Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 31, 2020

जानें- दिल्ली-नोएडा- गाजियाबाद जाने के लिए आज से मिलेंगी क्या छूट? https://ift.tt/2MgDCAX
Horoscope Today, 1 june: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2XJ4COW
जब असिस्टेंट डायरेक्टर ने रणबीर को कहा लव यू, एक्टर ने यूं दिया जवाब https://ift.tt/2TZ2VvA
उद्धव ठाकरे म्हणतात 'शालेय शिक्षण सुरू करा', शिक्षक म्हणतात 'कसं?'
रिटर्न ऑन कॅपिटल उत्तम परतावा मिळण्याचा मूळ मंत्र

गुंतवणुकीवर दीर्घकालीन उत्तम परतावा (रिटर्न) मिळावा अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते. यामुळे ज्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहोत, ती कंपनी करत असलेल्या व्यवसायात किती "रिटर्न' मिळवत आहे हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी गुंतवणूक गुरु चार्ली मुंगर म्हणतात, जर एखादी कंपनी स्वतः च्या व्यवसायमधून गुंतविलेल्या भांडवलावर 40 वर्षात दर वर्षी जर केवळ 6 टक्केच परतावा मिळवत असेल तर, त्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी 40 वर्ष गुंतवणूक करून देखील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा दर वर्षी 6 टक्केच असणे अपेक्षित आहे 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

थोडक्यात, दिर्घकाळामध्ये शेअरचा परतावा कंपनीच्या भांडवलावर मिळणाऱ्या परताव्याप्रमाणे वाटचाल करतो. एखादा व्यवसाय उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत असेल तर त्या व्यवसायात अनेक व्यावसायिक उतरू लागतात. ज्यामुळे स्पर्धा निर्माण होते आणि पर्यायाने "प्राईस वॉर' म्हणेजच एकमेकांपेक्षा उत्पादनाची किंवा देत असलेल्या सेवांची किंमत कमी होण्याकडे कल होऊ लागतो. ज्यामुळे त्या व्यवसायात पूर्वीसारखा मिळणारा परतावा किंवा "रिटर्न ऑन कॅपिटल' कमी होऊ लागते. स्पर्धेच्या युगात ज्या कंपन्या मागील 7 वर्ष म्हणजेच जास्तकाळ  सातत्याने उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत आहेत, म्हणजेच त्या कंपन्या स्पर्धकांना मात देत आहेत किंवा त्या कंपन्यांकडे स्पर्धकांपेक्षा काहीतरी वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे ते व्यवसायामधील मिळणारे "रिटर्न' तसेच एकाधिकार टिकवून आहेत तसेच मिळणाऱ्या "रिटर्न'मधून जर कंपन्या पुन्हा स्वतः च्या व्यवसायात पैसा गुंतवणूक करत असतील तर, चक्रवाढ पद्धतीने व्यवसायाची वृद्धी होते. पर्यायाने त्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक उत्तम "रिटर्न' देते. ब्रिटिश फंड मॅनेजर टेरी स्मिथ ज्यांची  "इंग्लिश' वॉरेन बफे म्हणून  स्तुती केली जाते ते देखील याच प्रकारचे वक्तव्य करतात.ॉ

गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

भारतीय शेअर बाजारात ब्रिटानिया इंडस्ट्रीज, नेस्ले, मॅरिको,एशियन पेन्ट्स ,पिडिलाईट इत्यादी अनेक कंपन्या अशा प्रकारचे उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' दर्शवतात. आजपर्यंत दिर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यावर या कंपन्यांच्या शेअरने चांगला परतावा दिला आहे. सामान्यपणे महाग "व्हॅल्युएशन'ला वाटणाऱ्या या कंपन्यांचे शेअरने त्यांच्या व्यवसायतील स्पर्धात्मक गुणवत्तेमुळे महाग "व्हॅल्युएश'ला टिकाव धरून  दीर्घकाळ म्हणजेच 5 ते 10 वर्षाच्या काळात चढ-उतार दर्शवून देखील खूप चांगला परतावा दिला आहे. सामान्य गुतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना अशा प्रकारे उत्तम  "रिटर्न ऑन कॅपिटल' दिलेल्या तसेच भांडवलात स्पर्धात्मक गुणवत्तेच्या बळावर व्यवसाय वृद्धी करत असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्याटप्याने गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळविणे अपेक्षित आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील आठवड्यात सेन्सेक्स 32,424 अंशांवर तर निफ्टी 9580 अंशांवर बंद झाला. पुढील कालावधीसाठी निफ्टीची 8800 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. "शॉर्ट टर्म ट्रेडिंग'च्या दृष्टीने विचार करता औषध कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारा "फार्मा इंडेक्स' जोपर्यंत 8,999 पातळीच्या वर आहे तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहे. "शॉर्ट टर्म'च्या आलेखानुसार, निफ्टी 9800 ते 8800 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार करत आहे. मात्र "फार्मा इंडेक्स'ने मागील 7 आठवडे 9,753 ते 8,999 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार दर्शविल्यानंतर मागील सप्ताह अखेर 9,768 पातळीला बंद भाव देऊन मर्यादित पातळ्यांमध्येच फिरणाऱ्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडून "शॉर्ट टर्म'साठी तेजीचे संकेत दिले आहेत. फार्मा इंडेक्समधील सिप्ला, अरबिंदो फार्मा या कंपन्यांचे शेअरने देखील मर्यादित पातळ्यांमधेच फिरणाऱ्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत देत तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे मर्यादित धोका स्वीकारून 609 या पातळीचा "स्टॉप लॉस' ठेऊन सिप्ला कंपनीच्या शेअरमध्येमध्ये "शॉर्ट टर्म'साठी खरेदी करणे योग्य ठरू शकेल. अशा प्रकारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना प्रामुख्याने  "फंडामेंटल' विश्लेषण आणि अल्पावधीसाठी ट्रेडिंग करताना प्रामुख्याने "टेक्निकल' विश्लेषण करून ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करणे हितावह ठरू शकेल.

सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रिटर्न ऑन कॅपिटल उत्तम परतावा मिळण्याचा मूळ मंत्र गुंतवणुकीवर दीर्घकालीन उत्तम परतावा (रिटर्न) मिळावा अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते. यामुळे ज्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहोत, ती कंपनी करत असलेल्या व्यवसायात किती "रिटर्न' मिळवत आहे हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी गुंतवणूक गुरु चार्ली मुंगर म्हणतात, जर एखादी कंपनी स्वतः च्या व्यवसायमधून गुंतविलेल्या भांडवलावर 40 वर्षात दर वर्षी जर केवळ 6 टक्केच परतावा मिळवत असेल तर, त्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी 40 वर्ष गुंतवणूक करून देखील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा दर वर्षी 6 टक्केच असणे अपेक्षित आहे  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  थोडक्यात, दिर्घकाळामध्ये शेअरचा परतावा कंपनीच्या भांडवलावर मिळणाऱ्या परताव्याप्रमाणे वाटचाल करतो. एखादा व्यवसाय उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत असेल तर त्या व्यवसायात अनेक व्यावसायिक उतरू लागतात. ज्यामुळे स्पर्धा निर्माण होते आणि पर्यायाने "प्राईस वॉर' म्हणेजच एकमेकांपेक्षा उत्पादनाची किंवा देत असलेल्या सेवांची किंमत कमी होण्याकडे कल होऊ लागतो. ज्यामुळे त्या व्यवसायात पूर्वीसारखा मिळणारा परतावा किंवा "रिटर्न ऑन कॅपिटल' कमी होऊ लागते. स्पर्धेच्या युगात ज्या कंपन्या मागील 7 वर्ष म्हणजेच जास्तकाळ  सातत्याने उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत आहेत, म्हणजेच त्या कंपन्या स्पर्धकांना मात देत आहेत किंवा त्या कंपन्यांकडे स्पर्धकांपेक्षा काहीतरी वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे ते व्यवसायामधील मिळणारे "रिटर्न' तसेच एकाधिकार टिकवून आहेत तसेच मिळणाऱ्या "रिटर्न'मधून जर कंपन्या पुन्हा स्वतः च्या व्यवसायात पैसा गुंतवणूक करत असतील तर, चक्रवाढ पद्धतीने व्यवसायाची वृद्धी होते. पर्यायाने त्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक उत्तम "रिटर्न' देते. ब्रिटिश फंड मॅनेजर टेरी स्मिथ ज्यांची  "इंग्लिश' वॉरेन बफे म्हणून  स्तुती केली जाते ते देखील याच प्रकारचे वक्तव्य करतात.ॉ गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल... भारतीय शेअर बाजारात ब्रिटानिया इंडस्ट्रीज, नेस्ले, मॅरिको,एशियन पेन्ट्स ,पिडिलाईट इत्यादी अनेक कंपन्या अशा प्रकारचे उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' दर्शवतात. आजपर्यंत दिर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यावर या कंपन्यांच्या शेअरने चांगला परतावा दिला आहे. सामान्यपणे महाग "व्हॅल्युएशन'ला वाटणाऱ्या या कंपन्यांचे शेअरने त्यांच्या व्यवसायतील स्पर्धात्मक गुणवत्तेमुळे महाग "व्हॅल्युएश'ला टिकाव धरून  दीर्घकाळ म्हणजेच 5 ते 10 वर्षाच्या काळात चढ-उतार दर्शवून देखील खूप चांगला परतावा दिला आहे. सामान्य गुतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना अशा प्रकारे उत्तम  "रिटर्न ऑन कॅपिटल' दिलेल्या तसेच भांडवलात स्पर्धात्मक गुणवत्तेच्या बळावर व्यवसाय वृद्धी करत असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्याटप्याने गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळविणे अपेक्षित आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा मागील आठवड्यात सेन्सेक्स 32,424 अंशांवर तर निफ्टी 9580 अंशांवर बंद झाला. पुढील कालावधीसाठी निफ्टीची 8800 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. "शॉर्ट टर्म ट्रेडिंग'च्या दृष्टीने विचार करता औषध कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारा "फार्मा इंडेक्स' जोपर्यंत 8,999 पातळीच्या वर आहे तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहे. "शॉर्ट टर्म'च्या आलेखानुसार, निफ्टी 9800 ते 8800 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार करत आहे. मात्र "फार्मा इंडेक्स'ने मागील 7 आठवडे 9,753 ते 8,999 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार दर्शविल्यानंतर मागील सप्ताह अखेर 9,768 पातळीला बंद भाव देऊन मर्यादित पातळ्यांमध्येच फिरणाऱ्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडून "शॉर्ट टर्म'साठी तेजीचे संकेत दिले आहेत. फार्मा इंडेक्समधील सिप्ला, अरबिंदो फार्मा या कंपन्यांचे शेअरने देखील मर्यादित पातळ्यांमधेच फिरणाऱ्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत देत तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे मर्यादित धोका स्वीकारून 609 या पातळीचा "स्टॉप लॉस' ठेऊन सिप्ला कंपनीच्या शेअरमध्येमध्ये "शॉर्ट टर्म'साठी खरेदी करणे योग्य ठरू शकेल. अशा प्रकारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना प्रामुख्याने  "फंडामेंटल' विश्लेषण आणि अल्पावधीसाठी ट्रेडिंग करताना प्रामुख्याने "टेक्निकल' विश्लेषण करून ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करणे हितावह ठरू शकेल. सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TZlEY9
Read More
पिंपरीतील महिलांना सुंदर दिसण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार; कारण...

पिंपरी : महिलांचे सौंदर्य खुलविणाऱ्या ब्युटी पार्लर व्यवसायावर आता मंदीचे सावट आले आहे. ग्राहकांसोबत सोशल डिस्टन्सिंग पाळून नेमका पार्लरचा व्यवसाय कसा करावा? या पेचात महिला ब्युटी पार्लर व्यावसायिक सापडल्या आहेत. शहरात बऱ्याच महिलांचा ब्युटी पार्लर घरगुती व्यवसाय असल्याने कुटुंबीयांची काळजी त्यांना भेडसावत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील आठवड्यात सलून व ब्युटी पार्लर व्यवसायास परवानगी दिली आहे. शहरात शेकडो ब्युटी पार्लर आहेत. बऱ्याच महिला पार्लर चालक अद्यापही ऑर्डर स्वीकारत नाहीत. एखादे लग्न किंवा घरगुती सोहळा असल्यास अत्यावश्‍यक ऑर्डरच घेतल्या जात आहेत. बऱ्याच महिला चालकांचे दोन ते तीन महिन्यांचे भाडे थकलेले आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर सुरू न झाल्यास व्यवसायाला खीळ बसण्याची भीती त्यांना सतावत आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पार्लरमधील वापरण्यात येणारी इलेक्‍ट्रीक साधने दोन महिन्यांपासून वापरात नसल्याने बिघाड होण्याची दाट शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे ब्युटी पार्लर चालक महिलांनी पार्लरसाठी लागेल इतके विविध प्रकारचे क्रीम्स प्रॉडक्‍ट्‌स व साहित्य वर्षभर पुरेल इतके साठून ठेवले आहे. त्यातही मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे त्याचे पैसेही अडकून पडले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 लग्नसराईचा ऐन मोक्‍याचा हंगाम निघून गेला आहे. सणवार, इव्हेंट या मेकअप ऑर्डर हुकल्या आहेत. घराबाहेर न पडणाऱ्या महिलांनी अद्याप पार्लरमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

"पार्लरमध्ये आलेले नेमके कोणत्या परिसरातून व कसे येतात, हे पडताळून पाहणे कठीण आहे. घरगुती पार्लर असलेल्या चालकांनी बारकाईने काळजी घेऊनही संकट ओढवू शकते.''

- तनुजा राणे, ब्युटी पार्लर चालक, कासारवाडी

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरीतील महिलांना सुंदर दिसण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार; कारण... पिंपरी : महिलांचे सौंदर्य खुलविणाऱ्या ब्युटी पार्लर व्यवसायावर आता मंदीचे सावट आले आहे. ग्राहकांसोबत सोशल डिस्टन्सिंग पाळून नेमका पार्लरचा व्यवसाय कसा करावा? या पेचात महिला ब्युटी पार्लर व्यावसायिक सापडल्या आहेत. शहरात बऱ्याच महिलांचा ब्युटी पार्लर घरगुती व्यवसाय असल्याने कुटुंबीयांची काळजी त्यांना भेडसावत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील आठवड्यात सलून व ब्युटी पार्लर व्यवसायास परवानगी दिली आहे. शहरात शेकडो ब्युटी पार्लर आहेत. बऱ्याच महिला पार्लर चालक अद्यापही ऑर्डर स्वीकारत नाहीत. एखादे लग्न किंवा घरगुती सोहळा असल्यास अत्यावश्‍यक ऑर्डरच घेतल्या जात आहेत. बऱ्याच महिला चालकांचे दोन ते तीन महिन्यांचे भाडे थकलेले आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर सुरू न झाल्यास व्यवसायाला खीळ बसण्याची भीती त्यांना सतावत आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पार्लरमधील वापरण्यात येणारी इलेक्‍ट्रीक साधने दोन महिन्यांपासून वापरात नसल्याने बिघाड होण्याची दाट शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे ब्युटी पार्लर चालक महिलांनी पार्लरसाठी लागेल इतके विविध प्रकारचे क्रीम्स प्रॉडक्‍ट्‌स व साहित्य वर्षभर पुरेल इतके साठून ठेवले आहे. त्यातही मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे त्याचे पैसेही अडकून पडले आहेत. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   लग्नसराईचा ऐन मोक्‍याचा हंगाम निघून गेला आहे. सणवार, इव्हेंट या मेकअप ऑर्डर हुकल्या आहेत. घराबाहेर न पडणाऱ्या महिलांनी अद्याप पार्लरमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. "पार्लरमध्ये आलेले नेमके कोणत्या परिसरातून व कसे येतात, हे पडताळून पाहणे कठीण आहे. घरगुती पार्लर असलेल्या चालकांनी बारकाईने काळजी घेऊनही संकट ओढवू शकते.'' - तनुजा राणे, ब्युटी पार्लर चालक, कासारवाडी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2AtlhxS
Read More
पोलिसांची व्यथा : आधी उन्हाचे चटके, आता पाऊस झोडपणार!

औरंगाबाद - सामान्यवेळी एखादा दरोडा पडला, दंगल झाली तर तिथे बंदोबस्तावर गेल्यास जखम झाली तर रुग्णालयात जाऊ, उपचार घेऊ अन् बरेही होऊ. तिथे घर सुरक्षित राहते. पण, कोरोनासाठीच्या बंदोबस्तात आम्ही धोक्यात असतो आणि आमचे कुटुंबीयही धोक्यात आहेत, अशा भावना पोलिसांच्या आहेत. पण, त्या ते व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आता रोटेशन पद्धतीने बंदोबस्त देण्याची गरज आहे. 

राज्यातील कोरोनाचे संकट पाहता वैद्यकीय आणि पोलिस सेवा अत्यंत व्यस्त आहे. पोलिसांवरील ताण मोठा आहे. पोलिस दलात कोरोना विषाणूचा शिरकाव, लागण आणि मृत्यू ही गंभीर स्थिती आहे. अशा काळात जीव धोक्यात घालून पोलिस ताणतणाव, रोष व हल्ले झेलून काम करीत आहेत. एकीकडे कर्तव्य, दुसरीकडे कुटुंब, मानसिक तणाव यात अनेक पोलिस अडकले आहेत. मनाची घालमेलही होत आहे. २३ मार्चपासून पोलिस बांधव रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे पोलिस जीव धोक्यात घालून रस्त्यावर उन्हाचे चटके सहन करीत आहेत.

तीन महिने वैशाख वणवा सोसल्यानंतर या विचित्र परिस्थितीत अनेक पोलिस कोरोनाचे शिकार झाले. राज्यात चोवीस तासांत ९१ पोलिसांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. आतापर्यंत २ हजार ४१६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. २६ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढला असल्याने पोलिसांना या काळातही रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे राहावे लागणार आहे. आता काही दिवसांत पावसाचा फटकाराही पोलिसांना बसणार आहे. अशा पोलिसांसाठी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्तात रोटेशन पद्धतीसह इतर उपाय अवलंबून दिलासा देण्याची गरज आहे. 

बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या... 
 
भावनिक कोंडी 
आम्ही घरात आहेत; पण घरात असल्यासारखे नाही! स्वतःला आयसोलेट करूनच राहतो. स्वतंत्र खोलीत. कुटुंबीयांना आमच्या खोलीत प्रवेश नसतो. मुलांसोबत जास्त बसणे नाही, बोलणेही कमीच असते. मनाची स्थितीही बिकट होते. प्रशासनाकडून दिलासा मिळायला हवा. आराम मिळायला हवा. पोलिसांनाही विश्रांती मिळावी. रिलीफची गरज आहे, अशी भावना पोलिसांची आहे. 
 
हे करता येईल... 
रोटेशन पद्धतीने पोलिसांना आराम देता येईल. साईड ब्रॅंचमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आहे.  तेथे काम करणाऱ्या पोलिसांनाही ठराविक काळासाठी बंदोबस्तावर पाठवायला हवे. औरंगाबादेत आयआरबी, हिंगोली, जालना येथे एसआरपी, नांदेडला सीआरपी आहे. ज्या ठिकाणी फोर्सेस आहेत तेथे त्यांचा उपयोग घ्यावा.  परिणामी मुख्य बंदोबस्तावर असलेल्यांना आराम मिळू शकेल. अशा रोटेशन पद्धतीचा अवलंब व्हावा. 

सुविधाही मिळाव्यात 
पावसामुळे पोलिसांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. जालना पोलिस दलात रेनकोट, छत्र्या व इतर साहित्य तसेच पीपीई किटही मिळत आहेत. विशेषतः येथील एकही पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह नाही. या पोलिसांना मिळणाऱ्या सुविधा इतर जिल्ह्यांतील पोलिसांनाही मिळाव्यात, अशी अपेक्षाही पोलिसांची आहे.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिसांची व्यथा : आधी उन्हाचे चटके, आता पाऊस झोडपणार! औरंगाबाद - सामान्यवेळी एखादा दरोडा पडला, दंगल झाली तर तिथे बंदोबस्तावर गेल्यास जखम झाली तर रुग्णालयात जाऊ, उपचार घेऊ अन् बरेही होऊ. तिथे घर सुरक्षित राहते. पण, कोरोनासाठीच्या बंदोबस्तात आम्ही धोक्यात असतो आणि आमचे कुटुंबीयही धोक्यात आहेत, अशा भावना पोलिसांच्या आहेत. पण, त्या ते व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आता रोटेशन पद्धतीने बंदोबस्त देण्याची गरज आहे.  राज्यातील कोरोनाचे संकट पाहता वैद्यकीय आणि पोलिस सेवा अत्यंत व्यस्त आहे. पोलिसांवरील ताण मोठा आहे. पोलिस दलात कोरोना विषाणूचा शिरकाव, लागण आणि मृत्यू ही गंभीर स्थिती आहे. अशा काळात जीव धोक्यात घालून पोलिस ताणतणाव, रोष व हल्ले झेलून काम करीत आहेत. एकीकडे कर्तव्य, दुसरीकडे कुटुंब, मानसिक तणाव यात अनेक पोलिस अडकले आहेत. मनाची घालमेलही होत आहे. २३ मार्चपासून पोलिस बांधव रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे पोलिस जीव धोक्यात घालून रस्त्यावर उन्हाचे चटके सहन करीत आहेत. तीन महिने वैशाख वणवा सोसल्यानंतर या विचित्र परिस्थितीत अनेक पोलिस कोरोनाचे शिकार झाले. राज्यात चोवीस तासांत ९१ पोलिसांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. आतापर्यंत २ हजार ४१६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. २६ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढला असल्याने पोलिसांना या काळातही रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे राहावे लागणार आहे. आता काही दिवसांत पावसाचा फटकाराही पोलिसांना बसणार आहे. अशा पोलिसांसाठी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्तात रोटेशन पद्धतीसह इतर उपाय अवलंबून दिलासा देण्याची गरज आहे.  बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या...    भावनिक कोंडी  आम्ही घरात आहेत; पण घरात असल्यासारखे नाही! स्वतःला आयसोलेट करूनच राहतो. स्वतंत्र खोलीत. कुटुंबीयांना आमच्या खोलीत प्रवेश नसतो. मुलांसोबत जास्त बसणे नाही, बोलणेही कमीच असते. मनाची स्थितीही बिकट होते. प्रशासनाकडून दिलासा मिळायला हवा. आराम मिळायला हवा. पोलिसांनाही विश्रांती मिळावी. रिलीफची गरज आहे, अशी भावना पोलिसांची आहे.    हे करता येईल...  रोटेशन पद्धतीने पोलिसांना आराम देता येईल. साईड ब्रॅंचमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आहे.  तेथे काम करणाऱ्या पोलिसांनाही ठराविक काळासाठी बंदोबस्तावर पाठवायला हवे. औरंगाबादेत आयआरबी, हिंगोली, जालना येथे एसआरपी, नांदेडला सीआरपी आहे. ज्या ठिकाणी फोर्सेस आहेत तेथे त्यांचा उपयोग घ्यावा.  परिणामी मुख्य बंदोबस्तावर असलेल्यांना आराम मिळू शकेल. अशा रोटेशन पद्धतीचा अवलंब व्हावा.  सुविधाही मिळाव्यात  पावसामुळे पोलिसांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. जालना पोलिस दलात रेनकोट, छत्र्या व इतर साहित्य तसेच पीपीई किटही मिळत आहेत. विशेषतः येथील एकही पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह नाही. या पोलिसांना मिळणाऱ्या सुविधा इतर जिल्ह्यांतील पोलिसांनाही मिळाव्यात, अशी अपेक्षाही पोलिसांची आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dohb8X
Read More
विप्लवला छंद नावीन्यपूर्ण इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा 

विप्लव मालपुटे हा आठवीत गेलेला मुलगा इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्यात तासन्‌तास रमतो. सायकलसाठीचा इंडिकेटर, वायरलेस नोटिसबोर्ड, मोबाईल फोन व ब्ल्यू टूथच्या माध्यमातून साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादसुविधा अशी अनेक उपयुक्त साधनं त्याने बनवली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विप्लव विकास मालपुटे याला इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा भारीच छंद. तो तासन्‌तास त्यात रमतो. जुन्या, वापरात नसलेल्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स साधनांमधील अजूनही वापरता येतील, अशा सुट्या भागांचा फेरवापर करून तो वेगळंच काही तरी बनवतो. तो म्हणाला, ""मी एक वायरलेस नोटिसबोर्ड तयार केला आहे. याच्या डिस्प्लेवर दोन ओळींमध्ये सोळा अंक किंवा अक्षरं बसू शकतात. यात कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या साहाय्याने प्रोग्रॅमिंग करून संदेश प्रसारित करता येतो. हा संदेश वाचता येतो तसाच तो ऐकवण्याची सोयही आहे. असंच ब्लू टूथ तंत्राच्या वापराने संदेश वहनाचं साधन तयार केलं आहे. सायकलसाठीचा इंडिकेटर बनवला आहे. याच्या माध्यमातून ब्रेक दाबल्यावर मागच्या बाजूला लाल रंगाची पट्टी प्रकाशाने उजळून निघते. डावी-उजवीकडे आपण वळणार असल्याचा संकेत देण्याची व्यवस्थाही मी केली आहे. सोल्डरिंग गन ठेवण्यासाठी लाकडी स्टॅण्ड मी टाकाऊ वस्तूंपासून बनवला आहे.' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विप्लवची आई वंदना यांनी सांगितलं की, विप्लवला एखादी वस्तू तयार करायची कल्पना सुचल्यानंतर तो ती पूर्णत्वाला जाईपर्यंत खूप कष्ट घेतो. धीराने पाठपुरावा करतो. त्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या संकेतस्थळांचा शोध घेऊन त्यात सांगितलेल्या गोष्टींवर स्वतः विचार करतो. आपल्या कामात वेगळेपणा कसा आणता येईल, याकडे त्याचं लक्ष असतं. त्याच्या कल्पक वृत्तीला या छंदामुळे नवी वाट खुली झाली आहे. कल्पनेला तर्काची जोड मिळाली आहे. विप्लवची क्षमता धावणे, सायकल चालवणे या फिटनेस प्रकारांमध्येही उत्तम आहे. शारीरिक व बौद्धिक संपदेची तो मेहनतीने करत असलेली कमाई पाहताना विलक्षण समाधान आणि अभिमान वाटतो. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विप्लवला छंद नावीन्यपूर्ण इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा  विप्लव मालपुटे हा आठवीत गेलेला मुलगा इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्यात तासन्‌तास रमतो. सायकलसाठीचा इंडिकेटर, वायरलेस नोटिसबोर्ड, मोबाईल फोन व ब्ल्यू टूथच्या माध्यमातून साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादसुविधा अशी अनेक उपयुक्त साधनं त्याने बनवली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विप्लव विकास मालपुटे याला इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा भारीच छंद. तो तासन्‌तास त्यात रमतो. जुन्या, वापरात नसलेल्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स साधनांमधील अजूनही वापरता येतील, अशा सुट्या भागांचा फेरवापर करून तो वेगळंच काही तरी बनवतो. तो म्हणाला, ""मी एक वायरलेस नोटिसबोर्ड तयार केला आहे. याच्या डिस्प्लेवर दोन ओळींमध्ये सोळा अंक किंवा अक्षरं बसू शकतात. यात कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या साहाय्याने प्रोग्रॅमिंग करून संदेश प्रसारित करता येतो. हा संदेश वाचता येतो तसाच तो ऐकवण्याची सोयही आहे. असंच ब्लू टूथ तंत्राच्या वापराने संदेश वहनाचं साधन तयार केलं आहे. सायकलसाठीचा इंडिकेटर बनवला आहे. याच्या माध्यमातून ब्रेक दाबल्यावर मागच्या बाजूला लाल रंगाची पट्टी प्रकाशाने उजळून निघते. डावी-उजवीकडे आपण वळणार असल्याचा संकेत देण्याची व्यवस्थाही मी केली आहे. सोल्डरिंग गन ठेवण्यासाठी लाकडी स्टॅण्ड मी टाकाऊ वस्तूंपासून बनवला आहे.'  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  विप्लवची आई वंदना यांनी सांगितलं की, विप्लवला एखादी वस्तू तयार करायची कल्पना सुचल्यानंतर तो ती पूर्णत्वाला जाईपर्यंत खूप कष्ट घेतो. धीराने पाठपुरावा करतो. त्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या संकेतस्थळांचा शोध घेऊन त्यात सांगितलेल्या गोष्टींवर स्वतः विचार करतो. आपल्या कामात वेगळेपणा कसा आणता येईल, याकडे त्याचं लक्ष असतं. त्याच्या कल्पक वृत्तीला या छंदामुळे नवी वाट खुली झाली आहे. कल्पनेला तर्काची जोड मिळाली आहे. विप्लवची क्षमता धावणे, सायकल चालवणे या फिटनेस प्रकारांमध्येही उत्तम आहे. शारीरिक व बौद्धिक संपदेची तो मेहनतीने करत असलेली कमाई पाहताना विलक्षण समाधान आणि अभिमान वाटतो.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2yPi6jG
Read More
हो खरंच! लॉकडाउनमध्येही या कंपनीने दिली भरघोस वेतनवाढ अन् बोनस

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे खासगी नोकरदारच नव्हे तर सरकारी नोकरदारांचीही वेतन कपात झाली. आवकच बंद झाल्याने अनेक खासगी कंपन्यांनी आता कर्मचारी कपातही सुरू केली आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. अशी स्थितीत वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स कंपनीने कामगारांना बेसिक पगारात सहा हजार रुपयांची वेतनवाढ दिली. आता या कर्मचाऱ्यांना इतर मासिक भत्ते मिळून मासिक वेतनात ११ हजार ०३२ रुपये इतकी भरघोस वाढ मिळाली आहे. रविवारी (ता. ३१) भारतीय बहुजन कामगार संघाच्या माध्यमातून तीन वर्षांसाठीचा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

लॉकडाउनमुळे सगळेच उद्योग-धंदे ठप्प आहेत. खासगी क्षेत्राचे तर खूप मोठे नुकसान झाले. लॉकडाउन संपल्यानंतरही अनेक कंपन्या यातून सावरू शकणार नाहीत. त्यासाठी काही वर्ष लागतील, असे जाणकार सांगत आहेत. असे असताना औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या कामगारांना वेतनवाढ दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या... 

२१ हजार बोनस अजून बरेच काही

पत्रकात म्हटले, वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स या संघटनेतील कामगारांचा वेतनवाढीचा करार करण्यात आला. या करारानुसार कामगारांच्या मूळ मासिक वेतनात सहा हजारांची वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता कायद्याप्रमाणे असेल व त्याचे प्रमाण इतर मासिक भत्ते मिळून मासिक वेतनात ११ हजार ०३२ रुपये इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे. यासह २१ हजार रुपये वार्षिक बोनस देण्यात येणार आहे. एवढे नव्हे तर प्रत्येक कामगारांना ५० हजार रुपये वार्षिक बिनव्याजी उचलही देण्यात येणार आहे. कामगारांसाठी वार्षिक सहलही काढली जाणार आहे, असेही करारात नमूद आहे. 
 
यांनी घेतला पुढाकार
या करारासाठी भारतीय बहुजन कामगार संघाचे अध्यक्ष तथा भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, सचिव अरुण मते यांनी पाठपुरावा केला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक नितीन केतकर, सफराज पटेल, एचआर मॅनेजर अच्युत काळे, डेप्युटी मॅनेजर तुषार वडागळे, कचरू घोडके, सुनील आराक, पद्माकर भालेराव यांची उपस्थिती होती.  
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हो खरंच! लॉकडाउनमध्येही या कंपनीने दिली भरघोस वेतनवाढ अन् बोनस औरंगाबाद : लॉकडाउनमुळे खासगी नोकरदारच नव्हे तर सरकारी नोकरदारांचीही वेतन कपात झाली. आवकच बंद झाल्याने अनेक खासगी कंपन्यांनी आता कर्मचारी कपातही सुरू केली आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. अशी स्थितीत वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स कंपनीने कामगारांना बेसिक पगारात सहा हजार रुपयांची वेतनवाढ दिली. आता या कर्मचाऱ्यांना इतर मासिक भत्ते मिळून मासिक वेतनात ११ हजार ०३२ रुपये इतकी भरघोस वाढ मिळाली आहे. रविवारी (ता. ३१) भारतीय बहुजन कामगार संघाच्या माध्यमातून तीन वर्षांसाठीचा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.  लॉकडाउनमुळे सगळेच उद्योग-धंदे ठप्प आहेत. खासगी क्षेत्राचे तर खूप मोठे नुकसान झाले. लॉकडाउन संपल्यानंतरही अनेक कंपन्या यातून सावरू शकणार नाहीत. त्यासाठी काही वर्ष लागतील, असे जाणकार सांगत आहेत. असे असताना औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या कामगारांना वेतनवाढ दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या...  २१ हजार बोनस अजून बरेच काही पत्रकात म्हटले, वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स या संघटनेतील कामगारांचा वेतनवाढीचा करार करण्यात आला. या करारानुसार कामगारांच्या मूळ मासिक वेतनात सहा हजारांची वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता कायद्याप्रमाणे असेल व त्याचे प्रमाण इतर मासिक भत्ते मिळून मासिक वेतनात ११ हजार ०३२ रुपये इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे. यासह २१ हजार रुपये वार्षिक बोनस देण्यात येणार आहे. एवढे नव्हे तर प्रत्येक कामगारांना ५० हजार रुपये वार्षिक बिनव्याजी उचलही देण्यात येणार आहे. कामगारांसाठी वार्षिक सहलही काढली जाणार आहे, असेही करारात नमूद आहे.    यांनी घेतला पुढाकार या करारासाठी भारतीय बहुजन कामगार संघाचे अध्यक्ष तथा भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, सचिव अरुण मते यांनी पाठपुरावा केला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक नितीन केतकर, सफराज पटेल, एचआर मॅनेजर अच्युत काळे, डेप्युटी मॅनेजर तुषार वडागळे, कचरू घोडके, सुनील आराक, पद्माकर भालेराव यांची उपस्थिती होती.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZWqSHY
Read More
सुरक्षित पण सुजाण पालकत्व 

कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे ‘पालकत्वाची‘ परिभाषाच बदलायला लागली आहे. पण म्हणून मुले घरातच कोंडून ठेवणे हेही शक्य नाही. आपण सुरक्षित पण सुजाण पालकत्वाचे काही सोपे नियम सध्या पाळू शकू. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- मुलांना शाळेत सोडताना-आणताना रिक्षा, व्हॅनसाठी ‘सोशल डिस्टन्सिंग'चे कडक नियम पालकांनीच घालून दिले पहिजेत. (अर्थात त्याची आर्थिक किंमत मोजावी लागणार). 

- मुलांना शाळेत प्रवेश करण्यापासून स्वच्छतेचे, सुरक्षिततेचे सगळे नियम शिक्षकांना सैनिकी शिस्तीने शिकवावे लागणार. त्यासाठी रोजचे तापमान मोजण्यापासून, स्वच्छतागृहापर्यंत प्रत्येक ठिकाणी कष्ट घ्यावे लागणार. (यात शिक्षणाची गती कमी होणारच). 

- मुलांच्या वर्गातले प्रचलित शिक्षण व त्याचवेळेस आॅनलाईन शिक्षण याचा समतोल राखण्यासाठी तारेवरची कसरत पालकांना करावीच लागणार. (त्यातून स्क्रीनचे व्यसन अजून वाढणार). 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- मुले मोकळ्या हवेत खेळलीच पाहिजेत, नाहीतर त्यांचे बालपण कोमेजणार. पण मग हे खेळताना डोक्याला डोके लागणारच. (दोन मीटर अंतर ठेऊन खेळण्याचे खेळ शोधणे हे आव्हानच असणार). 

- शाळेबरोबर क्लासला पाठवायला लागणार हेही कटू सत्य. आता क्लास चालवायचे तर तेथेही कोरोना शिकायला येणार. कोरोनाला दाराबाहेर ठेवायचे तर क्लाससाठीही स्वयंघोषित सुरक्षिततेचे नियम लागणार. (पालकांना त्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार). 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- मुलांची कलात्मक अभिव्यक्ती (मग ते गाणे, वादन, नृत्य किंवा चित्रकला असो) कोरोनाच्या लढाईत ‘लॉक' होणार की, काय ही वेगळीच भीती. आता कलाशिक्षकांना ‘चौकटीत राहून कलेचा मुक्त अविष्कार' कसा शिकवायचा याप्रश्‍नाचे कलात्मक उत्तर शोधायचे आहे. 

- मुलांचे ‘खाणे-पिणे‘ हा प्रत्येक आईबाबांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न. आता शाळेत डबा खाताना हात कधी धुवायचे, एकमेकांच्या डब्यातले खायचे का, अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधताना आईवडिलांची भूक कमी होण्याची चिन्हे आहेत. 

- शिशू शाळेत जाणा-या मुलांना ‘खरचं शाळेत पाठवायचे का,‘ या प्रश्‍नाचे उत्तर ‘सध्यातरी नाही‘ असे असले तरी आपल्या चिमुरड्यात उद्याचा आईनस्टाईन बघणा-या पालकांना कदाचित त्या छोट्यांना टीव्ही, संगणकासमोर बसवण्याचा मोह होणारच. 

-मुलांची पावसाळ्यातली आजारपणे, बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे या सगळ्या प्रश्‍नांकडे आता वेगळ्या सुरक्षित पण त्याचवेळेस सकारात्मक पद्धतीने बघायची वेळ प्रत्येक आईवडिलांवर येणार आहे. 

- सगळ्यात मुख्य मुद्दा असणार आहे तो मुलांना ‘आनंदी‘ ठेवण्याचा. त्यांना भितीशी सामना करायला शिकवण्याचा. त्यासाठी स्वतःचा आत्मविश्‍वास टिकवण्याचा. 

या व अशा अनेक छोट्या, मोठ्या प्रश्‍नांचे पालकांना एकच उत्तर हवे असेल तर कोरोनाची अचूक माहिती, सुरक्षिततेच्या नियमांची जाण व अंमलबजावणी, खूप सारा संयम, आनंदी आणि भयमुक्त पालकत्व म्हणजे यशस्वी पालकत्व. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सुरक्षित पण सुजाण पालकत्व  कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे ‘पालकत्वाची‘ परिभाषाच बदलायला लागली आहे. पण म्हणून मुले घरातच कोंडून ठेवणे हेही शक्य नाही. आपण सुरक्षित पण सुजाण पालकत्वाचे काही सोपे नियम सध्या पाळू शकू.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - मुलांना शाळेत सोडताना-आणताना रिक्षा, व्हॅनसाठी ‘सोशल डिस्टन्सिंग'चे कडक नियम पालकांनीच घालून दिले पहिजेत. (अर्थात त्याची आर्थिक किंमत मोजावी लागणार).  - मुलांना शाळेत प्रवेश करण्यापासून स्वच्छतेचे, सुरक्षिततेचे सगळे नियम शिक्षकांना सैनिकी शिस्तीने शिकवावे लागणार. त्यासाठी रोजचे तापमान मोजण्यापासून, स्वच्छतागृहापर्यंत प्रत्येक ठिकाणी कष्ट घ्यावे लागणार. (यात शिक्षणाची गती कमी होणारच).  - मुलांच्या वर्गातले प्रचलित शिक्षण व त्याचवेळेस आॅनलाईन शिक्षण याचा समतोल राखण्यासाठी तारेवरची कसरत पालकांना करावीच लागणार. (त्यातून स्क्रीनचे व्यसन अजून वाढणार).  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  - मुले मोकळ्या हवेत खेळलीच पाहिजेत, नाहीतर त्यांचे बालपण कोमेजणार. पण मग हे खेळताना डोक्याला डोके लागणारच. (दोन मीटर अंतर ठेऊन खेळण्याचे खेळ शोधणे हे आव्हानच असणार).  - शाळेबरोबर क्लासला पाठवायला लागणार हेही कटू सत्य. आता क्लास चालवायचे तर तेथेही कोरोना शिकायला येणार. कोरोनाला दाराबाहेर ठेवायचे तर क्लाससाठीही स्वयंघोषित सुरक्षिततेचे नियम लागणार. (पालकांना त्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार).  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा - मुलांची कलात्मक अभिव्यक्ती (मग ते गाणे, वादन, नृत्य किंवा चित्रकला असो) कोरोनाच्या लढाईत ‘लॉक' होणार की, काय ही वेगळीच भीती. आता कलाशिक्षकांना ‘चौकटीत राहून कलेचा मुक्त अविष्कार' कसा शिकवायचा याप्रश्‍नाचे कलात्मक उत्तर शोधायचे आहे.  - मुलांचे ‘खाणे-पिणे‘ हा प्रत्येक आईबाबांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न. आता शाळेत डबा खाताना हात कधी धुवायचे, एकमेकांच्या डब्यातले खायचे का, अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधताना आईवडिलांची भूक कमी होण्याची चिन्हे आहेत.  - शिशू शाळेत जाणा-या मुलांना ‘खरचं शाळेत पाठवायचे का,‘ या प्रश्‍नाचे उत्तर ‘सध्यातरी नाही‘ असे असले तरी आपल्या चिमुरड्यात उद्याचा आईनस्टाईन बघणा-या पालकांना कदाचित त्या छोट्यांना टीव्ही, संगणकासमोर बसवण्याचा मोह होणारच.  -मुलांची पावसाळ्यातली आजारपणे, बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे या सगळ्या प्रश्‍नांकडे आता वेगळ्या सुरक्षित पण त्याचवेळेस सकारात्मक पद्धतीने बघायची वेळ प्रत्येक आईवडिलांवर येणार आहे.  - सगळ्यात मुख्य मुद्दा असणार आहे तो मुलांना ‘आनंदी‘ ठेवण्याचा. त्यांना भितीशी सामना करायला शिकवण्याचा. त्यासाठी स्वतःचा आत्मविश्‍वास टिकवण्याचा.  या व अशा अनेक छोट्या, मोठ्या प्रश्‍नांचे पालकांना एकच उत्तर हवे असेल तर कोरोनाची अचूक माहिती, सुरक्षिततेच्या नियमांची जाण व अंमलबजावणी, खूप सारा संयम, आनंदी आणि भयमुक्त पालकत्व म्हणजे यशस्वी पालकत्व.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3djyJmM
Read More

Saturday, May 30, 2020

तुकाराम मुंढे हुकुमशाहसारखे वागतात, नागपुरातील या कॉंग्रेसे आमदाराने डागली तोफ

नागपूर : लोकप्रतिनीधींचे ऐकायचे नाही, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या नाही, प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखील लोकांना महिनाभर डांबून ठेवायचे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची नाही आणि भक्तांमार्फत सोशल मीडियावर स्वतःला नागपूरचा राजा म्हणून घ्यायचे, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे धोरण आहे. त्यामुळे असा हेकेखोर राजा आम्हाला नको आहे. याचा हिशेब आपण अधिवेशनात घेऊ असा इशारा कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी दिला.

विकास ठाकरे यांनी शनिवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मुंढे यांना वैयक्तिक विरोध करीत नाही. मात्र ते ज्या पद्धतीने वागतात, काम करतात त्याला माझा विरोध आहे. मी त्यांच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जातो. त्या समजून घेण्याऐवजी आपणच कसे बरोबर आहोत यावरच त्यांचा भर असतो.

कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर ट्रस्ट ले-आऊटसह सुमारे पाच किलोमीटरचा परिसर त्यांनी बंद केला. त्याआधी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी, गैरसोयी जाणून घेतल्या नाहीत. डॉक्‍टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी यांनाही बाहेर पडू दिले नाही. नियमानुसार लॉकडाऊन करताना तेथील नागरिकांना सोयीसुविधा पुरवाव्या हा नियम आहे. तो त्यांनी मान्य केला नाही. आता ट्रस्ट ले-आऊट वगळून इतर वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळले. हीच मागणी आपण करीत होतो. आता कोण चुकले हे मुंडे यांनीच सांगावे.

अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू

पब्लिसिटी क्रेझी

मुंढे पगारी नोकरदार आहे. राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा घेतात. सरकारच्याच योजनांची त्यांना अंमलबजावणी करायची असते. मात्र ते मुंढे पॅटर्न म्हणून स्वतःचा प्रचार करतात. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. याचे श्रेयही ते सरकारला देत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी त्यांनी एजन्सी नियुक्त केली आहे. यावर त्यांचे भक्त वेगवेगळ्या पोजचे फोटो टाकतात. "नागपूरचा राजा' म्हणतात. यावर त्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून कधी आक्षेप घेतला नाही. सरकारची नोकरी करतो असे म्हटले नाही. यावरून सर्वच मुंढेंच्या सहमतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते. एवढीच प्रसिद्धी आणि समाजसेवेची खुमखुमी असेल तर मुंढे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात यावे, असेही ठाकरे म्हणाले.

गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या

कॉंग्रसेच्या एका नगरसेवकाने नागरिकांना विलिकरणासाठी दोन तासाची मुदत मागितली होती. मात्र मुंढे यांच्या आदेशावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आपणावरसुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पालकमंत्री, महापौर, आमदारांचेही ते ऐकत नाही. रचना अपार्टमेंट येथील एक इमारतील त्यांनी क्वारंटाईन सेंटर सुरू केले. याच इमारतीला लागून असलेल्या फ्लॅटमध्ये दीडशे कुटुंब राहातात. त्यांचा विरोध स्वाभाविक होता. मात्र त्यांनाही हाकलून लावले, असे ठाकरे यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तुकाराम मुंढे हुकुमशाहसारखे वागतात, नागपुरातील या कॉंग्रेसे आमदाराने डागली तोफ नागपूर : लोकप्रतिनीधींचे ऐकायचे नाही, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या नाही, प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखील लोकांना महिनाभर डांबून ठेवायचे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची नाही आणि भक्तांमार्फत सोशल मीडियावर स्वतःला नागपूरचा राजा म्हणून घ्यायचे, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे धोरण आहे. त्यामुळे असा हेकेखोर राजा आम्हाला नको आहे. याचा हिशेब आपण अधिवेशनात घेऊ असा इशारा कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी दिला. विकास ठाकरे यांनी शनिवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मुंढे यांना वैयक्तिक विरोध करीत नाही. मात्र ते ज्या पद्धतीने वागतात, काम करतात त्याला माझा विरोध आहे. मी त्यांच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जातो. त्या समजून घेण्याऐवजी आपणच कसे बरोबर आहोत यावरच त्यांचा भर असतो. कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर ट्रस्ट ले-आऊटसह सुमारे पाच किलोमीटरचा परिसर त्यांनी बंद केला. त्याआधी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी, गैरसोयी जाणून घेतल्या नाहीत. डॉक्‍टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी यांनाही बाहेर पडू दिले नाही. नियमानुसार लॉकडाऊन करताना तेथील नागरिकांना सोयीसुविधा पुरवाव्या हा नियम आहे. तो त्यांनी मान्य केला नाही. आता ट्रस्ट ले-आऊट वगळून इतर वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळले. हीच मागणी आपण करीत होतो. आता कोण चुकले हे मुंडे यांनीच सांगावे. अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू पब्लिसिटी क्रेझी मुंढे पगारी नोकरदार आहे. राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा घेतात. सरकारच्याच योजनांची त्यांना अंमलबजावणी करायची असते. मात्र ते मुंढे पॅटर्न म्हणून स्वतःचा प्रचार करतात. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. याचे श्रेयही ते सरकारला देत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी त्यांनी एजन्सी नियुक्त केली आहे. यावर त्यांचे भक्त वेगवेगळ्या पोजचे फोटो टाकतात. "नागपूरचा राजा' म्हणतात. यावर त्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून कधी आक्षेप घेतला नाही. सरकारची नोकरी करतो असे म्हटले नाही. यावरून सर्वच मुंढेंच्या सहमतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते. एवढीच प्रसिद्धी आणि समाजसेवेची खुमखुमी असेल तर मुंढे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात यावे, असेही ठाकरे म्हणाले. गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या कॉंग्रसेच्या एका नगरसेवकाने नागरिकांना विलिकरणासाठी दोन तासाची मुदत मागितली होती. मात्र मुंढे यांच्या आदेशावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आपणावरसुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पालकमंत्री, महापौर, आमदारांचेही ते ऐकत नाही. रचना अपार्टमेंट येथील एक इमारतील त्यांनी क्वारंटाईन सेंटर सुरू केले. याच इमारतीला लागून असलेल्या फ्लॅटमध्ये दीडशे कुटुंब राहातात. त्यांचा विरोध स्वाभाविक होता. मात्र त्यांनाही हाकलून लावले, असे ठाकरे यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cggpJW
Read More
जयंती विशेष : अहल्याबाई होळकरांच्या सवतींचे काय झाले? जाणून घ्या...

औरंगाबाद : पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.  

अहल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे सुभेदार मल्हारराव व गौतमाबाई यांचे पुत्र. त्यांचा जन्म २ जानेवारी १७२३ ला झाला. अहल्याबाईंशी त्यांचे २१ मार्च १७३८ ला लग्न झाले. त्यावेळी अहल्याबाई आठ वर्षांच्या होत्या. अहल्याबाईंसह खंडेरावांना चार बायका होत्या. खंडेराव यांना कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान १९ मार्च १७५४ ला वीरमरण आले. त्यांच्या चार बायकांपैकी पुण्यश्लोक अहल्याबाई वगळता इतर तिघी सती गेल्या. पार्वतीबाई पीताबाई आणि सुरताबाई अशी त्यांची नावे आहेत. 

सासऱ्यांनी जाऊ दिले नाही सती

अहल्याबाई याच होळकर घराण्याचे नाव लौकिक करतील. त्या उत्तम प्रशासक आहेत. त्यांना समाजभान आहे, हे त्यांचे सासरे मल्हाररावांनी हेरले होते. त्यामुळेच त्यांनी अहल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. पुढे १२ वर्षांनंतर मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर अहल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. लढाईत त्या स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. राणी अहल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.  

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...
 

असे गेले बालपण

अहल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ ला पूर्वीच्या बीड, तर आताच्या अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या चौंडी (ता. जामखेड) या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहल्याबाईंचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना मोडी लिपीतून लिहिण्या-वाचण्यास शिकविले होते. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई होते. माणकोजी शिदे आणि सुशीलाबाई या दांपत्याला महादजी, येसाजी, बाणाजी, विठोजी आणि सुभनजी अशी पाच मुले आणि एक मुलगी होती. ती मुलगी म्हणजे अहल्याबाई. एकुलती एक मुलगी असल्याने त्यांचे बालपण लाडात गेले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जयंती विशेष : अहल्याबाई होळकरांच्या सवतींचे काय झाले? जाणून घ्या... औरंगाबाद : पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.   अहल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे सुभेदार मल्हारराव व गौतमाबाई यांचे पुत्र. त्यांचा जन्म २ जानेवारी १७२३ ला झाला. अहल्याबाईंशी त्यांचे २१ मार्च १७३८ ला लग्न झाले. त्यावेळी अहल्याबाई आठ वर्षांच्या होत्या. अहल्याबाईंसह खंडेरावांना चार बायका होत्या. खंडेराव यांना कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान १९ मार्च १७५४ ला वीरमरण आले. त्यांच्या चार बायकांपैकी पुण्यश्लोक अहल्याबाई वगळता इतर तिघी सती गेल्या. पार्वतीबाई पीताबाई आणि सुरताबाई अशी त्यांची नावे आहेत.  सासऱ्यांनी जाऊ दिले नाही सती अहल्याबाई याच होळकर घराण्याचे नाव लौकिक करतील. त्या उत्तम प्रशासक आहेत. त्यांना समाजभान आहे, हे त्यांचे सासरे मल्हाररावांनी हेरले होते. त्यामुळेच त्यांनी अहल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. पुढे १२ वर्षांनंतर मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर अहल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. लढाईत त्या स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. राणी अहल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.   सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...   असे गेले बालपण अहल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ ला पूर्वीच्या बीड, तर आताच्या अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या चौंडी (ता. जामखेड) या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहल्याबाईंचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना मोडी लिपीतून लिहिण्या-वाचण्यास शिकविले होते. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई होते. माणकोजी शिदे आणि सुशीलाबाई या दांपत्याला महादजी, येसाजी, बाणाजी, विठोजी आणि सुभनजी अशी पाच मुले आणि एक मुलगी होती. ती मुलगी म्हणजे अहल्याबाई. एकुलती एक मुलगी असल्याने त्यांचे बालपण लाडात गेले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3etBhPc
Read More
लवकरच ट्रॅकवर धावेल नागपूर मेट्रो, अशा असतील प्रवासाच्या अटी

नागपूर : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवितानाच परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शिथिलताही दिली. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारकडे देण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आपली बस, मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, नागपूरकरांचा प्रवास आता कोरोनापूर्वीच्या काळानुसार नव्हे तर कोरोनाच्या सावटात अनेक अटींसह प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना जुन्याच आपली बस, मेट्रोमधून प्रवासाचा नवा अनुभव येणार आहे.

मार्च 11 रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शहरातील मेट्रो सेवा, आपली बस बंद करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद आहे. मात्र, लॉकडाऊन चारमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने नागरिक आता कामावर जात आहेत. खाजगी वाहनांचाही वापर होत आहे. केंद्र सरकारने आज लॉकडाऊन पाचची घोषणा केली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळल्यास सर्वच भागात सर्वच सेवा सुरू करण्याचे स्पष्ट केले आहे.

अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू

शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच टप्प्या-टप्प्याने सर्व सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता कोरोना रुग्णांमुळे प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र वगळून इतर भागात सार्वजनिक वाहतूकीचाही मार्ग मोकळा झाला. ही सेवा कधीपासून सुरू करणार? याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा मजूर वर्ग, कामगार, खाजगी कार्यालयातील कर्मचारी बस, मेट्रोची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र आता नागपूरकरांचा प्रवास कोरोनाच्या सावटातच होणार असल्याने प्रवासासाठी अनेक अटींचा सामना करावा लागणार आहे.

बसमध्ये प्रवासासाठी अटी व उपाययोजना

- दररोज प्रत्येक बसमधील आसनांची फेरीनंतर स्वच्छता.

- प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक

- एका आसनावर एकच प्रवासी

- बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक.

मेट्रोमधून प्रवासासाठी अटी व उपाययोजना

- सोशल डिस्टनिसंगचे पालन करावे लागणार.

- मास्कचा वापर करणे बंधनकारक

- संपूर्ण मेट्रो ट्रेनचे सॅनिटायझेशन

- लिफ्ट, एस्केलेटर्सवर हात ठेवता येणार नाही.

 

सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचा विचार आहे. मात्र बसची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, आसनावर बसण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येत आहेत. बसमध्ये नेमके किती प्रवासी राहतील याबाबतही विचार केला आहे. ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल, परंतु सध्याच वेळापत्रक सांगता येणार नाही.
- तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका.

आपली बसमध्ये अनेक गरीब, मजूर वर्ग प्रवास करतो. आता बांधकाम, खाजगी कार्यालयेही काही प्रमाणात सुरू झाले. येथील कर्मचारी, मजुरांना ये-जा करण्यासाठी आपली बस सुरू करण्याबाबत आयुक्तांना पत्र देणार आहे. प्रशासनाने याबाबत मार्गदर्शक तत्व तयार करून लवकर बससेवा सुरू करावी.
- बाल्या बोरकर, सभापती, परिवहन समिती, महापालिका.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लवकरच ट्रॅकवर धावेल नागपूर मेट्रो, अशा असतील प्रवासाच्या अटी नागपूर : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवितानाच परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शिथिलताही दिली. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारकडे देण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आपली बस, मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, नागपूरकरांचा प्रवास आता कोरोनापूर्वीच्या काळानुसार नव्हे तर कोरोनाच्या सावटात अनेक अटींसह प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना जुन्याच आपली बस, मेट्रोमधून प्रवासाचा नवा अनुभव येणार आहे. मार्च 11 रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शहरातील मेट्रो सेवा, आपली बस बंद करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद आहे. मात्र, लॉकडाऊन चारमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने नागरिक आता कामावर जात आहेत. खाजगी वाहनांचाही वापर होत आहे. केंद्र सरकारने आज लॉकडाऊन पाचची घोषणा केली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळल्यास सर्वच भागात सर्वच सेवा सुरू करण्याचे स्पष्ट केले आहे. अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच टप्प्या-टप्प्याने सर्व सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता कोरोना रुग्णांमुळे प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र वगळून इतर भागात सार्वजनिक वाहतूकीचाही मार्ग मोकळा झाला. ही सेवा कधीपासून सुरू करणार? याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा मजूर वर्ग, कामगार, खाजगी कार्यालयातील कर्मचारी बस, मेट्रोची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र आता नागपूरकरांचा प्रवास कोरोनाच्या सावटातच होणार असल्याने प्रवासासाठी अनेक अटींचा सामना करावा लागणार आहे. बसमध्ये प्रवासासाठी अटी व उपाययोजना - दररोज प्रत्येक बसमधील आसनांची फेरीनंतर स्वच्छता. - प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक - एका आसनावर एकच प्रवासी - बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक. मेट्रोमधून प्रवासासाठी अटी व उपाययोजना - सोशल डिस्टनिसंगचे पालन करावे लागणार. - मास्कचा वापर करणे बंधनकारक - संपूर्ण मेट्रो ट्रेनचे सॅनिटायझेशन - लिफ्ट, एस्केलेटर्सवर हात ठेवता येणार नाही.   सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचा विचार आहे. मात्र बसची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, आसनावर बसण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येत आहेत. बसमध्ये नेमके किती प्रवासी राहतील याबाबतही विचार केला आहे. ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल, परंतु सध्याच वेळापत्रक सांगता येणार नाही. - तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका. आपली बसमध्ये अनेक गरीब, मजूर वर्ग प्रवास करतो. आता बांधकाम, खाजगी कार्यालयेही काही प्रमाणात सुरू झाले. येथील कर्मचारी, मजुरांना ये-जा करण्यासाठी आपली बस सुरू करण्याबाबत आयुक्तांना पत्र देणार आहे. प्रशासनाने याबाबत मार्गदर्शक तत्व तयार करून लवकर बससेवा सुरू करावी. - बाल्या बोरकर, सभापती, परिवहन समिती, महापालिका. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cgcEnO
Read More