जीम खुल्या तालमी मात्र बंदच! कोल्हापूर - कोरोना महामारीतल्या सहा महिन्याच्या टाळेबंदी नंतर राज्य शासनाने जीम, व्यायामशाळा नियम व अटींसह खुल्या करण्याची परवानगी दसऱ्याच्या मुहूर्तावर दिली आहे. यामुळे जीम प्रेमी आणि व्यावसायिक सुखावले आहेत, परंतु महाराष्ट्राचा पारंपारिक रांगडा खेळ असलेला कुस्तीचे आखाडे, तालमी खुले करण्यास शासनाची परवानगी मिळालेली नाही. कुस्तीच्या स्पर्धा तसेच आखाडे सुरु करावेत अशी मागणी पैलवान वर्गाकडून होत आहे. लॉकडाऊन काळात लोकांच्या जगण्याचे चक्र थांबले. कुस्ती पंढरी कोल्हापूरसह राज्यातल्या आखाड्यांना टाळे लागले.पैलवानांच्या शड्डूचा आवाज थांबला. मल्लांना गावाकडे परतावे लागले. कुस्तीचे फडही बंद झाल्याने अनेकांची कुस्ती थांबली.सध्या लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कुस्ती आखाडे, तसेच कुस्ती स्पर्धा बंद असल्याने पैलवान अडचणीत आहेत.खुराकाला पैसे नाहीत.अन्‌ खुराकाची सोय झाली तरी सराव कुठे करायचा? असा दुहेरी प्रश्न त्यांच्या समोर आहे. शासनाला संसर्गाची भिती, पण... निवासी आखाड्यात पैलवान एकत्र राहतात. कुस्ती हा थेट बॉडी टू बॉडी कॉन्टॅक्‍टचा खेळ असल्याने संसर्गाची भिती अधिक असते.परंतु आखाड्यातल्या मल्लांना बाहेर फिरण्याची मुभा कमी असते. बाहेरील लोकांशी मल्लांचा संपर्क कमी येतो. आखाडा व्यवस्थापकांना बाहेरून सरावासाठी येणाऱ्या मल्लांची तपासणी करत मर्यादीत मल्लांना प्रवेश देता येऊ शकतो. या संदर्भात कुस्ती संघटना प्रशासनास काही दिवसापासून राज्यभर निवेदन देत आहेत. परंतु राज्यशासन आखाड्यांच्या बाबतीत भूमिका घेताना दिसून येत नाही. कुस्ती स्पर्धा सुरु होण्याची गरज... तब्बल सहा महिन्यापासून पैलवान कुस्तीपासून दुरावले आहेत. फड बंद असल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या मल्लांची आर्थिक बाजू चांगली आहे. त्यांचा खुराक सराव सुरु आहे. परंतु गरीब पैलवानांना पैसे नसल्याने खुराक बंद करत कुस्ती बंद करण्याची वेळ आली आहे. आयपीएलच्या धर्तीवर प्रेक्षक विरहीत ऑनलाईन कुस्ती स्पर्धेचा प्रयोग सध्या पुढे येत आहे. मोजक्‍या लोकांसह सर्व नियमांचे पालन करुन या स्पर्धा होऊ शकतात. यासाठी शासन आणि प्रायोजक मंडळीची गरज आहे. कुस्ती, पैलवानकी टिकण्यासाठी परत आखाडे, मैदाने, स्पर्धा सुरु होणे गरजेचे आहे. कुस्तीच्या सरावातला खंड मल्लांची कुस्ती संपवू शकतो. फड सुरु झाले तर पैलवानांना चार पैसे मिळतील. कोल्हापुरात राज्यभरातून मल्ल सरावासाठी येतात पण ते थांबले आहेत. तरी हवी ती काळजी घेवून हे सुरु व्हावे. - विश्वास हारुगले, वस्ताद - गंगावेश तालीम.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 28, 2020

जीम खुल्या तालमी मात्र बंदच! कोल्हापूर - कोरोना महामारीतल्या सहा महिन्याच्या टाळेबंदी नंतर राज्य शासनाने जीम, व्यायामशाळा नियम व अटींसह खुल्या करण्याची परवानगी दसऱ्याच्या मुहूर्तावर दिली आहे. यामुळे जीम प्रेमी आणि व्यावसायिक सुखावले आहेत, परंतु महाराष्ट्राचा पारंपारिक रांगडा खेळ असलेला कुस्तीचे आखाडे, तालमी खुले करण्यास शासनाची परवानगी मिळालेली नाही. कुस्तीच्या स्पर्धा तसेच आखाडे सुरु करावेत अशी मागणी पैलवान वर्गाकडून होत आहे. लॉकडाऊन काळात लोकांच्या जगण्याचे चक्र थांबले. कुस्ती पंढरी कोल्हापूरसह राज्यातल्या आखाड्यांना टाळे लागले.पैलवानांच्या शड्डूचा आवाज थांबला. मल्लांना गावाकडे परतावे लागले. कुस्तीचे फडही बंद झाल्याने अनेकांची कुस्ती थांबली.सध्या लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कुस्ती आखाडे, तसेच कुस्ती स्पर्धा बंद असल्याने पैलवान अडचणीत आहेत.खुराकाला पैसे नाहीत.अन्‌ खुराकाची सोय झाली तरी सराव कुठे करायचा? असा दुहेरी प्रश्न त्यांच्या समोर आहे. शासनाला संसर्गाची भिती, पण... निवासी आखाड्यात पैलवान एकत्र राहतात. कुस्ती हा थेट बॉडी टू बॉडी कॉन्टॅक्‍टचा खेळ असल्याने संसर्गाची भिती अधिक असते.परंतु आखाड्यातल्या मल्लांना बाहेर फिरण्याची मुभा कमी असते. बाहेरील लोकांशी मल्लांचा संपर्क कमी येतो. आखाडा व्यवस्थापकांना बाहेरून सरावासाठी येणाऱ्या मल्लांची तपासणी करत मर्यादीत मल्लांना प्रवेश देता येऊ शकतो. या संदर्भात कुस्ती संघटना प्रशासनास काही दिवसापासून राज्यभर निवेदन देत आहेत. परंतु राज्यशासन आखाड्यांच्या बाबतीत भूमिका घेताना दिसून येत नाही. कुस्ती स्पर्धा सुरु होण्याची गरज... तब्बल सहा महिन्यापासून पैलवान कुस्तीपासून दुरावले आहेत. फड बंद असल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या मल्लांची आर्थिक बाजू चांगली आहे. त्यांचा खुराक सराव सुरु आहे. परंतु गरीब पैलवानांना पैसे नसल्याने खुराक बंद करत कुस्ती बंद करण्याची वेळ आली आहे. आयपीएलच्या धर्तीवर प्रेक्षक विरहीत ऑनलाईन कुस्ती स्पर्धेचा प्रयोग सध्या पुढे येत आहे. मोजक्‍या लोकांसह सर्व नियमांचे पालन करुन या स्पर्धा होऊ शकतात. यासाठी शासन आणि प्रायोजक मंडळीची गरज आहे. कुस्ती, पैलवानकी टिकण्यासाठी परत आखाडे, मैदाने, स्पर्धा सुरु होणे गरजेचे आहे. कुस्तीच्या सरावातला खंड मल्लांची कुस्ती संपवू शकतो. फड सुरु झाले तर पैलवानांना चार पैसे मिळतील. कोल्हापुरात राज्यभरातून मल्ल सरावासाठी येतात पण ते थांबले आहेत. तरी हवी ती काळजी घेवून हे सुरु व्हावे. - विश्वास हारुगले, वस्ताद - गंगावेश तालीम.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2JhKDmX

No comments:

Post a Comment