महाराष्ट्रामध्ये केवळ नागपुरात का काढली जाते मारबत; काय आहे इतिहास, जाणून घ्या सविस्तर नागपूर : समाजातील कुप्रथा, भ्रष्टाचार, अत्याचारावर प्रहार करण्यासाठी निमित्त असलेल्या देशातील एकमेव मारबत उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गेल्या १४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पिवळी, काळी मारबत आणि समाजातील वाईट बाबींवर प्रहार करणाऱ्या मारबत, बडग्यांची निघणारी मिरवणूक रद्द करण्यात आली. साथरोग प्रतिबंधक कायद्यामुळे केवळ दहनाची परवानगी मागण्यात आली असली तरी नागरिकांच्या संभाव्य गर्दीमुळे ती मिळण्याची शक्यता कमी आहे. विदर्भ, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात मारबतीची प्रथा केवळ नागपुरात आहे. यंदा या प्रथेत खंड पडत असला तरी मारबतीचा इतिहास आणि त्यामागील आख्यायिका जाणून घेणे गरजेचे ठरते. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याला काळी व पिवळी मारबतीसह शहरात बडग्याचीही मिरवणूक काढण्यात येते. शहराच्या संस्कृतीचे प्रतीक ठरलेला मारबत उत्सवाचा यंदा नागपूरकरांंना आनंद लुटता येणार नाही. शहरात साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. महत्त्वाची बातमी - ठाकरे सरकार हिंमत असेल तर माजी आमदारांवर ही कारवाई करून दाखवा...   शहराच्या हद्दीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शहराबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी आहे. शहरातील नागरिकांना ते वारंवार एकत्र येऊ नये, गर्दी टाळावी, असे आवाहन करीत आहे. त्यामुळे या उत्सवाला ते परवानगी देणार नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी होणारी गर्दी, कर्णकर्कश संगीत, विविध नृत्यावर ठेका धरणारी तरुणाई, या उत्साहवर्धक सोहळ्याला नागपूरकरांना मुकावे लागणार आहे. समाजातील वाईट प्रथा, रुढींवर प्रहार करण्यासोबतच रोगराईची देवता म्हणून मारबतीची पूजा केली जाते. परंतु यंदा मिरवणुकीला परवानगी नाही. पिवळी मारबत काढणाऱ्या तऱ्हाणे तेली समाजातर्फे पोलिस उपायुक्तांना मारबतीचे दहन करण्याची परवानगी मागितली आहे. परंतु शहराबाबत निर्णयासाठी मनपा आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यासंबंधी दहनाची परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. वर्षानुवर्षांपासूनची परंपरा खंडित होऊ नये यासाठी पिवळ्या मारबतीचे नाईक तलाव परिसरात दहन करण्याचे ठरविले आहे. अधिक वाचा - राजकारण : शिवसेनेत काँग्रेसी कल्चरचा शिरकाव; निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता, वाचा...   अशी झाली स्थापनेला सुरुवात... इंग्रज शासनाच्या अत्याचारास कंटाळलेले प्रत्येक धर्माचे, समाजाचे युवक, प्रौढ या देशातून इंग्रजांना कसे हाकलायचे याच विचारात असायचे. परंतु, इंग्रजांच्या दडपशाही व अत्याचारी धोरणामुळे जनतेला एकत्र येण्यावर बंदी होती. परंतु, धार्मिक कार्यास थोडीफार मुभा होती. याच गोष्टीचा फायदा घेत तऱ्हाने तेली समाजातील नागरिकांनी इंग्रजांना या देशातून हाकलून लावण्याचा चंगच बांधला होता. आपल्या भारताला लागलेली इंग्रजांची कीड काढण्यासाठी समाजातील लोकांना एकत्र आणण्यासोबतच समाजबांधणीचे काम केले. धार्मिक कार्यातून इंग्रज सरकारवर प्रहार करण्याच्या उद्देशाने मारबतीच्या माध्यमातून इंग्रजांना लक्ष्य करणे सुरू केले. त्याच उद्देशाने नागपूर येथील बारदाना मार्केटमधून निघणाऱ्या काळ्या मारबतीची सुरुवात १८८० म्हणजेच १४० वर्षांपूर्वी झाली. तर मस्कासाथ येथील तऱ्हाणे तेली समाजाच्या पिवळ्या मारबतीची मिरवणूक १८८४ म्हणजेच १३६ वर्षांपासून सुरू आहे. आजवरच्या इतिहासात कुठल्याही कारणाने हा उत्सव रद्द झाला नाही.   ‘कोरोनाला घेऊन जा गे मारबत’ घोषणेला मुकणार दरवर्षी ‘घेऊन जा गे मारबत`च्या घोषणांनी दुमदुमणारे नागपूर आणि या घोषणा देणारे व ऐकणऱ्यांना पुढील वर्षीच दिलासा मिळणार आहे. समाजातील कुप्रथांसह सद्यःस्थितीतील रोगराई, दृष्ट प्रवृत्तीला घेऊन जागे मारबत अशा घोषणा दिल्या जातात. यंदा कोरोनाला घेऊन जा गे मारबत, अशा घोषणांची शक्यता होती. परंतु मिरवणूक निघणार नसल्याने तसेच दहनासाठीही मारबत रस्त्यावर येणार की नाही, याबाबत शंका असल्याने या घोषणेला नागपूरकर मुकणार आहे.   रोगराईची देवता... पावसाळ्याचे दिवस रोगराईचे असतात. डास, माशा यांचा प्रादूर्भाव वाढतो. लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. श्रावण संपताच पावसाचा जोर कमी होतो, अशावेळी खोकला, सर्दी, ताप घेऊन जा गे मारबत' अशा घोषणा दिल्या जातात. मारबतीच्या दर्शनासाठी अनेक जण नवजात बालकांना घेऊन जातात. बाळाचे तोंड देवीच्या स्तनाला लावण्याचीदेखील प्रथा आहे.   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मिरवणुकीचा बेत नाही. नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता आम्हीच तो निर्णय घेतला. मनपा आयुक्तांना परवानगी मागितली नसताना ते नाकारल्याचे सांगतात. परवानगी मागितली नसताना देण्याचा प्रश्न येतोच कुठे? जानेवारीपासून पिवळी मारबत तयार करण्यात आली. त्यामुळे तिचे दहन व्हावे, एवढी इच्छा आहे. याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. पोलिसांनी परवानगी न दिल्यास त्यांनी मारबतीचे सुरक्षेत दहन करावे. पिवळी मारबत चौक ते दहनस्थळ असलेल्या नाईक तलावापर्यंतचा मार्ग दहा मिनिटांचा आहे. त्यामुळे पोलिस परवानगी देतील, अशी अपेक्षा आहे. - प्रकाश गौरकर, अध्यक्ष, तऱ्हाणे तेली समाज व आयोजक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 17, 2020

महाराष्ट्रामध्ये केवळ नागपुरात का काढली जाते मारबत; काय आहे इतिहास, जाणून घ्या सविस्तर नागपूर : समाजातील कुप्रथा, भ्रष्टाचार, अत्याचारावर प्रहार करण्यासाठी निमित्त असलेल्या देशातील एकमेव मारबत उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गेल्या १४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पिवळी, काळी मारबत आणि समाजातील वाईट बाबींवर प्रहार करणाऱ्या मारबत, बडग्यांची निघणारी मिरवणूक रद्द करण्यात आली. साथरोग प्रतिबंधक कायद्यामुळे केवळ दहनाची परवानगी मागण्यात आली असली तरी नागरिकांच्या संभाव्य गर्दीमुळे ती मिळण्याची शक्यता कमी आहे. विदर्भ, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात मारबतीची प्रथा केवळ नागपुरात आहे. यंदा या प्रथेत खंड पडत असला तरी मारबतीचा इतिहास आणि त्यामागील आख्यायिका जाणून घेणे गरजेचे ठरते. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याला काळी व पिवळी मारबतीसह शहरात बडग्याचीही मिरवणूक काढण्यात येते. शहराच्या संस्कृतीचे प्रतीक ठरलेला मारबत उत्सवाचा यंदा नागपूरकरांंना आनंद लुटता येणार नाही. शहरात साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. महत्त्वाची बातमी - ठाकरे सरकार हिंमत असेल तर माजी आमदारांवर ही कारवाई करून दाखवा...   शहराच्या हद्दीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शहराबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी आहे. शहरातील नागरिकांना ते वारंवार एकत्र येऊ नये, गर्दी टाळावी, असे आवाहन करीत आहे. त्यामुळे या उत्सवाला ते परवानगी देणार नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी होणारी गर्दी, कर्णकर्कश संगीत, विविध नृत्यावर ठेका धरणारी तरुणाई, या उत्साहवर्धक सोहळ्याला नागपूरकरांना मुकावे लागणार आहे. समाजातील वाईट प्रथा, रुढींवर प्रहार करण्यासोबतच रोगराईची देवता म्हणून मारबतीची पूजा केली जाते. परंतु यंदा मिरवणुकीला परवानगी नाही. पिवळी मारबत काढणाऱ्या तऱ्हाणे तेली समाजातर्फे पोलिस उपायुक्तांना मारबतीचे दहन करण्याची परवानगी मागितली आहे. परंतु शहराबाबत निर्णयासाठी मनपा आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यासंबंधी दहनाची परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. वर्षानुवर्षांपासूनची परंपरा खंडित होऊ नये यासाठी पिवळ्या मारबतीचे नाईक तलाव परिसरात दहन करण्याचे ठरविले आहे. अधिक वाचा - राजकारण : शिवसेनेत काँग्रेसी कल्चरचा शिरकाव; निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता, वाचा...   अशी झाली स्थापनेला सुरुवात... इंग्रज शासनाच्या अत्याचारास कंटाळलेले प्रत्येक धर्माचे, समाजाचे युवक, प्रौढ या देशातून इंग्रजांना कसे हाकलायचे याच विचारात असायचे. परंतु, इंग्रजांच्या दडपशाही व अत्याचारी धोरणामुळे जनतेला एकत्र येण्यावर बंदी होती. परंतु, धार्मिक कार्यास थोडीफार मुभा होती. याच गोष्टीचा फायदा घेत तऱ्हाने तेली समाजातील नागरिकांनी इंग्रजांना या देशातून हाकलून लावण्याचा चंगच बांधला होता. आपल्या भारताला लागलेली इंग्रजांची कीड काढण्यासाठी समाजातील लोकांना एकत्र आणण्यासोबतच समाजबांधणीचे काम केले. धार्मिक कार्यातून इंग्रज सरकारवर प्रहार करण्याच्या उद्देशाने मारबतीच्या माध्यमातून इंग्रजांना लक्ष्य करणे सुरू केले. त्याच उद्देशाने नागपूर येथील बारदाना मार्केटमधून निघणाऱ्या काळ्या मारबतीची सुरुवात १८८० म्हणजेच १४० वर्षांपूर्वी झाली. तर मस्कासाथ येथील तऱ्हाणे तेली समाजाच्या पिवळ्या मारबतीची मिरवणूक १८८४ म्हणजेच १३६ वर्षांपासून सुरू आहे. आजवरच्या इतिहासात कुठल्याही कारणाने हा उत्सव रद्द झाला नाही.   ‘कोरोनाला घेऊन जा गे मारबत’ घोषणेला मुकणार दरवर्षी ‘घेऊन जा गे मारबत`च्या घोषणांनी दुमदुमणारे नागपूर आणि या घोषणा देणारे व ऐकणऱ्यांना पुढील वर्षीच दिलासा मिळणार आहे. समाजातील कुप्रथांसह सद्यःस्थितीतील रोगराई, दृष्ट प्रवृत्तीला घेऊन जागे मारबत अशा घोषणा दिल्या जातात. यंदा कोरोनाला घेऊन जा गे मारबत, अशा घोषणांची शक्यता होती. परंतु मिरवणूक निघणार नसल्याने तसेच दहनासाठीही मारबत रस्त्यावर येणार की नाही, याबाबत शंका असल्याने या घोषणेला नागपूरकर मुकणार आहे.   रोगराईची देवता... पावसाळ्याचे दिवस रोगराईचे असतात. डास, माशा यांचा प्रादूर्भाव वाढतो. लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. श्रावण संपताच पावसाचा जोर कमी होतो, अशावेळी खोकला, सर्दी, ताप घेऊन जा गे मारबत' अशा घोषणा दिल्या जातात. मारबतीच्या दर्शनासाठी अनेक जण नवजात बालकांना घेऊन जातात. बाळाचे तोंड देवीच्या स्तनाला लावण्याचीदेखील प्रथा आहे.   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मिरवणुकीचा बेत नाही. नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता आम्हीच तो निर्णय घेतला. मनपा आयुक्तांना परवानगी मागितली नसताना ते नाकारल्याचे सांगतात. परवानगी मागितली नसताना देण्याचा प्रश्न येतोच कुठे? जानेवारीपासून पिवळी मारबत तयार करण्यात आली. त्यामुळे तिचे दहन व्हावे, एवढी इच्छा आहे. याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. पोलिसांनी परवानगी न दिल्यास त्यांनी मारबतीचे सुरक्षेत दहन करावे. पिवळी मारबत चौक ते दहनस्थळ असलेल्या नाईक तलावापर्यंतचा मार्ग दहा मिनिटांचा आहे. त्यामुळे पोलिस परवानगी देतील, अशी अपेक्षा आहे. - प्रकाश गौरकर, अध्यक्ष, तऱ्हाणे तेली समाज व आयोजक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3h7rArA

No comments:

Post a Comment