शासनाची परवानगी; पण जलतरण तलाव कोरडेच  कोल्हापूर : राज्य शासनाने जलतरण तलाव सुरू करण्याला मंजुरी दिली असूनही शहरातील बहुतांश तलाव बंदच आहेत. तलाव सुरू होतील, अशी शक्‍यता नसताना अनपेक्षित या निर्णयामुळे जलतरणपटू काही प्रमाणात समाधानी झाले असले तरीही तलाव सुरू करण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे.  सात महिन्यांच्या लॉकडाउनमुळे राज्यभरातील जलतरण तलाव पोहण्यासाठी आणि सरावासाठी बंद केले होते. सध्या मात्र शासनाने तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे, मात्र अनेक महिन्यांपासून बंद असणारे जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी आणि त्याचा मेंटेनंस करण्यासाठी मात्र काही कालावधी जावा लागणार आहे. जलतरण तलाव योग्यप्रकारे कार्यान्वित ठेवण्यासाठी ही यंत्रणा सात महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने वापरली गेली आहे. शिवाय तलावातील पाणी हे शुद्धीकरण करून सोडले जाते व साठवणुकीची व्यवस्था स्वच्छ गरजेची आहे.  शिवाय शासनाने तलाव सुरू करण्यासाठी परवानगी दिली असली तरीही नेमक्‍या सूचना मात्र दिल्या नसल्यामुळे तलावचालकांसमोर याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जलतरणप्रेमींना जलतरणाचा आनंद घेण्यासाठी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे.    शासनाने परवानगी दिली असली तरीही डागडुजी आणि पाण्याचे आरोग्यवर्धक प्रमाण नीट राखण्यासाठी थोड्या दिवसांचा कालावधी जावा लागणार आहे. शिवाय मार्गदर्शक सूचना ठरवूनच प्रवेश संख्या निश्‍चिती आणि वापरायला मिळणाऱ्या सुविधा या ठरवल्या जातील.  - डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी.  संपादन - धनाजी सुर्वे   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 5, 2020

शासनाची परवानगी; पण जलतरण तलाव कोरडेच  कोल्हापूर : राज्य शासनाने जलतरण तलाव सुरू करण्याला मंजुरी दिली असूनही शहरातील बहुतांश तलाव बंदच आहेत. तलाव सुरू होतील, अशी शक्‍यता नसताना अनपेक्षित या निर्णयामुळे जलतरणपटू काही प्रमाणात समाधानी झाले असले तरीही तलाव सुरू करण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे.  सात महिन्यांच्या लॉकडाउनमुळे राज्यभरातील जलतरण तलाव पोहण्यासाठी आणि सरावासाठी बंद केले होते. सध्या मात्र शासनाने तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे, मात्र अनेक महिन्यांपासून बंद असणारे जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी आणि त्याचा मेंटेनंस करण्यासाठी मात्र काही कालावधी जावा लागणार आहे. जलतरण तलाव योग्यप्रकारे कार्यान्वित ठेवण्यासाठी ही यंत्रणा सात महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने वापरली गेली आहे. शिवाय तलावातील पाणी हे शुद्धीकरण करून सोडले जाते व साठवणुकीची व्यवस्था स्वच्छ गरजेची आहे.  शिवाय शासनाने तलाव सुरू करण्यासाठी परवानगी दिली असली तरीही नेमक्‍या सूचना मात्र दिल्या नसल्यामुळे तलावचालकांसमोर याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जलतरणप्रेमींना जलतरणाचा आनंद घेण्यासाठी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे.    शासनाने परवानगी दिली असली तरीही डागडुजी आणि पाण्याचे आरोग्यवर्धक प्रमाण नीट राखण्यासाठी थोड्या दिवसांचा कालावधी जावा लागणार आहे. शिवाय मार्गदर्शक सूचना ठरवूनच प्रवेश संख्या निश्‍चिती आणि वापरायला मिळणाऱ्या सुविधा या ठरवल्या जातील.  - डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी.  संपादन - धनाजी सुर्वे   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3p29xHK

No comments:

Post a Comment