उमरेड नगर परिषदेने अतिक्रमणावर चालविला बुलडोझर  उमरेड (नागपूर) : येथील जुना मोटार स्टँड, इतवारी बाजार पेठ परिसरातील अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण नगर परिषद उमरेडने जेसीबीच्या साहाय्याने हटविले. ही कारवाई शनिवारी सकाळी अकरा वाजतादरम्यान करण्यात आली. यावेळी काही दुकानदारांनी विरोध केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.  शहरातील रस्त्याच्या कडेला तसेच वर्दळीच्या ठिकाणी चौकात बसणारे फळभाजी विक्रेते यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नागरिक भाजीपाला तसेच फळांची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असतात. परिणामी वाहतुकीला अडसर निर्माण होतो. विशेष म्हणजे, जनतेला वेळोवेळी स्वच्छता, फिजिकल डिस्टन्स तसेच मास्क वापरण्याच्या सूचना देऊनसुद्धा निष्काळजीपणाने वावरताना दिसून येत असल्याने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज सकाळी नगर परिषदेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली.  हेही वाचा : शिक्षकदिनीच विनाअनुदानित शिक्षकांनी पाळला काळादिन...या आहेत मागण्या इतवारी बाजार पेठेतील युनियन बँकेच्या शेजारील दुकान मालकांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना येण्या-जण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे त्या ठिकाणी नियमित गर्दी होत असे. शनिवारी जेसीबीच्या साहाय्याने सदर अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच संताजी जगनाडे चौकात मोठ्या प्रमाणात फळभाजी विक्रेते हातगाड्यांची गर्दी करून नियमबाह्य पद्धतीने दुकाने उभी करून गर्दीस कारणीभूत ठरत होते. त्यामुळे त्या सर्वांना मुख्य भाजी मंडीत बसण्याचे आदेश दिले, असेही मुख्याधिकारी भगत यांनी सांगितले. येथील बाजारात फळ व भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने एकत्र आले. या कारवाईचा विरोध करीत फळभाजी विक्रेत्यांनी शनिवारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.  संपादन : मेघराज मेश्राम   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 5, 2020

उमरेड नगर परिषदेने अतिक्रमणावर चालविला बुलडोझर  उमरेड (नागपूर) : येथील जुना मोटार स्टँड, इतवारी बाजार पेठ परिसरातील अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण नगर परिषद उमरेडने जेसीबीच्या साहाय्याने हटविले. ही कारवाई शनिवारी सकाळी अकरा वाजतादरम्यान करण्यात आली. यावेळी काही दुकानदारांनी विरोध केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.  शहरातील रस्त्याच्या कडेला तसेच वर्दळीच्या ठिकाणी चौकात बसणारे फळभाजी विक्रेते यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नागरिक भाजीपाला तसेच फळांची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असतात. परिणामी वाहतुकीला अडसर निर्माण होतो. विशेष म्हणजे, जनतेला वेळोवेळी स्वच्छता, फिजिकल डिस्टन्स तसेच मास्क वापरण्याच्या सूचना देऊनसुद्धा निष्काळजीपणाने वावरताना दिसून येत असल्याने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज सकाळी नगर परिषदेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली.  हेही वाचा : शिक्षकदिनीच विनाअनुदानित शिक्षकांनी पाळला काळादिन...या आहेत मागण्या इतवारी बाजार पेठेतील युनियन बँकेच्या शेजारील दुकान मालकांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना येण्या-जण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे त्या ठिकाणी नियमित गर्दी होत असे. शनिवारी जेसीबीच्या साहाय्याने सदर अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच संताजी जगनाडे चौकात मोठ्या प्रमाणात फळभाजी विक्रेते हातगाड्यांची गर्दी करून नियमबाह्य पद्धतीने दुकाने उभी करून गर्दीस कारणीभूत ठरत होते. त्यामुळे त्या सर्वांना मुख्य भाजी मंडीत बसण्याचे आदेश दिले, असेही मुख्याधिकारी भगत यांनी सांगितले. येथील बाजारात फळ व भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने एकत्र आले. या कारवाईचा विरोध करीत फळभाजी विक्रेत्यांनी शनिवारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.  संपादन : मेघराज मेश्राम   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3lSZYco

No comments:

Post a Comment