‘शॉर्टेज’चे कारण सांगून व्यापाऱ्यांकडून लूट कळंब (जि. उस्मानाबाद) : देशावर कोरोनाचे संकट आले असून, सर्व प्रशासकीय यंत्रणा जिवाची पर्वा न करता संकटाशी दोन हात करीत आहेत. उस्मानाबाद ग्रीन झोनमध्ये असल्याने टाळेबंदीत शिथिलता मिळाल्याने शेतकरी, सर्वसामान्य पावसाळी कामे पूर्ण करून घेत आहेत. पशुधनाला पक्का निवारा करण्यासाठी पन्हाळी पत्रे, बांबू आदी साहित्य खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र कोरोनाच्या संकटकाळात पत्र्याचे ‘शॉर्टेज’ असल्याचे कारण सांगून शहरातील व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा प्रकार समोर येत आहे. एरवी पाचशे ते सहाशे रुपयांना मिळणारा पत्रा एक हजार ४०० रुपयेप्रमाणे विक्री करून सर्वसामान्यांची व्यापाऱ्यांकडून सर्रास लूट सुरू आहे.  हेही वाचा - ‘साहेब, तुमच्या पाया पडतो; पण एक वेळ सोडा हो...’ टाळेबंदीला ४६ दिवस पूर्ण झाले आहेत. देशावरील कोरोनाचे महासंकट टाळण्यासाठी तिसऱ्या टप्प्यात टाळेबंदी करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची ग्रीन झोनमध्ये नोंद झाल्यामुळे टाळेबंदीमधून सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व प्रकारच्या आस्थापना सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत उघड्या ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय बेकरी व्यावसायिकांना सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सुधारित नियम घालून देण्यात आले आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत शहरातील एकही आस्थापना उघडी राहण्याचा प्रश्‍नच येत नाही. बहुतांश शेतकरी पशुधन, शेतमाल साठवणूक करण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत पत्र्याचे शेड उभे करतात. काही शेतकरी उसाचे पाचट जमा करून गोठा बांधतात. पशुधनासाठी पक्का निवारा असावा म्हणून अनेक शेतकरी नियोजन करतात. सोमवारी (ता. ११) शहरातील मार्केटमध्ये उन्हाळी पत्रे, सागवानी बांबू, लोखंडी पाइप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. शहरात १० ते १५ व्यापारी पत्रे, लोखंडी पाइप, बांबू विक्रीचा व्यवसाय करतात. यात किरकोळ व्यापाऱ्यांसह ठोक व्यापाऱ्यांचा समावेश आहे. वाहनचालकांवर गाडा ढकलण्याची वेळ, टाळेबंदीमुळे भाजीपाला विक्रीचा पर्याय टाळेबंदीच्या पूर्वी पाचशे ते सहाशे रुपयांना उन्हाळी पत्रा मिळत होता. तो पत्रा आता एक हजार ४०० रुपयांना मिळू लागल्याने दर वाढण्याचे नेमके काय कारण, असे शेतकरी व्यापाऱ्यांना सवाल करीत आहेत. शॉर्टेज असून, उत्पादन होत नसल्याने साहित्य मिळत नाही. वशिला लावून हे तरी साहित्य आपल्या बाजारात उपलब्ध होते. दुसरीकडे जाऊन बघा, साहित्यच मिळत नाही, असे व्यापारी शेतकऱ्यांना सांगून कोरोनाच्या महासंकटाची संधी साधून सर्वसामान्यांची व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 11, 2020

‘शॉर्टेज’चे कारण सांगून व्यापाऱ्यांकडून लूट कळंब (जि. उस्मानाबाद) : देशावर कोरोनाचे संकट आले असून, सर्व प्रशासकीय यंत्रणा जिवाची पर्वा न करता संकटाशी दोन हात करीत आहेत. उस्मानाबाद ग्रीन झोनमध्ये असल्याने टाळेबंदीत शिथिलता मिळाल्याने शेतकरी, सर्वसामान्य पावसाळी कामे पूर्ण करून घेत आहेत. पशुधनाला पक्का निवारा करण्यासाठी पन्हाळी पत्रे, बांबू आदी साहित्य खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र कोरोनाच्या संकटकाळात पत्र्याचे ‘शॉर्टेज’ असल्याचे कारण सांगून शहरातील व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा प्रकार समोर येत आहे. एरवी पाचशे ते सहाशे रुपयांना मिळणारा पत्रा एक हजार ४०० रुपयेप्रमाणे विक्री करून सर्वसामान्यांची व्यापाऱ्यांकडून सर्रास लूट सुरू आहे.  हेही वाचा - ‘साहेब, तुमच्या पाया पडतो; पण एक वेळ सोडा हो...’ टाळेबंदीला ४६ दिवस पूर्ण झाले आहेत. देशावरील कोरोनाचे महासंकट टाळण्यासाठी तिसऱ्या टप्प्यात टाळेबंदी करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची ग्रीन झोनमध्ये नोंद झाल्यामुळे टाळेबंदीमधून सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व प्रकारच्या आस्थापना सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत उघड्या ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय बेकरी व्यावसायिकांना सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सुधारित नियम घालून देण्यात आले आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत शहरातील एकही आस्थापना उघडी राहण्याचा प्रश्‍नच येत नाही. बहुतांश शेतकरी पशुधन, शेतमाल साठवणूक करण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत पत्र्याचे शेड उभे करतात. काही शेतकरी उसाचे पाचट जमा करून गोठा बांधतात. पशुधनासाठी पक्का निवारा असावा म्हणून अनेक शेतकरी नियोजन करतात. सोमवारी (ता. ११) शहरातील मार्केटमध्ये उन्हाळी पत्रे, सागवानी बांबू, लोखंडी पाइप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. शहरात १० ते १५ व्यापारी पत्रे, लोखंडी पाइप, बांबू विक्रीचा व्यवसाय करतात. यात किरकोळ व्यापाऱ्यांसह ठोक व्यापाऱ्यांचा समावेश आहे. वाहनचालकांवर गाडा ढकलण्याची वेळ, टाळेबंदीमुळे भाजीपाला विक्रीचा पर्याय टाळेबंदीच्या पूर्वी पाचशे ते सहाशे रुपयांना उन्हाळी पत्रा मिळत होता. तो पत्रा आता एक हजार ४०० रुपयांना मिळू लागल्याने दर वाढण्याचे नेमके काय कारण, असे शेतकरी व्यापाऱ्यांना सवाल करीत आहेत. शॉर्टेज असून, उत्पादन होत नसल्याने साहित्य मिळत नाही. वशिला लावून हे तरी साहित्य आपल्या बाजारात उपलब्ध होते. दुसरीकडे जाऊन बघा, साहित्यच मिळत नाही, असे व्यापारी शेतकऱ्यांना सांगून कोरोनाच्या महासंकटाची संधी साधून सर्वसामान्यांची व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35YfxIo

No comments:

Post a Comment