अरे देवा काय ही वेळ ; आई पॉझिटिव्ह , वडीलांना अर्धांगवायू , दोन मुले क्वारंटाइन ,कोरोनाच्या भयाने शेजारीही लांब ... रत्नागिरी : कोरोनाने भल्याभल्यांना जेरीस आणले. रत्नागिरीतील एक घटना मनाला वेदना देणारी आहे. तशी त्या कुटुंबाची परिस्थिती उत्तमच. मात्र, आईला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आणि कुटुंबच पुरते ढासळून गेले. आईमुळे तिघांपैकी दोन मुलांना रुग्णालयात क्वारंटाईन केले. वडील अर्धांगवायूमुळे जागेवरच असल्याने त्यांच्या सेवेसाठी एका मुलाला घरी ठेवले. परंतु, त्यांची परिस्थिती मन हेलावणारी आहे. कोणी जवळ येत नाही, विचारत नाही. लोक शेजारधर्म निभावत आहेत. मात्र, कठड्यावर ठेवलेले जेवणाचे पान एखाद्या याचकाप्रमाणे घेऊन जाण्याची वेळ कोरोनाने त्या कुटुंबावर आणली.  रत्नागिरी शहराच्या खालच्या भागात हे कुटुंब राहते. तिन्ही मुले शिकलेली-सवरलेली आणि चांगल्या नोकरीलाही आहेत. मात्र, आई-वडिलांची परिस्थिती वाईट आहे. वडिलांना अर्धांगवायू झाल्याने ते जागेवरच पडून असतात. आईलाही अनेक शारीरिक त्रास होत आहेत. मुले रत्नागिरीत आली, मात्र या दरम्यान आईला मूळव्याधीचा त्रास अधिक जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांचा स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या तिन्ही मुलांना आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन रुग्णालयात क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला.  हेही वाचा- याच्यामुळेच रत्नागिरीचे आले आरोग्य धोक्यात : कोण केला आरोप.... वाचा कोरोनाच्या भयाने शेजारीही लांब  सर्व मुलांना आरोग्य विभाग घेऊन जात होते. परंतु, घरात अर्धांगवायूमुळे जागेवर असलेल्या वडिलांची सेवा कोण करणार? असा प्रश्‍न होता. अखेर एका मुलाला घरी ठेवण्यात आले. या मुलांच्या प्रवासाचा मुंबई इतिहास असल्याचे सांगितले जाते. परंतु, त्याची परिस्थिती त्यापेक्षाही वाईट झाली आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने त्या कुटुंबाच्या जवळ जाण्याचे किंवा सहानुभूती दाखविण्याचे धाडस कोण करण्यास तयार नाही. हेही वाचा- कोरोनाला हरवायचं ,आपण जिंकायचं म्हणत मनावर दगड ठेवत कर्तव्यकठोरतेचे  येथे केले जाते पालन... रत्नागिरीकरांमध्ये अजून माणुसकी आहे. त्यांचे जेवणाचे हाल होऊ नये, यासाठी अनेकांनी शेजारधर्म पाळत त्यांना सकाळी, सायंकाळी जेवण देण्यास सुरवात केली. परंतु ती ताट-वाटी परत घेण्यास कोणी धजावत नाही. अखेर शेजाऱ्यांनी पत्रावळ्यावर त्याला जेवण देण्यास सुरवात केली. जेवण घेऊन जाणार कोण, मग ते भरलेले पान घराच्या कठड्यावर ठेवायचे आणि त्या व्यक्तीने ते घेऊन आपल्या पोटाची खळगी भरायची, अशी वाईट आणि मनाला वेदना देणारी वेळ एका चांगल्या कुटुंबावर या कोरोनाने आणली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 15, 2020

अरे देवा काय ही वेळ ; आई पॉझिटिव्ह , वडीलांना अर्धांगवायू , दोन मुले क्वारंटाइन ,कोरोनाच्या भयाने शेजारीही लांब ... रत्नागिरी : कोरोनाने भल्याभल्यांना जेरीस आणले. रत्नागिरीतील एक घटना मनाला वेदना देणारी आहे. तशी त्या कुटुंबाची परिस्थिती उत्तमच. मात्र, आईला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आणि कुटुंबच पुरते ढासळून गेले. आईमुळे तिघांपैकी दोन मुलांना रुग्णालयात क्वारंटाईन केले. वडील अर्धांगवायूमुळे जागेवरच असल्याने त्यांच्या सेवेसाठी एका मुलाला घरी ठेवले. परंतु, त्यांची परिस्थिती मन हेलावणारी आहे. कोणी जवळ येत नाही, विचारत नाही. लोक शेजारधर्म निभावत आहेत. मात्र, कठड्यावर ठेवलेले जेवणाचे पान एखाद्या याचकाप्रमाणे घेऊन जाण्याची वेळ कोरोनाने त्या कुटुंबावर आणली.  रत्नागिरी शहराच्या खालच्या भागात हे कुटुंब राहते. तिन्ही मुले शिकलेली-सवरलेली आणि चांगल्या नोकरीलाही आहेत. मात्र, आई-वडिलांची परिस्थिती वाईट आहे. वडिलांना अर्धांगवायू झाल्याने ते जागेवरच पडून असतात. आईलाही अनेक शारीरिक त्रास होत आहेत. मुले रत्नागिरीत आली, मात्र या दरम्यान आईला मूळव्याधीचा त्रास अधिक जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांचा स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या तिन्ही मुलांना आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन रुग्णालयात क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला.  हेही वाचा- याच्यामुळेच रत्नागिरीचे आले आरोग्य धोक्यात : कोण केला आरोप.... वाचा कोरोनाच्या भयाने शेजारीही लांब  सर्व मुलांना आरोग्य विभाग घेऊन जात होते. परंतु, घरात अर्धांगवायूमुळे जागेवर असलेल्या वडिलांची सेवा कोण करणार? असा प्रश्‍न होता. अखेर एका मुलाला घरी ठेवण्यात आले. या मुलांच्या प्रवासाचा मुंबई इतिहास असल्याचे सांगितले जाते. परंतु, त्याची परिस्थिती त्यापेक्षाही वाईट झाली आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने त्या कुटुंबाच्या जवळ जाण्याचे किंवा सहानुभूती दाखविण्याचे धाडस कोण करण्यास तयार नाही. हेही वाचा- कोरोनाला हरवायचं ,आपण जिंकायचं म्हणत मनावर दगड ठेवत कर्तव्यकठोरतेचे  येथे केले जाते पालन... रत्नागिरीकरांमध्ये अजून माणुसकी आहे. त्यांचे जेवणाचे हाल होऊ नये, यासाठी अनेकांनी शेजारधर्म पाळत त्यांना सकाळी, सायंकाळी जेवण देण्यास सुरवात केली. परंतु ती ताट-वाटी परत घेण्यास कोणी धजावत नाही. अखेर शेजाऱ्यांनी पत्रावळ्यावर त्याला जेवण देण्यास सुरवात केली. जेवण घेऊन जाणार कोण, मग ते भरलेले पान घराच्या कठड्यावर ठेवायचे आणि त्या व्यक्तीने ते घेऊन आपल्या पोटाची खळगी भरायची, अशी वाईट आणि मनाला वेदना देणारी वेळ एका चांगल्या कुटुंबावर या कोरोनाने आणली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2yQBvkt

No comments:

Post a Comment