पुणे विद्यापीठाकडून सहा हजार तक्रारींचे निवारण  पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या निकालातील त्रुटींमुळे आलेल्या सुमारे सहा हजार तक्रारींचे निवारण करत सुधारीत निकाल तयार केला आहे. त्यातील दोन हजार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन जाहीर केल आहे. परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या तारखेपेक्षा दोन दिवस आधीच तयार केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन- एमसीक्यू) पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली होती. यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत अडथळे आले. त्याचा परिणाम निकाल जाहीर झाल्यानंतर समोर आले.  अनेक विद्यार्थ्यांना एकाच विषयात शून्य गुण मिळाले होते, तसेच परीक्षा देऊनही अनुपस्थित दाखवणे, चुकीचा विषय गुणपत्रिकेत दाखवणे अशा अनेक तक्रारी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.   महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी   अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्याने गडबड असताना चुकीच्या निकालामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत असल्याने विद्यापीठाने त्यांचे विश्लेषण करून त्याची कारणे शोधण्यास सुरूवात केली. यात काही तक्रारी तांत्रिक चुका, विद्यार्थ्यांनी दोन ईमेल देणे, वारंवार पेपर सोडविणे या कारणामुळे निकाल बदलला असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले होते. विद्यापीठाकडे आलेल्या सर्व तक्रारींचे ३ डिसेंबर पर्यंत निवारण केले जाईल असे परीक्षा विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट केले होते. परंतु दोन दिवस आधीच हे काम पूर्ण केले आहे.  पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, विद्यापीठाने दोन दिवस आधीच सुमारे सहा हजार जणांचा सुधारीत  निकाल तयार केला आहे. हा निकाल अपलोड करण्याचे काम सुरू असून, आत्तापर्यंत दोन हजार जणांचा निकाल जाहीर केला आहे. उर्वरीत निकाल ही लवकरच अपलोड केला जाईल.  निकालपत्र वाटपास सुरूवात  विद्यापीठाने निकाल जाहीर केले, पण अजून अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका उपलब्ध झालेली नाही. परदेशी शिक्षण, पदव्युत्तर पदवीचा प्रवेश, बार काउन्सिलकडे विधीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणारी नोंदणी व त्याची संपत आलेली मुदत यासाठी गुणपत्रिका आवश्यक आहे.  विद्यापीठाकडे आत्तापर्यंत फार्मसी, इंजिनिअरींगच्या गुणपत्रिका छापून पूर्ण केल्या आहेत, त्या संबंधित महाविद्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका येत्या काही दिवसात उपलब्ध होतील, असे काकडे यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 1, 2020

पुणे विद्यापीठाकडून सहा हजार तक्रारींचे निवारण  पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या निकालातील त्रुटींमुळे आलेल्या सुमारे सहा हजार तक्रारींचे निवारण करत सुधारीत निकाल तयार केला आहे. त्यातील दोन हजार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन जाहीर केल आहे. परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या तारखेपेक्षा दोन दिवस आधीच तयार केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन- एमसीक्यू) पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली होती. यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत अडथळे आले. त्याचा परिणाम निकाल जाहीर झाल्यानंतर समोर आले.  अनेक विद्यार्थ्यांना एकाच विषयात शून्य गुण मिळाले होते, तसेच परीक्षा देऊनही अनुपस्थित दाखवणे, चुकीचा विषय गुणपत्रिकेत दाखवणे अशा अनेक तक्रारी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.   महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी   अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्याने गडबड असताना चुकीच्या निकालामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत असल्याने विद्यापीठाने त्यांचे विश्लेषण करून त्याची कारणे शोधण्यास सुरूवात केली. यात काही तक्रारी तांत्रिक चुका, विद्यार्थ्यांनी दोन ईमेल देणे, वारंवार पेपर सोडविणे या कारणामुळे निकाल बदलला असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले होते. विद्यापीठाकडे आलेल्या सर्व तक्रारींचे ३ डिसेंबर पर्यंत निवारण केले जाईल असे परीक्षा विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट केले होते. परंतु दोन दिवस आधीच हे काम पूर्ण केले आहे.  पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, विद्यापीठाने दोन दिवस आधीच सुमारे सहा हजार जणांचा सुधारीत  निकाल तयार केला आहे. हा निकाल अपलोड करण्याचे काम सुरू असून, आत्तापर्यंत दोन हजार जणांचा निकाल जाहीर केला आहे. उर्वरीत निकाल ही लवकरच अपलोड केला जाईल.  निकालपत्र वाटपास सुरूवात  विद्यापीठाने निकाल जाहीर केले, पण अजून अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका उपलब्ध झालेली नाही. परदेशी शिक्षण, पदव्युत्तर पदवीचा प्रवेश, बार काउन्सिलकडे विधीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणारी नोंदणी व त्याची संपत आलेली मुदत यासाठी गुणपत्रिका आवश्यक आहे.  विद्यापीठाकडे आत्तापर्यंत फार्मसी, इंजिनिअरींगच्या गुणपत्रिका छापून पूर्ण केल्या आहेत, त्या संबंधित महाविद्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका येत्या काही दिवसात उपलब्ध होतील, असे काकडे यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/37obfep

No comments:

Post a Comment