चिनी नकोच, रक्षाबंधनासाठी तयार केल्या खास या राख्या...  नागपूर : देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतात रक्षाबंधनासाठी मोठ्या प्रमाणात चिनी राख्यांना मागणी असते. परंतु भारत-चीन सीमेवर सुरू असल्याच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिनी वस्तू नकोच असा भारतीयांचा सूर आहे. त्यामुळे चिनी राख्यांना पर्याय म्हणून नागपुरातील अंबिलवादे कुटुंबीयांनी स्वदेशी राख्यांची निर्मिती केली आहे.  या स्वदेशी राख्यांना पुणे, मुंबईसह गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामिनी नीलेश अंबिलवादे यांनी याबाबत माहिती दिली. लॉकडाऊन काळात कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित येऊन शेणापासून राख्या तयार करण्याचे काम सुरू केले. सुरुवातील शेणापासून राख्या कशा तयार होऊ शकतील, हा मोठा प्रश्‍न होता. त्यानंतर शेणाचा बेस देऊन त्यावर कागदी आणि कापडी फुलांची आकर्षक कलाकुसर करून, सुबक स्वदेशी गोमय राख्यांची निर्मिती करण्यात आली. अंबिलवादे कुटुंबाने संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात शेण व गोमुत्रापासून अनेक कलात्मक वस्तूंची निर्मिती केली आहे.  एकेकाला ड्युटीवरून हाकलून देईन; मला समजता काय, अशी धमकी देणारा 'तो' आहे तरी कोण, वाचा...   राख्यांसह बांगड्या आणि जपमाळही  रक्षाबंधनात बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राख्या ही यावर्षीची महत्त्वाची निर्मिती. पंचगव्यापासून निर्मित या राख्यांना यामिनी यांनी कापड व कागदाच्या फुलांनी सजवून अतिशय आकर्षक रूप दिले आहे. त्यांचा मुलगा आदर्श याचाही यात मोठा सहभाग आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासह पर्यावरणाच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे यामिनी यांनी सांगितले. याशिवाय पंचगव्यापासून जपमाळा, बांगड्या, हातांचे कडे, कानातील झुमके, मोतीहार आणि आकर्षक ब्रेसलेटही त्यांनी तयार केल्या आहेत.    आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक  देशी गायीच्या शेणापासून तयार झालेल्या या गोमय राख्यांमध्ये पंचगव्य आणि शेणाचे मिश्रण आहे. त्यावर सर्व नैसर्गिक वस्तूंचा वापर केला आहे. मनुष्याच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम राखी हातावर बांधल्यानंतर होणार आहे. राखी जुणी झाल्यावर तिला फेकून न देता, झाडांच्या मुळाशी टाकली की, ती शेणखताचेही काम करेल. अशाप्रकारे एका राखीचे अनेक उपयोग होतील.    आठ हजार राख्यांची ऑर्डर  लॉकडाऊनमध्ये नवीन काय करावे या विचारातून गोमय राखीची निर्मिती झाली. शेणापासून राखी तयार करताना शेणासह वॉटर कलर, कपड्याचे व कागदांची फुले आणि रेशीम दोरीचा वापर केला आहे. या राख्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 8 हजार राख्यांची ऑर्डर आम्हाला मिळाली आहे. यामिनी अंबिलवादे, नागपूर  संपादन : अतुल मांगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 10, 2020

चिनी नकोच, रक्षाबंधनासाठी तयार केल्या खास या राख्या...  नागपूर : देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतात रक्षाबंधनासाठी मोठ्या प्रमाणात चिनी राख्यांना मागणी असते. परंतु भारत-चीन सीमेवर सुरू असल्याच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिनी वस्तू नकोच असा भारतीयांचा सूर आहे. त्यामुळे चिनी राख्यांना पर्याय म्हणून नागपुरातील अंबिलवादे कुटुंबीयांनी स्वदेशी राख्यांची निर्मिती केली आहे.  या स्वदेशी राख्यांना पुणे, मुंबईसह गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामिनी नीलेश अंबिलवादे यांनी याबाबत माहिती दिली. लॉकडाऊन काळात कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित येऊन शेणापासून राख्या तयार करण्याचे काम सुरू केले. सुरुवातील शेणापासून राख्या कशा तयार होऊ शकतील, हा मोठा प्रश्‍न होता. त्यानंतर शेणाचा बेस देऊन त्यावर कागदी आणि कापडी फुलांची आकर्षक कलाकुसर करून, सुबक स्वदेशी गोमय राख्यांची निर्मिती करण्यात आली. अंबिलवादे कुटुंबाने संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात शेण व गोमुत्रापासून अनेक कलात्मक वस्तूंची निर्मिती केली आहे.  एकेकाला ड्युटीवरून हाकलून देईन; मला समजता काय, अशी धमकी देणारा 'तो' आहे तरी कोण, वाचा...   राख्यांसह बांगड्या आणि जपमाळही  रक्षाबंधनात बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राख्या ही यावर्षीची महत्त्वाची निर्मिती. पंचगव्यापासून निर्मित या राख्यांना यामिनी यांनी कापड व कागदाच्या फुलांनी सजवून अतिशय आकर्षक रूप दिले आहे. त्यांचा मुलगा आदर्श याचाही यात मोठा सहभाग आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासह पर्यावरणाच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे यामिनी यांनी सांगितले. याशिवाय पंचगव्यापासून जपमाळा, बांगड्या, हातांचे कडे, कानातील झुमके, मोतीहार आणि आकर्षक ब्रेसलेटही त्यांनी तयार केल्या आहेत.    आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक  देशी गायीच्या शेणापासून तयार झालेल्या या गोमय राख्यांमध्ये पंचगव्य आणि शेणाचे मिश्रण आहे. त्यावर सर्व नैसर्गिक वस्तूंचा वापर केला आहे. मनुष्याच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम राखी हातावर बांधल्यानंतर होणार आहे. राखी जुणी झाल्यावर तिला फेकून न देता, झाडांच्या मुळाशी टाकली की, ती शेणखताचेही काम करेल. अशाप्रकारे एका राखीचे अनेक उपयोग होतील.    आठ हजार राख्यांची ऑर्डर  लॉकडाऊनमध्ये नवीन काय करावे या विचारातून गोमय राखीची निर्मिती झाली. शेणापासून राखी तयार करताना शेणासह वॉटर कलर, कपड्याचे व कागदांची फुले आणि रेशीम दोरीचा वापर केला आहे. या राख्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 8 हजार राख्यांची ऑर्डर आम्हाला मिळाली आहे. यामिनी अंबिलवादे, नागपूर  संपादन : अतुल मांगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3215B0K

No comments:

Post a Comment