सावंतवाडीत मुसळधार पाऊस  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरात आज सायंकाळी अवकाळी मुसळधार पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. परिसरातील गावामध्ये असलेले काजू व आंबा बागायतदार मात्र चिंतेत आले आहेत.  चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व काही तालुक्‍यात अधून-मधून सरींचा शिडकाव होत आहे; मात्र मोठा पाऊस झाला नव्हता. आज अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा-पाऊण तास पावसाने हजेरी लावली. यामुळे काहीशी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. शहरासह कोलगाव, माजगाव, मळगाव भागातही पाऊस झाला. बांदा परिसरात, कुडाळ तालुक्‍यातील आकेरी, हुमरस, माणगाव खोऱ्यातील काही भाग या परिसरात हलक्‍या सरी कोसळल्या.  अवकाळीने आंबा व काजू बागायतदार पूर्णतः संकटात आले आहेत. तालुक्‍यात अल्प प्रमाणात आंबा तर मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे एक कलमी काजूची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या काजू व आंबा परिपक्व झाला आहे; मात्र ढगाळ वातावरण आणि पावसामुळे किडींचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. फळपिकांना पाऊस लागल्यामुळे हा धोका आणखीनच वाढला आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. पुढील एक-दोन दिवस पाऊस झाल्यास, ढगाळ वातावरण कायम राहिल्यास ढेकण्या किडी निर्माण होऊन काजू पीक धोक्‍यात येऊ शकते. यावर उपाययोजना म्हणून बागायतदार औषध फवारणीची तयारी करत आहेत.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 21, 2021

सावंतवाडीत मुसळधार पाऊस  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरात आज सायंकाळी अवकाळी मुसळधार पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. परिसरातील गावामध्ये असलेले काजू व आंबा बागायतदार मात्र चिंतेत आले आहेत.  चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व काही तालुक्‍यात अधून-मधून सरींचा शिडकाव होत आहे; मात्र मोठा पाऊस झाला नव्हता. आज अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा-पाऊण तास पावसाने हजेरी लावली. यामुळे काहीशी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. शहरासह कोलगाव, माजगाव, मळगाव भागातही पाऊस झाला. बांदा परिसरात, कुडाळ तालुक्‍यातील आकेरी, हुमरस, माणगाव खोऱ्यातील काही भाग या परिसरात हलक्‍या सरी कोसळल्या.  अवकाळीने आंबा व काजू बागायतदार पूर्णतः संकटात आले आहेत. तालुक्‍यात अल्प प्रमाणात आंबा तर मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे एक कलमी काजूची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या काजू व आंबा परिपक्व झाला आहे; मात्र ढगाळ वातावरण आणि पावसामुळे किडींचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. फळपिकांना पाऊस लागल्यामुळे हा धोका आणखीनच वाढला आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. पुढील एक-दोन दिवस पाऊस झाल्यास, ढगाळ वातावरण कायम राहिल्यास ढेकण्या किडी निर्माण होऊन काजू पीक धोक्‍यात येऊ शकते. यावर उपाययोजना म्हणून बागायतदार औषध फवारणीची तयारी करत आहेत.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2ZFPz9W

No comments:

Post a Comment