आंबा वाहतूकदारांचा संप मागे  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - येथे आंबा वाहतुकदारांनी पुकारलेला संप अखेर आज मागे घेण्यात आला. दरम्यान, या हंगामामध्ये आंबा बागायतदारांसाठी तडजोडीच्या दरात काम करणार असल्याचे वाहतुकदारांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत ठरविले.  आंबा पेटी वाहतूक करताना 150 रुपये प्रति पेटी मागे मिळावा यासाठी वाहतूकदार ट्रक मालक यांनी संप पुकारला होता; मात्र वेंगुर्ला येथे आज माल वाहतुकदार, ट्रान्सपोर्टदार व आंबा बागायतदार यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी वाहतुकदार संघटना पदाधिकारी शिवाजी घोगळे, मनोज वालावलकर, रामदास पडते, शरद वालावलकर, श्री रामेश्वर ट्रान्सपोर्टचे जैनू पडवळ, लता गुड्‌सचे जगन्नाथ सावंत, सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे श्‍याम कौलगेकर, वेंगुर्ला ट्रान्सपोर्टचे श्री. गावडे, संदिप पेडणेकर, उदय चिचकर, अंकुश वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य वाहतुकदार उपस्थित होते.  या बैठकीत वेंगुर्ला ते वाशी-नवी मुंबई पर्यंतचे भाडे प्रति पेटीला 150 रुपये असावे, हमाली, कमिशन वजा जाता गाडी मालकास 110 रुपये मिळावेत यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत आंबा बागायतदारांच्या हितासाठी तडजोड केली. गाडीमध्ये आंबा पेटी एका जागेवर भरावी, गाडीला फिरती नसावी, दोरी बांधण्यासाठी गाडीमालक स्वखूशीने पैसे देतील ते हमालांनी घ्यावेत, गाड्या नंबरप्रमाणे भराव्यात, एक्‍सप्रेससाठी जाणारी गाडी सायंकाळी 6 वाजेर्यंत सोडण्यात यावी, लोकल वाहतुक वेळेच्या पुढे गेलीतरी त्यांना पूर्ण भाडे मिळावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले आणि आपला संप मागे घेतल्याचे वाहतूकदारांनी जाहीर केले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 29, 2021

आंबा वाहतूकदारांचा संप मागे  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - येथे आंबा वाहतुकदारांनी पुकारलेला संप अखेर आज मागे घेण्यात आला. दरम्यान, या हंगामामध्ये आंबा बागायतदारांसाठी तडजोडीच्या दरात काम करणार असल्याचे वाहतुकदारांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत ठरविले.  आंबा पेटी वाहतूक करताना 150 रुपये प्रति पेटी मागे मिळावा यासाठी वाहतूकदार ट्रक मालक यांनी संप पुकारला होता; मात्र वेंगुर्ला येथे आज माल वाहतुकदार, ट्रान्सपोर्टदार व आंबा बागायतदार यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी वाहतुकदार संघटना पदाधिकारी शिवाजी घोगळे, मनोज वालावलकर, रामदास पडते, शरद वालावलकर, श्री रामेश्वर ट्रान्सपोर्टचे जैनू पडवळ, लता गुड्‌सचे जगन्नाथ सावंत, सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे श्‍याम कौलगेकर, वेंगुर्ला ट्रान्सपोर्टचे श्री. गावडे, संदिप पेडणेकर, उदय चिचकर, अंकुश वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य वाहतुकदार उपस्थित होते.  या बैठकीत वेंगुर्ला ते वाशी-नवी मुंबई पर्यंतचे भाडे प्रति पेटीला 150 रुपये असावे, हमाली, कमिशन वजा जाता गाडी मालकास 110 रुपये मिळावेत यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत आंबा बागायतदारांच्या हितासाठी तडजोड केली. गाडीमध्ये आंबा पेटी एका जागेवर भरावी, गाडीला फिरती नसावी, दोरी बांधण्यासाठी गाडीमालक स्वखूशीने पैसे देतील ते हमालांनी घ्यावेत, गाड्या नंबरप्रमाणे भराव्यात, एक्‍सप्रेससाठी जाणारी गाडी सायंकाळी 6 वाजेर्यंत सोडण्यात यावी, लोकल वाहतुक वेळेच्या पुढे गेलीतरी त्यांना पूर्ण भाडे मिळावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले आणि आपला संप मागे घेतल्याचे वाहतूकदारांनी जाहीर केले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3m6NY7Q

No comments:

Post a Comment