वैभववाडीसाठी निधीच्या केवळ घोषणाच : आमदार राणे वैभववाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्याच्या विकासासाठी 300 कोटीची घोषणा केली. त्यासोबतच वैभववाडी तालुक्‍यात निधीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या; परंतु प्रत्यक्षात काहीही निधी देण्यात आलेला नाही. जर वैभववाडी तालुक्‍यातील विकासकामांसाठी घोषणा करून निधी देणार नसतील आपण अशा पालकमंत्र्यांचा निषेध करतो, अशा शब्दात आमदार नीतेश राणे यांनी पालकमंत्र्यावर जोरदार टीका येथे केली.  येथील पंचायत समितीच्या एका कार्यक्रमासाठी आमदार राणे आले होते. यावेळी त्यांना पंचायत समितीची इमारत बांधुन पूर्ण होऊन सहा वर्षे उलटली; परंतु प्रत्यक्षात ती वापरात आली नाही, असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी या इमारतीचे काम ठेकेदारामुळे रखडले आहे. त्यामुळे या प्रकरणात अधिकारी किंवा ठेकेदार जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करू. याशिवाय या इमारतीचा विषय आपण गांभीर्याने घेत असून ही इमारत लवकर वापरात येण्यासाठी प्रयत्न केले जातील. या इमारतीच्या छप्परासाठी पालकमंत्र्यानी निधीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात निधी दिला नाही. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला 300 कोटी, उमेदच्या महिलांचा पगार देण्यासाठी शासन निर्णय काढुन पगार देवू, अशा घोषणा केल्या; परंतु निधीही नाही, पगारही नाही. निव्वळ घोषणाच ते करीत आहेत; परंतु केवळ घोषणा करून ते विसरणार असतील तर त्यांचा आपण निषेधच करणार आहे.''  ...तर सुरक्षेची हमी कुणाकडून?  मुंबईत सापडलेल्या स्फोटक प्रकरणात वाझे, परमवीरसिंग प्यादी आहेत; परंतु खरे सूत्रधार कोण? हे लवकरच समोर येतील. एखाद्या उद्योगपतीच्या घरासमोर जर स्फोटके सापडत असतील तर आपण सुरक्षेची हमी कोणाकडुन घ्यायची? असा प्रश्‍न त्यांनी केला. या विषयावरून आम्हाला ठाकरे सरकार पाडायचे नाही; परंतु देशाची, राज्याची सुरक्षा महत्वाची असल्यामुळे भाजपने हा विषय उचलुन धरला आहे.  वैभववाडीवर इतके प्रेम का?  पालकमंत्री वैभववाडी येवुन निधीच्या मोठमोठ्या घोषणा करतात. वैभववाडीवर त्यांचे एवढे प्रेम का ? हे लवकरच जाहीर करू, असा इशारा आमदार राणेंनी दिला.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 19, 2021

वैभववाडीसाठी निधीच्या केवळ घोषणाच : आमदार राणे वैभववाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्याच्या विकासासाठी 300 कोटीची घोषणा केली. त्यासोबतच वैभववाडी तालुक्‍यात निधीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या; परंतु प्रत्यक्षात काहीही निधी देण्यात आलेला नाही. जर वैभववाडी तालुक्‍यातील विकासकामांसाठी घोषणा करून निधी देणार नसतील आपण अशा पालकमंत्र्यांचा निषेध करतो, अशा शब्दात आमदार नीतेश राणे यांनी पालकमंत्र्यावर जोरदार टीका येथे केली.  येथील पंचायत समितीच्या एका कार्यक्रमासाठी आमदार राणे आले होते. यावेळी त्यांना पंचायत समितीची इमारत बांधुन पूर्ण होऊन सहा वर्षे उलटली; परंतु प्रत्यक्षात ती वापरात आली नाही, असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी या इमारतीचे काम ठेकेदारामुळे रखडले आहे. त्यामुळे या प्रकरणात अधिकारी किंवा ठेकेदार जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करू. याशिवाय या इमारतीचा विषय आपण गांभीर्याने घेत असून ही इमारत लवकर वापरात येण्यासाठी प्रयत्न केले जातील. या इमारतीच्या छप्परासाठी पालकमंत्र्यानी निधीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात निधी दिला नाही. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला 300 कोटी, उमेदच्या महिलांचा पगार देण्यासाठी शासन निर्णय काढुन पगार देवू, अशा घोषणा केल्या; परंतु निधीही नाही, पगारही नाही. निव्वळ घोषणाच ते करीत आहेत; परंतु केवळ घोषणा करून ते विसरणार असतील तर त्यांचा आपण निषेधच करणार आहे.''  ...तर सुरक्षेची हमी कुणाकडून?  मुंबईत सापडलेल्या स्फोटक प्रकरणात वाझे, परमवीरसिंग प्यादी आहेत; परंतु खरे सूत्रधार कोण? हे लवकरच समोर येतील. एखाद्या उद्योगपतीच्या घरासमोर जर स्फोटके सापडत असतील तर आपण सुरक्षेची हमी कोणाकडुन घ्यायची? असा प्रश्‍न त्यांनी केला. या विषयावरून आम्हाला ठाकरे सरकार पाडायचे नाही; परंतु देशाची, राज्याची सुरक्षा महत्वाची असल्यामुळे भाजपने हा विषय उचलुन धरला आहे.  वैभववाडीवर इतके प्रेम का?  पालकमंत्री वैभववाडी येवुन निधीच्या मोठमोठ्या घोषणा करतात. वैभववाडीवर त्यांचे एवढे प्रेम का ? हे लवकरच जाहीर करू, असा इशारा आमदार राणेंनी दिला.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3s3VDpx

No comments:

Post a Comment