सिंधुदुर्गातील तीन गावांना वादळाचा तडाखा वैभववाडी (सिंधुदुर्ग) - भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण आणि हेत या तीन गावांना आज पहाटे चक्रीवादळाने तडाखा दिला. यात तिन्ही ठिकाणी मोठी पडझड झाली. जिल्ह्याच्या इतर भागांत मात्र आज पावसाचा जोर ओसरला. गेले दोन दिवस सिंधुदुर्गावर निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव होता. आज मात्र पावसाचा जोर कमी होता. भुईबावडा परिसराला चक्रीवादळाने फटका दिला. यात तिरवडेतील 2 तर भुईबावड्यातील एका घराचे नुकसान झाले आहे. हेत केंद्रशाळेच्या छपराचे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला असून काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भुईबावडा पहिलीवाडी येथील दीपक सीताराम पांचाळ यांच्या घराच्या छपराची कौले वादळात उडून गेली. त्यामुळे साखर झोपेत असलेल्या पांचाळ कुटुंबाला धडकी भरली. सुदैवाने कोणालाही ईजा झाली नाही; मात्र पांचाळ यांचे 13 हजार 625 रुपयांचे नुकसान झाले. तिरवडे तर्फ खारेपटण येथील श्रीधर तुकाराम कलमष्टे याच्या घराच्या छप्पराचे सर्व पत्र वादळात उडून गेले. त्यामुळे कलमष्टे यांचे 30 हजार रुपयांचे, तर रघुनाथ शंकर पवार यांच्या घराच्या छपराचे 3 हजार रुपये नुकसान झाले. या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे. हेत केंद्रशाळेच्या छपराचे पत्रे आणि कौले फुटली आहेत, तर वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागाचा वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता. चक्रीवादळामुळे हेत गावातील काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 24 तासांत तालुक्यात 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. "निसर्ग'च्या तडाख्याची आकडेमोड सुरू ओरोस - निसर्ग चक्रीवादळ जिल्ह्यात थेट धडकले नसले तरी त्याचा फटका मात्र जिल्ह्याला बसला आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करायला सुरवात केली असून, जिल्ह्यातील 29 घरांना फटका बसला आहे. यात लाखो रुपयांची वित्तहानी झाली असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. काही ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळ आता शमले आहे; मात्र यामुळे झालेल्या नुकसानीचे वास्तव पुढे येऊ लागले आहे. याचा फटका जिल्ह्यातील 29 घरांना बसला आहे. यात सावंतवाडी तालुक्यात 4 घरांवर झाडे पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे. यात तळवणे गावात 3 तर डांबरे गावात 1 घरांचा समावेश आहे. वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड आणि वजराट गावात प्रत्येकी एका घरांचा समावेश आहे. यात 19 हजार रुपयांची नुकसानी झाली आहे. कुडाळ तालुक्यात घोडगे आणि हुमरस गावातील प्रत्येकी एका घरावर झाड पडून घरांचे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील 10 घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. यात कांदळगाव 3, मालवण 2, मळा, आचरा, चिंदर, तळगाव, आमडोस या गावातील प्रत्येकी एका घरावर झाड पडले आहे. यात 1 लाख 17 हजार 750 रुपयांचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यातील 3 घरांचे झाड पडून नुकसान झाले आहे. यात देवगड, तांबळडेग, पोयरे गावातील घरांचा समावेश आहे. कणकवली तालुक्यातील 6 घरांचे नुकसान झाले असून, लिंगेश्वरनगर, राजनगर, खारेपाटण, करुळ, कळसुली, डामरे गावाचा समावेश आहे. वैभववाडी तालुक्यात वैभववाडी 2 आणि ऐनारी गावातील घरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वायरी येथे विद्युत खांबांवर झाड पडून पोलांचे 44 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हानी वाढणार जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळात फटका बसून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे; मात्र प्रत्यक्षात नुकसानी झालेल्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम ग्रामस्तरावर सुरु असून हा नुकसानचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/374jxr2 Read More Read more No comments:
मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास विकास देशमुख औरंगाबाद : यंदा मॉन्सून वेळेवर म्हणजेच १ जूनला केरळमध्ये आला. आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासात सध्यातरी कुठलाच अडथळा आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही यंदा मॉन्सून वेळेवर येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. दरम्यान, मॉन्सूनचा हा प्रवास कसा असतो, तो येतो कुठून आणि तो कोणत्या भागात कधी पोचतो, याची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी. मॉन्सून म्हणजे काय? भारतीय उपखंडात जो पाऊस पडतो त्याला ‘मॉन्सून’ म्हणतात. मॉन्सून हा ‘माऊस्म’ या अरबी शब्दाचा अपभ्रंश आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, विशिष्ट मोसमात भारताच्या नैऋत्य दिशेकडून येऊन भारताला धडकणाऱ्या आणि सोबत भरपूर पाणी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. इंग्रजीमध्ये मोसमला मॉन्सून म्हणत असल्याने या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मॉन्सूनचा पाऊस हे नाव आहे, असेही म्हटले जाते. भारतात हा पाऊस दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पडतो. असा पडतो पाऊस मॉन्सूनचा उगम जमीन-सागराच्या तापमान विसंगतीमुळे होतो, हे पहिल्यांदा एडमंड हॅले यांनी सांगितले होते. त्यानंतर या सिद्धांतात अनेक सूचना व नवी माहिती सामावली गेली. पण, मॉन्सून उत्पत्तीबद्दल फक्त एकच सिद्धांत अस्तित्वात आहे असे नाही, तर इतरही अनेक मतमतांतरे वैज्ञानिक जगतात आढळतात. एका वैकल्पिक सिद्धांतानुसार मॉन्सूनचा जन्म कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या संगमाच्या पट्ट्यामुळे निर्माण होतो. याला ‘इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन’ असेही म्हणतात. मॉन्सून म्हणजे दुसरेतिसरे काही नसून समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस आहे. जमिनीचे तापमान आणि समुद्राचे तापमान यावर या वाऱ्यांचा प्रवास ठरतो. पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे. वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात मॉन्सून वारे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहत असतात व सुसाट वेगाने वाहत येणारे हे वारे समुद्रावरील बाष्पाचे तयार झालेले ढग पुढे दाबत असतात. याचवेळी सुरवातीस कधी कधी वारे ताशी ५०० किमी वेगाने वाहतात. सूर्याच्या मिळणाऱ्या प्रखर प्रकाशाने या भागात तापमान वाढते आणि हवेचा दाब कमी होतो. यावरच मॉन्सूनची गती अवलंबून असते. नैऋत्य वाऱ्यांच्या ढगांचा मोठा समूह अंदमानपर्यंत २५ मेदरम्यान वाहक बनून आणतात. त्यावेळी मॉन्सून अंदमानात दाखल झाल्याचे सांगण्यात येते. पुढे हा प्रवास नैऋत्य दिशेने सुरू होतो व मॉन्सून वारे केरळमध्ये पोचतात. तिथे मोठ्या ढगांचा समूह जमतो. त्यानंतर वारे पश्चिम किनारपट्टीवर प्रवेश करून पाऊस सुरू होतो. महाराष्ट्रात कोणत्या भागात कधी येणार? हवामान खात्याने दिलेल्या नवीन तारखेनुसार राज्यात मॉन्सून पोचण्याची सर्वसाधारण तारीख आता ८ जून आहे. या तारखेला गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे मॉन्सून पोचेल. त्यानंतर सहा दिवसांमध्ये म्हणजे १४ जूनपर्यंत मॉन्सून पूर्ण राज्य व्यापून पुढचा प्रवास करण्याची सरासरी तारीख निश्चित केली आहे. यावर्षी कर्नाटकात मॉन्सून कशाप्रकारे वाटचाल करतो, याचा अंदाज घेऊन राज्यात मॉन्सून कधी पोचेल, याची निश्चित माहिती देता येईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, सध्या त्याचा प्रवास पाहता तो मुंबईमध्ये ११ जून, नागपूरमध्ये १६ जून, पुण्यात १० जून, तर औरंगाबादमध्ये १३ जूनच्या आसपास पोचेल पण या मॉन्सूनच्या सध्याच्या प्रवासात अडथळा आला तर या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2UaeikH Read More Read more No comments:
अरे देवा...! पहिल्याच पावसात `हा` डोक्याला ताप ओरोस (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत पावसाच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने अत्यावश्यक उपाययोजना न केल्याने कसाल शहरात सर्व्हिस व पर्यायी रस्ते चिखलमय झाले आहेत. काल (ता.3) कसाल स्टॅण्ड समोरील ब्रीजजवळ सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून रस्ता चिखलमय बनला होता. याचा नाहक त्रास वाहन चालक व नागरिकांना सहन करावा लागला. यामुळे पहिल्या पावसात चौपदरीकरण अंतर्गत कामांचे तीन-तेरा वाजले तर पुढे पावसाळ्यात काय होणार असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे. कसाल शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे; मात्र गेली दोन वर्ष चौपदरीकरण अंतर्गत पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाही यावर्षी पावसाळ्याआधी ठेकेदार कंपनी प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पहिल्याच पावसात या वर्षी चौपदरीकरण कामाला फटका बसला आहे. वेळीच उपाय योजा अन्यथा... कसाल स्टॅण्ड समोरील ब्रीज खाली रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून येथे दुचाकी घसरण्याच्या घटना घडत आहेत. काल (ता.3) येथे सेवा रस्त्यावर ब्रीजखाली पाणीच पाणी झाले. हा रस्ता पाण्याखाली गेला, चिखलमय झाला. येथील सेवा रस्त्यावरील गटार रस्ते काम अर्धवट स्थितीत आहेत. दरम्यान, पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पद्धतीची व्यवस्था न केल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शिवाय वेळीच उपाययोजना न केल्यास हा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/30bIBvc Read More Read more No comments:
शिरशिंगे गोठवेवाडीवासीयांबाबत खासदार राऊत म्हणाले... सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शिरशिंगे गोठवेवाडीवासियांसोबत शिवसेना ठामपणे आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक असल्यास अजुन निधी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी त्यांना दिली. तेथील चाळीस घराच्या स्वेच्छा पुनर्वसनाचा अहवाल तयार करुन तो शासनाकडे सादर करा, अशा सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गतवर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील शिंरशिंगे गोठवेवाडी येथील डोंगर खचून डोंगराखालील 40 घरांना धोका निर्माण झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या भागाला भेट देत तेथील ग्रामस्थांना धीर देत असलेल्या डोंगराच्या खालून संरक्षण भिंत बांधण्याची ग्वाही दिली होती. शिवाय याबाबत तत्काळ निधीही उपलब्ध करून दिला होता. खासदार राऊत यांनी या संरक्षण भिंतीची व इतर अन्य शासकीय कामांची नुकतीच पाहणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शब्बीर मणियार, अशोक दळवी, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, सागर नाणोसकर, शिरशिंगे सरपंच रेखा घावरे, माजी सरपंच सुरेश शिर्के आदी उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी डोंगराचा धोका कायम असून संरक्षण भिंतीची उंची वाढवणे गरजेचे आहे, असे सांगितले तसेच पुनर्वसनाबाबत पुन्हा एकदा मागणी उपस्थित केली. आराखड्यासाठी सूचना ग्रामस्थांचे मागणी लक्षात घेता खासदार राऊत म्हणाले, ""शिवसेना नेहमी गोठवेवाडी ग्रामस्थांसोबत असून लोकांची मागणी लक्षात घेता संरक्षण भिंतीच्या वाढीव कामासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. या कामाचा तत्काळ आराखडा सादर करा. चाळीस घराच्या पुनर्वसनाबाबत त्या लोकांच्या स्वेच्छा पुर्नवसनाचा अहवाल शासनाला सादर करा.'' यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2UbBjDL Read More Read more No comments:
राज्य पतसंस्था नियामक मंडळाला उच्च न्यायालयाची नोटीस नागपूर : बिगर कृषी सहकारी पतसंस्थांकडून स्टॅबिलायझेशन ऍण्ड लिक्विडिटी फंडाकरिता मागण्यात आलेल्या अंशदानप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या सहकार विभागाचे प्रधान सचिव व महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ यांना नोटीस बजावली. तसेच यावर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. याबाबत विदर्भ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशनने नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यामध्ये स्टॅबिलायझेशन ऍण्ड लिक्विडिटी फंड निर्माण करण्याची व त्याकरिता बिगर कृषी सहकारी पतसंस्थांकडून अंशदान घेण्याची तरतूद आहे. अंशदान किती व केव्हा घ्यायचे हे ठरविण्याचा अधिकार नियामक मंडळाला देण्यात आला आहे. तसेच, फंड निर्मिती व अंशदानासंदर्भात अधिकृत राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. मात्र, नियामक मंडळाने या अत्यावश्यक तरतुदीकडे दुर्लक्ष करून 17 फेब्रुवारी रोजी अंशदानाचा वादग्रस्त आदेश जारी केला. त्याद्वारे बिगर कृषी सहकारी पतसंस्थांकडून गेल्यावर्षी 31 मार्चपर्यंत स्वीकारलेल्या एकूण ठेवींच्या 0.05 टक्के अंशदान मागितले. या आदेशामुळे पतसंस्थांना अंशदानापोटी मोठी रक्कम मंडळाकडे जमा करावी लागणार आहे. त्याचा पतसंस्थावर आर्थिक ताण पडेल. तसेच, नियामक मंडळाने राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करून अंशदानाचा वादग्रस्त आदेश जारी केला आहे. आदेश जारी करताना कायदेशीर तरतुदीचे पालन करण्यात आले नाही. हेही वाचा : लालपरी झाली कणखर, मालासह घेतेय धाव त्यामुळे, हा वादग्रस्त आदेश अवैध ठरवून रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2Y5m403 Read More Read more No comments:
खासगी हॉस्पिटलकडून बिलासाठी तगादा; कोरोनावर उपचार घेतलेले रुग्ण चिंतेत पुणे - कोरोना रुग्णांवर मोफत उपचाराची घोषणा केलेल्या महापालिकेवरच खासगी हॉस्पिटल अविश्वास दाखवत असून, उपचारानंतर पैसे न घेता घरी सोडलेल्या रुग्णांकडून पैसे वसूल करण्याची तयारी या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने केली आहे. "पुढच्या 45 दिवसांत महापालिकेने बिलाचे पैसे न दिल्यास ते तुम्हाला द्यावे लागणार असे हॉस्पिटलकडून रुग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना चिंतेने घेरले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य सरकार आणि महापालिकेच्या योजनांमधून या हॉस्पिटलची बिले देण्यात येणार असून ती 90 दिवसांत देण्याची बाब करारात आहे, असे महापालिका प्रशासाचे म्हणणे आहे. तर योजनांची अंमलबजावणी करताना महापालिका रक्कम थकवत असल्याचे खासगी हॉस्पिटलकडून सांगण्यात येत आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा महापालिकेच्या हॉस्पिटलची क्षमता संपल्याने कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी खासगी हॉस्पिटलशी करार करण्यात आला आहे. त्याठिकाणी रुग्णांवर उपचार केले जातील, असे महापालिकेने जाहीर केले. राज्य सरकारच्या महात्मा फुले योजना आणि शहरी गरीब योजनेतून उपचाराची बिले देण्याबाबचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार रुग्णांवर उपचार करण्याच्या सूचना हॉस्पिटल व्यवस्थापनाला केल्या आहेत. तरीही सुरवातील सरसकट रुग्णांकडून उपचाराची बिले घेतली. त्याचा गाजावाजा झाल्यानंतर या हॉस्पिटलनी रुग्णांकडून पैसे घेणे थांबविले आहे. त्यानंतर मात्र, एवढ्या प्रमाणात बिलांची रक्कम महापालिकेकडून वेळेत मिळण्याची शक्यता कमी असल्याने ती थेट रुग्णांकडूनच वसूल करण्यासाठी हॉस्पिटलनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क करण्यास सुरवात केली आहे. गरीब आणि गरजूंवर मोफत उपचार करण्यात येतील. या रुग्णांना त्या-त्या हॉस्पिटलमधील जनरल वॉर्डमध्ये उपचार घ्यावे लागतील. अशा रुग्णांची बिले महापालिका आणि राज्य सरकार देणार आहे. तरीही, स्वतंत्र खोली घेतलेल्या रुग्णांना मात्र, स्वत: बिलाची रक्कम भरावी लागेल, असे महापालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे सध्या जनरल वॉर्डमध्ये दाखल असलेल्यांवर मोफत उपचार होत आहेत. रुग्णांवरील उपचारासाठी केलेल्या करारानुसार संबंधित हॉस्पिटलला 90 दिवसांत बिलांची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे आता रुग्णांकडे बिल मागण्याचा प्रश्न येत नाही. हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना केल्या जातील, ज्यामुळे रुग्णांकडे बिले घेतली जाणार नाहीत. डॉ. रामचंद्र हंकारे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका कोरोना रुग्णांवर उपचारासाठी करार केलेली खासगी हॉस्पिटल - 15 या हॉस्पिटलमधील खाटांची क्षमता - 1 हजार 700 सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - 585 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2XwRQEo Read More Read more No comments:
आरोग्यसेविकेवर अतिरिक्त वेतन घेतल्याचा ठपका नागपूर : आरोग्यसेविकेला गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त वेतन दिले जात असल्याचा ठपका ठेवत 6 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्याचा आदेश प्रशासनाने काढला. या आदेशाविरोधात आरोग्यसेविकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली असून न्यायालयाने आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. चित्रा गजानन देशपांडे (मालेगाव. जि. वाशीम) असे आरोग्य सेविकेचे नाव आहे. त्यांनी वादग्रस्त वसुलीविरुद्ध नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, आरोग्यसेविकेची नियुक्ती 2 सप्टेंबर 1986 रोजीची असून त्या सध्या जऊळका (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. त्यांना 1 जुलै 2013 ते 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत अतिरिक्त वेतन देण्यात आले, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे, 13 मार्च 2020 रोजी वादग्रस्त आदेश जारी करून देशपांडे यांच्यावर 6 लाख 11 हजार 121 रुपयांची वसुली काढण्यात आली आहे. हा आदेश अवैध असल्याचा दावा याचिकाकर्तीने केला आहे. आदेश जारी करण्यापूर्वी नोटीस पाठवून बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. ही वसुली कोणत्या आधारावर काढण्यात आली आणि अतिरिक्त वेतन कसे व का देण्यात आले या बाबी आदेशात स्पष्ट करण्यात आल्या नाहीत. हेही वाचा : वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांकडून अशा पद्धतीने वसुली करता येत नाही, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. त्यांनी वादग्रस्त आदेश रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने राज्याच्या नगरविकास विभागाचे सचिव, वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशीम जिल्हा आरोग्य अधिकारी व जऊळका (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना नोटीस बजावून याचिकेवर 30 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्तीतर्फे ऍड. नरेंद्र ठोंबरे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3cxmMsb Read More Read more No comments:
या तारखेपासून सुरू होईल जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली जिल्हा व तहसील न्यायालयाने सोमवार (ता. 8)पासून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय राज्याचे मुख्य न्यायमूर्तींनी घेतला आहे. उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल एस. बी. अग्रवाल यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार काही नियम व अटींच्या अधीन राहून न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. यामुळे, वकील व पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे अध्यक्ष सुभाष घाटके व त्यांच्या सदस्यांनी मुख्य न्यायमूर्ती यांना जिल्हा व सत्र न्यायालये सुरू करण्याची मागणी केली होती. ती आता मान्य करण्यात आली आहे. अ श्रेणीत असणारी न्यायालये सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत कामकाज करतील. या न्यायालयांत केवळ 15 टक्केच कर्मचाऱ्यांना कामकाजाकरिता बोलविण्याची परवानगी राहील. या न्यायालयांमध्ये लॉकडाउनच्या आधी दाखल करण्यात आलेले सगळ्या प्रकाराचे जामीन अर्ज, आणि यापूर्वी तारखा निश्चित केलेल्या प्रकरणांवर सुनावणी होईल. याशिवाय ज्या प्रकरणांमध्ये साक्षीदारांची गरज नाही अशा निकाल अथवा आदेशाकरिता निश्चित केलेल्या प्रकरणांवर सुनावणी होईल. तसेच अपील, रिव्हिजन ऍप्लिकेशन, निकाल अथवा आदेशाकरिता निश्चित केलेल्या प्रकरणांवर सुनावणी होईल. हेही वाचा : लालपरी झाली कणखर, मालासह घेतेय धाव यावेळी न्यायालयात दररोज निर्धारित प्रकरणांवरच सुनावणी होईल. तसेच ही न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज करतील, वकिलांनीही त्याच सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ब श्रेणीतील न्यायालयांचे कामकाजदेखील दोन सत्रामध्ये होईल. मात्र, त्या न्यायालयांमध्ये किमान 50 टक्के कर्मचारी कामकाजासाठी बोलावण्याची सूट देण्यात आली आहे. या न्यायालयांमध्ये पहिल्या आठवड्यात 15 पेक्षा अधिक प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. या न्यायालयांमध्ये वकिलांना प्रत्यक्ष हजर राहून कामकाज करता येईल. परंतु, कोरोनाबाधित आढळल्यास न्यायालयीन प्रत्यक्ष कामकाज बंद करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. दोन श्रेणीत विभागणी राज्यातील जिल्हा न्यायालयांची कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आधारे अ आणि ब अशा दोन श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत मुंबई महानगरपालिका व उपनगरे, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती व नागपूर या महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा व सत्र न्यायालयांचा समावेश आहे. तर, ब श्रेणीत राज्यातील इतर सगळी जिल्हा व तहसील न्यायालयांचा समावेश करण्यात आला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2BAiLql Read More Read more No comments:
वेतनासाठी घ्यावे लागणार नऊ हजार कोटींचे कर्ज;महाराष्ट्र सरकार लागोपाठ दुसऱ्या महिन्यात अडचणीत मुंबई - कोरोना संकटामुळे राज्य सरकारने विकासकामांवरील खर्चात तब्बल ६७ टक्के कपात घोषित केली असली तरी, वेतन आणि निवृत्तीवेतन देण्यासाठी किमान नऊ हजार कोटींचे कर्ज उचलायची वेळ आली आहे. राज्याचे वेतनदेयक १२ हजार कोटींच्या आसपास असताना मे महिन्यात जेमतेम साडेपाच हजार कोटी करापोटी तिजोरीत जमा झाल्याने आता कर्ज उचलण्याशिवाय पर्याय नाही, असे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या महिन्यातही नऊ हजार कोटी वेतन तसेच कोरोनाखर्चासाठी उचलेले गेले होते. सध्या पोलिस आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी वगळता बहुतांश कर्मचारी सक्रीय नसल्याने त्यांना खासगी क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांप्रमाणे काही महिने कमी वेतन देण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा बड्या मंत्र्याने समोर आणल्याचेही समजते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्रात आजमितीस अंदाजे १७ लाख कर्मचारी तर, ७ लाख निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचे देयक हा यापूवीर्ही चिंतेचा विषय ठरला होता. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा तसेच मदत पुनर्वसन विभाग वगळता अन्य सर्व खात्यांना खर्चास बंदी घालण्यात आली आहे. तरीही सध्या अडचणी वाढत चालल्या आहेत. ‘डीपीडीसी’ खर्चातील २५ टक्के रक्कम कोरोना मदतकार्यात वापरण्याची परवानगी दिली असली तरी, प्रत्यक्षात जेमतेम १० टक्के निधी राज्याच्या तिजोरीतून दिला जातो आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा जिल्ह्यात प्रवासी मजुरांच्या छावण्याही स्वयंसेवी संस्थांना मदतीला घेऊन चालवा असे तोंडी आदेश होते. जीएसटी वसुली, परतावा, विक्रीकर, स्टॅम्प ड्युटी अशा सर्व आघाड्यांवर मे महिन्याची वसुली अत्यल्प होती. जूनमध्येही आवकीत फार वाढ होण्याची शक्यता नाही. केंद्र सरकारची आवक कमी असल्याने तिकडून तरी काय मिळणार? आडात नाही तर पोहाऱ्यात कसे येणार असा प्रश्न केला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पाणीपुरवठा या खात्यांना गेली काही वर्षे मोठा निधी मिळाला. मात्र यावेळी ते शक्य नाही. पॅकेज शक्य नाही ‘‘वेतन देयकातील मार्चमध्ये झालेली कपात गणपतीच्या सुमारास दुसऱ्या टप्प्यात भरून देण्याचा शब्द सरकारने आम्हाला दिला आहे. महाराष्ट्रातले आघाडी सरकार अडचणीतून मार्ग काढेल,’’ असा विश्वास अधिकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केला. प्रबळ आणि संघटीत कर्मचाऱ्यांसमोर काही महिन्यांसाठी वेतन कपातीचा प्रश्न ठेवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला असून राज्याचा आर्थिक डोलारा सावरणे मोठे आव्हान झाले आहे. या परिस्थितीत पॅकेज देणे अशक्यप्राय विषय असल्याचे सनदी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळवून टाकले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2ACfGFQ Read More Read more No comments:
या तारखेपासून सुरू होईल जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली जिल्हा व तहसील न्यायालयाने सोमवार (ता. 8)पासून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय राज्याचे मुख्य न्यायमूर्तींनी घेतला आहे. उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल एस. बी. अग्रवाल यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार काही नियम व अटींच्या अधीन राहून न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. यामुळे, वकील व पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे अध्यक्ष सुभाष घाटके व त्यांच्या सदस्यांनी मुख्य न्यायमूर्ती यांना जिल्हा व सत्र न्यायालये सुरू करण्याची मागणी केली होती. ती आता मान्य करण्यात आली आहे. अ श्रेणीत असणारी न्यायालये सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत कामकाज करतील. या न्यायालयांत केवळ 15 टक्केच कर्मचाऱ्यांना कामकाजाकरिता बोलविण्याची परवानगी राहील. या न्यायालयांमध्ये लॉकडाउनच्या आधी दाखल करण्यात आलेले सगळ्या प्रकाराचे जामीन अर्ज, आणि यापूर्वी तारखा निश्चित केलेल्या प्रकरणांवर सुनावणी होईल. याशिवाय ज्या प्रकरणांमध्ये साक्षीदारांची गरज नाही अशा निकाल अथवा आदेशाकरिता निश्चित केलेल्या प्रकरणांवर सुनावणी होईल. तसेच अपील, रिव्हिजन ऍप्लिकेशन, निकाल अथवा आदेशाकरिता निश्चित केलेल्या प्रकरणांवर सुनावणी होईल. हेही वाचा : लालपरी झाली कणखर, मालासह घेतेय धाव यावेळी न्यायालयात दररोज निर्धारित प्रकरणांवरच सुनावणी होईल. तसेच ही न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज करतील, वकिलांनीही त्याच सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ब श्रेणीतील न्यायालयांचे कामकाजदेखील दोन सत्रामध्ये होईल. मात्र, त्या न्यायालयांमध्ये किमान 50 टक्के कर्मचारी कामकाजासाठी बोलावण्याची सूट देण्यात आली आहे. या न्यायालयांमध्ये पहिल्या आठवड्यात 15 पेक्षा अधिक प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. या न्यायालयांमध्ये वकिलांना प्रत्यक्ष हजर राहून कामकाज करता येईल. परंतु, कोरोनाबाधित आढळल्यास न्यायालयीन प्रत्यक्ष कामकाज बंद करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. दोन श्रेणीत विभागणी राज्यातील जिल्हा न्यायालयांची कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आधारे अ आणि ब अशा दोन श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत मुंबई महानगरपालिका व उपनगरे, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती व नागपूर या महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा व सत्र न्यायालयांचा समावेश आहे. तर, ब श्रेणीत राज्यातील इतर सगळी जिल्हा व तहसील न्यायालयांचा समावेश करण्यात आला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3eP3TCK Read More Read more No comments:
उपराजधानीत हत्याकांडांची मालिका; कायदा व सुवस्थेचा उपस्थित झाला प्रश्न नागपूर : लॉकडाउनच्या काळात चोवीस तास चार जणांच्या खुनामुळे शहर हादरले आहे. यशोधरानगर, प्रतापनगर आणि हुडकेश्वर परिसरात तिघांचा तर गणेशपेठमधील एम्प्रेस मॉलजवळील झाडाझुडपातही हात आणि पाय कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या सर्व घटना पाहता उपराजधानीतील कायदा व सुवस्था बिघडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कुऱ्हाडीने घातला घाव हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळगीनगर परिसरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. वैभव मूर्ती (30, रा. भोलेबाबानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना चैतन्य होमिओपॅथी फार्मसीजवळ गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता घडली. दोन तरुणांनी दुचाकीने पाठलाग करून हा खून केला असून ऋतिक ऊर्फ मांजी (रा. आशीर्वादनगर) आणि किटाणू अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी कुख्यात गुंड असून त्यांचा शोध सुरू आहे. वैभव हा राजीव गांधी योजनांचे लोकांचे फॉर्म भरून पैसे कमवत होता. हात-पाय कापले एम्प्रेस मॉल परिसरातील पाठीमागे झुडपात एक कुजलेला मृतदेह गुरुवारी सापडला. मृतदेह 30 ते 35 वयोगटातील युवकाचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पण, त्याचा खून करून मृतदेह विदर्भ अपार्टमेंटच्या पाठीमागे असलेल्या एम्प्रेस मॉलच्या खुल्या जागेतील झुडपात फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाचा एक हात आणि पाय कापला असल्याचे आढळून आले. त्यावरून निर्घृणपणे खून केल्याचा संशय निर्माण झाला आहे. बहिणीच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने हल्ला बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी धमकी देऊनही ऐकत नसलेल्या बहिणीच्या प्रियकराचा भावाने लोखंडी रॉडने हल्ला करून खून केला. ही थरारक घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता गोपालनगरात घडली. कार्तिक सारवे (वय 24, रा. गोपालनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक सारवे हा नोकरीच्या शोधासाठी नागपुरात आला होता. त्याने गोपालनगरात भाड्याने खोली भाड्याने घेतली होती. टीव्ही केबल वितरणाच्या कामात हेमंत झोडापे यांच्या कार्यालयात कार्तिक हा वसुली आणि तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळी 11 वाजता नेहमीप्रमाणे त्याने झोडापे यांचे कार्यालय उघडले. त्यानंतर दुपारी तो आयटी पार्कजवळ असलेल्या झोडापे यांच्या कार्यालयात गेला होता. तेथून तो आपल्या (एमएच-31, ईडब्ल्यू-0374) क्रमांकाच्या दुचाकीने परत येत होता. त्यावेळी गोपालनगरातील श्री गिफ्ट ऍण्ड टॉय दुकानाजवळून येत असताना दोन दुचाकीस्वार विक्रम आणि रामू पाठलाग करीत असताना त्याला दिसले. त्यामुळे कार्तिकने दुचाकी जोरात पळवायला सुरुवात केली. मात्र, काही अंतरावरच पाठीमागून दुचाकीने आलेल्या आरोपी विक्रमने कार्तिकच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. कार्तिक जमिनीवर कोसळला. त्यानंतर दुचाकीवरून उतरून दोन्ही आरोपींनी कार्तिकच्या डोक्यावर रॉडने सपासप वार करून जागीच ठार केले. कार्तिकला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर दोन्ही मारेकरी दुचाकीने पळून गेले. घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे, सहायक आयुक्त केशव शेंगळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह रुग्णालयात पाठवून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेमासाठी वाट्टेल ते... कार्तिक याचे जयताळा येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. प्रेमाची कुणकुण तरुणीच्या भावापर्यंत पोहचली. त्यामुळे विषय वाढविण्यापेक्षा कार्तिकची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. विक्रमने कार्तिकची भेट घेतली. त्याला बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी धमकी दिली. मात्र, त्याने "प्रेमासाठी वाट्टेल ते...' असे म्हणून विक्रमला फटकारले होते. हेही वाचा : वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू हत्याकांड सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद कार्तिक हा दुचाकीने जात असताना विक्रम आणि त्याचा मित्र रामू दुचाकीने पाठलाग करीत होते. कार्तिकच्या डोक्यावर रॉड मारून खाली पाडल्यानंतर खून करण्यात आला. हा सर्व प्रकार रस्त्यावरील आणि काही दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून विक्रमसोबत असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 04, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2XAblvI Read More Read more No comments:
झारखंड के जमशेदपुर और कर्नाटक के हम्पी में भूकंप के झटके, तीव्रता 4.7 और 4 https://ift.tt/2Y5LWJt Latest news updates June 04, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
दिल्ली में मरीजों का आंकड़ा 25 हजार के पार, 10 रेल कोच को बनाया गया कोरोना वार्ड https://ift.tt/3ePBpZC Latest news updates June 04, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments: