"रेडी'चा अपेक्षित विकास नाही ः तांबे सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - रेडी बंदर विकास अपेक्षित होत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून बंदर काढून घेत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीला ते द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज येथे दिली. कंपन्यांच्या नावाखाली याठिकाणी कोणी जमिनी लाटल्या असतील आणि प्रकल्प सुरू केला नसेल तर अशा जमिनी पुन्हा शासनाने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले.  जिल्हा दौऱ्यावर असलेल्या तांबे यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ""पक्षाला व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच आगामी विधानसभा निवडणूकही कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे. आम्हालाही वाटतं की 288 पैकी 145 जागा येऊन आमचं सरकार बनावं. त्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये लढणार आहोत.''  ते म्हणाले, ""रेडी बंदराचे काम ज्या ठेकेदाराने घेतले त्याच्याकडून बंदराचा हवा तसा विकास झालेला नाही. स्थानिक युवकांना अपेक्षित रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे बंदराचा विकास होण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून बंदर काढून घेणेच योग्य होईल. तशी मागणी आपण बंदर विकासमंत्र्यांकडे करू. कॉंग्रेस मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. वाळू, चिरे प्रश्‍नांबरोबरच मच्छीमारांचे प्रश्‍न हाताळणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांना मुंबई- पुण्याला धाव घ्यावी लागत आहे. म्हणूनच सत्तेच्या माध्यमातून रोजगाराच्या दृष्टीने काय करता येईल, हे पाहावे लागेल.''  कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब, किरण टेंबुलकर, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राघवेंद्र नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी उपस्थित होते.    भांडणे प्रत्येकाच्या घरात असतात  जिल्हा कॉंग्रेसमध्ये गटबाजी नाही; मात्र, याठिकाणी कोण गटबाजी करीत असेल तर ते चुकीचे आहे. माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत आपल्याशी बोलले आहेत. त्यांची माझी भेट झाली. प्रत्येकाच्या घरात भांडणं होत असतात आणि ती कशी मिटवायची हे आम्हाला माहीत आहे, असेही तांबे एका प्रश्‍नावर म्हणाले.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 4, 2021

"रेडी'चा अपेक्षित विकास नाही ः तांबे सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - रेडी बंदर विकास अपेक्षित होत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून बंदर काढून घेत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीला ते द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज येथे दिली. कंपन्यांच्या नावाखाली याठिकाणी कोणी जमिनी लाटल्या असतील आणि प्रकल्प सुरू केला नसेल तर अशा जमिनी पुन्हा शासनाने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले.  जिल्हा दौऱ्यावर असलेल्या तांबे यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ""पक्षाला व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच आगामी विधानसभा निवडणूकही कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे. आम्हालाही वाटतं की 288 पैकी 145 जागा येऊन आमचं सरकार बनावं. त्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये लढणार आहोत.''  ते म्हणाले, ""रेडी बंदराचे काम ज्या ठेकेदाराने घेतले त्याच्याकडून बंदराचा हवा तसा विकास झालेला नाही. स्थानिक युवकांना अपेक्षित रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे बंदराचा विकास होण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून बंदर काढून घेणेच योग्य होईल. तशी मागणी आपण बंदर विकासमंत्र्यांकडे करू. कॉंग्रेस मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. वाळू, चिरे प्रश्‍नांबरोबरच मच्छीमारांचे प्रश्‍न हाताळणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांना मुंबई- पुण्याला धाव घ्यावी लागत आहे. म्हणूनच सत्तेच्या माध्यमातून रोजगाराच्या दृष्टीने काय करता येईल, हे पाहावे लागेल.''  कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब, किरण टेंबुलकर, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राघवेंद्र नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी उपस्थित होते.    भांडणे प्रत्येकाच्या घरात असतात  जिल्हा कॉंग्रेसमध्ये गटबाजी नाही; मात्र, याठिकाणी कोण गटबाजी करीत असेल तर ते चुकीचे आहे. माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत आपल्याशी बोलले आहेत. त्यांची माझी भेट झाली. प्रत्येकाच्या घरात भांडणं होत असतात आणि ती कशी मिटवायची हे आम्हाला माहीत आहे, असेही तांबे एका प्रश्‍नावर म्हणाले.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aDP3P5

No comments:

Post a Comment