घरबसल्या फेरफार नोंदीसाठी करा आता ऑनलाईन अर्ज कोरेगाव भीमा - सामान्य शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यात अतिशय क्लिष्ट वाटणारी फेरफार नोंदीची प्रक्रीया आता शासनाच्या नव्या ई हक्क प्रणालीमुळे अधिक सोपी झाली असून आता फेरफार नोंदीसाठी घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्याने आजवर सुमारे २० हजार जणांनी या प्रणालीद्वारे अर्ज दाखल केल्याची माहिती राज्याचे ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याबाबत माहिती देताना श्री जगताप म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अपर मुख्य सचिव श्री. करीर, आणि राज्याचे जमाबंदी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील ई-फेरफार प्रकल्प आता अंतिम टप्प्यावर आला आहे. या टप्प्यात सामान्य जनतेसाठी शासनाने ई- हक्क प्रणाली ही एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे कोणत्याही सामान्य माणसाला जमीन खरेदी केल्यानंतर किंवा घरातील कर्ता पुरुष मयत झाल्यानंतर त्याची वारस नोंद  अथवा  कर्जानंतर बोजाची अथवा कर्जफेडीनंतर बोजा कमी केल्याची नोंद असो, प्रत्येक वेळी तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावे लागतात. यापूर्वी या  क्लिष्ट कामात सर्वसामान्यांना त्रास व वेळही जात होता. पानशेत धरणामध्ये बेकायदा बोटींग; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आता मात्र ई- हक्क प्रणाली द्वारे घरबसल्या फेरफार नोंद घेण्याच्या दृष्टीने ऑनलाईन अर्ज  करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.  आजवर २० हजार जणांनी अर्ज दाखल केले असून त्याची प्रक्रिया देखील  वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू आहे. पुणे-मुंबईतील कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन; टाटा-सिप्लाचा उपक्रम​           या प्रणालीद्वारे वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अज्ञान पालनकर्ता कमी करणे, एकत्र कुटुंब पुढारी नोंद करणे किंवा कमी करणे तसेच इ-करार दाखल करणे, बोजा दाखल करणे अथवा कमी करणे अशा आठ  प्रकारच्या कामांचे अर्ज आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वर सुद्धा करता येतील. या नोंदीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की बँकेचे पत्र, गहाण खताची कॉपी, सोसायटीची इकरार कॉपी, वारस नोंदीसाठीचे प्रतिज्ञापत्र किंवा अनुषंगिक कागदपत्रे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची सुविधाही या प्रणालीमध्ये आहे. या कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदाराला एप्लीकेशन आयडी सह ऑनलाइन पोहोच देण्याचीही व्यवस्था या प्रणालीत आहे. या आधारे अर्जाच्या सध्याच्या स्टेटसचाही पडताळाही अर्जदाराला घेता येईल.   खासगी क्‍लासेसला परवानगी मिळणार; पुणे महापालिका आखणार नवीन नियमावली याकामी शासनाचे महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र, संग्राम केंद्र किंवा आपले सरकार  केंद्रांची मदतही या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्यांना होणार आहे.  त्यामुळे तलाठी कार्यालय बंद असले तरीही सर्वसामान्य माणसाला आपल्या स्वतःच्या नावाने अशा प्रकारचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणे आता शक्य झाले आहे. तसेच मंडलाधिकारी यांनी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच हा फेरफार अर्ज प्रमाणित करायचा आहे, जेणेकरून पेपर प्रमाणित झाल्यानंतर अद्ययावत सातबारा ही आपल्याला ऑनलाइन पद्धतीने https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध असणार आहे तसेच डिजिटल स्वाक्षरी सातबारा देखील https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याना आता तलाठी अथवा मंडल कार्यालयाकडे वारंवार चकरा मारण्याची गरज आता राहिलेली नाही. या सुविधेचा अधिकाधिक वापर नागरीकांनी करावा, असेही आवाहन रामदास जगताप यांनी केले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 31, 2020

घरबसल्या फेरफार नोंदीसाठी करा आता ऑनलाईन अर्ज कोरेगाव भीमा - सामान्य शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यात अतिशय क्लिष्ट वाटणारी फेरफार नोंदीची प्रक्रीया आता शासनाच्या नव्या ई हक्क प्रणालीमुळे अधिक सोपी झाली असून आता फेरफार नोंदीसाठी घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्याने आजवर सुमारे २० हजार जणांनी या प्रणालीद्वारे अर्ज दाखल केल्याची माहिती राज्याचे ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याबाबत माहिती देताना श्री जगताप म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अपर मुख्य सचिव श्री. करीर, आणि राज्याचे जमाबंदी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील ई-फेरफार प्रकल्प आता अंतिम टप्प्यावर आला आहे. या टप्प्यात सामान्य जनतेसाठी शासनाने ई- हक्क प्रणाली ही एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे कोणत्याही सामान्य माणसाला जमीन खरेदी केल्यानंतर किंवा घरातील कर्ता पुरुष मयत झाल्यानंतर त्याची वारस नोंद  अथवा  कर्जानंतर बोजाची अथवा कर्जफेडीनंतर बोजा कमी केल्याची नोंद असो, प्रत्येक वेळी तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावे लागतात. यापूर्वी या  क्लिष्ट कामात सर्वसामान्यांना त्रास व वेळही जात होता. पानशेत धरणामध्ये बेकायदा बोटींग; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आता मात्र ई- हक्क प्रणाली द्वारे घरबसल्या फेरफार नोंद घेण्याच्या दृष्टीने ऑनलाईन अर्ज  करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.  आजवर २० हजार जणांनी अर्ज दाखल केले असून त्याची प्रक्रिया देखील  वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू आहे. पुणे-मुंबईतील कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन; टाटा-सिप्लाचा उपक्रम​           या प्रणालीद्वारे वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अज्ञान पालनकर्ता कमी करणे, एकत्र कुटुंब पुढारी नोंद करणे किंवा कमी करणे तसेच इ-करार दाखल करणे, बोजा दाखल करणे अथवा कमी करणे अशा आठ  प्रकारच्या कामांचे अर्ज आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वर सुद्धा करता येतील. या नोंदीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की बँकेचे पत्र, गहाण खताची कॉपी, सोसायटीची इकरार कॉपी, वारस नोंदीसाठीचे प्रतिज्ञापत्र किंवा अनुषंगिक कागदपत्रे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची सुविधाही या प्रणालीमध्ये आहे. या कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदाराला एप्लीकेशन आयडी सह ऑनलाइन पोहोच देण्याचीही व्यवस्था या प्रणालीत आहे. या आधारे अर्जाच्या सध्याच्या स्टेटसचाही पडताळाही अर्जदाराला घेता येईल.   खासगी क्‍लासेसला परवानगी मिळणार; पुणे महापालिका आखणार नवीन नियमावली याकामी शासनाचे महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र, संग्राम केंद्र किंवा आपले सरकार  केंद्रांची मदतही या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्यांना होणार आहे.  त्यामुळे तलाठी कार्यालय बंद असले तरीही सर्वसामान्य माणसाला आपल्या स्वतःच्या नावाने अशा प्रकारचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणे आता शक्य झाले आहे. तसेच मंडलाधिकारी यांनी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच हा फेरफार अर्ज प्रमाणित करायचा आहे, जेणेकरून पेपर प्रमाणित झाल्यानंतर अद्ययावत सातबारा ही आपल्याला ऑनलाइन पद्धतीने https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध असणार आहे तसेच डिजिटल स्वाक्षरी सातबारा देखील https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याना आता तलाठी अथवा मंडल कार्यालयाकडे वारंवार चकरा मारण्याची गरज आता राहिलेली नाही. या सुविधेचा अधिकाधिक वापर नागरीकांनी करावा, असेही आवाहन रामदास जगताप यांनी केले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32MHCku

No comments:

Post a Comment