एकाच मुलीला दोन वेगवेगऴ्या गुणपत्रिका… वाचा कोणत्या मंडळाने केला घोळ नागपूर  : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या निकाल २९ जुलैला जाहीर करण्यात आला. या निकालात शहरातील एका शाळेतील एका विद्यार्थिनीला दोन वेगवेगळ्या गुणपत्रिका मिळाल्याने शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विशेष म्हणजे या दोन गुणपत्रिकांवरील एकच नाव आणि एकच बैठक क्रमांक असला तरी प्रत्येक विषयासाठी मिळालेले गुण वेगळे असल्याने शाळा प्रशासनही चकीत झाले आहे. या प्रकाराने शिक्षण मंडळाच्या कार्यशैलीवर आता टीका होऊ लागली आहे. कुलगुरू शोध समितीने घेतली या मोठ्या पदावरील व्यक्तीची भेट, अन् विद्यापीठ वर्तुळात रंगली चर्चा... ऐन परीक्षेच्या दिवसातच राज्यात करोनाचा संसर्ग वाढल्याने दहावीचा शेवटचा भुगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. यानंतर तपासणीसाठी बराच दिवस उत्तरपत्रिका परीक्षा केंद्र आणि पोस्ट ऑफिसमध्ये अडकून पडल्या होत्या. त्यामुळे वेळेत निकाल जाहीर करण्याचे शिक्षण मंडळापुढे आव्हान होते. या आव्हानाला पेलत विभागाने विक्रमी वेळेत तपासणी आणि निकाल तयार करण्याचे काम केले. यातून शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल कमी दिवसात देण्याच्या प्रयत्नात मंडळाकडून चक्क गुणपत्रिका तयार करण्यात गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. शहरातील एका विद्यार्थिनीने ऑनलाईन निकाल शोधला. यावेळी बैठक क्रमांकाच्या मदतीने ऑनलाईन निकाल शोधला असता तिला सर्व सहावी विषयांमध्ये ३५ गुण मिळाल्याचे दिसून आले. यामुळे ती चकित झाली. सर्व विषयात सारखेच गुण मिळाले अशक्य आहे. त्यामुळे तीने शाळेत संपर्क केला. त्यानंतर पुन्हा बैठक क्रमांक टाकून गुणपत्रिका पाहण्यात आली असला वेगळी गुणपत्रिका हाती लागली. त्यामुळे शिक्षकही अचंबित झाले. या दोन्ही गुणपत्रिकीमध्ये विद्यार्थिनीचे नाव आणि बैठक क्रमांक सारखा आहे. मात्र, तिला मिळालेले सहाही विषयातील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. विद्यार्थांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेत असा गोंधळ झाल्याने शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका होत आहे.   दहावीच्या गुणपत्रिकेबाबत असा कुठलाही तांत्रिक गोंधळ झाला असल्यास शाळेने आमच्याकडे लेखी अर्ज करावा. त्याची योग्य तपासणी होईल. विद्यार्थांचे कुठलेही नुकसान होणार नाही. रविकांत देशपांडे, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ नागपूर.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 2, 2020

एकाच मुलीला दोन वेगवेगऴ्या गुणपत्रिका… वाचा कोणत्या मंडळाने केला घोळ नागपूर  : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या निकाल २९ जुलैला जाहीर करण्यात आला. या निकालात शहरातील एका शाळेतील एका विद्यार्थिनीला दोन वेगवेगळ्या गुणपत्रिका मिळाल्याने शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विशेष म्हणजे या दोन गुणपत्रिकांवरील एकच नाव आणि एकच बैठक क्रमांक असला तरी प्रत्येक विषयासाठी मिळालेले गुण वेगळे असल्याने शाळा प्रशासनही चकीत झाले आहे. या प्रकाराने शिक्षण मंडळाच्या कार्यशैलीवर आता टीका होऊ लागली आहे. कुलगुरू शोध समितीने घेतली या मोठ्या पदावरील व्यक्तीची भेट, अन् विद्यापीठ वर्तुळात रंगली चर्चा... ऐन परीक्षेच्या दिवसातच राज्यात करोनाचा संसर्ग वाढल्याने दहावीचा शेवटचा भुगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. यानंतर तपासणीसाठी बराच दिवस उत्तरपत्रिका परीक्षा केंद्र आणि पोस्ट ऑफिसमध्ये अडकून पडल्या होत्या. त्यामुळे वेळेत निकाल जाहीर करण्याचे शिक्षण मंडळापुढे आव्हान होते. या आव्हानाला पेलत विभागाने विक्रमी वेळेत तपासणी आणि निकाल तयार करण्याचे काम केले. यातून शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल कमी दिवसात देण्याच्या प्रयत्नात मंडळाकडून चक्क गुणपत्रिका तयार करण्यात गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. शहरातील एका विद्यार्थिनीने ऑनलाईन निकाल शोधला. यावेळी बैठक क्रमांकाच्या मदतीने ऑनलाईन निकाल शोधला असता तिला सर्व सहावी विषयांमध्ये ३५ गुण मिळाल्याचे दिसून आले. यामुळे ती चकित झाली. सर्व विषयात सारखेच गुण मिळाले अशक्य आहे. त्यामुळे तीने शाळेत संपर्क केला. त्यानंतर पुन्हा बैठक क्रमांक टाकून गुणपत्रिका पाहण्यात आली असला वेगळी गुणपत्रिका हाती लागली. त्यामुळे शिक्षकही अचंबित झाले. या दोन्ही गुणपत्रिकीमध्ये विद्यार्थिनीचे नाव आणि बैठक क्रमांक सारखा आहे. मात्र, तिला मिळालेले सहाही विषयातील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. विद्यार्थांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेत असा गोंधळ झाल्याने शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका होत आहे.   दहावीच्या गुणपत्रिकेबाबत असा कुठलाही तांत्रिक गोंधळ झाला असल्यास शाळेने आमच्याकडे लेखी अर्ज करावा. त्याची योग्य तपासणी होईल. विद्यार्थांचे कुठलेही नुकसान होणार नाही. रविकांत देशपांडे, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ नागपूर.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gpFR2l

No comments:

Post a Comment