जिल्ह्यात गारठा वाढू लागला; पारा 20 अंशावर सांगली : जिल्ह्यात सलग पंधरा दिवस अतिवृष्टी झाल्यानंतर आता थंडीची लाट हळूहळू पसरू लागली आहे. पारा 20 अंशापर्यंत घसरला आहे. सांगली, मिरज या शहरांतील हे तापमान आहे. अतिवृष्टीनंतर जमिनी ओल्या असल्याने ग्रामीण भाग अधिकच गारठला आहे.  एकीकडे दिवाळीची धामधुम सुरु असताना गारठा वाढू लागला आहे. पुढील आठवडाभरात पारा आणखी घसरेल, असा हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 20 अंशापर्यंत खाली आहे. यंदा पश्‍चिम महाराष्ट्रातही थंडीची लाट येईल, असा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यातील थंडी पाहता तो खरा ठरेल, अशीच सर्वत्र चर्चा आहे. सध्या भूजलपातळी वाढली आहे. सगळीकडे पाणीसाठे वाढले आहेत. त्याचाही परिणाम या काळात होणार आहे. ग्रामीण भागात थंडी अधिक जाणवते आहे.  गेल्यावर्षी थंडी अजिबात जाणवली नव्हती. थंडीशी निगडीत बाजारपेठ ठप्प झाली होती. श्‍वेटर, मफलर, कानटोप्या, रजई विकणाऱ्यांना दुकाने गुंडाळावी लागली होती. यंदा मात्र दिवाळीतच त्यांचे चेहरे खुलले आहेत. यंदाची थंडी त्यांचा गल्ला गरम करणार, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. संजू लमाणी म्हणाला, ""थंडी वाढेल तसे ग्राहक येत आहेत. यंदा चांगला व्यवसाय अपेक्षित आहे.''  मुले, ज्येष्ठांची काळजी गरजेची...  थंडी वाढेल तसा दुचाकीवरचा प्रवास त्रासदायक ठरू लागला आहे. सर्दीची साथ यायला लागली आहे. या काळात लहान मुले, ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग आणि महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. कोरोना मुक्तांनी या काळात वाफ घेत रहावे, काढा प्यावा, उबदार कपडे वापरावेत, व्यायाम सुरु ठेवावा, असेही आवाहन केले आहे.   संपादन : प्रफुल्ल सुतार    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 12, 2020

जिल्ह्यात गारठा वाढू लागला; पारा 20 अंशावर सांगली : जिल्ह्यात सलग पंधरा दिवस अतिवृष्टी झाल्यानंतर आता थंडीची लाट हळूहळू पसरू लागली आहे. पारा 20 अंशापर्यंत घसरला आहे. सांगली, मिरज या शहरांतील हे तापमान आहे. अतिवृष्टीनंतर जमिनी ओल्या असल्याने ग्रामीण भाग अधिकच गारठला आहे.  एकीकडे दिवाळीची धामधुम सुरु असताना गारठा वाढू लागला आहे. पुढील आठवडाभरात पारा आणखी घसरेल, असा हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 20 अंशापर्यंत खाली आहे. यंदा पश्‍चिम महाराष्ट्रातही थंडीची लाट येईल, असा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यातील थंडी पाहता तो खरा ठरेल, अशीच सर्वत्र चर्चा आहे. सध्या भूजलपातळी वाढली आहे. सगळीकडे पाणीसाठे वाढले आहेत. त्याचाही परिणाम या काळात होणार आहे. ग्रामीण भागात थंडी अधिक जाणवते आहे.  गेल्यावर्षी थंडी अजिबात जाणवली नव्हती. थंडीशी निगडीत बाजारपेठ ठप्प झाली होती. श्‍वेटर, मफलर, कानटोप्या, रजई विकणाऱ्यांना दुकाने गुंडाळावी लागली होती. यंदा मात्र दिवाळीतच त्यांचे चेहरे खुलले आहेत. यंदाची थंडी त्यांचा गल्ला गरम करणार, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. संजू लमाणी म्हणाला, ""थंडी वाढेल तसे ग्राहक येत आहेत. यंदा चांगला व्यवसाय अपेक्षित आहे.''  मुले, ज्येष्ठांची काळजी गरजेची...  थंडी वाढेल तसा दुचाकीवरचा प्रवास त्रासदायक ठरू लागला आहे. सर्दीची साथ यायला लागली आहे. या काळात लहान मुले, ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग आणि महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. कोरोना मुक्तांनी या काळात वाफ घेत रहावे, काढा प्यावा, उबदार कपडे वापरावेत, व्यायाम सुरु ठेवावा, असेही आवाहन केले आहे.   संपादन : प्रफुल्ल सुतार    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UoN35C

No comments:

Post a Comment