मुद्रांक शुल्कापोटी पुणे शहरातून मिळाला राज्य सरकारला एवढा महसूल पुणे - गेल्या वर्षभरात कोरोना फटका सर्वच क्षेत्राला बसला. अशा परिस्थितीतही पुणे शहरातून वर्षभरात राज्य सरकारला मुद्रांक शुल्कात तब्बल तीन हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्याने महसूल मिळून देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्यावर्षी ९ मार्च रोजी पुण्यात राज्यातील पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला. त्यानंतर २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन लावले. जवळपास पाच महिने शहरातील व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मरगळ आली होती. मात्र, या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत दिली होती. तर एक जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत ही सवलत एक टक्क्यांनी कमी करून दोन टक्के केली. ही मुदत उद्या संपुष्टात येत आहे. पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक जमिनी अथवा सदनिकांच्या खरेदी-विक्रीवर एरवी सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. परंतु त्यात सवलत दिल्यामुळे त्याचा मोठा फायदा राज्य सरकारला झाला. गेल्या सहा महिन्यांत या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे मुद्रांक शुल्कातून मिळालेल्या उत्पन्नातून समोर आले आहे. गेल्यावर्षी जवळपास चार हजारांहून अधिक उत्पन्न एकट्या पुणे शहरात मिळाले होते. यंदा मात्र कोरोनाच्या ‍पार्श्‍वभूमीवर मुद्रांक शुल्कातून तीन हजार ६९९ कोटी रुपयांहून अधिक महसूल राज्य सरकारला मिळाला आहे. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा गर्दी करू नका मुद्रांक शुल्कात दिलेल्या दोन टक्क्यांच्या सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. परंतु मुद्रांक शुल्काची रक्कम भरली असेल आणि दस्तावर स्वाक्षरी झाल्या असतील, तर पुढील चार महिन्यांमध्ये कधीही दस्तनोंदणी केली, तरी या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच, ३१ डिसेंबरपूर्वी ज्यांनी मुद्रांक शुल्क भरले आणि दस्तावर स्वाक्षरी केली असेल, त्यांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे नागरीकांनी दस्त रजिस्टर कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

मुद्रांक शुल्कापोटी पुणे शहरातून मिळाला राज्य सरकारला एवढा महसूल पुणे - गेल्या वर्षभरात कोरोना फटका सर्वच क्षेत्राला बसला. अशा परिस्थितीतही पुणे शहरातून वर्षभरात राज्य सरकारला मुद्रांक शुल्कात तब्बल तीन हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्याने महसूल मिळून देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्यावर्षी ९ मार्च रोजी पुण्यात राज्यातील पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला. त्यानंतर २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन लावले. जवळपास पाच महिने शहरातील व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मरगळ आली होती. मात्र, या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत दिली होती. तर एक जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत ही सवलत एक टक्क्यांनी कमी करून दोन टक्के केली. ही मुदत उद्या संपुष्टात येत आहे. पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक जमिनी अथवा सदनिकांच्या खरेदी-विक्रीवर एरवी सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. परंतु त्यात सवलत दिल्यामुळे त्याचा मोठा फायदा राज्य सरकारला झाला. गेल्या सहा महिन्यांत या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे मुद्रांक शुल्कातून मिळालेल्या उत्पन्नातून समोर आले आहे. गेल्यावर्षी जवळपास चार हजारांहून अधिक उत्पन्न एकट्या पुणे शहरात मिळाले होते. यंदा मात्र कोरोनाच्या ‍पार्श्‍वभूमीवर मुद्रांक शुल्कातून तीन हजार ६९९ कोटी रुपयांहून अधिक महसूल राज्य सरकारला मिळाला आहे. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा गर्दी करू नका मुद्रांक शुल्कात दिलेल्या दोन टक्क्यांच्या सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. परंतु मुद्रांक शुल्काची रक्कम भरली असेल आणि दस्तावर स्वाक्षरी झाल्या असतील, तर पुढील चार महिन्यांमध्ये कधीही दस्तनोंदणी केली, तरी या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच, ३१ डिसेंबरपूर्वी ज्यांनी मुद्रांक शुल्क भरले आणि दस्तावर स्वाक्षरी केली असेल, त्यांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे नागरीकांनी दस्त रजिस्टर कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39vzmcT

No comments:

Post a Comment