सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे नाव उज्वल करू ः सावंत कणकवली (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत लोकांच्या घामाचा पैसा आहे, तो सुरशित ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही राजकीय आमिषाला बळी न पडता काम करा. एकत्रीत येउन महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या बॅंकेचा नावलौकीक वाढवूया, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यश सतिश सावंत यांनी केले.  को-ऑप बॅंक एम्लॉईज युनियन सिंधुदुर्ग, बॅंक कर्मचाऱ्यांचा मेळावा रविवारी वेताळ बांबर्डे येथील मांगल्य मंगल कार्यालय सभागृहात झाला. यावेळी सावंत बोलत होते. या मेळाव्यास युनियनचे अध्यक्ष व शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसुळ, नगरसेवक सुशांत नाईक, युनियनचे पदाधिकारी व बॅंक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या मेळाव्यात सिंधुदुर्गच्या कार्यालयाचे उद्‌घाटन बॅंकेचे अध्यश सावंत व अडसुळ यांच्या हस्ते करण्यात आले. सावंत म्हणाले, की येत्या दोन महिन्यांत बॅंक ठेवीमध्ये वाढ करून चांगला कर्जव्यवहार केला पाहिजे. ही आपली सांघिक जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न ते आम्ही आपले प्रश्न समजतो. बॅंकेत शेतकऱ्यांचीच मुले कर्मचारी म्हणून काम करतात.  जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अडसुळ म्हणाले, संघर्षातूनच वातावरण निर्मिती होते. समस्या वाढल्या, की संघर्ष होतो व संस्थेचे नुकसान होते. संस्थेवर परिवार अवलंबून असतो. संस्था चांगली चालली तर चांगल्या सुविधा घेता येतात. त्यातून बॅंकेची प्रगती व प्रतिष्ठा वाढते. एक व्यक्ती प्रश्नाचे निवारण करू शकत नाही. अनेक सुविधांचा लाभ घेवू शकत नाही. यासाठी युनियन हवी. एकासाठी अनेक व अनेकांसाठी एक अशी सहकाराची व्याख्या आहे. सेवा नियम सगळ्यांना सारखे असायला हवेत. युनियन व युनियन सदस्यांच्या पाठीशी राहा.  कोरोनाच्या काळात आपण दिलेली सेवा प्रशंसनीय आहे. चांगली वसूली करून बॅंकेच्या प्रगतीला हातभार लावा. बॅंकेची आर्थिक स्थिती सक्षम आहे. पगारवाढ करण्यासाठी निधी आहे. सर्वांची काळजी घेणारा करार करण्यात येईल; मात्र, चांगला व वाईट फरक तुम्हाला कळला पाहिजे. बॅंकेच होणारे नुकसान टाळले पाहिजे. अघोरी शक्ती संचालक मंडळात येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. बॅंकेची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. शरद सावंत यांनी आभार मानले.  शरद पवारांनी केले होते कौतुक  भारत सरकार नॅशनल बॅंकेमागे उभे आहे; मात्र जिल्हा बॅंकेच्या मागे तुम्ही आहात व नॅशनल बॅंकेपुढे जाउन ग्राहकांना सेवा पुरवता. सर्व धोरणांची अंमलबजावणी कर्मचारीच करतात. शरद पवार यांनी तर आंबोली दौऱ्यात शुन्य एनपीए असणाऱ्या या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा राज्यातील इतर सर्व बॅंकांनी आदर्श घ्यावा, असे वक्तव्य करून जिल्हा बॅंकेचा गौरव केला होता. त्याला साजेसे काम यापुढे करूया.   संपादन -राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 1, 2021

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे नाव उज्वल करू ः सावंत कणकवली (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत लोकांच्या घामाचा पैसा आहे, तो सुरशित ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही राजकीय आमिषाला बळी न पडता काम करा. एकत्रीत येउन महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या बॅंकेचा नावलौकीक वाढवूया, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यश सतिश सावंत यांनी केले.  को-ऑप बॅंक एम्लॉईज युनियन सिंधुदुर्ग, बॅंक कर्मचाऱ्यांचा मेळावा रविवारी वेताळ बांबर्डे येथील मांगल्य मंगल कार्यालय सभागृहात झाला. यावेळी सावंत बोलत होते. या मेळाव्यास युनियनचे अध्यक्ष व शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसुळ, नगरसेवक सुशांत नाईक, युनियनचे पदाधिकारी व बॅंक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या मेळाव्यात सिंधुदुर्गच्या कार्यालयाचे उद्‌घाटन बॅंकेचे अध्यश सावंत व अडसुळ यांच्या हस्ते करण्यात आले. सावंत म्हणाले, की येत्या दोन महिन्यांत बॅंक ठेवीमध्ये वाढ करून चांगला कर्जव्यवहार केला पाहिजे. ही आपली सांघिक जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न ते आम्ही आपले प्रश्न समजतो. बॅंकेत शेतकऱ्यांचीच मुले कर्मचारी म्हणून काम करतात.  जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अडसुळ म्हणाले, संघर्षातूनच वातावरण निर्मिती होते. समस्या वाढल्या, की संघर्ष होतो व संस्थेचे नुकसान होते. संस्थेवर परिवार अवलंबून असतो. संस्था चांगली चालली तर चांगल्या सुविधा घेता येतात. त्यातून बॅंकेची प्रगती व प्रतिष्ठा वाढते. एक व्यक्ती प्रश्नाचे निवारण करू शकत नाही. अनेक सुविधांचा लाभ घेवू शकत नाही. यासाठी युनियन हवी. एकासाठी अनेक व अनेकांसाठी एक अशी सहकाराची व्याख्या आहे. सेवा नियम सगळ्यांना सारखे असायला हवेत. युनियन व युनियन सदस्यांच्या पाठीशी राहा.  कोरोनाच्या काळात आपण दिलेली सेवा प्रशंसनीय आहे. चांगली वसूली करून बॅंकेच्या प्रगतीला हातभार लावा. बॅंकेची आर्थिक स्थिती सक्षम आहे. पगारवाढ करण्यासाठी निधी आहे. सर्वांची काळजी घेणारा करार करण्यात येईल; मात्र, चांगला व वाईट फरक तुम्हाला कळला पाहिजे. बॅंकेच होणारे नुकसान टाळले पाहिजे. अघोरी शक्ती संचालक मंडळात येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. बॅंकेची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. शरद सावंत यांनी आभार मानले.  शरद पवारांनी केले होते कौतुक  भारत सरकार नॅशनल बॅंकेमागे उभे आहे; मात्र जिल्हा बॅंकेच्या मागे तुम्ही आहात व नॅशनल बॅंकेपुढे जाउन ग्राहकांना सेवा पुरवता. सर्व धोरणांची अंमलबजावणी कर्मचारीच करतात. शरद पवार यांनी तर आंबोली दौऱ्यात शुन्य एनपीए असणाऱ्या या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा राज्यातील इतर सर्व बॅंकांनी आदर्श घ्यावा, असे वक्तव्य करून जिल्हा बॅंकेचा गौरव केला होता. त्याला साजेसे काम यापुढे करूया.   संपादन -राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tl4xjl

No comments:

Post a Comment