आम्हाला राजशिष्टाचार शिकवू नका ः सावंतवाडी नगराध्यक्ष सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - पालिका ही स्वायत्त संस्था आहे. याला काही वेगळे अधिकार आहेत. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला राजशिष्टाचार शिकवू नये. नारायण राणे पालकमंत्री असताना आमदार दीपक केसरकर यांनी राजशिष्टाचार पाळला होता का? अशी खोचक टीका नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केली.  नगराध्यक्ष परब यांनी आज पालिकेमध्ये दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते. ते म्हणाले, पालकमंत्री सामंत, आमदार केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना सात दिवसांपूर्वी पालिकेच्या उद्या (ता.30) होणाऱ्या विकासकामांच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण मेलवर पाठवले आहे. त्यामुळे कार्यक्रमाला कोणी आले आणि कोणी नाही आले तरी कार्यक्रम होणारच.  परब म्हणाले, ""29 डिसेंबरला नगराध्यक्ष म्हणून माझ्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शहरातील विकासकामांच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नगराध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. ते पाळले असून फडणवीस सरकारच्या काळात पालिकेला मिळालेल्या अकरा कोटी रुपयांच्या निधीतून ही कामे करण्यात आली आहेत. यामध्ये शिवउद्यान कुंपण बांधकाम, बॅ. नाथ पै सभागृह नूतनीकरण, काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृह नूतनीकरण, जलतरण तलाव नूतनीकरण आदी कामांचा समावेश आहे.''  परब पुढे म्हणाले, ""पालकमंत्री सामंत हे श्रेय घेण्यासाठी आणि उद्‌घाटने करण्यासाठी धडपडत आहेत; मात्र त्यांनी ठाकरे सरकारकडून आधी पालिकेला निधी द्यावा आणि त्यानंतर त्यांनी हवे तेवढे श्रेय घ्यावे. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला त्यांना त्यांची वेळ घेऊन आमंत्रण देऊ. राजशिष्टाचारबाबत त्यांनी आम्हाला शिकवू नये. रत्नागिरीचा राजशिष्टाचार वेगळा आणि सिंधुदुर्गचा वेगळा आहे. त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर पंचवीस वर्षांचा राजशिष्टाचार बाहेर पडेल. उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष या नात्याने पालकमंत्री सामंत यांच्यासह आमदार केसरकर, जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांना सात दिवस आधी मेल केला आहे. मी फोनवरूनही त्यांना तसे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी उगाच राजकारण करू नये. दुसरीकडे हक्कभंगबाबत सुनाविणाऱ्या आमदार केसरकर यांनी पालकमंत्री म्हणून राणे असताना पालिकेच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला किती शिष्टाचार पाळला होता? त्यावेळी त्यांचा राजशिष्टाचार कुठे गेला होता? आम्ही आयोजित केलेला उद्‌घाटनाचा कार्यक्रम हा कायदेशीरच आहे. त्यामुळे केसरकरांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. पालिका ही स्वायत्त संस्था असल्याने तिला वेगळे अधिकार आहेत. या अधिकारात राहून आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला कोण येणार नाही म्हणून कार्यक्रम होण्याचा राहणार नाही.''  कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा  उद्याच्या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी गैरहजर राहणार का? याबाबत त्यांनी तुम्हाला तसे कळवले आहे का? असे नगराध्यक्षांना विचारले असता त्यांनी अद्याप आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी तसे कळवले नाही; मात्र तरीही ते गैरहजर राहिले तर कायदेशीर कारवाईची पावले उचलणार असल्याचे नगराध्यक्ष परब यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 29, 2020

आम्हाला राजशिष्टाचार शिकवू नका ः सावंतवाडी नगराध्यक्ष सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - पालिका ही स्वायत्त संस्था आहे. याला काही वेगळे अधिकार आहेत. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला राजशिष्टाचार शिकवू नये. नारायण राणे पालकमंत्री असताना आमदार दीपक केसरकर यांनी राजशिष्टाचार पाळला होता का? अशी खोचक टीका नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केली.  नगराध्यक्ष परब यांनी आज पालिकेमध्ये दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते. ते म्हणाले, पालकमंत्री सामंत, आमदार केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना सात दिवसांपूर्वी पालिकेच्या उद्या (ता.30) होणाऱ्या विकासकामांच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण मेलवर पाठवले आहे. त्यामुळे कार्यक्रमाला कोणी आले आणि कोणी नाही आले तरी कार्यक्रम होणारच.  परब म्हणाले, ""29 डिसेंबरला नगराध्यक्ष म्हणून माझ्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शहरातील विकासकामांच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नगराध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. ते पाळले असून फडणवीस सरकारच्या काळात पालिकेला मिळालेल्या अकरा कोटी रुपयांच्या निधीतून ही कामे करण्यात आली आहेत. यामध्ये शिवउद्यान कुंपण बांधकाम, बॅ. नाथ पै सभागृह नूतनीकरण, काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृह नूतनीकरण, जलतरण तलाव नूतनीकरण आदी कामांचा समावेश आहे.''  परब पुढे म्हणाले, ""पालकमंत्री सामंत हे श्रेय घेण्यासाठी आणि उद्‌घाटने करण्यासाठी धडपडत आहेत; मात्र त्यांनी ठाकरे सरकारकडून आधी पालिकेला निधी द्यावा आणि त्यानंतर त्यांनी हवे तेवढे श्रेय घ्यावे. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला त्यांना त्यांची वेळ घेऊन आमंत्रण देऊ. राजशिष्टाचारबाबत त्यांनी आम्हाला शिकवू नये. रत्नागिरीचा राजशिष्टाचार वेगळा आणि सिंधुदुर्गचा वेगळा आहे. त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर पंचवीस वर्षांचा राजशिष्टाचार बाहेर पडेल. उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष या नात्याने पालकमंत्री सामंत यांच्यासह आमदार केसरकर, जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांना सात दिवस आधी मेल केला आहे. मी फोनवरूनही त्यांना तसे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी उगाच राजकारण करू नये. दुसरीकडे हक्कभंगबाबत सुनाविणाऱ्या आमदार केसरकर यांनी पालकमंत्री म्हणून राणे असताना पालिकेच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला किती शिष्टाचार पाळला होता? त्यावेळी त्यांचा राजशिष्टाचार कुठे गेला होता? आम्ही आयोजित केलेला उद्‌घाटनाचा कार्यक्रम हा कायदेशीरच आहे. त्यामुळे केसरकरांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. पालिका ही स्वायत्त संस्था असल्याने तिला वेगळे अधिकार आहेत. या अधिकारात राहून आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला कोण येणार नाही म्हणून कार्यक्रम होण्याचा राहणार नाही.''  कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा  उद्याच्या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी गैरहजर राहणार का? याबाबत त्यांनी तुम्हाला तसे कळवले आहे का? असे नगराध्यक्षांना विचारले असता त्यांनी अद्याप आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी तसे कळवले नाही; मात्र तरीही ते गैरहजर राहिले तर कायदेशीर कारवाईची पावले उचलणार असल्याचे नगराध्यक्ष परब यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aT12Kj

No comments:

Post a Comment