सरकारविरोधात रणरागिणी मैदानात  कुडाळ (सिंधुदुर्ग) - राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय ठरले आहे. झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रणरागिनी मैदानात उतरणार आहेत. वेळप्रसंगी दोन थोबाडीत मारण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.  भाजपच्या प्रदेशाध्यक्ष खापरे आज जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज मराठा समाजाच्या सभागृहात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नीलम गोंधळी, अस्मिता जीजकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, संजना सावंत, सावी लोके, शारदा कांबळे, प्रज्ञा ढवण, कुडाळ शहर अध्यक्ष ममता धुरी आदी उपस्थित होते.  खापरे म्हणाल्या, "3 जुलैला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. 1998 पासून हा राजकीय प्रवास सुरू आहे. गेले तीन दिवस कोकण-प्रवास करून आज जिल्हा दौऱ्यावर आले. राज्यातील झोपी गेलेले महाविकास आघाडीचे सरकार, राज्यातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाबाबत कारवाईच्या दृष्टिकोनातून कोणतीच पावले उचलत नाहीत. झोपी गेलेला सरकारला जागे करण्यासाठी आता भाजपच्या रणरागिणी मैदानात उतरणार आहेत. यामध्ये डॉक्‍टर, वकील, पत्रकार, खेळाडू, आशा, स्वयंसेविका, नर्स, झोपडपट्टीतील महिला आदी विविध क्षेत्रातील महिलांना एकत्रित करून राज्यात महिलांचा तालुका, जिल्हा पातळीवर रणरागिनी ग्रुप तयार केला जाणार आहे. महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी या सरकारने दिशा कायदा आणावा, ही मागणी आहे.  ...तरीही सरकार का गप्प?  खापरे म्हणाल्या, शिरूर येथे शौचालयासाठी गेलेल्या भगिनीवर अत्याचार होऊन त्याचे डोळे फोडण्याचा प्रयत्न होतो. सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे. म्हणूनच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राज्यात रणरागिनीचा ग्रुप स्थापन करण्यात येणार आहे. आता महिला रणरागिणी म्हणून मैदानात उतरतील. अन्याय करणाऱ्यांच्या दोन थोबाडीत मारण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत.'' महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सध्या तेरसे यांनी स्वागत केले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 7, 2020

सरकारविरोधात रणरागिणी मैदानात  कुडाळ (सिंधुदुर्ग) - राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय ठरले आहे. झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रणरागिनी मैदानात उतरणार आहेत. वेळप्रसंगी दोन थोबाडीत मारण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.  भाजपच्या प्रदेशाध्यक्ष खापरे आज जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज मराठा समाजाच्या सभागृहात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नीलम गोंधळी, अस्मिता जीजकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, संजना सावंत, सावी लोके, शारदा कांबळे, प्रज्ञा ढवण, कुडाळ शहर अध्यक्ष ममता धुरी आदी उपस्थित होते.  खापरे म्हणाल्या, "3 जुलैला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. 1998 पासून हा राजकीय प्रवास सुरू आहे. गेले तीन दिवस कोकण-प्रवास करून आज जिल्हा दौऱ्यावर आले. राज्यातील झोपी गेलेले महाविकास आघाडीचे सरकार, राज्यातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाबाबत कारवाईच्या दृष्टिकोनातून कोणतीच पावले उचलत नाहीत. झोपी गेलेला सरकारला जागे करण्यासाठी आता भाजपच्या रणरागिणी मैदानात उतरणार आहेत. यामध्ये डॉक्‍टर, वकील, पत्रकार, खेळाडू, आशा, स्वयंसेविका, नर्स, झोपडपट्टीतील महिला आदी विविध क्षेत्रातील महिलांना एकत्रित करून राज्यात महिलांचा तालुका, जिल्हा पातळीवर रणरागिनी ग्रुप तयार केला जाणार आहे. महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी या सरकारने दिशा कायदा आणावा, ही मागणी आहे.  ...तरीही सरकार का गप्प?  खापरे म्हणाल्या, शिरूर येथे शौचालयासाठी गेलेल्या भगिनीवर अत्याचार होऊन त्याचे डोळे फोडण्याचा प्रयत्न होतो. सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे. म्हणूनच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राज्यात रणरागिनीचा ग्रुप स्थापन करण्यात येणार आहे. आता महिला रणरागिणी म्हणून मैदानात उतरतील. अन्याय करणाऱ्यांच्या दोन थोबाडीत मारण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत.'' महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सध्या तेरसे यांनी स्वागत केले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3k9ECFE

No comments:

Post a Comment