केंद्रीय प्रवेश समितीचा घोळ चव्हाट्यावर  नागपूर : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत 15 जुलैपासून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वीच केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रक्रियेवर संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी आक्षेप घेतला असून काही विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयांना मार्गदर्शन केंद्र वाटप केल्याचा आरोप करीत प्रक्रियेवर शाळा संचालक, मुख्याध्यापक आणि खुद्द केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय प्रवेश समितीचा घोळ चव्हाट्यावर आला आहे.  प्रवेश प्रक्रियेदरम्यान क्‍लासेसशी टायअप असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना फायदा पोहचविण्याच्या अनुषंगाने प्रत्येकवेळी समितीमार्फत काम केल्या जात असल्याचा आरोप होत आला आहे. त्यातूनच यावेळीही समितीद्वारे काही विशिष्ट महाविद्यालयांना बोलावून घेत, त्यांना मार्गदर्शन केंद्राचे वाटप करण्यात आल्याचे समजते. मार्गदर्शन केंद्रावर अर्ज करणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना कौन्सिलींगचे काम केल्या जाणार आहे. याशिवाय त्यांना "पीन' क्रमांक देण्यात येणार आहे.  मात्र, या विद्यार्थ्यांचा "पिन' क्रमांक मार्गदर्शन केंद्र असलेल्या शाळांना "ऍक्‍सेस' करणे शक्‍य होणार असल्याचेही समजते. त्यामुळे या शाळांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शन केंद्रावर समितीचे सदस्य प्रा. राजेंद्र झाडे, राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे रविंद्र फडणवीस, मुख्याध्यापक संघाचे किशोर मासूरकर, विजुक्‍टाचे अशोक गव्हाणकर, विलास करडे यांनी आक्षेप नोंदविला आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान गेल्यावर्षी काही कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या मार्गदर्शन केंद्रावर घोळ करण्यात आल्याच्या बऱ्याच तक्रारी समितीकडे प्राप्त झालेल्या होत्या. आता पुन्हा एकदा मार्गदर्शन केंद्र मिळवून काही शाळा अशाच प्रकारचा घोळ तर करणार नाही ना प्रश्‍न निर्माण होतोय.   हेही वाचा : सत्ताधारी पडले तुकाराम मुंढेंवर भारी; दिला 'स्मार्ट' धक्‍का कुठले निकष लावले कळेना  मार्गदर्शन केंद्र कुठल्या निकषानुसार देण्यात आले हे कळायला मार्ग नाही. यासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत कुठलीच प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. शिवाय ज्यांनी मागीतले, त्या शाळांमध्ये खरोखरच सोयीसुविधा आहेत काय, याची तपासणीही करण्यात आलेली नाही. मागील वर्षी काही कनिष्ठ महाविद्यालयांनी या केंद्रासाठी अर्ज केले होते. त्यांचा विचार या वाटपात करण्यात आला नसल्याचे दिसते.    मार्गदर्शन केंद्र वाटपाचे निकष काय, हे कळत नाही. केंद्रीय प्रवेश समितीने असेच कुणालाही मार्गदर्शन केंद्रावे वाटप करणे चुकीचे आहे. त्यामुळेच हा आक्षेप नोंदविला आहे.  -रवींद्र फडणवीस, कार्यवाह, राज्य शिक्षण संस्था महामंडळ.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 10, 2020

केंद्रीय प्रवेश समितीचा घोळ चव्हाट्यावर  नागपूर : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत 15 जुलैपासून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वीच केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रक्रियेवर संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी आक्षेप घेतला असून काही विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयांना मार्गदर्शन केंद्र वाटप केल्याचा आरोप करीत प्रक्रियेवर शाळा संचालक, मुख्याध्यापक आणि खुद्द केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय प्रवेश समितीचा घोळ चव्हाट्यावर आला आहे.  प्रवेश प्रक्रियेदरम्यान क्‍लासेसशी टायअप असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना फायदा पोहचविण्याच्या अनुषंगाने प्रत्येकवेळी समितीमार्फत काम केल्या जात असल्याचा आरोप होत आला आहे. त्यातूनच यावेळीही समितीद्वारे काही विशिष्ट महाविद्यालयांना बोलावून घेत, त्यांना मार्गदर्शन केंद्राचे वाटप करण्यात आल्याचे समजते. मार्गदर्शन केंद्रावर अर्ज करणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना कौन्सिलींगचे काम केल्या जाणार आहे. याशिवाय त्यांना "पीन' क्रमांक देण्यात येणार आहे.  मात्र, या विद्यार्थ्यांचा "पिन' क्रमांक मार्गदर्शन केंद्र असलेल्या शाळांना "ऍक्‍सेस' करणे शक्‍य होणार असल्याचेही समजते. त्यामुळे या शाळांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शन केंद्रावर समितीचे सदस्य प्रा. राजेंद्र झाडे, राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे रविंद्र फडणवीस, मुख्याध्यापक संघाचे किशोर मासूरकर, विजुक्‍टाचे अशोक गव्हाणकर, विलास करडे यांनी आक्षेप नोंदविला आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान गेल्यावर्षी काही कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या मार्गदर्शन केंद्रावर घोळ करण्यात आल्याच्या बऱ्याच तक्रारी समितीकडे प्राप्त झालेल्या होत्या. आता पुन्हा एकदा मार्गदर्शन केंद्र मिळवून काही शाळा अशाच प्रकारचा घोळ तर करणार नाही ना प्रश्‍न निर्माण होतोय.   हेही वाचा : सत्ताधारी पडले तुकाराम मुंढेंवर भारी; दिला 'स्मार्ट' धक्‍का कुठले निकष लावले कळेना  मार्गदर्शन केंद्र कुठल्या निकषानुसार देण्यात आले हे कळायला मार्ग नाही. यासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत कुठलीच प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. शिवाय ज्यांनी मागीतले, त्या शाळांमध्ये खरोखरच सोयीसुविधा आहेत काय, याची तपासणीही करण्यात आलेली नाही. मागील वर्षी काही कनिष्ठ महाविद्यालयांनी या केंद्रासाठी अर्ज केले होते. त्यांचा विचार या वाटपात करण्यात आला नसल्याचे दिसते.    मार्गदर्शन केंद्र वाटपाचे निकष काय, हे कळत नाही. केंद्रीय प्रवेश समितीने असेच कुणालाही मार्गदर्शन केंद्रावे वाटप करणे चुकीचे आहे. त्यामुळेच हा आक्षेप नोंदविला आहे.  -रवींद्र फडणवीस, कार्यवाह, राज्य शिक्षण संस्था महामंडळ.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3iKuGCW

No comments:

Post a Comment