नव्या शेतकरी कायद्याविरोधात सावंतवाडीत धरणे  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्याला मारक ठरणारा हा कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा देण्यात आला.  देशभरात आज आंदोलन सुरू असल्याचे जिल्हा संयोजक जाधव यांनी सांगितले. याआधी निवेदनातून इशारा देण्यात आला होता.  निवेदनात म्हटले आहे, की किसानविरोधी कायद्याच्या विरोधात किसान मजदूर मोर्चाच्या माध्यमातून दिल्ली, सिंधु बॉर्डर, शहापूर बॉर्डर तसेच गाजीपूर बॉर्डर याठिकाणी किसानविरोधी कायदा मागे घेण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे 550 जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी 11 ते 17 जानेवारीपर्यंत शृंखलाबद्ध धरणे आंदोलन करण्यात आले. जर शेतकरीविरोधी कायदा मागे घेतला नाही तर देशव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने योग्य विचार करून कायदा मागे घ्यावा, तसेच आंदोलन शांततेने होण्यासाठी सहकार्य करावे, असे निवेदनातून सूचित केले होते. तसेच, येथील उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांना आंदोलनाची पूर्वकल्पना दिली होती. या वेळी किसान मोर्चा संयोजक सिंधुदुर्ग सगुन जाधव, भारत मुक्ती मोर्चाचे संयोजक राजीव कदम, कृष्णा जाधव, संकेत कुडाळकर, अनिकेत जाधव, आत्माराम जाधव, महादेव जाधव, अविनाश गावकर, सिद्धी जाधव, प्रेरणा जाधव आदी उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 16, 2021

नव्या शेतकरी कायद्याविरोधात सावंतवाडीत धरणे  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्याला मारक ठरणारा हा कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा देण्यात आला.  देशभरात आज आंदोलन सुरू असल्याचे जिल्हा संयोजक जाधव यांनी सांगितले. याआधी निवेदनातून इशारा देण्यात आला होता.  निवेदनात म्हटले आहे, की किसानविरोधी कायद्याच्या विरोधात किसान मजदूर मोर्चाच्या माध्यमातून दिल्ली, सिंधु बॉर्डर, शहापूर बॉर्डर तसेच गाजीपूर बॉर्डर याठिकाणी किसानविरोधी कायदा मागे घेण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे 550 जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी 11 ते 17 जानेवारीपर्यंत शृंखलाबद्ध धरणे आंदोलन करण्यात आले. जर शेतकरीविरोधी कायदा मागे घेतला नाही तर देशव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने योग्य विचार करून कायदा मागे घ्यावा, तसेच आंदोलन शांततेने होण्यासाठी सहकार्य करावे, असे निवेदनातून सूचित केले होते. तसेच, येथील उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांना आंदोलनाची पूर्वकल्पना दिली होती. या वेळी किसान मोर्चा संयोजक सिंधुदुर्ग सगुन जाधव, भारत मुक्ती मोर्चाचे संयोजक राजीव कदम, कृष्णा जाधव, संकेत कुडाळकर, अनिकेत जाधव, आत्माराम जाधव, महादेव जाधव, अविनाश गावकर, सिद्धी जाधव, प्रेरणा जाधव आदी उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38O6ywq

No comments:

Post a Comment