दोषींवर कडक कारवाई करणार  ः नलावडे कणकवली (सिंधुदुर्ग) - नगरपंचायतीचा अग्निशमन बंब पाण्याने नेहमीच सज्ज असायलाच हवा. बाजारपेठेतील दुकानाला आग लागली तेव्हा बंबात पाणी कमी होते, ही वस्तुस्थिती आहे. यातील दोषींवर निश्‍चितपणे कारवाई करणार आहोत. बंब घटनास्थळी उशिरा पोचल्याबद्दल दिलगिरी व्यक्‍त करत आहोत, असे प्रतिपादन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज केले.  श्री. नलावडे यांनी आज आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभिजित मुसळे, किशोर राणे, संदीप नलावडे, महेश सावंत, राजू गवाणकर आदी उपस्थित होते. श्री. नलावडे म्हणाले, ""आगीच्या घटनेनंतर नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी पोचला; पण त्यात पाणी कमी होते. त्यानंतर आम्ही तातडीने दिलीप बिल्डकॉन कंपनीशी बोलून त्यांचा टॅंकर मागवला. या टॅंकरमधील पाणी बंबात घेतले आणि तातडीने आग आटोक्‍यात आणली. दुकानाला लागलेली आग ही नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबामुळेच आटोक्‍यात आली ही वस्तुस्थिती आहे; मात्र बंबांत पाणी कमी असणे आणि बंब उशिरा पोचणे याबाबत आम्ही दिलगिरी आहोत.''  यापुढे सतर्कता  ते म्हणाले, ""बंबात पाणी कमी ठेवल्याबद्दल संबंधित दोषींवर निश्‍चितपणे कारवाई होणार आहे. यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. यापुढे अशा घटना होऊ नयेत याची काळजी घेऊ. यापुढे अग्निशामक बंब रजिस्टर मेंटेन केले जाईल. बंबात पाणी, डिझेल किती याची रोज तपासणी होईल. ही सर्व जबाबदारी स्वत: आणि माझे सर्व नगरसेवक घेतील. बाणे यांच्या दुकानाला आग लागली तेव्हा पुण्याला कौटुंबिक कार्यक्रमात होतो; मात्र तातडीने उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांना माहिती दिली. भाजप कार्यकर्त्यांनीही मेहनत घेतली.   संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

दोषींवर कडक कारवाई करणार  ः नलावडे कणकवली (सिंधुदुर्ग) - नगरपंचायतीचा अग्निशमन बंब पाण्याने नेहमीच सज्ज असायलाच हवा. बाजारपेठेतील दुकानाला आग लागली तेव्हा बंबात पाणी कमी होते, ही वस्तुस्थिती आहे. यातील दोषींवर निश्‍चितपणे कारवाई करणार आहोत. बंब घटनास्थळी उशिरा पोचल्याबद्दल दिलगिरी व्यक्‍त करत आहोत, असे प्रतिपादन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज केले.  श्री. नलावडे यांनी आज आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभिजित मुसळे, किशोर राणे, संदीप नलावडे, महेश सावंत, राजू गवाणकर आदी उपस्थित होते. श्री. नलावडे म्हणाले, ""आगीच्या घटनेनंतर नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी पोचला; पण त्यात पाणी कमी होते. त्यानंतर आम्ही तातडीने दिलीप बिल्डकॉन कंपनीशी बोलून त्यांचा टॅंकर मागवला. या टॅंकरमधील पाणी बंबात घेतले आणि तातडीने आग आटोक्‍यात आणली. दुकानाला लागलेली आग ही नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबामुळेच आटोक्‍यात आली ही वस्तुस्थिती आहे; मात्र बंबांत पाणी कमी असणे आणि बंब उशिरा पोचणे याबाबत आम्ही दिलगिरी आहोत.''  यापुढे सतर्कता  ते म्हणाले, ""बंबात पाणी कमी ठेवल्याबद्दल संबंधित दोषींवर निश्‍चितपणे कारवाई होणार आहे. यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. यापुढे अशा घटना होऊ नयेत याची काळजी घेऊ. यापुढे अग्निशामक बंब रजिस्टर मेंटेन केले जाईल. बंबात पाणी, डिझेल किती याची रोज तपासणी होईल. ही सर्व जबाबदारी स्वत: आणि माझे सर्व नगरसेवक घेतील. बाणे यांच्या दुकानाला आग लागली तेव्हा पुण्याला कौटुंबिक कार्यक्रमात होतो; मात्र तातडीने उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांना माहिती दिली. भाजप कार्यकर्त्यांनीही मेहनत घेतली.   संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TNaiG1

No comments:

Post a Comment