CoronaVirus : खबरदार विनाकारण फिराल तर... आता दंडुक्यासह गुन्हेही  औरंगाबाद, : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. असे असतानाही विविध कारणे सांगत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या जवळपास पन्नास नागरिकांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराच्या बाहेर पडू नये, आवश्यक असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत गरज असेल तरच बाहेर पडावे. जीवनाश्यक सर्व वस्तूंची दुकाने सुरू आहेत.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा फिरणाऱ्यांची संख्या वाढली  त्यामुळे गर्दी न करता खरेच गरज असेल तरच बाहर पडावे असे सांगण्यात येत असल्याने संधीचा फायदा घेत काहीजण विविध कारणे दाखवत विनाकारण बाहेर फिरत आहेत. रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसभर घरांमध्ये बसून कंटाळा आलेले नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. त्यासाठी खोटे बहाणे सांगत आहेत.  मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा पन्नास जणांच्या विरोधात गुन्‍हे अशा विनाकारण फिरणाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर कारण खोटे आहे, असे लक्षात येताच पोलिस चांगलाच प्रसाद देत आहेत. आता मात्र नागरिकांना फटके देण्याबरोबरच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. शहरातील क्रांती चौक, मुकुंदवाडी, सिडको, उस्मानपुरा, एमआयडीसी वाळूज, वाळूज अशा जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शनिवारी (ता.२८) शहरातील विविध पोलिस ठाण्यांत जवळपास ५० विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा तेरा दुकानदार, दोन रिक्षाचालकांवर गुन्हे  संचारबंदीच्या या काळात जिवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मात्र सूट दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाननेही उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र काही असताना किराणा दुकान किंवा दूध डेरी अशा दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंसह विविध वस्तूंची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. छावणी येथे उमंग एम्पोरियम दुकान संचारबंदीच्या काळात उघडे ठेवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच प्रमाणे छावणीत राणी नॉव्हेल्टी, माणसी स्टेशनरी स्टोअर्स आणि गिफ्ट शॉप अशा तीन दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय मिटमिटा येथील नवनाथ मुळे यांच्या दूध डेअरी वरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी येथील दत्तकृपा ट्रेडर्स या दुकानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.एकुण तेरा दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 29, 2020

CoronaVirus : खबरदार विनाकारण फिराल तर... आता दंडुक्यासह गुन्हेही  औरंगाबाद, : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. असे असतानाही विविध कारणे सांगत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या जवळपास पन्नास नागरिकांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराच्या बाहेर पडू नये, आवश्यक असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत गरज असेल तरच बाहेर पडावे. जीवनाश्यक सर्व वस्तूंची दुकाने सुरू आहेत.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा फिरणाऱ्यांची संख्या वाढली  त्यामुळे गर्दी न करता खरेच गरज असेल तरच बाहर पडावे असे सांगण्यात येत असल्याने संधीचा फायदा घेत काहीजण विविध कारणे दाखवत विनाकारण बाहेर फिरत आहेत. रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसभर घरांमध्ये बसून कंटाळा आलेले नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. त्यासाठी खोटे बहाणे सांगत आहेत.  मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा पन्नास जणांच्या विरोधात गुन्‍हे अशा विनाकारण फिरणाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर कारण खोटे आहे, असे लक्षात येताच पोलिस चांगलाच प्रसाद देत आहेत. आता मात्र नागरिकांना फटके देण्याबरोबरच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. शहरातील क्रांती चौक, मुकुंदवाडी, सिडको, उस्मानपुरा, एमआयडीसी वाळूज, वाळूज अशा जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शनिवारी (ता.२८) शहरातील विविध पोलिस ठाण्यांत जवळपास ५० विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा तेरा दुकानदार, दोन रिक्षाचालकांवर गुन्हे  संचारबंदीच्या या काळात जिवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मात्र सूट दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाननेही उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र काही असताना किराणा दुकान किंवा दूध डेरी अशा दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंसह विविध वस्तूंची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. छावणी येथे उमंग एम्पोरियम दुकान संचारबंदीच्या काळात उघडे ठेवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच प्रमाणे छावणीत राणी नॉव्हेल्टी, माणसी स्टेशनरी स्टोअर्स आणि गिफ्ट शॉप अशा तीन दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय मिटमिटा येथील नवनाथ मुळे यांच्या दूध डेअरी वरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी येथील दत्तकृपा ट्रेडर्स या दुकानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.एकुण तेरा दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2QUAGwG

No comments:

Post a Comment