कणकवलीकर पुन्हा संतप्त, काय आहे मागणी? कणकवली (सिंधुदुर्ग) - उड्डाणपूल जोड रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे महामार्ग ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कणकवलीकरांनी केली आहे. त्याबाबतची तक्रार देखील कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, कोसळलेल्या भिंतीची पाहणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.  शहरातील उड्डाणपूल जोड रस्त्याची भिंत काल दुपारी कोसळली होती. त्यानंतर संतप्त कणकवलीकरांनी रास्ता रोको केला. रात्री पोलिस ठाण्यात धाव घेऊन ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची तक्रारही दिली; मात्र प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच ठेकेदारावर गुन्हा दाखल करू, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली. त्यामुळे आज सकाळी कणकवलीकर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेतली. त्यावेळी राजमाने यांनी याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.  राष्ट्रीय महामार्गावर एस. एम. हायस्कूल नजीक जेथे उड्डाणपूल जोड रस्त्याची भिंत कोसळली, तेथे आता 24 तास बंदोबस्त असून या सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. शिवाय जानवली पूल ते पटवर्धन चौक या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. उड्डाणपूल जोड रस्त्याच्या परिसरात कुठलेही वाहन थांबू नये यासाठीही पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.  उड्डाणपूल भिंत तातडीने हटवावी  पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील उड्डाणपूल जोडणाऱ्या भिंतीला सतत तडे जात आहेत. यात भिंतीचा आणखी काही भाग कोसळून अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महामार्ग ठेकेदाराने जानवली नदी पूल ते एस. एम. हायस्कूल पर्यंतची संपूर्ण भिंत तातडीने हटवावी, अशी मागणी "आम्ही कणकवलीकर' संस्थेचे अध्यक्ष अशोक करंबेळकर यांनी केली आहे.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 14, 2020

कणकवलीकर पुन्हा संतप्त, काय आहे मागणी? कणकवली (सिंधुदुर्ग) - उड्डाणपूल जोड रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे महामार्ग ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कणकवलीकरांनी केली आहे. त्याबाबतची तक्रार देखील कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, कोसळलेल्या भिंतीची पाहणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.  शहरातील उड्डाणपूल जोड रस्त्याची भिंत काल दुपारी कोसळली होती. त्यानंतर संतप्त कणकवलीकरांनी रास्ता रोको केला. रात्री पोलिस ठाण्यात धाव घेऊन ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची तक्रारही दिली; मात्र प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच ठेकेदारावर गुन्हा दाखल करू, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली. त्यामुळे आज सकाळी कणकवलीकर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेतली. त्यावेळी राजमाने यांनी याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.  राष्ट्रीय महामार्गावर एस. एम. हायस्कूल नजीक जेथे उड्डाणपूल जोड रस्त्याची भिंत कोसळली, तेथे आता 24 तास बंदोबस्त असून या सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. शिवाय जानवली पूल ते पटवर्धन चौक या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. उड्डाणपूल जोड रस्त्याच्या परिसरात कुठलेही वाहन थांबू नये यासाठीही पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.  उड्डाणपूल भिंत तातडीने हटवावी  पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील उड्डाणपूल जोडणाऱ्या भिंतीला सतत तडे जात आहेत. यात भिंतीचा आणखी काही भाग कोसळून अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महामार्ग ठेकेदाराने जानवली नदी पूल ते एस. एम. हायस्कूल पर्यंतची संपूर्ण भिंत तातडीने हटवावी, अशी मागणी "आम्ही कणकवलीकर' संस्थेचे अध्यक्ष अशोक करंबेळकर यांनी केली आहे.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gUSEtm

No comments:

Post a Comment