परप्रांतीय मूळ गावात गेल्याने भाड्याची घरे रिकामी; स्थानिकांना मोठा आर्थिक फटका  पनवेल : कोरोना काळात रोजगार बुडाल्याने परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे ते भाड्याने राहत असलेली घरे रिकामी आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील स्थानिकांना बसला आहे. सध्या सुमारे 50 टक्के खोल्या रिकाम्या आहेत.  दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात असलेल्या उद्योग-धंद्यांमुळे या ठिकाणी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीचा फायदा मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार या भागात आले आहेत. त्यांच्या वास्तव्यासाठी या भागातील स्थानिकांनी ठिकठिकाणी चाळी बांधून स्वस्त आणि परवडतील अशा भाड्यात खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेतून होतो; परंतु कोरोनामुळे परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावी गेल्याने हे स्थानिक आर्थिक संकटात सापडले आहेत.    तळोजा आणि नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र, तसेच उरण परिसरातील बंदरांवर आधारित उद्योगांमुळे रोजगारासाठी लाखोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार या भागात राहतात. सध्या 50 टक्के पेक्षा अधिक खोल्या रिकाम्या आहेत.  - कमलाकर पाटील, रहिवाशी.    अनलॉक 4.0 मुळे अपेक्षा  राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक 4.0 मुळे काही प्रमाणात उद्योग सुरू होत असल्याने परप्रांतीय कामगार पुन्हा येत आहेत. त्यामुळे भाड्याच्या खोल्या पुन्हा भरू लागतील, अशी अपेक्षा आहे.  - प्रल्हाद चौधरी, खिडूकपाडा.    नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील 6 हजार ते 20 हजारांपर्यंतच्या भाड्याची घरे मिळत आहेत. या परिसरातील ग्रामीण भागात 3 हजारांपासून घरे मिळतात. त्यामुळे आर्थिक गणिते जुळवण्याच्या उद्देशाने परप्रांतीय कामगार ग्रामीण भागातील चाळीत भाड्याने घर घेतात.  - अरुण मिश्रा, परप्रांतीय कामगार. ---------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 4, 2020

परप्रांतीय मूळ गावात गेल्याने भाड्याची घरे रिकामी; स्थानिकांना मोठा आर्थिक फटका  पनवेल : कोरोना काळात रोजगार बुडाल्याने परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे ते भाड्याने राहत असलेली घरे रिकामी आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील स्थानिकांना बसला आहे. सध्या सुमारे 50 टक्के खोल्या रिकाम्या आहेत.  दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात असलेल्या उद्योग-धंद्यांमुळे या ठिकाणी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीचा फायदा मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार या भागात आले आहेत. त्यांच्या वास्तव्यासाठी या भागातील स्थानिकांनी ठिकठिकाणी चाळी बांधून स्वस्त आणि परवडतील अशा भाड्यात खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेतून होतो; परंतु कोरोनामुळे परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावी गेल्याने हे स्थानिक आर्थिक संकटात सापडले आहेत.    तळोजा आणि नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र, तसेच उरण परिसरातील बंदरांवर आधारित उद्योगांमुळे रोजगारासाठी लाखोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार या भागात राहतात. सध्या 50 टक्के पेक्षा अधिक खोल्या रिकाम्या आहेत.  - कमलाकर पाटील, रहिवाशी.    अनलॉक 4.0 मुळे अपेक्षा  राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक 4.0 मुळे काही प्रमाणात उद्योग सुरू होत असल्याने परप्रांतीय कामगार पुन्हा येत आहेत. त्यामुळे भाड्याच्या खोल्या पुन्हा भरू लागतील, अशी अपेक्षा आहे.  - प्रल्हाद चौधरी, खिडूकपाडा.    नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील 6 हजार ते 20 हजारांपर्यंतच्या भाड्याची घरे मिळत आहेत. या परिसरातील ग्रामीण भागात 3 हजारांपासून घरे मिळतात. त्यामुळे आर्थिक गणिते जुळवण्याच्या उद्देशाने परप्रांतीय कामगार ग्रामीण भागातील चाळीत भाड्याने घर घेतात.  - अरुण मिश्रा, परप्रांतीय कामगार. ---------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/356HSO9

No comments:

Post a Comment