तासगाव तालुक्‍यात यंदाचा द्राक्ष हंगाम उशिरा येळावी : यंदाचा मान्सून व वादळी पाऊस धुवांधार व संततधार राहिल्याने सध्या तासगाव पश्‍चिम भागातील निमणी, तुरची, येळावी परिसरातील द्राक्षबागांच्या लांबलेल्या द्राक्ष फळ छाटण्या या एकाच कालावधीत व एकाचवेळी होऊ लागल्या आहेत. परिणामी यंदाचा या परिसरातील सर्व द्राक्षबागांचा द्राक्ष हंगाम उशिरा व एकाचवेळी सुरू होणार असल्याने द्राक्ष दर कमी मिळण्याचे संकट बागायतदारासमोर उभे राहणार आहे.  अनेक बागांची छाटणी एकाचवेळी सुरु झाल्याने मजुरांची कमतरताही भासू लागल्याचे चित्र दिसून येते. तासगाव पश्‍चिम भागात द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. निमणी, तुरची, नेहरूनगर, नागाव, व येळावी या परिसरातील द्राक्ष बागायतदार द्राक्ष दर चांगला मिळावा म्हणून नेहमी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात आगाप फळ छाटणी घेतात. मात्र यंदा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातच सततधार, मुसळधार पाऊस व ढगाळ वातावरण राहिले. या काळात द्राक्ष बागेत पाणी साचून राहिल्याने द्राक्ष वेलीच्या मुळांची वाढ खुंटली. परिणामी अशा वातावरणात डोळे न फुटण्याच्या भीतीमुळे अनेक द्राक्षबागायतदारांनी आगाप फळछाटणी घेण्याचे धाडस केले नव्हते. परंतु गेल्या पंधरा दिवसात पावसाने उघडीप दिल्याने या परिसरातील फळ छाटणी कामाना चांगलाच वेग आला आहे.  कामासाठी मजुर दाखल  अनेक बागांची द्राक्ष छाटण्या एकाच कालावधीत झाल्याने अनेक बागांचाही द्राक्ष हंगामही एकाच वेळी येणार असल्याने द्राक्ष दर घसरण्याचे संकट भविष्यात उभे राहणार आहे.सध्या या परिसरात एकाच वेळी अनेक द्राक्ष बागांची छाटणी होत असल्याने गावातील मजूरबरोबर तासगाव निमणी,तुरची परिसरातील अनेक मजूर गट या कामासाठी येत असल्याचे दिसून येते.    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 10, 2020

तासगाव तालुक्‍यात यंदाचा द्राक्ष हंगाम उशिरा येळावी : यंदाचा मान्सून व वादळी पाऊस धुवांधार व संततधार राहिल्याने सध्या तासगाव पश्‍चिम भागातील निमणी, तुरची, येळावी परिसरातील द्राक्षबागांच्या लांबलेल्या द्राक्ष फळ छाटण्या या एकाच कालावधीत व एकाचवेळी होऊ लागल्या आहेत. परिणामी यंदाचा या परिसरातील सर्व द्राक्षबागांचा द्राक्ष हंगाम उशिरा व एकाचवेळी सुरू होणार असल्याने द्राक्ष दर कमी मिळण्याचे संकट बागायतदारासमोर उभे राहणार आहे.  अनेक बागांची छाटणी एकाचवेळी सुरु झाल्याने मजुरांची कमतरताही भासू लागल्याचे चित्र दिसून येते. तासगाव पश्‍चिम भागात द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. निमणी, तुरची, नेहरूनगर, नागाव, व येळावी या परिसरातील द्राक्ष बागायतदार द्राक्ष दर चांगला मिळावा म्हणून नेहमी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात आगाप फळ छाटणी घेतात. मात्र यंदा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातच सततधार, मुसळधार पाऊस व ढगाळ वातावरण राहिले. या काळात द्राक्ष बागेत पाणी साचून राहिल्याने द्राक्ष वेलीच्या मुळांची वाढ खुंटली. परिणामी अशा वातावरणात डोळे न फुटण्याच्या भीतीमुळे अनेक द्राक्षबागायतदारांनी आगाप फळछाटणी घेण्याचे धाडस केले नव्हते. परंतु गेल्या पंधरा दिवसात पावसाने उघडीप दिल्याने या परिसरातील फळ छाटणी कामाना चांगलाच वेग आला आहे.  कामासाठी मजुर दाखल  अनेक बागांची द्राक्ष छाटण्या एकाच कालावधीत झाल्याने अनेक बागांचाही द्राक्ष हंगामही एकाच वेळी येणार असल्याने द्राक्ष दर घसरण्याचे संकट भविष्यात उभे राहणार आहे.सध्या या परिसरात एकाच वेळी अनेक द्राक्ष बागांची छाटणी होत असल्याने गावातील मजूरबरोबर तासगाव निमणी,तुरची परिसरातील अनेक मजूर गट या कामासाठी येत असल्याचे दिसून येते.    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2IjZQ6t

No comments:

Post a Comment