुण कहाणी; आता कशी करेल, गणराया त्यांचे साकडे पुरे?   जिल्हा परिषदेतील बांधकाम उत्तर विभागाकडील साकव बांधण्यासाठी आलेला सात कोटी 64 लाख 66 हजार रुपये, पाणीपुरवठा विभागाकडील खास उपाययोजनांसाठी मिळालेला 93 लाख 73 हजार रुपये, समाजकल्याण विभागाला अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेसाठी आलेला सहा कोटी 64 लख 39 हजार रुपये असा एकूण 15 कोटी 60 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे. जिल्ह्यातील पालिकांना मिळालेल्या जादाचा दलित वस्ती सुविधा पुरविण्यासाठीचा 14 कोटी 40 लाख 16 हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे.  बँड व्यावसायिकांवर कोरोनाचं विघ्न; ४५ हजार कलाकारांची उपासमार अनेक विकासकामे रखडणार   अखर्चिक निधी परत गेल्यामुळे पालिका व जिल्हा परिषदेकडील दलित वस्ती सुधार योजनेची कामे यावर्षी निधीअभावी होणार नाहीत. तसेच साकवांच्या कामासाठी जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी आग्रही असतात. त्यासाठी आलेला सात कोटी 64 लाखांचा निधी परत गेल्याने ही कामेही आता होणार नाहीत. आता पुढील वर्षी मार्चमध्ये पुन्हा निधी उपलब्ध झाल्यावरच या कामांवर निधी टाकून ती पूर्ण करावी लागणार आहेत. पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा Edited By : Siddharth Latkar  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DjL6lS
Read More
अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत टाकले युरिया खत; शेतकऱ्याचे झाले २ लाखांचे नुकसान!

मंचर : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील शेतकरी सुभाष यशवंत वाळुंज यांनी कांदा चाळीत साठवलेल्या 700 कांदा पिशव्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोनशे कांदा पिशव्या भरतील एवढा कांदा काळा पडला आहे. हा कांदा फेकून देणे शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.शेतकर्या चे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिंगवे (पारगाव) याठिकाणी माळी मळ्यात सुभाष यशवंत वाळुंज  राहतात. यावर्षी त्यांनी मोठा खर्च करून कांद्याचे भर घोस उत्पादन घेतले. काढलेला कांदा पिशव्या त्यांनी शिंगवे गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांची कांदा चाळ भाड्याने घेऊन त्यामध्ये साठवला होता.  कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने  दहा  दिवसांपूर्वी युरिया टाकला असा अंदाज आहे. सोमवारी ( ता 31)सुभाष वाळूंज कांदाचाळी कडे कांदा पाहण्यासाठी गेले. त्यांना कांदा चाळीत युरीया टाकल्याचे आढळून आले. हे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. कांदा खराब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी थोडाफार सुरक्षित राहिले ला कांदा पिशव्यांमध्येभरण्यास सुरुवात केली आहे. मागील अनेक महिन्यापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे त. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न चांगले मिळेल अशी वाळूज यांना अपेक्षा होती. पण त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी पडले आहे.

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

 गेल्या वर्षी सुभाष वाळुंज यांच्या उसाच्या शेतीला अज्ञातांनी आग लावल्याने तसेच ठिबक संच ही पेटवून दिल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कोरोना साथीमुळे गेल्या सहा महिन्यापासून कांद्याला बाजार भाव नसल्यामुळे वाळुज यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. बाजारभाव वाढू लागल्याने त्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेतला होता. पण खोडसाळपणा ने केलेल्या कृत्यामुळे त्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. खोडसाळपणे नुकसान करणाऱ्या चा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी केली आहे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत टाकले युरिया खत; शेतकऱ्याचे झाले २ लाखांचे नुकसान! मंचर : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील शेतकरी सुभाष यशवंत वाळुंज यांनी कांदा चाळीत साठवलेल्या 700 कांदा पिशव्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोनशे कांदा पिशव्या भरतील एवढा कांदा काळा पडला आहे. हा कांदा फेकून देणे शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.शेतकर्या चे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिंगवे (पारगाव) याठिकाणी माळी मळ्यात सुभाष यशवंत वाळुंज  राहतात. यावर्षी त्यांनी मोठा खर्च करून कांद्याचे भर घोस उत्पादन घेतले. काढलेला कांदा पिशव्या त्यांनी शिंगवे गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांची कांदा चाळ भाड्याने घेऊन त्यामध्ये साठवला होता.  कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने  दहा  दिवसांपूर्वी युरिया टाकला असा अंदाज आहे. सोमवारी ( ता 31)सुभाष वाळूंज कांदाचाळी कडे कांदा पाहण्यासाठी गेले. त्यांना कांदा चाळीत युरीया टाकल्याचे आढळून आले. हे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. कांदा खराब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी थोडाफार सुरक्षित राहिले ला कांदा पिशव्यांमध्येभरण्यास सुरुवात केली आहे. मागील अनेक महिन्यापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे त. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न चांगले मिळेल अशी वाळूज यांना अपेक्षा होती. पण त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी पडले आहे. हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त  गेल्या वर्षी सुभाष वाळुंज यांच्या उसाच्या शेतीला अज्ञातांनी आग लावल्याने तसेच ठिबक संच ही पेटवून दिल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कोरोना साथीमुळे गेल्या सहा महिन्यापासून कांद्याला बाजार भाव नसल्यामुळे वाळुज यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. बाजारभाव वाढू लागल्याने त्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेतला होता. पण खोडसाळपणा ने केलेल्या कृत्यामुळे त्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. खोडसाळपणे नुकसान करणाऱ्या चा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी केली आहे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32KuMTW
Read More
पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा

सातारा : पुढच्या वर्षी लवकर... केवळ या जयघोषात सातारा शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणपतींचे मंगळवारी (ता.1) विसर्जन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव काळ सुना सुना झालेला होता. ना विसर्जन मिरवणुक ना ढोल-ताशांच्या कडकडाट. तरीही सर्वत्र केवळ टाळ्यांचा कडकडाटात बाप्पांना निरोप देताना प्रत्येकजण कोरोनाचे विघ्न दूर होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करीत होता. 

गणपती विसर्जनासाठी सातारा शहरातील बुधवार नाका, पोहणे तलाव, कल्याणी शाळा परिसर आदी ठिकाणी कृत्रिम तळ्यांची निर्मीती करुन विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवार नाका या ठिकाणी नागरिकांकडून गणपती घेतले जात होते. त्यानंतर एक ट्रॉलीतून ते विसर्जन तळी नेऊन एकत्रित तळ्यात विसर्जीत केली जात होते. विसर्जन स्थळावर पोलिसांचा बंदोबस्त होता. याबरोबरच पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

संगम माहूली, उरमोडी नदीवर देखील गावातील घरोघरचे गणपती विसर्जनासाठी नेले जात होते. विसर्जनासाठी पाच पेक्षा जादा माणसांनी परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा गर्दीचे प्रमाण घटले होते. सर्वच विसर्जनस्थळी पालिका, ग्रामपंचातय प्रशासनाने निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केली होती. नागरिक त्या कुंडातच निर्माल्य ठेवत होते. दरम्यान शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील (कंटेनमेंट झोन) गणपतींच्या मुर्तींचे पालिकेने संकलन केल्याचे सांगण्यात आले.

जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता

दरवर्षी ताशांचा गजर,गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोष करत गणेश विसर्जनाचा जल्लोष पहाटे सहा वाजेपर्यत चालायचा. यंदा मात्र तो डामडौल आणि जल्लोष दिसत नव्हता. पोलीस प्रशासनाने मानाच्या पाच मंडळांना सायंकाळी साडे सहा वाजता विसर्जनासाठी अर्धा तासाची वेळ दिली. त्यानूसार एकेक गणपती 501 पाटी नजीक आले. तेथून ते बुधवार नाका तळ्याच्या येथे मार्गस्थ झाले.

साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश

विसर्जनातील शेवटचा मानाचा गणपती श्री शंकर पार्वती गणपती (महादेव) याचे नगराध्यक्षा माधवी कदम, शाहूपूरी पोलिस स्टेशनचे प्रमुख विशाल वायकर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या असा या जयघोष करत उपस्थित भक्तांनी गणरायाला भावपुर्ण निरोप दिला. कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा सातारा : पुढच्या वर्षी लवकर... केवळ या जयघोषात सातारा शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणपतींचे मंगळवारी (ता.1) विसर्जन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव काळ सुना सुना झालेला होता. ना विसर्जन मिरवणुक ना ढोल-ताशांच्या कडकडाट. तरीही सर्वत्र केवळ टाळ्यांचा कडकडाटात बाप्पांना निरोप देताना प्रत्येकजण कोरोनाचे विघ्न दूर होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करीत होता.  गणपती विसर्जनासाठी सातारा शहरातील बुधवार नाका, पोहणे तलाव, कल्याणी शाळा परिसर आदी ठिकाणी कृत्रिम तळ्यांची निर्मीती करुन विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवार नाका या ठिकाणी नागरिकांकडून गणपती घेतले जात होते. त्यानंतर एक ट्रॉलीतून ते विसर्जन तळी नेऊन एकत्रित तळ्यात विसर्जीत केली जात होते. विसर्जन स्थळावर पोलिसांचा बंदोबस्त होता. याबरोबरच पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.  संगम माहूली, उरमोडी नदीवर देखील गावातील घरोघरचे गणपती विसर्जनासाठी नेले जात होते. विसर्जनासाठी पाच पेक्षा जादा माणसांनी परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा गर्दीचे प्रमाण घटले होते. सर्वच विसर्जनस्थळी पालिका, ग्रामपंचातय प्रशासनाने निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केली होती. नागरिक त्या कुंडातच निर्माल्य ठेवत होते. दरम्यान शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील (कंटेनमेंट झोन) गणपतींच्या मुर्तींचे पालिकेने संकलन केल्याचे सांगण्यात आले. जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता दरवर्षी ताशांचा गजर,गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोष करत गणेश विसर्जनाचा जल्लोष पहाटे सहा वाजेपर्यत चालायचा. यंदा मात्र तो डामडौल आणि जल्लोष दिसत नव्हता. पोलीस प्रशासनाने मानाच्या पाच मंडळांना सायंकाळी साडे सहा वाजता विसर्जनासाठी अर्धा तासाची वेळ दिली. त्यानूसार एकेक गणपती 501 पाटी नजीक आले. तेथून ते बुधवार नाका तळ्याच्या येथे मार्गस्थ झाले. साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश विसर्जनातील शेवटचा मानाचा गणपती श्री शंकर पार्वती गणपती (महादेव) याचे नगराध्यक्षा माधवी कदम, शाहूपूरी पोलिस स्टेशनचे प्रमुख विशाल वायकर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या असा या जयघोष करत उपस्थित भक्तांनी गणरायाला भावपुर्ण निरोप दिला. कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32TzcYW
Read More
तरुण पाण्यात आडकल्याचे समजताच धरणाचे ११ आकरा दरवाजे केले बंद

राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले. प्रचंड वेगाने जलप्रपात धरणाच्या दरवाजा खालील स्थिर पात्रात कोसळून, नदीपात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागला. स्थिर पात्राच्या मधोमध असलेल्या भिंतीवर एक तरुण अडकला. पाण्याने वेढलेल्या तरुणाला पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच उघडलेले सर्व दरवाजे पुन्हा बंद केले. दरवाजांच्याखाली स्थिर पात्राच्या भिंतीवर अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. १५ मिनिटांनी पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. धनराज बर्डे (वय २०, रा. नांदगाव) असे अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. ते दृश्य पाहण्यासाठी आलेला धनराज बर्डे थेट दरवाजांच्या खाली असलेल्या स्थिर पात्राच्या भिंतीवर चढला. पहिले तीन दरवाजे उघडले. धनराज भांबावला. तसाच बसून राहिला. सकाळी साडेनऊवाजेपर्यंत सर्व ११ दरवाजे उघडले. झपाट्याने स्थिर पात्रात पडलेले पाणी मुळा नदी पात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागले. धनराजच्या चारही बाजूने पाण्याने वेढा दिला. धनराज अडकला.

पर्यटकांसह उपस्थित काही पत्रकारांनी एक तरुण पाण्याने वेढलेल्या भिंतीवर बसल्याचे पाहिले. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पत्रकारांनी जलसंपदा खात्याचे धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, घटनेची माहिती दिली. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी तातडीने दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले. पाणी कमी झाले. धनराजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंधरा- वीस मिनिटे धनराज पाण्याने वेढला होता. त्याच्या जवळून दोन हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने प्रचंड आवाज करीत जलप्रपात नदीपात्रात वेगाने जात होता. नशीब बलवत्तर म्हणून धनराजचे प्राण वाचले.

घटना घडल्यानंतर थोड्या वेळाने काही उत्साही पर्यटक दरवाजा खाली असलेल्या स्थिर पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. तर, काही पर्यटक स्थिर पात्राच्या भिंतीवरून, वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून चालत होते.  अत्यंत धोकादायक ठिकाणी पर्यटक सेल्फी काढण्याच्या नादात वावरत होते. त्यामुळे, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे.

मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील म्हणाल्या, धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर सावधानतेसाठी तीन वेळा भोंगा वाजविण्यात आला. परंतु, उत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन बसतात. अडकलेल्या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे.  जलसंपदाची कर्मचारी संख्या अपुरी असल्याने, पर्यटकांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही.

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तरुण पाण्यात आडकल्याचे समजताच धरणाचे ११ आकरा दरवाजे केले बंद राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले. प्रचंड वेगाने जलप्रपात धरणाच्या दरवाजा खालील स्थिर पात्रात कोसळून, नदीपात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागला. स्थिर पात्राच्या मधोमध असलेल्या भिंतीवर एक तरुण अडकला. पाण्याने वेढलेल्या तरुणाला पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच उघडलेले सर्व दरवाजे पुन्हा बंद केले. दरवाजांच्याखाली स्थिर पात्राच्या भिंतीवर अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. १५ मिनिटांनी पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. धनराज बर्डे (वय २०, रा. नांदगाव) असे अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. ते दृश्य पाहण्यासाठी आलेला धनराज बर्डे थेट दरवाजांच्या खाली असलेल्या स्थिर पात्राच्या भिंतीवर चढला. पहिले तीन दरवाजे उघडले. धनराज भांबावला. तसाच बसून राहिला. सकाळी साडेनऊवाजेपर्यंत सर्व ११ दरवाजे उघडले. झपाट्याने स्थिर पात्रात पडलेले पाणी मुळा नदी पात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागले. धनराजच्या चारही बाजूने पाण्याने वेढा दिला. धनराज अडकला. पर्यटकांसह उपस्थित काही पत्रकारांनी एक तरुण पाण्याने वेढलेल्या भिंतीवर बसल्याचे पाहिले. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पत्रकारांनी जलसंपदा खात्याचे धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, घटनेची माहिती दिली. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी तातडीने दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले. पाणी कमी झाले. धनराजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंधरा- वीस मिनिटे धनराज पाण्याने वेढला होता. त्याच्या जवळून दोन हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने प्रचंड आवाज करीत जलप्रपात नदीपात्रात वेगाने जात होता. नशीब बलवत्तर म्हणून धनराजचे प्राण वाचले. घटना घडल्यानंतर थोड्या वेळाने काही उत्साही पर्यटक दरवाजा खाली असलेल्या स्थिर पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. तर, काही पर्यटक स्थिर पात्राच्या भिंतीवरून, वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून चालत होते.  अत्यंत धोकादायक ठिकाणी पर्यटक सेल्फी काढण्याच्या नादात वावरत होते. त्यामुळे, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे. मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील म्हणाल्या, धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर सावधानतेसाठी तीन वेळा भोंगा वाजविण्यात आला. परंतु, उत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन बसतात. अडकलेल्या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे.  जलसंपदाची कर्मचारी संख्या अपुरी असल्याने, पर्यटकांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gTqVsG
Read More
या गावात दगड वापरायला बंदी आहे ! गावात दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही नाही सापडणार 

या गावात तुम्हाला दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही सापडणार नाही. माती आणि विटांची सुबक घरे हे इथले वैशिष्ट्य. या गावचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव रामेश्‍वराचे मंदिर मात्र दगडातील वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराशी जोडलेल्या आख्यायिकेमुळे गावात दगडाचे घर उभारले जात नाही. ही परंपरा कित्येक पिढ्या जपली आहे. सावंतवाडीपासून अवघ्या 6 किलोमीटरवर असलेले आकेरी-हुमरस (ता. कुडाळ). 
आकेरी आणि हुमरस ही आता दोन गावे म्हणून ओळखली जातात. त्यांच्या ग्रामपंचायती वेगळ्या आहेत; मात्र पूर्वी ही दोन्ही गावे मिळून एकच गाव होते आणि बांधकामात दगड न वापरण्याची परंपरा आजही या दोन गावांत जपली जाते.

 
माणगावला जाणाऱ्या मार्गाशेजारीच श्री देव रामेश्‍वर मंदिराचे बांधकाम झाले. त्यावेळी मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा दगड देवगडवरून बैलगाडीतून आणला होता. श्री रामेश्‍वरावर आकेरीवासीयांची मोठी नितांत श्रद्धा असून, आपल्या मंदिराचे बांधकाम दगडी असल्यामुळे देवापेक्षा मोठे कोणी असू नये, या विचारधारेने गावात कोणीही आपल्या घराला दगड वापरणार नाही, असा शब्द मानकाऱ्यांनी मंदिरात देवासमोर दिला. त्यानंतर ते आजतागायत गावात कोणीही स्थायिक झालेली व्यक्ती आपल्या वास्तूला दगड वापरत नाही. त्यामुळे गावातील सर्वच घरांचे बांधकाम विटांपासून झालेले आहे. अलीकडे स्लॅबची घरे बांधणारे सिमेंटच्या ब्लॉकचा वापर करतात. श्रीदेव रामेश्‍वराच्या तुलनेत कोणतीच गोष्ट मोठी असू नये. तसे करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला गावात स्थिरता लाभत नाही, त्याची हानी होते, अशा पूर्वीपासून चालत आलेल्या आख्यायिकेनुसार आकेरी व हुमरसवासीय दगडी बांधकाम करत नाहीत. गावात दगडी बांधकाम करण्याचे ज्यांनी प्रयत्न केले त्यांना तशी वेगळी प्रचीती किंवा वेगळेच अनुभव आले असल्याचा दावा ग्रामस्थ करतात. त्यामुळे दगडी घरे नसलेला गाव म्हणून आकेरी-हुमरसचा नावलौकिक सर्वदूर आहे. 

पूर्वी आकेरी व हुमरस हे कुडाळ तालुक्‍यातील एकच गाव होते; मात्र नंतर काही कारणास्तव आकेरी व हुमरस असे दोन भाग करण्यात आले. आकेरी गावची लोकसंख्या 3 हजारांच्या आत आहे. गावचे दोन भाग झाल्यानंतरही दोन्ही गावांत देवाच्या दंतकथेनुसार दगडी बांधकाम करण्यास कोणीही तयार होत नाही. माणगावचे खोरे जवळच असल्यामुळे निसर्गाच्या कुशीत मुंबई-गोवा महामार्गावरच ही गावे आहेत. इथल्या स्थायिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे पावसाळ्यात गावाचे सौंदर्य विशेष खुलून दिसते. गावात सर्वांचीच घरे विटांची असल्यामुळे लगतच्या कोलगाव, आंबेगाव येथे वीट व्यवसाय जोरात चालतो. 
ग्रामस्थांची घरे दगडी नसली तरी गावातील शासकीय यंत्रणेची कार्यालये म्हणजे ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, प्राथमिक उपकेंद्रे आदींच्या बांधकामाला दगड वापरला गेला आहे. 

कोकणपण आजही टिकून
गावात पूर्वापार स्थित असलेल्या नागरिकांना गावची दंतकथा माहिती असल्यामुळे कोणीही जाणून बुजून घरकामात दगड वापरण्याचे धाडस करत नाही. इतर गावातून येथे स्थायिक होण्यास कोणी आल्यास त्याला स्थानिक नागरिक गावची दंतकथा व श्रीदेव रामेश्‍वराची महती ते स्पष्ट करून सांगतात. हे गाव शहरापासून जवळ आहे; मात्र दगडाचा वापर होत नसल्याने येथे निवासी संकुले किंवा फारसे सिमेंटीकरण झालेले नाही. त्यामुळे गावचे कोकणपण आजही टिकून आहे. 
 
""गावावर श्री देव रामेश्‍वराची कृपा कायम आहे. गावात चालत आलेल्या दंतकथेनुसार आजपर्यंत दगडी बांधकाम झालेले नाही. हे आमच्या गावचे वैशिष्ट्य आहे. आकेरी गावचा रथोत्सव एक मोठा उत्सव होतो. यावेळी गावच्या माहेरवाशिणी गावात येतात. रथोत्सव म्हणजे दसरा व दिवाळीसारखाच गावात उत्सव असतो.''
- बाळकृष्ण राऊळ, ग्रामस्थ.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

या गावात दगड वापरायला बंदी आहे ! गावात दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही नाही सापडणार  या गावात तुम्हाला दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही सापडणार नाही. माती आणि विटांची सुबक घरे हे इथले वैशिष्ट्य. या गावचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव रामेश्‍वराचे मंदिर मात्र दगडातील वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराशी जोडलेल्या आख्यायिकेमुळे गावात दगडाचे घर उभारले जात नाही. ही परंपरा कित्येक पिढ्या जपली आहे. सावंतवाडीपासून अवघ्या 6 किलोमीटरवर असलेले आकेरी-हुमरस (ता. कुडाळ).  आकेरी आणि हुमरस ही आता दोन गावे म्हणून ओळखली जातात. त्यांच्या ग्रामपंचायती वेगळ्या आहेत; मात्र पूर्वी ही दोन्ही गावे मिळून एकच गाव होते आणि बांधकामात दगड न वापरण्याची परंपरा आजही या दोन गावांत जपली जाते.   माणगावला जाणाऱ्या मार्गाशेजारीच श्री देव रामेश्‍वर मंदिराचे बांधकाम झाले. त्यावेळी मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा दगड देवगडवरून बैलगाडीतून आणला होता. श्री रामेश्‍वरावर आकेरीवासीयांची मोठी नितांत श्रद्धा असून, आपल्या मंदिराचे बांधकाम दगडी असल्यामुळे देवापेक्षा मोठे कोणी असू नये, या विचारधारेने गावात कोणीही आपल्या घराला दगड वापरणार नाही, असा शब्द मानकाऱ्यांनी मंदिरात देवासमोर दिला. त्यानंतर ते आजतागायत गावात कोणीही स्थायिक झालेली व्यक्ती आपल्या वास्तूला दगड वापरत नाही. त्यामुळे गावातील सर्वच घरांचे बांधकाम विटांपासून झालेले आहे. अलीकडे स्लॅबची घरे बांधणारे सिमेंटच्या ब्लॉकचा वापर करतात. श्रीदेव रामेश्‍वराच्या तुलनेत कोणतीच गोष्ट मोठी असू नये. तसे करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला गावात स्थिरता लाभत नाही, त्याची हानी होते, अशा पूर्वीपासून चालत आलेल्या आख्यायिकेनुसार आकेरी व हुमरसवासीय दगडी बांधकाम करत नाहीत. गावात दगडी बांधकाम करण्याचे ज्यांनी प्रयत्न केले त्यांना तशी वेगळी प्रचीती किंवा वेगळेच अनुभव आले असल्याचा दावा ग्रामस्थ करतात. त्यामुळे दगडी घरे नसलेला गाव म्हणून आकेरी-हुमरसचा नावलौकिक सर्वदूर आहे.  पूर्वी आकेरी व हुमरस हे कुडाळ तालुक्‍यातील एकच गाव होते; मात्र नंतर काही कारणास्तव आकेरी व हुमरस असे दोन भाग करण्यात आले. आकेरी गावची लोकसंख्या 3 हजारांच्या आत आहे. गावचे दोन भाग झाल्यानंतरही दोन्ही गावांत देवाच्या दंतकथेनुसार दगडी बांधकाम करण्यास कोणीही तयार होत नाही. माणगावचे खोरे जवळच असल्यामुळे निसर्गाच्या कुशीत मुंबई-गोवा महामार्गावरच ही गावे आहेत. इथल्या स्थायिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे पावसाळ्यात गावाचे सौंदर्य विशेष खुलून दिसते. गावात सर्वांचीच घरे विटांची असल्यामुळे लगतच्या कोलगाव, आंबेगाव येथे वीट व्यवसाय जोरात चालतो.  ग्रामस्थांची घरे दगडी नसली तरी गावातील शासकीय यंत्रणेची कार्यालये म्हणजे ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, प्राथमिक उपकेंद्रे आदींच्या बांधकामाला दगड वापरला गेला आहे.  कोकणपण आजही टिकून गावात पूर्वापार स्थित असलेल्या नागरिकांना गावची दंतकथा माहिती असल्यामुळे कोणीही जाणून बुजून घरकामात दगड वापरण्याचे धाडस करत नाही. इतर गावातून येथे स्थायिक होण्यास कोणी आल्यास त्याला स्थानिक नागरिक गावची दंतकथा व श्रीदेव रामेश्‍वराची महती ते स्पष्ट करून सांगतात. हे गाव शहरापासून जवळ आहे; मात्र दगडाचा वापर होत नसल्याने येथे निवासी संकुले किंवा फारसे सिमेंटीकरण झालेले नाही. त्यामुळे गावचे कोकणपण आजही टिकून आहे.    ""गावावर श्री देव रामेश्‍वराची कृपा कायम आहे. गावात चालत आलेल्या दंतकथेनुसार आजपर्यंत दगडी बांधकाम झालेले नाही. हे आमच्या गावचे वैशिष्ट्य आहे. आकेरी गावचा रथोत्सव एक मोठा उत्सव होतो. यावेळी गावच्या माहेरवाशिणी गावात येतात. रथोत्सव म्हणजे दसरा व दिवाळीसारखाच गावात उत्सव असतो.'' - बाळकृष्ण राऊळ, ग्रामस्थ. संपादन - धनाजी सुर्वे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DjGRqs
Read More
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

September 01, 2020 0 Comments
लिंगायत धर्मगुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर काल रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  from Zee24 Ta...
Read More