कोकणातील शेतकऱ्यांची दिवाळी यंदा शेतातच  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - परतीच्या पावसाने घातलेले धुमशान आणि भात कापणीला झालेला विलंब लक्षात घेता यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच जाणार असल्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात 70 टक्के भात कापणी पूर्ण झाली असून उर्वरित कापणीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे.  गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरक्ष: अश्रू आणले. भात कापणी लायक झाले असताना परतीच्या पावसाने आगमन केले. हा परतीच्या पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे भात कापणी करायची कशी? असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला; मात्र असे असतानाही काही शेतकऱ्यांनी स्वत:चा विचार न करता भात पदरात घेण्यासाठी कापणी केली; मात्र 90 टक्के शेतकऱ्यांनी पाऊस जाण्याची वाट पाहिल्याने आज भात कापणी खोळंबली आहे. गेल्या वर्षीही हीच स्थिती शेतकऱ्यांपुढे होती. गेल्या वर्षीही भात पिकाचे मोठे नुकसान झाले आले होते; मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी भात कापणी करण्यात सावधगिरी बाळगली होती.  गेली काही वर्षाचा विचार करता शेतकरी एकमेकांकडे भात कापणीसाठी जात असतात त्यामुळे भात कापणी आटोक्‍यात येत असे; मात्र गेले दोन-तीन वर्ष परतीच्या पावसाचा खेळखंडोबा पाहता प्रत्यक्ष करायची भात कापणी एकाच वेळी होत असल्याने कोणालाच एकमेकांकडे जाता येत नाही. त्यामुळे भात कापणीचा उत्साह कमी कमी होऊन भात कापणी खोळंबून जाते.  यावर्षी हीच परिस्थिती शेतकऱ्यावर आली असून जिल्ह्यात ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात कापणी शिल्लक राहिली आहे. बऱ्याच ठिकाणी वांयगणी शेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे पावसाळी भात पीक ताब्यात घेऊन वायंगणी शेतीकडे शेतकऱ्यांचा कल असतो; मात्र पावसाळी भात कापणी आटोक्‍यात येत नसल्याने शेतकरी पुरता दमून गेला आहे. वायंगणी शेती ही नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान पेरल्यास चांगले उत्पन्न मिळते. शिवाय बऱ्याच ठिकाणी पाण्याचाही प्रश्‍न असल्यानेही शेती नोव्हेंबर ते डिसेंबरमध्येच केली जाते. त्यामुळे शेतकऱ्याने भात कापणीला जोर दिला आहे.  मजूर नसल्याने चिंता  जिल्ह्यातील 70 टक्के भात कापणी मागे पडली आहे. त्यामुळे यावर्षीचा दिवाळी सण शेतकऱ्यांना शेतातच काढावा लागणार आहे. 14 नोव्हेंबरला दिवाळी तोंडावर आली असताना दिवाळीपूर्वी भात कापणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे; मात्र मुजरा अभावी प्रत्येक शेतकऱ्याला कुटुंबातील माणूस घेऊनच भातकापणी करावी लागत असल्याने भात कापणीसाठी वेळ लागत आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 3, 2020

कोकणातील शेतकऱ्यांची दिवाळी यंदा शेतातच  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - परतीच्या पावसाने घातलेले धुमशान आणि भात कापणीला झालेला विलंब लक्षात घेता यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच जाणार असल्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात 70 टक्के भात कापणी पूर्ण झाली असून उर्वरित कापणीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे.  गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरक्ष: अश्रू आणले. भात कापणी लायक झाले असताना परतीच्या पावसाने आगमन केले. हा परतीच्या पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे भात कापणी करायची कशी? असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला; मात्र असे असतानाही काही शेतकऱ्यांनी स्वत:चा विचार न करता भात पदरात घेण्यासाठी कापणी केली; मात्र 90 टक्के शेतकऱ्यांनी पाऊस जाण्याची वाट पाहिल्याने आज भात कापणी खोळंबली आहे. गेल्या वर्षीही हीच स्थिती शेतकऱ्यांपुढे होती. गेल्या वर्षीही भात पिकाचे मोठे नुकसान झाले आले होते; मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी भात कापणी करण्यात सावधगिरी बाळगली होती.  गेली काही वर्षाचा विचार करता शेतकरी एकमेकांकडे भात कापणीसाठी जात असतात त्यामुळे भात कापणी आटोक्‍यात येत असे; मात्र गेले दोन-तीन वर्ष परतीच्या पावसाचा खेळखंडोबा पाहता प्रत्यक्ष करायची भात कापणी एकाच वेळी होत असल्याने कोणालाच एकमेकांकडे जाता येत नाही. त्यामुळे भात कापणीचा उत्साह कमी कमी होऊन भात कापणी खोळंबून जाते.  यावर्षी हीच परिस्थिती शेतकऱ्यावर आली असून जिल्ह्यात ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात कापणी शिल्लक राहिली आहे. बऱ्याच ठिकाणी वांयगणी शेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे पावसाळी भात पीक ताब्यात घेऊन वायंगणी शेतीकडे शेतकऱ्यांचा कल असतो; मात्र पावसाळी भात कापणी आटोक्‍यात येत नसल्याने शेतकरी पुरता दमून गेला आहे. वायंगणी शेती ही नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान पेरल्यास चांगले उत्पन्न मिळते. शिवाय बऱ्याच ठिकाणी पाण्याचाही प्रश्‍न असल्यानेही शेती नोव्हेंबर ते डिसेंबरमध्येच केली जाते. त्यामुळे शेतकऱ्याने भात कापणीला जोर दिला आहे.  मजूर नसल्याने चिंता  जिल्ह्यातील 70 टक्के भात कापणी मागे पडली आहे. त्यामुळे यावर्षीचा दिवाळी सण शेतकऱ्यांना शेतातच काढावा लागणार आहे. 14 नोव्हेंबरला दिवाळी तोंडावर आली असताना दिवाळीपूर्वी भात कापणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे; मात्र मुजरा अभावी प्रत्येक शेतकऱ्याला कुटुंबातील माणूस घेऊनच भातकापणी करावी लागत असल्याने भात कापणीसाठी वेळ लागत आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3oWPE4P

No comments:

Post a Comment