अकार्यक्षमतेमुळे केसरकरांचे पालकमंत्रिपद गेले ः परब सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आमदार दीपक केसरकर यांचे पालकमंत्रिपद त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे काढून घेण्यात आले आहे. आमच्या कामांकडे लक्ष देण्यापेक्षा केसरकरांनी स्वतःकडे लक्ष द्यावे, असा टोलाही आज नगराध्यक्ष संजू परब यांनी येथे लगावला.  रवी जाधव यांचा स्टॉल उभारण्याबाबत कोणताही लेखी आदेश अद्याप झाला नसून तसा आदेश झाल्यास योग्य उत्तर संबंधितांना कळवू, असेही परब यांनी सांगितले.  येथील मोती तलाव काठी आठवडा बाजार भरविणे चुकीचे असल्याचे यापूर्वी आमदार केसरकर यांनी सांगितले होते. याबाबत नगराध्यक्ष परब यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ""याआधी वीस वर्ष पालिका केसरकर यांच्या ताब्यात होती. त्या वीस वर्षात त्यांना वाटेल ते त्यांनी निर्णय घेतले. आता दोन वर्ष पालिका आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे शहरवासियांना योग्य होईल असे निर्णय आम्ही घेत आहोत. सध्याचा बाजार आम्ही मोती तलावाकाठी भरत असून आतापर्यंत तरी त्याला कोणत्याही नागरिकाने किंवा व्यापाऱ्याने विरोध केला नाही. त्यामुळे मोती तलावाकाठी बाजार भरवण्याचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आम्ही घेत असलेल्या निर्णयांमध्ये ढवळाढवळ करू नये. त्यांनी पालकमंत्री असताना बेजबाबदारपणा आणि अकार्यक्षमता दाखवली आहे. त्यांच्या या अकार्यक्षमतेमुळे त्यांचे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले. त्यामुळे आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी शिकवू नये. आमची काळजी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावे. पालकमंत्रिपद का काढून घेतले याचा विचार करावा.''  ...तर योग्य उत्तर कळवणार  यावेळी नगरविकास मंत्र्यांनी रवी जाधव यांचा स्टॉल त्याच जागेवर उभारण्याचे आदेश दिले आहेत का? अशी विचारणा केल्यावर श्री. परब यांनी असे कोणतेही आदेश अद्याप आपल्याजवळ आले नसून अशा प्रकारचे आदेश प्राप्त झाल्यास संबंधितांना योग्य ते उत्तर कळवू, असे यावेळी श्री. परब यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 29, 2021

अकार्यक्षमतेमुळे केसरकरांचे पालकमंत्रिपद गेले ः परब सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आमदार दीपक केसरकर यांचे पालकमंत्रिपद त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे काढून घेण्यात आले आहे. आमच्या कामांकडे लक्ष देण्यापेक्षा केसरकरांनी स्वतःकडे लक्ष द्यावे, असा टोलाही आज नगराध्यक्ष संजू परब यांनी येथे लगावला.  रवी जाधव यांचा स्टॉल उभारण्याबाबत कोणताही लेखी आदेश अद्याप झाला नसून तसा आदेश झाल्यास योग्य उत्तर संबंधितांना कळवू, असेही परब यांनी सांगितले.  येथील मोती तलाव काठी आठवडा बाजार भरविणे चुकीचे असल्याचे यापूर्वी आमदार केसरकर यांनी सांगितले होते. याबाबत नगराध्यक्ष परब यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ""याआधी वीस वर्ष पालिका केसरकर यांच्या ताब्यात होती. त्या वीस वर्षात त्यांना वाटेल ते त्यांनी निर्णय घेतले. आता दोन वर्ष पालिका आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे शहरवासियांना योग्य होईल असे निर्णय आम्ही घेत आहोत. सध्याचा बाजार आम्ही मोती तलावाकाठी भरत असून आतापर्यंत तरी त्याला कोणत्याही नागरिकाने किंवा व्यापाऱ्याने विरोध केला नाही. त्यामुळे मोती तलावाकाठी बाजार भरवण्याचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आम्ही घेत असलेल्या निर्णयांमध्ये ढवळाढवळ करू नये. त्यांनी पालकमंत्री असताना बेजबाबदारपणा आणि अकार्यक्षमता दाखवली आहे. त्यांच्या या अकार्यक्षमतेमुळे त्यांचे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले. त्यामुळे आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी शिकवू नये. आमची काळजी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावे. पालकमंत्रिपद का काढून घेतले याचा विचार करावा.''  ...तर योग्य उत्तर कळवणार  यावेळी नगरविकास मंत्र्यांनी रवी जाधव यांचा स्टॉल त्याच जागेवर उभारण्याचे आदेश दिले आहेत का? अशी विचारणा केल्यावर श्री. परब यांनी असे कोणतेही आदेश अद्याप आपल्याजवळ आले नसून अशा प्रकारचे आदेश प्राप्त झाल्यास संबंधितांना योग्य ते उत्तर कळवू, असे यावेळी श्री. परब यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39tgxaL

No comments:

Post a Comment