प्रारूप मतदारयाद्यांवर तक्रारींचा पाऊस औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमधील एक-एक घोळ चव्हाट्यावर येत असून, विद्यमान नगरसेवक, इच्छुक महापालिकेच्या निवडणूक विभागात धाव घेऊन आक्षेप दाखल करत आहेत. बुधवार (ता. ११) व गुरुवार (ता. १२) दोन दिवसांत तब्बल ७१ आक्षेप दाखल झाले आहेत. १६ मार्चपर्यंत आक्षेप दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेले आरक्षण सोडत, वॉर्डरचना वादात सापडली होती. त्यावर तब्बल ३७० आक्षेप घेण्यात आले. निवडणूक आयोगाने या आक्षेपांची सुनावणी घेऊन काही बदल केले असले तरी त्यावर समाधान न झाल्याने अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, सोमवारी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. आरक्षण सोडत, वॉर्डरचना वादात सापडल्याने महापालिकेचा निवडणूक विभाग यावेळी तरी वादापासून दूर राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. शिवशाहीने मोडले एसटीचे कंबरडे मात्र, प्रारूप मतदारयाद्यांतून सुमारे एक लाख मतदारांची नावे गायब करण्यात आली असून, मतदार मनमानी पद्धतीने या वॉर्डातून त्या वॉर्डात टाकण्यात आले आहेत. त्यामुळे प्रारूप याद्यांवर आक्षेपांचा पाऊस पडत आहे. दोन दिवसांत तब्बल ७१ जणांनी आक्षेप दाखल केले आहेत. १६ मार्चपर्यंत आक्षेप दाखल करण्याची मुदत आहे. तोपर्यंत दाखल झालेल्या आक्षेपांची दखल घेऊन मतदारयाद्यांमध्ये दुरुस्ती केली जाईल, त्यानंतर २३ मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सुमंत मोरे यांनी सांगितले. कासंबरी भागातील चार हजार मतदार दुसर्याच वॉर्डात वॉर्ड क्रमांक सात पडेगाव कासंबरी भागातील सुमारे चार हजार मतदार मिटमिटा वॉर्ड क्रमांक आठमध्ये टाकण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे वॉर्डाची व्याप्ती व हायवे ओलांडून ही नावे दुसऱ्या वॉर्डात टाकण्यात आली आहेत. तसेच वॉर्ड क्रमांक आठमधील नावे सातमध्ये टाकण्यात आली आहेत. राज ठाकरे औरंगाबादेत आले, पण कोरोनाने केला मुड आँफ आत्मदहनाचा इशारा वॉर्ड क्रमांक ५८ इंदिरानगर न्यू बायजीपुरा पश्चिम वॉर्डातील मतदारांची नावे इतर वॉर्डात टाकण्यात आल्याने ही नावे परत घ्यावीत अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा वॉर्डातील वनिता पंडित खंडागळे यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, इंदिरानगर न्यू बायजीपुरा पश्चिम वॉर्डाची लोकसंख्या दहा हजार ६०० एवढी दाखविण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादीत मतदारांची संख्या पाच हजार ८२५ एवढी करण्यात आली आहे. या वॉर्डातील मतदार वॉर्ड क्रमांक ६० इंदिरानगर बायजीपुरा पूर्व, अल्तमश कॉलनी, वॉर्ड क्रमांक ५७ संजयनगर या तीन वॉर्डांमध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व १,७०० मतदारांचे नावे पुन्हा वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये समाविष्ट करण्यात यावीत, सर्व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावी, अन्यथा १६ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा श्रीमती खंडागळे यांनी दिला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 12, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2vemPcS Read More Read more No comments:
तीन मिनिटे थांबा अन् ११ सेकंदांतच निघा! औरंगाबाद : शहरातील गोंधळात टाकणारी सिग्नल व्यवस्था आणि चुकीच्या पद्धतीचे असलेले चौक वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहेत. महावीर चौकामधून निघण्यासाठी ११ सेकंदांचा, तर थांबण्यासाठी १८० सेकंदांचा म्हणजे तीन मिनिटांचा वेळ आहे. ११ सेकंदांमध्ये निघणे शक्य झाले नाही तर तब्बल सहा मिनिटे थांबण्याची शिक्षा वाहनधारकांना भोगावी लागते. सिडकोतील वसंतराव नाईक चौकातही हीच अवस्था आहे. शहरात वर्दळीच्या जालना रस्त्यावर सिग्नल व्यवस्थांच्या वेळा गर्दीनुसार कमी-जास्त करणे आवश्यक आहे. मात्र एकच टायमिंग सेट केलेल्या सिग्नलमुळे वाहनांची गर्दी नसतानाही वाहनधारकांना दोन ते तीन मिनिटे थांबण्याची शिक्षा भोगावी लागते; अन्यथा सरळ सिग्नल तोडून निघावे लागते. काही चौकांत तर ज्या व्यक्तीला सिग्नल पाळायचे आहे, त्याला मात्र १८० सेकंदांपर्यंतची शिक्षा सहन करावी लागत आहे. शिवजयंती ३६५ दिवस व्हावी, आम्ही तिथीनुसारच करु : राज ठाकरे महावीर चौक महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप चौक) येथे रेल्वेस्टेशनकडून बसस्थानकाकडे जाताना अवघ्या अकरा सेकंदांमध्ये वाहनधारकाला निघावे लागते. वाहनांची रांग अधिक असेल आणि अकरा सेकंदांत निघणे शक्य झाले नाही तर १८० सेकंद आणि दोन-तीन वेळा जर सिग्नल लागला तर साडेपाच ते सहा मिनिटे थांबण्याची शिक्षा भोगावी लागते. याच सिग्नलवर विरुद्ध दिशेने म्हणजे बसस्थानकाकडून रेल्वेस्टेशनकडे जाताना ३७ सेकंदांचा वेळ आहे. या बाजूला एनए प्रिंटर पेट्रोलपंप (बाबा पंप) आहे. रस्त्यालगत महावितरणचे ट्रान्सफॉर्मर अडथळा करून आहे. त्यामुळे एका बाजूला मोठा तर दुसऱ्या बाजूला छोटा रस्ता असल्याने वाहनांच्या रांगा अनेक वेळा एम्प्लॉयमेंट ऑफिसपर्यंत गेलेल्या असतात. त्यावेळी ३७ सेकंदांत शेवटच्या वाहनधारकांना जाणे शक्य होत नाही. दोन अथवा तीनवेळा थांबावे लागते. या सिग्नलवर १५४ सेकंदांचा वेळ असल्याने साडेचार मिनिटांपर्यंत खोळंबा होतो. सातत्याने वाहनांची वर्दळ असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंच्या सिग्नलची वेळ वाढविण्याची गरज आहे. अवयवदानाच्या चळवळीतून डाँक्टरांनाच मिळाले जिवदान अमरप्रीत, आकाशवाणी चौक अमरप्रीत चौकातील सिग्नलवर रेल्वेस्टेशनच्या दिशेने जाताना आणि रेल्वेस्टेशनकडून चिकलठाण्याच्या दिशेने अशा दोन्ही वेळेला १०२ सेकंद थांबावे लागते आणि ७३ सेकंदांत निघावे लागते. आकाशवाणी चौकामध्ये चिकलठाण्याकडून क्रांती चौकाकडे जाताना थांबण्यासाठी ८५ सेकंद, तर निघण्यासाठी ७३ सेकंदांचा वेळ आहे. हा वेळही पुरेसा आहे, मात्र बऱ्याच वेळा ७३ सेकंदांचा वेळ मोठा असल्याने आणि ग्रीन सिग्नल असतानाही लाल सिग्नल तोडावे लागतात. सेव्हन हिल चौक सेव्हन हिल चौकामध्येही एमजीएमकडून जालना रोडकडे येतानाच्या सिग्नलवर थांबण्यासाठी ११६ सेकंदांचा वेळ दिलेला आहे, तर निघण्यासाठी मात्र ४८ सेकंद आहेत. वाहनांची रांग अनेक वेळा एमजीएम चौकापर्यंत जाते, तेव्हा निघण्याची वेळ कमी पडते. याच सिग्नलवर चिकलठाणा ते क्रांती चौक दिशेने जाताना १४५ सेकंद थांबावे लागते. निघायला मात्र अवघे २१ सेकंद वेळ दिलेला असल्याने हा वेळ कमी पडतो. किडनी फेल्युअर टाळता येते, पण कसे. वसंतराव नाईक चौक वसंतराव नाईक चौकामध्ये (सिडको बसस्थानक चौक) जळगाव रोडने सिडको बसस्थानक चौकामध्ये आल्यानंतर ४२ सेकंदांचा वेळ निघण्यासाठी आहे. ४२ सेकंदांत निघता आले नाही तर ११४ सेकंद थांबणे भाग आहे. अनेक वेळा वाहनांची रांग मोठी असेल तर दोनवेळा थांबावे लागते तर जवळपास पाच साडेपाच मिनिटांपर्यंत खोळंबावे लागते. याच चौकात क्रांती चौकाच्या दिशेने आल्यानंतर चिकलठाणाकडे जाताना २१ सेकंदांत निघावे लागते; अन्यथा १३४ सेकंद थांबावे लागते. दोनवेळा थांबावे लागले तर चार-साडेचार मिनिटे थांबून राहावे लागते. चिकलठाण्याच्या दिशेने आल्यानंतर क्रांती चौकाकडे जाताना ३७ सेकंदांत निघा; अन्यथा ११५ सेकंद थांबा अशी अवस्था आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 12, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2Wkqz87 Read More Read more No comments:
"कोरोना'ने आणले यात्रा, जत्रांवर गंडांतर नगर ः ""कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शासकीय कार्यक्रम, मेळाव्यांवर आगामी 15 दिवसांसाठी बंदी घातली आहे. वाढदिवस, लग्न, जत्रा, यात्रांसाठी नागरिकांनी जाण्याचे टाळावे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्यास प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल,'' असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिला. हेही वाचा - विखेपाटील म्हणाले, राजकारण म्हणजे खेळ जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना द्विवेदी म्हणाले, ""कोरोना संसर्गजन्य विषाणूचा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. प्रशासनाने पूर्ण सतर्कता बाळगली आहे. नागरिकांनी "कोरोना'बाबत भीती बाळगण्याची गरज नाही; परंतु गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. दुबईवरून आलेल्या येथील चौघांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. स्वच्छतेबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी. मढी येथील यात्रेसंदर्भात देवस्थान कमिटीशी संपर्क झाला आहे. एरवी होणारी लक्षणीय गर्दी यंदा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनाही दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.'' ""परदेशातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची माहिती घेण्यासाठी ट्रॅव्हल्स, टूर एजन्सीचालकांची बैठक घेणार आहोत. तसेच मॉल, सिनेमागृहांनादेखील स्वच्छताविषयक निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील नागरिक सुजाण व सूज्ञ आहेत. आगामी जत्रा, यात्रेला ते गर्दी करणार नाहीत. जागरूकतेबाबत नगरकरांचा कमालीचा पुढाकार असतो. त्यामुळे कमीत-कमी कायद्याचा वापर करून परिस्थिती हाताळली जाईल,'' असा विश्वास द्विवेदी यांनी व्यक्त केला. निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे "स्क्रिनिंग' जर्मनी, इराण, दक्षिण कोरिया, चीन, स्पेन, फ्रान्स, इटली येथून येणाऱ्या प्रवाशांचे "स्क्रिनिंग' केले जात आहे. नगरकरांनी भीती बाळगण्याची गरज नाही, असे द्विवेदी म्हणाले. 1077 टोल-फ्री हेल्पलाइन सुरू नागरिकांच्या शंका-समाधानासाठी प्रशासनाने 1077 हा टोल-फ्री क्रमांक सुरू केला आहे. "कोरोना'संदर्भात काहीही शंका असेल, तर नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन द्विवेदी यांनी केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 12, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3cSJGvD Read More Read more No comments:
ही वाहने होतायेत बंद : पण का ते वाचा औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ‘भारत स्टेज -४’ (बीएस फोर) मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयात एक एप्रिलपासून थांबविण्यात येणार आहे. यापुढे ननीन भारत स्टेज -६ मानांकन वाहनांचीच नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे बीएस फोर वाहनांची खरेदी करणाऱ्यांनी आपले वाहन ३१ मार्च २०२० पूर्वी नोंदणी करून घेणे आवश्यक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. किडनी फेल्युअर टाळता येते, पण कसे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश देशभरात एक एप्रिलनंतर भारत स्टेज-चार (बीएस फोर) मानांकन नसलेली वाहने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विक्री व नोंदणी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी ‘बीएस-फोर’ मानांकनाची वाहने खरेदी केली आहे; अशा वाहनधारकांनी त्याची नोंदणी ३१ मार्चपूर्वी करून त्यांना नोंदणी क्रमांक जारी होणे आवश्यक आहे. ही वाहने ३१ मार्चपूर्वी नोंदणी न झाल्यास त्यांना रस्त्यावर वापरता येणार नाही. ३१ मार्च किंवा त्यापूर्वी होणारी नोंदणीची गर्दी पाहता तसेच ऐनवेळी कागदपत्रांत काही त्रुटी उद्भवण्याची शक्यता आहे. शिवजयंती ३६५ दिवस व्हावी, आम्ही तिथीनुसारच करु : राज ठाकरे वाहने नोंदणी झाल्याची खात्री आवश्यक शुल्क व कर भरल्याने, व्हीआयपी क्रमांकाची फी भरल्याने, मोटार वाहन निरीक्षकाकडे वाहन तपासणीसाठी सादर केल्याने अथवा मोटार वाहन निरीक्षकाने तपासणी केल्याने वाहनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही. वाहनास नोंदणी क्रमांक जारी झाल्यावरच सदर वाहनाची नोंदणी प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण होते. सर्व वाहनधारकांनी त्यांच्या मालकीची वाहने नोंदणी झाली असल्याबाबत खात्री करावी. अवयवदानाच्या चळवळीतून डाँक्टरांनाच मिळाले जिवदान येथे करा खात्री ज्या वाहनमालकांना वाहनाचे मूळ स्मार्ट कार्ड आरसी, नोंदणी पुस्तक प्राप्त झाले नाही त्यांनी त्यांचा वाहन क्रमांक www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध पर्यायामध्ये तपासून घ्यावा. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये. यासाठी ३१ मार्चपूर्वी वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन श्री. मैत्रेवार यांनी केले. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे याची उपस्थिती होती. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 12, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2WbcObp Read More Read more No comments:
#WeCareForPune : पुणे शहरात मास्कच्या नावाने ‘दुकानदारी’ पुणे - शहरात ‘एमआरपी’पेक्षा दुपटीपेक्षा जास्त दराने सर्व प्रकारच्या मास्कची सर्रास विक्री होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारी यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकांना ‘अन्न व औषध प्रशासन’मधील (एफडीए) अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागत असल्याने वाट्टेल त्या भावाने मास्क विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार तरी कोण, असा प्रश्न पडला आहे. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कात्रज, गोकूळनगर अशा उपनगरांमधील काही भागांत एकेका मास्कची ९०० रुपयांना विक्री होत असल्याची गंधवार्ता ‘एफडीए’ला नाही. माध्यमातून या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आपल्या कामाच्या हद्दीवरून टोलवाटोलवी सुरू होते, त्यामुळे खरेदी किमतीपेक्षा कित्येक पटींनी जास्त दरात विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करणार कोण, हा प्रश्न या वादात अनुत्तरितच राहात असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित रुग्णापैकी तीन जणांचा अहवाल पाझिटिव्ह मास्कची अव्वाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी थेट ‘एफडीए’च्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचल्या आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मास्कची विक्री करण्याचे परिपत्रक जाहीर केले आहे. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण, ‘एफडीए’चे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यग्र असतात. पुणे : कोरोनाची अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई; सायबर पोलिसांचा 'वॉच'! ‘एन ९५’ची घाऊक खरेदी किंमत १५० रुपये... ‘एन ९५’ प्रकारच्या मास्कची घाऊक खरेदी किंमत आणि त्यावर वस्तू व सेवा कर असे मिळून १५० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यावरील कमिशन धरून किंमत २५० रुपयांच्या दरम्यान आहे. प्रत्यक्षात याची विक्री तीनशेपेक्षा जास्त रुपयांना होत असल्याचे दिसते. यावर नियंत्रण कधी आणि कोणती सरकारी यंत्रणा आणणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष आहे. प्रत्येक मास्कची खरेदी-विक्री बिलावर करावी. त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, असा प्रयत्न न करण्याच्या सूचना औषध विक्रेत्यांना करण्यात आल्या आहेत. ही सामाजिक सामाजिक बांधिलकी जपण्याची वेळ आहे, त्यामुळे मास्क, सॅनिटायजर योग्य किमतीत विक्री करण्याचे आवाहनदेखील केले आहे. - अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 12, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2IEAVaC Read More Read more No comments:
कोरोना वायरस से टूरिज्म को नुकसान, हिमाचल में 30% तक कम हुए पर्यटक https://ift.tt/39MWrGd Latest news updates March 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
NRC-NPR पर दिल्ली विधानसभा का विशेष सत्र आज, विरोध में आ सकता है प्रस्ताव https://ift.tt/2TP9MZ7 Latest news updates March 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
Horoscope Today, 13 March: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/39ReECs Latest news updates March 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
रंग पंचमी का क्या है महत्व? ये उपाय करने से होगी धन की बरकत https://ift.tt/2Qd2And Latest news updates March 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
जोरदार स्वागत के बाद आज राज्यसभा के लिए नामांकन करेंगे सिंधिया https://ift.tt/3aS6Ose Latest news updates March 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
कोरोना की चपेट में सिनेमा, पहली बार कैंसिल हो रहे ये मशहूर इवेंट्स https://ift.tt/2U1HA3Z Latest news updates March 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
शाह का सवाल- क्या एक ही जज करेगा न्याय, दूसरे पर भरोसा क्यों नहीं? https://ift.tt/2xAU4YT Latest news updates March 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
पूर्व BSP विधायक हाजी अलीम की हत्या के केस में बेटा ही गिरफ्तार https://ift.tt/33iQU7J Latest news updates March 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments: