सिंधुदुर्ग ग्रामिण भागात दूषित पाण्याचा त्रास सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यातील 843 सार्वजनिक पाणी स्त्रोतातील तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी ग्रामीण भागातील 54 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. कणकवली, वैभववाडी व दोडामार्ग तालुक्‍यात दुषित पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी ही माहिती दिली.  जिल्ह्यात यावर्षी अधिक पाऊस झाल्याने सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतामध्ये पुराचे पाणी जाऊन पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले होते. ऑक्‍टोबरमध्ये केलेल्या पाणी नमुने तपासणीमध्ये ग्रामीण भागातील 743 व शहरी भागातील 100 पाणी नमुने तपासण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातील 743 पाणी नमुन्यांपैकी 54 पाणी नमूने दूषित आढळले आहेत. शहरी भागातील तपासण्यात आलेल्या 100 पाणी नमुन्यांपैकी एकही पाणी नमुना दूषित आढळलेला नाही.  जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील असे मिळून दोडामार्ग तालुक्‍यात तपासण्यात आलेल्या 60 नमुन्यांपैकी 11 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. सावंतवाडी 126 पैकी 3 पाणी नमूने दूषित, कुडाळ 151 पैकी 5 दूषित, मालवण 132 पैकी 1 दूषित, कणकवली 123 पैकी 16 दूषित, देवगड 112 पैकी 5 दूषित, वैभववाडी 56 पैकी 13 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. जिल्ह्यातील एकमेव वेंगुर्ले तालुक्‍यात शहरी व ग्रामीण भागात दूषित पाणी असलेला एकही पाण्याचा स्त्रोत नसल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.  आजारांची टांगती तलवार  जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात याची तीव्रता अधिक आहे. याच भागात दुषित पाणी वाढत असल्याने आरोग्यविषयी प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे.  दूषित पाणी समस्येचे तालुके  तालुका*एकूण नमुने*दूषित नमुने  सावंतवाडी*126*3  कुडाळ*151*5  मालवण*132*1  कणकवली*123*16  देवगड*112*5  वैभववाडी*56*13  (वेंगुर्ले तालुक्‍यात दूषित पाण्याचा स्त्रोत नाही)    तपासणीत आढळलेले दूषित पाण्याचे स्त्रोत शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायतीमार्फत नेमलेल्या ग्राम सुरक्षारक्षकांमार्फत पाण्यात टीसीएल पावडर टाकून पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. या व्यतिरिक्त अन्य कोणतीही पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा नाही; मात्र टीसीएल टाकून शुद्धीकरण केलेल्या स्त्रोतातील पाण्याचे पुन्हा नमुने घेऊन ते तपासले जातात व पाणी पिण्यास योग्य आहे की नाही याची खात्री केली जाते.  - डॉ. महेश खलीपे, जिल्हा आरोग्य अधिकारी.  संपादन - राहुल पाटील   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 30, 2020

सिंधुदुर्ग ग्रामिण भागात दूषित पाण्याचा त्रास सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यातील 843 सार्वजनिक पाणी स्त्रोतातील तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी ग्रामीण भागातील 54 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. कणकवली, वैभववाडी व दोडामार्ग तालुक्‍यात दुषित पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी ही माहिती दिली.  जिल्ह्यात यावर्षी अधिक पाऊस झाल्याने सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतामध्ये पुराचे पाणी जाऊन पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले होते. ऑक्‍टोबरमध्ये केलेल्या पाणी नमुने तपासणीमध्ये ग्रामीण भागातील 743 व शहरी भागातील 100 पाणी नमुने तपासण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातील 743 पाणी नमुन्यांपैकी 54 पाणी नमूने दूषित आढळले आहेत. शहरी भागातील तपासण्यात आलेल्या 100 पाणी नमुन्यांपैकी एकही पाणी नमुना दूषित आढळलेला नाही.  जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील असे मिळून दोडामार्ग तालुक्‍यात तपासण्यात आलेल्या 60 नमुन्यांपैकी 11 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. सावंतवाडी 126 पैकी 3 पाणी नमूने दूषित, कुडाळ 151 पैकी 5 दूषित, मालवण 132 पैकी 1 दूषित, कणकवली 123 पैकी 16 दूषित, देवगड 112 पैकी 5 दूषित, वैभववाडी 56 पैकी 13 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. जिल्ह्यातील एकमेव वेंगुर्ले तालुक्‍यात शहरी व ग्रामीण भागात दूषित पाणी असलेला एकही पाण्याचा स्त्रोत नसल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.  आजारांची टांगती तलवार  जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात याची तीव्रता अधिक आहे. याच भागात दुषित पाणी वाढत असल्याने आरोग्यविषयी प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे.  दूषित पाणी समस्येचे तालुके  तालुका*एकूण नमुने*दूषित नमुने  सावंतवाडी*126*3  कुडाळ*151*5  मालवण*132*1  कणकवली*123*16  देवगड*112*5  वैभववाडी*56*13  (वेंगुर्ले तालुक्‍यात दूषित पाण्याचा स्त्रोत नाही)    तपासणीत आढळलेले दूषित पाण्याचे स्त्रोत शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायतीमार्फत नेमलेल्या ग्राम सुरक्षारक्षकांमार्फत पाण्यात टीसीएल पावडर टाकून पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. या व्यतिरिक्त अन्य कोणतीही पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा नाही; मात्र टीसीएल टाकून शुद्धीकरण केलेल्या स्त्रोतातील पाण्याचे पुन्हा नमुने घेऊन ते तपासले जातात व पाणी पिण्यास योग्य आहे की नाही याची खात्री केली जाते.  - डॉ. महेश खलीपे, जिल्हा आरोग्य अधिकारी.  संपादन - राहुल पाटील   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/37lY8dD

No comments:

Post a Comment