‘गोंधळामुळे नेत्यांची प्रतिमा खराब’ नवी दिल्ली - संसद सदस्यांचे वर्तन समाजासमोर एखाद्या ‘रोल मॉडेल'' प्रमाणे हवे. मात्र अलीकडे संसदेतील चर्चेचा स्तर घसरत चालल्याने व गोंधळाला महत्त्व आल्याने राजकीय नेत्यांनी समाजातील प्रतिमा वेगाने घसरत आहे, अशा शब्दांत राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे.  नक्षलवाद्यांना ठेचणार नारीशक्ती; CRPF च्या कोब्रा पथकात 34 महिला नायडू यांनी आज ट्विटद्वारे म्हटले, की सभागृहांतील चर्चेची पातळी घसरली आहे व लोकांच्या नजरेतून नेत्यांची प्रतिमाही खराब झाली आहे. निवडून आलेल्या संसद सदस्यांनी पदाची प्रतिष्ठा व आपली कर्तव्ये यांचे भान ठेवावे. राज्यसभेतील गोंधळाचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याचा प्रकार समोर आल्यावर नायडू यांनी संबंधितांना दालनात बोलावून असे करणे चुकीचे आहे, अशी समज दिली. आजही त्यांनी तोच मुद्दा अधोरेखित केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सभागृहाच्या कामकाजाचे अशा पद्धतीने चित्रीकरण करून सोशल मीडीयावर ते टाकणे हा सभागृहाच्या अवमानाचा मुद्दा ठरू शकतो. हे वर्तन संसदीय मर्यादेच्या संपूर्ण विरुद्ध असून ते करणारांविरुद्ध कारवाई होईल, असाही इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान, कृषी कायदे राज्यसभेत ज्या पद्धतीने प्रचंड गदारोळात मंजूर करवून घेण्यात आल्याबाबत विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदविले त्याबद्दल त्यांनी टिप्पणी केलेली नाही.  संसद अधिवेशनात दोन्ही सभागृहांत शेतकरी आंदोलनावरून गदारोळ सुरू आहे.  कृषी कायद्याने काय मिळणार? शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे वाचा राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चा राज्यसभेत पूर्ण झाली पण लोकसभेत त्यास मुहूर्तही मिळू शकलेला नाही. नायडू यांनी संसदीय कामकाजात गोंधळाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल प्रत्येक अधिवेशनात सदस्यांना समजून सांगितले आहे. मात्र राज्यसभेत अभिभाषण चर्चा सुरू होण्यासाठी गोंधळ घालणाऱ्या ‘आप’च्या तीन खासदारांना निलंबितच करावे लागले याबद्दल त्यांनी खेद या वेळी व्यक्त केला आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 6, 2021

‘गोंधळामुळे नेत्यांची प्रतिमा खराब’ नवी दिल्ली - संसद सदस्यांचे वर्तन समाजासमोर एखाद्या ‘रोल मॉडेल'' प्रमाणे हवे. मात्र अलीकडे संसदेतील चर्चेचा स्तर घसरत चालल्याने व गोंधळाला महत्त्व आल्याने राजकीय नेत्यांनी समाजातील प्रतिमा वेगाने घसरत आहे, अशा शब्दांत राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे.  नक्षलवाद्यांना ठेचणार नारीशक्ती; CRPF च्या कोब्रा पथकात 34 महिला नायडू यांनी आज ट्विटद्वारे म्हटले, की सभागृहांतील चर्चेची पातळी घसरली आहे व लोकांच्या नजरेतून नेत्यांची प्रतिमाही खराब झाली आहे. निवडून आलेल्या संसद सदस्यांनी पदाची प्रतिष्ठा व आपली कर्तव्ये यांचे भान ठेवावे. राज्यसभेतील गोंधळाचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याचा प्रकार समोर आल्यावर नायडू यांनी संबंधितांना दालनात बोलावून असे करणे चुकीचे आहे, अशी समज दिली. आजही त्यांनी तोच मुद्दा अधोरेखित केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सभागृहाच्या कामकाजाचे अशा पद्धतीने चित्रीकरण करून सोशल मीडीयावर ते टाकणे हा सभागृहाच्या अवमानाचा मुद्दा ठरू शकतो. हे वर्तन संसदीय मर्यादेच्या संपूर्ण विरुद्ध असून ते करणारांविरुद्ध कारवाई होईल, असाही इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान, कृषी कायदे राज्यसभेत ज्या पद्धतीने प्रचंड गदारोळात मंजूर करवून घेण्यात आल्याबाबत विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदविले त्याबद्दल त्यांनी टिप्पणी केलेली नाही.  संसद अधिवेशनात दोन्ही सभागृहांत शेतकरी आंदोलनावरून गदारोळ सुरू आहे.  कृषी कायद्याने काय मिळणार? शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे वाचा राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चा राज्यसभेत पूर्ण झाली पण लोकसभेत त्यास मुहूर्तही मिळू शकलेला नाही. नायडू यांनी संसदीय कामकाजात गोंधळाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल प्रत्येक अधिवेशनात सदस्यांना समजून सांगितले आहे. मात्र राज्यसभेत अभिभाषण चर्चा सुरू होण्यासाठी गोंधळ घालणाऱ्या ‘आप’च्या तीन खासदारांना निलंबितच करावे लागले याबद्दल त्यांनी खेद या वेळी व्यक्त केला आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aBFyzQ

No comments:

Post a Comment