"कोरोना'ने आणले यात्रा, जत्रांवर गंडांतर नगर ः ""कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शासकीय कार्यक्रम, मेळाव्यांवर आगामी 15 दिवसांसाठी बंदी घातली आहे. वाढदिवस, लग्न, जत्रा, यात्रांसाठी नागरिकांनी जाण्याचे टाळावे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्यास प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल,'' असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिला.  हेही वाचा - विखेपाटील म्हणाले, राजकारण म्हणजे खेळ जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना द्विवेदी म्हणाले, ""कोरोना संसर्गजन्य विषाणूचा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. प्रशासनाने पूर्ण सतर्कता बाळगली आहे. नागरिकांनी "कोरोना'बाबत भीती बाळगण्याची गरज नाही; परंतु गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. दुबईवरून आलेल्या येथील चौघांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. स्वच्छतेबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी. मढी येथील यात्रेसंदर्भात देवस्थान कमिटीशी संपर्क झाला आहे. एरवी होणारी लक्षणीय गर्दी यंदा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनाही दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.'' ""परदेशातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची माहिती घेण्यासाठी ट्रॅव्हल्स, टूर एजन्सीचालकांची बैठक घेणार आहोत. तसेच मॉल, सिनेमागृहांनादेखील स्वच्छताविषयक निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील नागरिक सुजाण व सूज्ञ आहेत. आगामी जत्रा, यात्रेला ते गर्दी करणार नाहीत. जागरूकतेबाबत नगरकरांचा कमालीचा पुढाकार असतो. त्यामुळे कमीत-कमी कायद्याचा वापर करून परिस्थिती हाताळली जाईल,'' असा विश्‍वास द्विवेदी यांनी व्यक्त केला.  निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.    परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे "स्क्रिनिंग'  जर्मनी, इराण, दक्षिण कोरिया, चीन, स्पेन, फ्रान्स, इटली येथून येणाऱ्या प्रवाशांचे "स्क्रिनिंग' केले जात आहे. नगरकरांनी भीती बाळगण्याची गरज नाही, असे द्विवेदी म्हणाले.    1077 टोल-फ्री हेल्पलाइन सुरू  नागरिकांच्या शंका-समाधानासाठी प्रशासनाने 1077 हा टोल-फ्री क्रमांक सुरू केला आहे. "कोरोना'संदर्भात काहीही शंका असेल, तर नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन द्विवेदी यांनी केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 12, 2020

"कोरोना'ने आणले यात्रा, जत्रांवर गंडांतर नगर ः ""कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शासकीय कार्यक्रम, मेळाव्यांवर आगामी 15 दिवसांसाठी बंदी घातली आहे. वाढदिवस, लग्न, जत्रा, यात्रांसाठी नागरिकांनी जाण्याचे टाळावे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्यास प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल,'' असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिला.  हेही वाचा - विखेपाटील म्हणाले, राजकारण म्हणजे खेळ जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना द्विवेदी म्हणाले, ""कोरोना संसर्गजन्य विषाणूचा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. प्रशासनाने पूर्ण सतर्कता बाळगली आहे. नागरिकांनी "कोरोना'बाबत भीती बाळगण्याची गरज नाही; परंतु गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. दुबईवरून आलेल्या येथील चौघांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. स्वच्छतेबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी. मढी येथील यात्रेसंदर्भात देवस्थान कमिटीशी संपर्क झाला आहे. एरवी होणारी लक्षणीय गर्दी यंदा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनाही दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.'' ""परदेशातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची माहिती घेण्यासाठी ट्रॅव्हल्स, टूर एजन्सीचालकांची बैठक घेणार आहोत. तसेच मॉल, सिनेमागृहांनादेखील स्वच्छताविषयक निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील नागरिक सुजाण व सूज्ञ आहेत. आगामी जत्रा, यात्रेला ते गर्दी करणार नाहीत. जागरूकतेबाबत नगरकरांचा कमालीचा पुढाकार असतो. त्यामुळे कमीत-कमी कायद्याचा वापर करून परिस्थिती हाताळली जाईल,'' असा विश्‍वास द्विवेदी यांनी व्यक्त केला.  निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.    परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे "स्क्रिनिंग'  जर्मनी, इराण, दक्षिण कोरिया, चीन, स्पेन, फ्रान्स, इटली येथून येणाऱ्या प्रवाशांचे "स्क्रिनिंग' केले जात आहे. नगरकरांनी भीती बाळगण्याची गरज नाही, असे द्विवेदी म्हणाले.    1077 टोल-फ्री हेल्पलाइन सुरू  नागरिकांच्या शंका-समाधानासाठी प्रशासनाने 1077 हा टोल-फ्री क्रमांक सुरू केला आहे. "कोरोना'संदर्भात काहीही शंका असेल, तर नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन द्विवेदी यांनी केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cSJGvD

No comments:

Post a Comment